Latest Post

बेलापूर  ( प्रतिनिधी ) -  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.           डॉ.कोकाटे यांना यापूर्वीही अठरा पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना अध्यापन क्षेत्रातील २१ वर्षांचा अध्यापन अनुभव असून गेल्या दोन वर्षांपासून त्या  प्रभारी प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे प्रशासकीय काम पाहत आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या व ग्रंथ अन्वेषक आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासकीय, शैक्षणिक, साहित्यिक,संशोधन,महिला सक्षमीकरण,सामाजिक, सांस्कृतिक  या विविध क्षेत्रात केलेल्या या सेवा कार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान केला गेला आहे. स्व.पै.किसनराव नाना डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री. नवनाथ युवा मंडळ,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.या कार्यक्रमात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे व कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.आझादी का अमृत महोत्सवा निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धा घेण्यात आल्या.पं. दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त मेगा रन स्पर्धा घेण्यात आल्या . मतदार जागृती अभियाना अंतर्गत निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखूसेवन विषय दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणावर ऑनलाइन घरगुती देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभही आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला पारनेरचे आमदार  निलेश लंके,अभिनेते मोहनराव गटणे,नाना डोंगरे, डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले..या कार्यक्रमात लोकनेते निलेश लंके यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा गुंड,दिलीप पवार, रामदास भोर,संभाजीराजे दहातोंडे,प्रशांत गायकवाड,ज्ञानदेव पांडूळे,आबापाटील सोनवणे, सुनिल पैठणे, डॉ.शैलेंद्र भणगे,रुपाली जाधव आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम  संपन्न झाला ..सदर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन निमगाव वाघा येथिल डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा नाना किसन डोंगरे यांनी केले तर नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचे रुग्ण वाढु लागल्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव कारेगावा बेलापुर खूर्द ही तीन गावे दिनांक ४ आँक्टोंबर पासुन १० आँक्टोंबर पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले  यांनी दिले आहे  श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव बेलापुर खूर्द कारेगाव या तीन गावात १० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होवु नये या करीता खबरदारीचा उपाय म्हणून ही तीन गावे पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे आपल्या आदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे की  अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोबीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.ज्या अर्थी, संदर्भ क्र.४ अन्वये राज्यातील कोविड -19 ची दुसरी लाट आटोक्यात येत असून अदयापहीको विड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकामी ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन या कार्यालयाकडील संदर्भ क्र.६ चे आदेशान्वये आहमदनगर जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजनांबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्याअर्थी, जिन्हयामध्ये दैनंदीन रित्या 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधीत रुग्ण संख्या आढळून येत आहे. तसेच जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. संदर्भ क्र. 7 अन्वये जिल्हयातील 20 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये Containment Zone जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त देणे, जनता कफ्युच्या माध्यमातून गावबंदी करणे, कोविड ऑपरोप्रायट बिहेवीअरची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, ग्रेसीव्ह टेस्टिंग करणे, गावातील नागरिकांचे प्राधान्याने 100 टक्के लसीकरण करणे बाबतची तपासणी करणेकामी अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली होती. ज्याअर्थी, संदर्भ क्र. 8 अन्वये बैठकीमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रूग्णसंख्या असणाया गावांच्या ठिकाणी Containment Zone घोषीत करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत घटना व्यवस्थापक यांना निर्देशीत करण्यात आलेले होते. तथापी, 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असणा-या गावांमध्ये Containment Zone घोषीत करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. त्यास्तव, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडील दिनांक 02/10/2021 रोजीच्या जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुजणसंख्या असणा-या गावांध्या प्राप्त यादीतील गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअथीं, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत माणसंख्या असणा-या खालील तक्त्यात गेल्या तालुक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 04/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून दिनांक 13/10/12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत या आदेशाद्वारे आदेशीत करीत आहे. सदरच्या क्षेत्रामध्ये जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर रोखण्याकामी गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद करणे, क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत सणसंख्या असणा-या. सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. 4. Entry - Exit points चे ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवा व जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात यावा. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणा-या वाहनांच्या चालकांचे विलगीकरण करावे. विलगीकरण कक्षांची व्यवस्था स्थानिक प्राधिकरणाने करावी,Entry - Evil points चे ठिकाणी ये-जा करणा-या व्यक्तींची थर्मल स्कॅनरदबारे स्क्रिनिंग करण्यात यावी.कंट्रोल रूम मध्ये रजिस्टर ठेवून प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा होणे कामी सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 8.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहिल. संबंधीत किराणा दुकान मालक व कामगार यांनी कोबीड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे तसेच दुकानाचे मालक, कर्मचारी व ग्राहकांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. सदर बाबींचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास तहसिलदार यांनी सदरचे दुकान 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत बंद करावे,दुध संकलन केंद्राव्दारे शेतक-यांच्या निवास वा दुधाळ जनावरे असलेल्या ठिकाणावरुन दुध संकलन करण्यात यावे. संबंधीतांनी मास्कचा व सॉनिटायझरचा वापर करणे तसेच सामाजीक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहिल. दुधाचे व्दार संकलन शक्य नसल्यास संकलन केंद्राच्या ठिकाणी कोवौड सुसंगत वर्तनाचं पालन करुन दूध संकलन कराने, तहसिलदार यांनी सदर संकलन केंद्रावर कोवीड सुसंगत वर्तनाचे पालन होणेबाबत उपनिबंधक (सहकार) यांचे सहाय्याने योग्य व्यक्तीची नेमणूक करावी व सदर ठिकाणी कोबीड सुसंगत वर्तनाचे उल्लंघन आढळल्यास अशा संकलन केंद्रास पुढील 30 दिवस दुध संकलनास मनाई करावी,उपरोक्त गावाच्या ठिकाणच्या सर्व शाळा व धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील..पोलीस विभागाने स्थानिक प्राधिकरणांच्या मदतीने सर्व पर्यायी रस्ते बंद कस्न Entry - exit points Movabie Baricades दद्वारे खुले ठेवावेत. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्वप्रकारच्या वाहनांना सदरचे गाव ओलांडून पूढे जावयाचे असल्यास सदर गावामध्ये न थांबण्याच्या अटीवरपूढे जाण्यास परवानगी राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निबंध आणणे आवश्यक ठरले आहे. तहसिलदार यांनी कॉन्टॅक्ट ट्रेनिंग करणे व कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग करणेकामी  नेमणुक करावी. कोबीड रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींनी तपासणीस प्रशासनास सहकार्य करणे बंधनकारक राहील...उपरोक्त गावाच्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाने आरोग्य विभागाचे मदतीने 18 वर्षावरील व्यक्तीचे प्राधान्याने लसीकरण करावे,कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत तसेच गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रैनी, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील..उपरोक्त गावाच्या ठिकाणी लग्न समारंभास मनाई राहील.उपरोक्त गावाच्या ठिकाणी तहसिलदार यांना पूर्वकल्पना देवून अंत्यविधी! दशक्रिया विधी यासाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.असेही आदेशात म्हटले आहे.



बेलापूर (प्रतिनिधी)-समाजाशी एकरूप होवून सामाजिक बांधिलकी ठेवून कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीचा सत्कार व सन्मान केल्याने काम करणार्‍या व्यक्तीला उर्जा,प्रोत्साहन व पाठबळ मिळाल्याने समाज्याचे अधिकाधिक काम त्यांच्या हातुन घडत असते असे प्रतिपादन कृषी-उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी गळनिंब विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले.अध्यक्षस्थानी प्रवरा सह.बॅंकेचे व्हा.चेअरमन बापूसाहेब वडितके होते. यावेळी पद्मभूषन बाळासाहेब विखे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी लक्ष्मण रामजी चिंधे यांची तर कामगार तलाठी श्री.वायखिंडे यांची मंडलाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल नवीन कामगार तलाठी म्हणून रूजू झाल्याबद्दल सौ.नाईक मॅडम,वस्तीशाळेच्या उपमुख्यध्यापिका सौ.अंत्रे मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यामुळे तसेच पंचायत समितीच्या बचत गटाच्या गट प्रमुखपदी सौ.ज्योती कोर्‍हाळे,तसेच कृषी सहाय्यक श्री.पाटील साहेब,दिपक बेलकर,संतोष पारखे,संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्र्ट मुंबई श्रीरामपूर संघटकपदी पत्रकार संदिप शेरमाळे यांची निवड झाल्याने तसेच कुरणपूर विविध कार्य.सेवा संस्थेच्या व्हा.चेअरमन पदी पुंजाहरी चिंधे यांची निवड झाल्याने,विकास तुपे हे फॅशन हेअर कटींग मध्ये उत्तीर्ण झाल्याने यावेळी सत्कार कण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठचे मा.सिनेट सदस्य प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर,आण्णासाहेब कडनोर,इंजि.सोहम चिंधे,संजय कुदनर,डाॅ.सुनिल चिंधे,आदींची भाषणे झाली.   यावेळी मुळा प्रवरा वीज संस्थेचे मा.संचालक जिजाबा वडितके, संस्थेचे चेअरमन केशव चिंधे,सोपानराव गवळी,पोपटराव हाळनोर,देवराम बाचकर,कैलास मारकड,विष्णू चिंधे,पंढरीनाथ भोसले,रामदास भोसले,केरूनाना शिंदे,तबाजी जाटे,ग्रा.पं.सदस्य संजय शिंदे,संजय बाहूले,दिपक जाटे,विष्णू कुदनर,आण्णासाहेब वडितके,प्रकाश जाटे,गणेश शिंदे,शिवाजी कोर्‍हाळे,सुरेश पिलगर,संदिप शेंडगे,मुरलिशेठ वधवानी,सागर चिंधे,संदिप कचरे,संस्थेचे सचिव हनुमान चिंधे,आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन संस्थेचे व्हा.चेअरमन बापू वडितके यांनी तर आभार विष्णू चिंधे यांनी मांडले.


अहमदनगर-पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यामध्ये अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी धडाकेबाज कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा उध्वस्त करण्यात आलाय.

एलसीबीचे पो. नि. कटके यांच्या पथकातल्या पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक संदीप पवार, संतोष लोंढे, पो. काँ. जालिंदर माने, कमलेश पाथरुट, राहूल सोळुंके, सागर सुलाने आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. दि. १ आणि २ आक्टोबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पो. नि. कटके यांना अवैध दारुसाठ्याविषयीची माहिती मिळाली होती. या कारवाईत सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संतोष मधुकर साळवे, अनिल सिताराम विधाटे, पंडा रामभाऊ खांडवे, दत्तात्रय तिकोले, नितीन मारुती साळवे, संभाजी विठ्ठल गव्हाणे या गुन्हेगारांचा समावेश आहे.



अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) शहरातील मुख्य भागामधील कोतवाली पोलीस स्टेशन मधिल रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री एक वाजता हत्यारा सह कोतवाली पोलिसांनी अटक केली . दि .०२ / १० / २०२१ रोजी रात्री २३/३० ते दि .०३ / १० / २०२१ रोजी ०१ / ०० वाजे पावेतो कोतवाली पोलीस स्टेशन हाददीमध्ये कोंबीग अॅपरेशन चालु असतांना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना बातमी मिळाली की अहमदनगर शहरात मार्केट यार्ड भागता महात्मा फुले चौकात एक इसम हा त्याचे हातात तलवार धरून नागरीकांवर दहशत माजविज आहे व तेथील नागरीक घाबरुन गेले आहेत अशी बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी हि पोसई / जी टी इंगळे , पोना / १ ९ ०० विष्णु भागवत , पोना / १४६४ अभय कदम , पोना / ५०० नितीन गाडगे पोकॉ / १५७२ प्रमोद लहारे , पोकॉ / १७ ९ ६ सुमीत गवळी , पोकॉ / १ ९ १ ९ दिपक रोहकले . पोकॉ / सुशील वाघेला अश्याना सांगीतल्याने त्यांनी लागलीच मार्केट यार्ड भागात जावुन सदर इसमास दोन पंचा सह त्याचे हातातील तलवारी सह ताब्यात घेण्यात आले असून त्याचे कडे त्याचे नाव गावा बाबत विचार पुस केली असता त्याने त्याचे नाव दिपक सुरेश बेऱ्हाडे वय २३ वर्ष रा- सारस नगर मार्केट यार्ड त्रिमूर्ती चौक असे असल्याचे सांगीतले त्यास तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन येवून त्याचे विरुध्द गुर नं । ७२८ / २०२१ आर्म अॅक्ट ४.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन व एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे करण्यात आला आहे त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन व एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) गु.र.ना ५८ ९ / २०२० भा द वि कलम ३ ९ २ , कोतवाली पोस्टे . ०२ ) गुर नं १५ ९ ० / २०१ ९ भा द वि कलम ३ ९ २ कोतवाली पोस्टे . ०३ ) गुरनं ५१५/२०१८ भा द वि कलम ३ ९ २,२०१,३४ एम आय डी सी पोस्टे ०४ ) गुरनं ३३६ / २०१ ९ भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे सदरची कारवाई ही मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो .. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे . पुढील कारवाई कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


श्रीरामपूर ( वार्ताहर ) पञकारीता क्षेञात हल्ली  घुसखोरी वाढली असल्यामुळे  खरी पञकारीता करणाऱ्या पञकारांची अनेकदा कुचंबना होत आहे. तरी देखील  पञकार पञकारीतेचा दर्जा सांभाळण्याचा  प्रामाणिक प्रयत्न  करत असुन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना बांधील राहील असे प्रतिपादन संपादक व पञकार सेवा सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष किसनराव हासे यांनी केले                             संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या वेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे, राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रीनाथ वढणे,  तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई, तालुकाध्यक्ष  संदिप जगताप उपाध्यक्ष चंद्रकांत लांडगे, हरीभाऊ बिडवे आदि प्रमुख उपस्थित होते.    संपादक व पञकार सेवा संघाच्या श्रीरामपुर तालुका कार्यकारीणीची बैठक शासकिय विश्राम गृह येथे काल शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पञकारांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष हासे म्हणाले कि, पञकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी ही एकमेव पञकारांची संघटना राज्यात काम करीत आहे. ग्रामिण पञकारांना न्याय मिळण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याचे सामर्थ्य केवळ याच संघटनेत आहे.  युट्युब व पीडीएफ पञकारीता बेकायदेशीरपणे सुरु आहे. ही पञकारीता क्षेञासाठी धोक्याची घंटा आहे. प्रामाणिकपणे पञकारीता करणाऱ्या पञकारांची त्यामुळे गळचेपी होत आहे. पञकारीता क्षेञ वाचवायचे असेल तर त्यासाठी या पञकारांवर बंदी घालणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घेतला असुन अशी बेकायदेशीर पञकारीता करणारांना येत्या काळात चाप बसणार आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केले जाणार आहेत. आपली संघटना ग्रामिण पञकारांना बळ देणारी संघटना आहे. संघटनेतील प्रत्येक पञकार हा वाघासारखा असला पाहीजे.उर्जा, दर्जा व राजा या ञिसुञीवर संघटनेचा पञकार तयार झाल्यास संघटनेतील पञकारांचे भविष्य उज्वल होण्यास वेळ लागणार नाही असे सांगुन ते म्हणाले कि, ग्रामिण पञकारांना संरक्षण, आधिस्विकृती व कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवुन देण्यासाठी मानधन व पेन्शन योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने संघटन अधिक मजबुत करा असा सल्लाही हासे यांनी यावेळी दिला.   यावेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे म्हणाले कि, पञकारीता क्षेञ भरकटत आसताना खऱ्या पञकारांना न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी संघटना राज्यभर काम करीत आहे. जिल्यात प्रत्येक तालुक्यात शाखा सुरु करण्यात येत आहेत. शासनाच्या विविध सवलती ग्रामिण पञकारांना मिळवुन देण्यासाठी राज्य अध्यक्षांचा लढा गेली अकरा वर्षे सुरु आहे. त्यासाठी जिल्ह्यात मजबुत संघटन केले जात आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आंम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी राज्य समन्वयक नरेंद्र लचके, जेष्ठ पञकार बद्रिनाथ वढणे,  तालुका कार्याध्यक्ष देविदास देसाई यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नुतन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या नुतन पदाधिकार्यांना ओळखपञ देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पञकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचलन नरेंद्र लचके यांनी केले तर आभार संदिप जगताप यांनी केले.यावेळी पत्रकार चंद्रकांत लांडगे, बापूसाहेब कोकणे, मोहन जगताप, बापूसाहेब नवले, दिलीप लोखंडे, संदीप जगताप, हरिभाऊ बिडवे, रामेश्वर आरगडे, अशोक रणनवरे, अशोक शेलार, शानवाज सय्यद, शकील शेख, किशोर कदम, सुहास शेलार, दत्तात्रय थोरात, विकास बोर्डे, अमोल बोर्डे, दिलीप तांबे, संदीप शेरमाळे, दिलीप दायमा, देविदास देसाई, बद्रीनारायण वढणे, जयेश सावंत, राजेश बोरुडे, राजेंद्र देसाई उपस्थित होते.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पहिलेच नागरीक कोरोना महामारीने  त्रस्त झालेले आहेत त्यावर शहरातील  अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई आणि साथीच्या आजाराची साथीचा फैलाऊ होऊ शकतो, श्रीरामपूर नगर पालिकेच्या मार्फत घन-कचरा ठेकेदारास दर महिन्याला तब्बल ३० लाख रुपये मोजले जातात, मात्र शहरातील अस्वच्छता जशीच्या तशीच आहे,मग इतकी मोठी रक्कम मोजूनही जर कोणताच काम होत नसेल तर नगर पालिकेने हा ठेका रद्द करुन इतर दुसऱ्यास द्यावा, जेणे करुन शहरातील स्वच्छतेने नागरीकांचे आरोग्य आबाधित राहील,मात्र नगर पालिका प्रशासनासह संबंधित काही नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्षांना केवळ ठेकेदार पोसण्याचे कामे करुन जनतेच्या करापोटी वसूल करण्यात

आलेली रक्कम ठेकेदारांच्या घशात टाकायची असल्याचे दिसून येत आहे,मग यामध्ये संबंधित अधिकारी यांचा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा  संशय देखील बळावत आहे. शहरवासियांच्या ज्वलंत सामाजिक आरोग्याप्रश्नी तथा संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी  समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा जे जे फौंडेशनचे जोएफ जमादार हे आपल्या कार्यकर्त्यांसह नगर पालिके समोर आमरण उपोषणास बसलेले आहेत,उपोषणाचा आज तीसरा दिवस असताना संबंधित नगर सेवक, नगराध्यक्षा आणि नगर पालिका प्रशासन कोणतीच ठोस भुमिका घेण्यासाठी पुढे धजावलेले नाहीत, याचाच अर्थ असा होतो की शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याप्रश्नी त्यांना काही एक घेणे-देणे राहिले नाही,त्यांना केवळ ठेकेदार पोसण्यात स्वारस्य आहे, शहरातील अस्वच्छतेमुळे संभाव्य रोगराई पसरुन जरी नागरीक आजारी पडले तरी आपण मात्र सुरक्षित आहोत असा त्यांचा भास असावा,मात्र शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगर पालिका प्रशासन आणि काही संधी साधू पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत शहरातील जागरुक नागरीक आवश्य त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी उपोषणकर्ते जोयफ जमादार यांनी सांगितले आहे,

आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त उपोषण स्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले तथा उपोषणकर्त्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण करत देशभक्तीपर गिते देखील मंद आवाजात वाजविण्यात आल्याने आतातरी झोपी गेलेल्या नगरपालिका प्रशासनास जाग येऊन संबंधित नागरी समस्याप्रकरणी ते तात्काळ उचित निर्णय घेतील असे शहरवासियांना वाटू लागले आहे.

या उपोषणास आमदार लहू कनडे, उपनगराध्यक्ष, करण ससाणे, कामगार नेते नागेशभाई सावंत, केतन खोरे,सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे, कॉंगेस शहराध्यक्ष संजय छल्लारे,मुन्ना पठान, रितेश ऐडके हनीफ पठान, विठ्ठल गोराणे,फिरोज पठान, चरन त्रिभुवन, शिवा साठे, फैय्याज बागवान, सागर दुपाटी, नगरसेवक रवि गुलाटी, नाजिर पिंजारी,प्रभाकर,जाकिर शाह, रईस शेख,कॉंगेस पक्ष,आम आदमी पार्टी,भारतीय लहुजी सेना,प्रहार जनशक्ति,R P I,भिम गर्जना सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी, मुसलिम ओबीसी, ऑर्गनाइजेशन,आदींनी आपला पाठिंबा दर्शविला असुन जमादार यांच्यासोबत,आसिफ तांबोळी, अय्युब पठान,ज़करिया सैय्यद, अरबाज़ कुरैशी,अमन शेख, साद पठान, शाहिद शेख, फैज़ान काज़ी, तौफीक शेख,अतीक पठान,उपोषणास बसलेले आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget