Latest Post

बेलापुर  (देविदास देसाई  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचे शनैश्वर जगताप हे २५७ मते मिळून विजयी झाले असुन त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले  उपाध्यक्ष पदी ईब्राहीम ईमाम शेख यांची बिनविरोध निवड झाली    तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता ग्रामसभा बोलविण्यात आली होती .मा. रामदास पांढरे यांच्या अध्क्षतेखाली ग्रामसभेत कामकाज झाले. तंटामुक्ती अध्यक्ष  निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडली राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली

गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर महाविकास आघाडी  रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तर जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला   घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली  एकुण ५०० मतदान झाले होते सायंकाळी चार  वाजता लगेच मतमोजणी करण्यात आली त्यात सरपंच रामा पांढरे यांच्या संक्लेश्वर   जनसेवा मंडळाचे शनैश्वर जगताप यांना २५७ मते मिळाली तर संजय जगताप यांच्या संक्लेश्वर महविकास आघाडीचे  उमेदवार रोहीदास खपके यांना २१० मते मिळाली १५ मते बाद झाली निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक काजल गायकवाड यांनी शनैश्वर जागताप यांना जास्त मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत केले   त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे तंटामुक्ती समीतीच्या अध्यक्ष पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेवुन मतदान प्रक्रीयेद्वारे तंटामूक्ती अध्यक्ष निवडणारे राहुरी तालुक्यातील संक्रापुर हे पहीले गाव ठरले आहे. ग्रामसभेत खालील ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी जाफर शेख सरपंच रामा पांढरे उपसरपंच विठ्ठल पांढरे सुदर्शन बोरावके महेश बोरावके दावल शेख आप्पासाहेब जगताप दिलावर शेख विजय गोसावी रमेश सालबंदे गोकुळ सालबंदे गेनु चव्हाण बापुसाहेब चव्हाण संभाजी जाधव रामदास जाधव विजय जाधव सोपान जगताप लक्ष्मण चव्हाण राधाजी चव्हाण धर्मा चव्हाण शशिकांत भोंगळे कांतीलाल जगताप संपत जगताप साहेबराव जगताप उदयपाल जाधव बाळासाहेब जाधव सांजय किसन जगताप राजेंद्र जगताप पंढरीनाथ जगताप काशिनाथ जगताप अनिल जगताप चांगदेव पांढरे साहेबराव पांढरे अंकुश गरगडे सुभाष गाडेकर काशिनाथ पांढरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते


बेलापुर  (देविदास देसाई  )- तंटामूक्ती अध्यक्षाची निवड ही ग्रामसभेतुन सर्वानुमते घेण्याचा अधिकार हा सर्व ग्रामसभेला दिला असला तरी एकमत न झाल्यास काय करावयाचे? हे मात्र सांगितले गेले नाही त्यामुळे राहुरी तालुक्यात  तंटामूक्तीचा अध्यक्ष निवडण्यासाठी चक्क गुप्त मतदानाची पध्दत अवलंबविण्यात आली असुन मतदान सुरु झाले आहे.राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावाच्या तंटामूक्त अध्यक्षाची निवड होण्याकरीता बैठक बोलविण्यात आली होती परंतु निवडीबाबत एकमत न झाल्यानेगुप्त मतदानाने निवड करण्याचे ठरले  निवडणूकी प्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पडणार असुन पाच वाजता मतमोजणी होणार आहे .राहुरी तालुक्यातील संक्रापुर या गावच्या तटामूक्ती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता परंतु गावात दोन्ही गट प्रबळ असल्यामुळे अध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते हात वर करुन अध्यक्ष निवडण्याचे ठरले परंतु त्यास अनेकांनी विरोध दर्शविला निवड ही गुप्त मतदान पध्दतीने घ्यावी असा सर्वानुमते निर्णय झाला अन सुरु झाली गुप्त मतदानाची प्रक्रीया.  जगताप गटाच्या वतीने संक्रेश्वर जनसेवा मंडळाचे रोहीदास खपके यांनी अर्ज दाखल केला तर संक्रेश्वर विकास मंडळाचे पांढरे गटाच्या वतीने शनैश्वर जगताप यांनी अर्ज दाखल केला खपके यांना कपबशी तरा जगताप यांंना छत्री हे चिन्ह देण्यत आले  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गायकवाड यांनी काम पाहीले मग काय तंटामूक्ती अध्यक्षाची निवडच तंट्यातून सुरु होवुन गुप्त मतदानावर संपली दोन्ही गटाच्या उमेद्वारांनी आपापली ताकद पणाला लावुन मतदार आणण्यासाठी चारचाकी दुचाकी वाहनाचा वापर सुरु केला मतदारांना अमिषही दाखविण्यात आले  घरोघर जावुन मतदाराला गाडीत घालून मतदान  करवुन घेण्यासाठी दोन्ही गटाची चढाओढ सुरु झाली शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ७१९ मतदान झाले होते सायंकाळी पाच वाजता लगेच मतमोजणी होणार आहे त्या करीता गावात पोलीस बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे.


श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या फेर निवडी झाल्या एक वर्ष अध्यक्ष पद ग्रामीण भागाकडे असेल तर  एक वर्ष हे शहर भागाकडे असेल या नियमाप्रमाणे यंदाचे अध्यक्षपद हे श्रीरामपूर ग्रामीण भागाकडे दिले असल्याचे मावळते अध्यक्ष रोहित साबळे यांनी बोलताना सांगितले.

श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या फेरणीवडीच्या बैठकीत साबळे बोलत होते.यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदी चितळी येथील चंद्रकांत वाघ यांची तर उपाध्यक्ष अमितराज आहेर  सोबतच चार नवीन संचालकांची निवड करण्यात आली यात सुशील रांका,सचिन पतंगे,गौरव शेटे आणि संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी ऍड. प्रविण जमधडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी अतिष देसरडा,तिलक डुंगरवाल, विशाल अंभोरे,अजय अहिरे,संतोष देसाई,राजू शेवंते,संजू पगारे,सुशील रांका,भानुदास बेरड,सचिन पतंगे, गौरव शेटे,अमितराज आहेर,संदीप गोडसे,अक्षय कुमावत, प्रविण जमधडे, उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष रोहित साबळे यांनी सांगितले की 2015 संघटना स्थापन झाली आणि  2018 साली संघटनेची नोंदणी झाली तेव्हा पासून संघटना फोटोग्राफर च्या हिताचा विचार करून कार्य करत आहे.नोंदणी करते वेळी एक वर्ष अध्यक्षपद हे शहराकडे असेल तर एक ग्रामीण भागाकडे असेल  याच पार्श्वभूमीवर यंदाचे अध्यक्षपद हे ग्रामीण भागात देत असल्याचे साबळे यांनी सांगितले.तर पुढे तिलक डुंगरवाल यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.

तर आज पर्यंत संघटनेने विविध सामाजिक उपक्रम घेतले त्याबद्दल माहिती विशद केली यामध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस प्रेरणा मिळावी याकरता  त्यांच्या सह पालकांचा संघटनेने  गुणगौरव सोहळा आयोजित केला.  सोबतच फोटोग्राफर बंधूंच्या हिताची अनेक उपक्रम यात  विविध यशस्वी राज्यस्तरीय फोटोग्राफर यांचे  मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले. फोटोग्राफर बंधूंसाठी एक लाख रुपयाचा अपघाती विमा देखील संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राहावा यादृष्टीने संघटनेने आज पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम घेतले त्यामध्ये वृक्षरोपण वृक्ष संगोपन असे कार्यक्रम होते तर येत्या काळात संघटना ही फोटोग्राफरच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असेल कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्यासाठी संघटनेचा फोटोग्राफर हा एकटा नसून त्याच्या  कुटुंबासोबत श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ही संघटना उभी असेल असा विश्वास यावेळी तिलक डुंगरवाल व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल अंभोरे यांनी केले,तर आभार संतोष देसाई यांनी मानले..



श्रीरामपूर (प्रतिनिधी)- काही विशिष्ट समाजातील लोकांनी समाजात उच्छाद मांडला असून हिंदू धर्माच्या आया-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे तसेच लव जिहाद सारख्या घटना घडत आहेत. हे सर्व हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र आहे. या षडयंत्राविरोधात शिवप्रहार प्रतिष्ठान लढा उभारणार आहे. त्यासाठी अठरा पगड जातीच्या हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी केले.  श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालयात अभूतपूर्व झालेल्या भगव्या मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना सूरज आगे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांच्यामुळे मंदिरे व हिंदु संस्कृती, धर्म सुरक्षित राहिला अशा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात तिथीला व तारखेला जयंती साजरी होते हे हिंदू संघटनासाठी खेदजनक असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती एकाच दिवशी साजरी होण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना शिवप्रहार प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक राजकीय पक्षांची सत्ता आली. अनेक मुख्यमंत्री झाले मात्र तिथीला जयंती साजरी करा म्हणणारे तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीला डोकं टेकवतात. मात्र शिवजयंती एकाच दिवशी करण्याची भूमिका घेत नाही हे चुकीचे आहे.

सर्व हिंदू समाजाने एकत्रित येवून परिसरात चाललेल्या हिंदूविरोधी षडयंत्रापासून, हिंदू समाजाचे रक्षण व सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी भव्य भगवा मेळावा घेण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले. अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यात हिंदू समाजाचे केवळ राजकारणासाठी, विभाजन करुन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केले. सर्वांच्या डोळ्यासमोर लव जिहाद, धर्मांतराचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून देखील या संदर्भात कोणीही  बोलण्यास पुढे येत नाही. एवढेच नाही तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांचा इतिहास शाळेच्या अभ्यासक्रमातून वगळून पुढच्या पिढीला हिंदू संस्कृतीपासून दूर केले जात आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. नगर जिल्ह्यात देखील काही विशिष्ट समाजातील लोकांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजातील आई-बहिणींच्या अब्रुशी खेळणे, विशिष्ट धर्मात हिंदूंचे धर्मांतर करणे, ठराविक परिसरात लोकवस्ती करुन, हिंदू धर्मातील संस्कृतीचा र्‍हास करणे, एवढेच नाही तर हातात नंग्या तलवारी घेवून हिंदू समाजावर दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. हे सर्व काही घडत आहे. त्यामागे, काही विशिष्ट लोकांसह, राजकारणी व समतेची भाषा करणार्‍या सेक्युलरवादी लोकांचा हात असल्याने हिंदू समाजावर अनेक  पिढ्यांपासून अन्याय, अत्याचार होत आहेत. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आणि शिकवणी प्रमाणे, तसेच १८ पगड जातींना सोबत घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे, असे यावेळी मा. पोलीस अधिकारी सूरज आगे यांनी सांगितले.

शिवप्रहार प्रतिष्ठान हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसून  कोणतेही राजकारण करणार नसून फक्त हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सूरज आगे यांच्या मनोगताला उपस्थित जनसमुदायाने प्रचंड दाद देवून आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे दोन्ही हात वर करुन सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची बातमी, पत्रक, अथवा आवाहन करण्यात आले नव्हते तरीही भगव्या मेळाव्याला हिंदू बांधवांनी स्वयंस्फुर्तीने मोठी गर्दी करण्याचा श्रीरामपूरच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असल्याची बोलकी प्रतिक्रिया मेळाव्यानंतर शहरभर व्यक्त करण्यात येत होती. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर व मास्कची व्यवस्था करण्यात आली होती.  अठरा पगड जातींचा हिंदू धर्मअठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जातीतील लोकांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, शिवाजी महाराजांच्या काळात कोणीही उच्च किंवा कोणीही खालच्या जातीचा असा भेदभाव नव्हता. सर्व अठरा पगड जातीतील लोकांना महाराज एकसमान मानायचे याची अनेक इतिहासातील उदाहरणे देत सूरज आगे म्हणाले की, नंतरच्या काळातील स्वार्थी राजकारण्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण केला. अठरा पगड जातींना बरोबर घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे कार्य केले आणि तोच खरा शिवधर्म आहे.  त्यामुळे आगामी काळात अठरा पगड जातीनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येवून जेथे जेथे भगवा झुकतोय असे वाटले तर त्या ठिकाणी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन केले.नेत्यांच्या पत्नींना ट्रॅक्टरमध्ये बसवा...भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतो. सध्या रस्त्याची गंभीर परिस्थिती आहे. नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर फाटा या रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले. सर्वसामान्य नागरिकांचे अपघात होवून त्यांना जीव गमवावा लागत आहे तरी खड्डे बुजत नाही. सर्व पक्षाच्या नेते मंडळींच्या पत्नींंना एका ट्रॅक्टरमध्ये बसवून नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर जोराची चक्कर मारावी म्हणजे कळेल रस्त्यावर खड्डे किती? व जनतेला त्रास किती? असे सांगून मा. पोलीस अधिकारी सूरज आगे म्हणाले की, भ्रष्टाचारी वृत्तीमुळे असे प्रकार होतात. भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्धही शिवप्रहार प्रतिष्ठान लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या त्यांच्या  वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



बेलापुर (प्रतिनिधी  )-केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी क्लासेस लावलेच पाहीजे हा समज चुकीच असुन आपल्या मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमच्या मागे धावेल असा सल्ला यूपीएससी परीक्षेत ४६९वा रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांनी दिला आहे.   यूपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा चांगली रँक घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत बेलापुर सेवा संस्था उपबाजार समिती बेलापुर कै मुरलीधर खटोड पतसंस्था गांवकरी पतसंस्था भाऊसाहेब वाबळे मित्र मंडळ बेलापुर पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक दुधाळ यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी सत्काराला उत्तर देताना अभिषेक दुधाळ म्हणाले की माझ्या यशामध्ये माझे मार्गदर्शक आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार त्याच बरोबर बेलापुर ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा आहे .जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम घेण्याची मनापासून तयारी ठेवली तर निश्चितच  यश मिळेल परंतु परीक्षा फार अवघड आहे मला जमेल का मोठ मोठे क्लासेस लावावे लागतील मी ग्रामीण भागातील आहे हे सर्व न्यूनगंड आगोदर दुर करा परीक्षेची तयारी करताना आगोदर परीक्षेचे स्वरुप समजुन घ्या मगच अभ्यास सुरु करा घरी बसुन अभ्यास करु नका असेही दुधाळ म्हणाला या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई भरत साळूंके आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्हा चेअरमन कलेश सातभाई गोरक्षनाथ कुऱ्हे गोरख गवते शेषराव पवार हर्षद दुधाळ मिलींद दुधाळ खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके अभिजीत राका गणेश लढ्ढा शितल गंगवाल अशोक पवार भाऊसाहेब वाबळे भास्कर बंगाळ प्रकाश कुऱ्हे रावसाहेब गाडे प्रकाश नाईक चंदु पा नाईक विजय कुऱ्हे अक्षय नाईक विक्रम नाईक सुधाकर खंडागळे सचिन वाबळे निलेश सोनवणे द्वाराकनाथ नवले शिवाजी वाबळे ज्ञानदेव वाबळे संजय नागले दिवाकर कोळसे किशोर राऊत अन्सार पटेल रमेश अमोलीक अशोक गवते मुस्ताक शेख अल्ताफ शेख पत्रकार देविदास देसाई सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्याचे कठडे लवकरात लवकर बसविले जातील असे अश्वासन आमदार लहु कानडे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे या इसमाचा मृत्यू झाला होता त्या नंतर चांदेगाव वळदगाव ब्राम्हणगाव मळहद बेलापुर येथील नागरीकांनी वळदगाव बंधाऱ्यावर कठडे न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेवुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी या परीसरातील नागरीकांना सोबत घेवुन आमदार लहु कानडे यांची भेट घेतली या पूर्वीही या बंधाऱ्यावरुन पडून अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत या बंधाऱ्याचे कठडे अज्ञात इसमांनी चोरुन नेले होते तेव्हापासुन या बंधाऱ्यावरुन  शेतकऱ्यांना, नागरीकांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यातच परवा सायकल वरुन बंधारा ओलांडत असताना रंगनाथ वायदंडे यांचा तोल गेला व त्यातच त्यांना  आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळे आणखी काही दुर्घटना घडण्याच्या आत या बंधाऱ्यावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी विक्रम नाईक यांच्यासह परिसरातील नागरीकांनी केली होती बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी सरपंच दत्तात्रय खर्डे विक्रम नाईक संतोष खर्डे साहेबराव सिनारे सुभाष सिनारे राजेंद्र भोसले यांच्यासह आमदार लहु कानडे यांची भेट घेतली व बंधाऱ्यावर तातडीने कठडे बसवावे अशी मागणी केली आपली मागणी रास्त असुन लवकरात लवकर वळदगाव बंधाऱ्याचे  कठडे दुरुस्त केले जातील असे अश्वासन आमदार कानडे यांनी दिले चांदेगाव ब्राम्हणगाव भांड करजगावमळहद बेलापुर बु !! ग्रामस्थांच्या वतीने आमदार कानडे यांना निवेदन देण्यात आले.






श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-कोरोनाचा धाक दाखवुन अघाडी सरकारने हिंदुच्या देव- देवता बरोबरच सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचे महापाप केले असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष  बाबा शिंदे यांनी व्यक्त  केले  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे  प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह श्रीरामपुर येथे संपन्न झाला  या स्पर्धेत घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस   प्रज्ञा तुंगर हीने मिळविले पल्लवी शेडगे हीने  दुसरा क्रमांक मिळविला तर शीतल पाटील हीस तिसरा क्रमांक मिळाला

 या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन आपली एकजुट दाखविणे गरजेचे आहे महीलांना कुणी त्रास देत असल्यास मनसे पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावि त्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल या पुढेही असेच विविध धार्मीक उपक्रम राबविण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला मनसेचे जिल्हा सचिव डाँक्टर संजय नवथर तुषर बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले 

मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे तुषार बोबडे जिल्हा सचिव सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष डॉ, संजय नवथर विधानसभा अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले 

. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव ईश्वर जगताप, शहर सरचिटणीस रोहित जौंजाळ, शहर चिटणीस अमोल साबणे,शहर उपाध्यक्ष मनोज जाधव, राजू शिंदे,बाबासाहेब भालेराव, संदीप विशंभर,तालुका संघटक मनविसे अतुल तारडे , कामगार सेना उप चिटणीस नंदू गंगावणे,विभाग अध्यक्ष,मारुती शिंदे, सागर त्रिभुवन, सचिन धोत्रे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश शिंदे, सद्दाम शेख, नितीन खरे, बाप्पू लबडे,आदिंनी विशेष परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिरसाट यांनी केले व   निलेश सोनवणे यांनी आभार मानले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget