Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-कोरोनाचा धाक दाखवुन अघाडी सरकारने हिंदुच्या देव- देवता बरोबरच सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचे महापाप केले असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष  बाबा शिंदे यांनी व्यक्त  केले  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे  प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह श्रीरामपुर येथे संपन्न झाला  या स्पर्धेत घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस   प्रज्ञा तुंगर हीने मिळविले पल्लवी शेडगे हीने  दुसरा क्रमांक मिळविला तर शीतल पाटील हीस तिसरा क्रमांक मिळाला

 या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन आपली एकजुट दाखविणे गरजेचे आहे महीलांना कुणी त्रास देत असल्यास मनसे पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावि त्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल या पुढेही असेच विविध धार्मीक उपक्रम राबविण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला मनसेचे जिल्हा सचिव डाँक्टर संजय नवथर तुषर बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले 

मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे तुषार बोबडे जिल्हा सचिव सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष डॉ, संजय नवथर विधानसभा अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले 

. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव ईश्वर जगताप, शहर सरचिटणीस रोहित जौंजाळ, शहर चिटणीस अमोल साबणे,शहर उपाध्यक्ष मनोज जाधव, राजू शिंदे,बाबासाहेब भालेराव, संदीप विशंभर,तालुका संघटक मनविसे अतुल तारडे , कामगार सेना उप चिटणीस नंदू गंगावणे,विभाग अध्यक्ष,मारुती शिंदे, सागर त्रिभुवन, सचिन धोत्रे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश शिंदे, सद्दाम शेख, नितीन खरे, बाप्पू लबडे,आदिंनी विशेष परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिरसाट यांनी केले व   निलेश सोनवणे यांनी आभार मानले.


श्रीरामपूर - शहरात चोरट्या मार्गाने, अवैध व्यवसाय सुरू असल्या संदर्भात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व आमलदारांनी, शहरातील बस स्थानक,रेल्वे मालधक्का तसेच विविध ठिकाणी छापा टाकून, मन्ना पत्ता,सोरट नावाचा जुगार खेळविल्या जाणाऱ्या अड्डयांवर छापे टाकून, आरोपी यांना विविध ठिकाणांहून जुगाराच्या साहित्य,व रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, वरील आरोपी विरुद्ध, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जुगार प्रतीबंध कायदा कलाम १२ अ प्रमाणे, आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, नितीन त्रिभुवन यांना ताब्यात घेतले असून.आरोपी संदीप पवार, शरद आडांगळे, यांच्या कडून १ हजार ६०  रुपयांचा मुद्देमाल, तर आरोपी नितीन त्रिभुवन यांच्या कडून १ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन, आरोपी विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून. या गुन्ह्याचा पुढील तपास, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज गोसावी, हिंगडे, विठेकर,चव्हाण, पोलीस नाईक विशाल दळवी, लोढे, माने, यमूल, जाधव, सोळंकी, कुसळकर, गावढे आदींच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे, शहरातील अवैध धंदे करणा-यांचेधाबे दणाणले आहेत.  

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहरामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन नगर जिल्ह्यामध्ये महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते येथे ते चार वर्षात सात पोलीस निरीक्षक बदलून गेले आहे.  बेलवंडी येथून नवीन बदलुन आलेले कोतवाली पोलिस स्टेशन सपंत शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी . असे महत्वाचे महत्वाची शहरात पोलीस स्टेशन केले आहे नगर जिल्ह्यात काही वर्षां पुर्वी पी एस आय म्हणून कोतवाली होते. नंतर पी आय तोफखाना नेवासा. क्षीरामपुर. बेलवंडी   येथुन कोतवाली पोलीस स्टेशन बदली झाली आहे चार वर्षात सोमनाथ मालकर. अभय परमार. रमेश रत्नपारखी. नितीन कुमार गोकावे. विकास वाघ. प्रवीण लोखंडे. राकेश मानगांवकर. असे चार वर्षात पोलीस निरीक्षक होऊन गेले आता नवीन बदलून आलेले पी आय सपंत शिंदे हे नगर शहरात त्यांच्या कारभाराकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. शहरांमध्ये अवैद्य धंदे वाहतूक याबाबत काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपंत शिदे यांचा सत्कार करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि रणदिवे व कचरे. महाजन . यावेळी हजर होते.

बेलापूर (प्रतिनिधी) येथील पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्या विचारात घेता पोलीसबळ कमी असल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थ व संघटनांनी पोलीस मित्र म्हणुन सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे.बेलापूर येथे गुरुवारी रात्री गोशाळेजवळ उदय खंडागळे तसेच भागवतनगर येथे भगीरथ चिंतामणी यांच्या घरी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीत आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत मिटके बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी अशा घटनांनी भयभीत न होता योग्य उपाययोजना करुन आपली काळजी घ्या, त्यासाठी सीसीटीव्ही, लोखंडी सुरक्षा दरवाजे बसवा, तसेच घरात गरजेपुरते पैसे ठेवा आणि किमती ऐवज बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवा. तसेच ठिकठिकाणी ग्रामसुरक्षा दलात सहभागी होऊन कायम पोलीस मित्र म्हणुन पोलिसांच्या मदतीला पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास श. पो. नि. संजय सानप यांनी व्यक्त केला.यावेळी शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. सर्वश्री जि.प. सदस्य शरद नवले, पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, सरपंच महेंद्र साळवी, उक्कलगावचे पोलीस पाटील थोरात, तंटा मुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, विजय शेलार, हाजी इस्माईल शेख, पत्रकार विष्णुपंत डावरे, प्रकाश कुऱ्हे, ओहोळ सर आदींनी मनोगत व्यक्त केले. बेलापूरला तुलनेने खुपच कमी मनुष्यबळ असतानाही पोलिसांनी हिरण प्रकरण तसेच अपहृत मुलीच्या घटनेत केलेल्या कार्याचे कौतूक करुन पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची एकमुखी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी दिली.या बैठकीला सर्वश्री उपसरपंच अभिषेक खंडागळे, ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान, शिवाजी पा. वाबळे, अशोक गवते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,  भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, ग्रा.पं. सदस्य रमेश अमोलिक, मुश्ताक शेख, केशव अंबिलवादे, दादा कुताळ, अकबर सय्यद, मदन सोमाणी, ,सतीश व्यास, नरेंद्र संचेती, प्रसाद खरात, शफिक आतार, सुजित साहनी, प्रा. विठ्ठल सदाफुले, पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, देविदास देसाई, सुहास शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.या बैठकीच्या यशस्वीतेसाठी पो. हे. कॉ. अतुल लोटके, पो. ना. गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखिल तमनर, हरीश पानसंबळ, पोपट भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले.बेलापूर दरोड्याच्या घटनेटनंतर  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यात आशादायक प्रगती असल्याने आरोपी लवकरच निष्पन्न होतील असा विश्वास  पोलीस निरीक्षक   संजय सानप यांनी व्यक्त केला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- ज्यांना लहानचे मोठे केले त्याच दिवट्यांनी वृध्द माता पित्यांना हाकलून द्यावे अन ज्याचा  रक्ताचा जातीचा धर्माचा कुठलाही  संबध नसताना त्याने त्यांचे संगोपन करावे हे दुर्दैवी असुन आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला की काय? अशी शंका पंत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केली       श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस श्रीरामपुर येथील वृध्दाश्रमात साजरा करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयातील श्रीमती चारुशिला मगरे या होत्या    या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे हे वृध्दांचा आधारवड बनले आहे या वृध्दाश्रमात आज १५ वयोवृध्द आहेत अनेक जण आपला वाढदिवस जोरदार साजरा करतात परंतु सुभाष वाघुंडे यांना दररोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेने काढ दिवस साजरा करावा लागतो आहे

आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून दानशूरांनी पुढे येवुन या वृध्दाश्रमास मदत करावी असे अवाहनही देसाई यांनी केले या वेळी पत्रकार चंद्रकांत झुरंगे  भाऊसाहेब वाघमारे श्रीमती चारुशिला मगरे माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे आदि मनोगत व्यक्त केले श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने वाघुंडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी माऊली वृध्दाश्रमास अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली  कार्यक्रमास नरेंद्र खरात योगेश गंगवाल अजिज शेख सुभाष सांळूंके सुभाष चोरडीया नाना मोरे संतोष पारखे राहुल पगारे पत्रकार सुहास शेलार किशोर कदम विकी काळे मुरलीधर वधवाणी अरुण खंडागळे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी केले तर चंद्रकांत झुरंगे यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे खंडागळे व चिंतामणी याच्या घरावर दरोडा पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने बेलापुर ग्रामस्थांची बैठक बोलविली व ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार ग्रामस्थांनी गस्त सुरु केली आहे.बेलापुर येथे दरोडा पडल्यानंतर पोलीस संख्या पहाता ग्रामस्थांचा रात्रीची गस्त घालताना विशेष करुन तरुणांचा सहभाग असावा या करीता बैठक बोलविण्यात आली होती त्या बैठकीत सर्वानुमते पोलीसांना सहकार्य करण्याचे अश्वासन ग्रामस्थांनी दिले.पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचारी निखिल तमनर व हरिष पानसंबळ यांच्या समवेत बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामूक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,ग्रामपंचायत सदस्य व आर.पी.आय युवक जिल्हाध्यक्ष रमेश अमोलिक,प्रभात कु-हे यांनी रात्री बेलापुर  व परिसरात गस्त घातली. बेलापुरला मोठा परिसर असुन वाड्या वस्त्यावर व उक्कलगाव येथेही या पोलीस मित्रांनी पोलीसा समवेत गस्त घातली.

बेलापुर  (देविदास  देसाई )-गावातील गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला असुन या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने घेवुन चोरटे पसार झाले आहे ही घटना समजताच तातडीने श्वान पथकही  बोलविण्यात आले होते. बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान

मुलीच्या गळ्याला चाकु लावला त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले एक फोटो पाहुन या महीलेच्या गळ्यातील हे दागीने लवकर द्या अशीही मागणी चोरट्यांनी केली त्यावर हा फोटो आमच्या मावशीचा आहे असे सांगताच या फोटोतील महीला व ही महीला एकच वाटते असेही चोरटे म्हणाले खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली त्यांनंतर भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या घरातुन ३५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लांबविले भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्याशी झटापट केली त्यात चोरट्याने त्यांच्या पायावर लोखंडी राँडने मारहाण केली सोमनाथनेही त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला त्याने चोरट्याला पकडले असता त्याच्या वडीलांना काय चालले हेच समजेना त्यांनी सोमनाथलाच मिठी मारली त्यामुळे तो  चोरटा सोमनाथच्या तावडीतुन निसटला त्यामुळे चोराट्यांनी तेथुन पळ काढला त्या नंतर सोमनाथ याने बेलापुर पोलीसांना फोन करताच काही मिनीटातच बेलापुर पोलीस घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत चोरटे पसार झाले होते सकाळी श्वान पथक बोलविण्यात आले होते श्वानाने कुऱ्हे वस्ती रोडलगत माग दाखवीला त्या पुढे चोरटे वहानाने फरार झाले असावेत त्यानंतर सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परिवारा कडून घटना कशी घडली या बाबत माहीती घेतली व अधिकाऱ्यांना तपासा बाबत योग्य त्या  सुचना दिल्या त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके व त्यांचा स्टाफ होता घटनेची माहीती मिळताच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देवुन खंडागळे व चिंतामणी परीवाराला धीर दिला या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी ग्राम रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना जि प सदस्य शरद नवले यांना दिल्या असुन आज सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशन येथे बैठक बोलविण्यात आली आहे



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget