बेलापुर (प्रतिनिधी )-प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्याचे कठडे लवकरात लवकर बसविले जातील असे अश्वासन आमदार लहु कानडे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.प्रवरा नदीवरील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे या इसमाचा मृत्यू झाला होता त्या नंतर चांदेगाव वळदगाव ब्राम्हणगाव मळहद बेलापुर येथील नागरीकांनी वळदगाव बंधाऱ्यावर कठडे न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेवुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी या परीसरातील नागरीकांना सोबत घेवुन आमदार लहु कानडे यांची भेट घेतली या पूर्वीही या बंधाऱ्यावरुन पडून अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत या बंधाऱ्याचे कठडे अज्ञात इसमांनी चोरुन नेले होते तेव्हापासुन या बंधाऱ्यावरुन शेतकऱ्यांना, नागरीकांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यातच परवा सायकल वरुन बंधारा ओलांडत असताना रंगनाथ वायदंडे यांचा तोल गेला व त्यातच त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळे आणखी काही दुर्घटना घडण्याच्या आत या बंधाऱ्यावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी विक्रम नाईक यांच्यासह परिसरातील नागरीकांनी केली होती बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी सरपंच दत्तात्रय खर्डे विक्रम नाईक संतोष खर्डे साहेबराव सिनारे सुभाष सिनारे राजेंद्र भोसले यांच्यासह आमदार लहु कानडे यांची भेट घेतली व बंधाऱ्यावर तातडीने कठडे बसवावे अशी मागणी केली आपली मागणी रास्त असुन लवकरात लवकर वळदगाव बंधाऱ्याचे कठडे दुरुस्त केले जातील असे अश्वासन आमदार कानडे यांनी दिले चांदेगाव ब्राम्हणगाव भांड करजगावमळहद बेलापुर बु !! ग्रामस्थांच्या वतीने आमदार कानडे यांना निवेदन देण्यात आले.
Post a Comment