Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-आजच्या युगात शेतीकरीता बैला  ऐवजी यंत्रांचा वापर होवु लागल्यामुळे खरे बैल दिसेनासे झाले असुन आता केवळ सणाकरीता मातीचेच बैल बाजारात दिसु लागले असुन येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हौस म्हणून पाळलेल्या बैलाला पहाण्याकरीता बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती                                  बेलापुर येथील हाँटेल व्यवसायीक व सामाजिक कार्यकर्ते सर्फराज उर्फ भैय्या जमालभाई शेख यांनी पाळलेल्या गावरान गायीला गोऱ्हा झाला होता त्यांनी त्यांचे निट संगोपन केले थोडा मोठा झाल्यावर  त्या बैलाला खरेदी करण्याकरीता व्यापारी आले असता त्यांचे चिरंजीव रीहान व आयान याने बैलाला कसायाला

विकण्यास मनाई केली अखेर बालहाट्टापायी त्यांनी तो बैल पाळण्याचे ठरविले त्यांचा हाँटेल व्यवसाय असल्यामुळे त्यांनी त्यास हाँटेलापुढेच बांधुन चांगली व्यवस्था ठेवली अनेक ग्राहक जेवणासाठी आले की त्या बैलासोबत सेल्फी घेवु लागले त्यामुळे सर्फराज यांचाही उत्साह वाढला तो बैल आज सहा वर्षाचा झाला आहे त्याचे वजन ८९ किलो आहे त्याची उंची आडीच फुट आहे ह भ प इंदोरीकर महाराजांनी दोन वेळेस भेट देवुन त्या बैलाची व बैल पाळणाराची स्तुती केली आहे  त्या बैलाला सोलापूर येथील एका शेतकऱ्यांने सहा लाख रुपयांना मागीतले होते परंतु रेहान व आयान यांच्या हट्टापायी आता त्या बैलाचे संगोपन करण्याचा निर्णय शेख परिवाराने घेतला असुन त्यांनी त्याचे नावा गोट्या ठेवले आहे आज त्यांनी त्या बैलाला बेलापुरगावात आणले असता त्या बैलास पहाण्याकरीता अनेकांनी त्यांच्या घरी गर्दी केली अखेर त्यांनी त्या बैलाला बेलापुराच्या पेठेतून फिरविले अनेकांनी त्या गोट्याबरोबर फोटो काढणे पसंत केले बऱ्याच जणांनी गोट्याला आपल्या कँमेऱ्यातही कैद केले खरोखरच पोळ्याच्या सणानिमित्ताने केवळ कागदावरच राहीलेली शेतकऱ्यांकडील खिलारी बैल जोडी पुन्हा दिसेल का ? सजीव बैलाकरीता असणारा बैल पोळा आता मातीने बनविल्या जाणाऱ्या बैलावर साजरा करण्याची वेळ आली आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

श्रीरामपूर शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी उम्मती फाउंडेशन या संस्थेने आज शिक्षक दिनानिमित्त श्रीरामपूर शहरातील "शहा छप्परबंद "या शाळेस काही "कपाटस" व "कॉम्प्युटर टेबल्स" यांची भेट दिली तसेच शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना "गणवेशाचे "ही वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर शहराचे "मुफ्ती रिजवान साहेब" हे होते तर सामाजिक कार्यकर्ते नजीर भाई (मामु )ज्येष्ठ नागरिक काकर मामु उपस्तीत होते , वरील कार्यक्रमाला उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल भाई दारूवाला तसेच उपाध्यक्ष फिरोज सर तसेच कायदेविषयक सल्लागार आरिफ शेख तसेच शाकीब भाई, युसुफ लखानी, वसीम जागीरदार , शहानवाज सर,समीर दोस्ती, नितीन बनकर ,हे लोक विशेष करून हजर होते ,वरील कार्यक्रमा करीता शहा छप्परबंद शाळेचे चेअरमन जाकिर सर व सचिव अल्ताफ सर यांनी व त्यांच्या सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ सर यांनी केले तर आभार अल्ताफ काकर सर यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरीग) अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण संपादन करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापूर येथील शिव मल्हार वाघ्या- मुरळी व गोंधळी सेवाभावी संस्थाच्यावतीने  विशाल शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ येळे,नंदकुमार खेमनर सचिव, चंद्रकात थोरात सरचिटणीस, शिवाजीराव गायकवाड, चिटणीस ,बबनराव पुंड, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र लकडे, जिल्हा उपाध्यक्ष, भारत सोनवणे, जिल्हा सचिव,नारायण ब्राह्मणे, जिल्हा सरचिटणीस आशा भीमराज गायकवाड, जिल्हा कार्याध्याक्ष, दत्तात्रय निकम, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बनकर, तालुका सचिव,जगन्नाथ तागड, तालुका उपाध्यक्ष, सटवाजी गाढे, तालुका कार्याध्यक्ष महेश औटी, तालुका संघटक ताई गणेश कदम, तालुका महिला सचिव तनीषा शेख, तालुका संघटक हरिभाऊ तांबे, तालुका सरचिटणीस मनोज सोनवणे,राहाता तालुकाध्यक्ष मिनू नेहाळे, तालुका संघटक  लताबाई महारनोर, तालुका उपाध्यक्ष अशोक सोनवणे, नांदगाव तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ मोरे, राहुरी तालुकाध्यक्ष  बाळासाहेब बाचकर, तालुका उपाध्यक्ष कांताबाई पेरने, तालुका महिला संघटक समाधान लबडे, राहूरी तालुका चिटणीस एकनाथ गोंधळी, नेवासा तालुकाध्यक्ष सुशिलाबाई गायकवाड, बाबासाहेब भालेराव,दादासाहेब कुसेकर, सूरज जाधव, सुभाष पारखे,बंटी थोरात, तथा सर्व सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिध) गणेश आगमना आगोदरच टोमॅटो मधून गणरायांनी दिले भक्तांना दर्शन.येत्या काही दिवसात गणेश उत्सवास प्रारंभ होऊन,गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या उत्सवास सुरवात होण्या आगोदर श्रीरामपूर शहरातील राजू मिर्जा या मुस्लिम बांधवाच्या घरात, टोमॅटोच्या रूपातून गणरायांनी भक्तांना दर्शन दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता. मिर्जा यांनी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी दिला. जेव्हा स्वयंपाका करिता घरातील महिलांनी टोमॅटो घेतला असता, टोमॅटोमध्ये गणरायांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आल्याने, महिलांनी मिर्जा यांना बोलावून सर्व हकीकत सांगितली, त्यानंतर मिर्जा यांच्या घरात आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले, त्यानंतर राजू मिर्जा यांनी गणारायांचे प्रतिबिंब असलेले टोमॅटो हा स्वयंपाकात वापरण्या ऐवजी, तो मंदिरात जाऊन देण्याचा निर्णय घेतला. व शहरातील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात टोमॅटो रुपी गणपती बाप्पा सुपूर्त केले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी देखील, टोमॅटो रुपी गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी सध्या टोमॅटोचे भाव पडल्याने, कदाचित शेतकरी राज्याच्या मदतीला गणपती बाप्पा धावून आल्याची धारणा व्यक्त केली जात आहे.

राहुरी(प्रतिनिधी)-राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथून एक सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या माय लेकीचा मृतदेह दोन सप्टेंबर रोजी टाकळीमियॉ येथील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

          या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू ही २७ वर्षीय विवाहित तरूणी व तिची ४ वर्षीय मुलगी सिद्धी दिलीप कडू ह्या दोघी मायलेकी १ सप्टेंबर पासून लाख रोड, कडू वस्ती येथील त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत देवळाली पोलिस चौकीत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. बेपत्ता झाल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान टाकळीमियॉ हद्दीतील पंचवटी भागातील एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून ला. स्थानिक रहिवासी व विद्या कडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हिचा शोध घेण्यास सुरुवात केली. विहितील पाण्याची पातळी जास्त व विहिरीत तळाच्या गाळात विद्याचा मृतदेह रुतल्याने विद्या हीचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही. पोहचणाऱ्या तरुणांनी रात्री १० वाजता गळाच्या सहाय्याने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला. दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी साई प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले होते. 

         घटनास्थळी देवळाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ, भिताडे, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे, मंगेश ढुस, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे,  ग्रामस्थ व नातेवाईक आदींनी घटनास्थळी मदत कार्य केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.


राहुरी(प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने दिनांक २ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

           नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास प्रात: विधीच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला होता. खुप उशीरा पर्यंत नितीन घरी परतला नाही. म्हणुन त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहाण्यासाठी गेला. त्यावेळी एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही बातमी गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ही घटना राहुरी पोलीसांना कळवताच पोलीस कर्मचारी संजय जाधव हे दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनास पाठविले. नितीन याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. परंतु नितीन याने अनेक मायक्रो फायनांस कंपनीचे कर्ज घेतले होते. लॉक डाऊनमध्ये हाताला वेळेवर काम मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाही. परिणामी फायनांस कंपन्यांनी हप्ते भरण्याचा तगादा लावला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्तांमध्ये चालु आहे.

          या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय जाधव हे करीत आहेत.

नाऊर( वार्ताहर)श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुंटूबातील तरुण शेतकरी विलास अशोक देसाई याचे महावितरणच्या विद्युत पोलवरील तारेला  चिकटून दुर्दैवी निधन झाल्यामुळे देसाई कुटुंबाचा आधारवडच नाहीसा झाला हे ओळखून कुटुंबीयांच्या मदतीसाठी सोशल मिडीयातून अवाहन करताच मोठ्या प्रमणात मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कै विलास यांच्या पश्चात  वृद्ध आई व पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता. त्याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. तसेच घरामध्ये तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा व एकमेव कमविता होता.त्याच्या वडिलांचे वर्षश्राद्ध समीप आले असताना, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. या मदतीच्या अवाहनाला प्रतिसाद   देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने ठाणे येथील उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घरी भेट देत त्याच्या घराचे अर्धवट असलेले बांधकाम पाहून घराचे वरील छतासाठी अँगल पाईप पत्रे यासाठी तब्बल तीस हजार रुपये मदत दिले.तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या माध्यमातूनसुमारे 40 ते 45 हजार रुपये मदत नागरिकांच्या माध्यमातून जमा झाली आहे पत्रकार देविदास देसाई,नाशिक येथील राहुल क्षीरसागर,कृष्णा देसाई व पत्रकार संदीप जगताप यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजाराची मदत जमा करण्यात आली असून ही मदत मयत विलासच्या मुलीच्या नावे ठेव पावतीच्या रुपात बँकेत ठेवण्यात येणार आहे.ग्रामविकास अधिकारी टि .के .जाधव व  पत्रकार संदीप जगताप यांनी सोशल मीडियातून व्हाट्सअपद्वारे ग्रामस्थांना कै. विलास देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्याच्या कुटुंबात कमविता व्यक्तीच गमविल्याने मुलींच्या शिक्षणासह भविष्यातील सर्वच प्रश्न अवघड असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी टी.के. जाधव व  पत्रकार संदिप जगताप या दोघांच्या खात्यावरती मिळून सुमारे नव्वद हजाराच्या आस-पास रक्कम जमा झाली. जमा झालेली रक्कम दोन मुलीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.सोशल मीडियातून सामाजिक जबाबदारी ओळखून अनेकांनी मदत केली ग्रामस्थांच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींना धन्यवाद देण्यात येत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget