Latest Post

प्रकृती कारणास्तव उपोषण मागे घेण्याची विनंती राहुरी (प्रतिनिधी) डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्री शिवाजी नगर राहुरी येथे दिनांक 23  ऑगस्ट 2021रोजी पासून उपोषणास बसलेल्या कामगारांची आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली

कारखाना कामगारांच्या अनेक वर्षापासून दरमहा मिळणाऱ्या पगार, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युएटी, पगाराचा फरक, रिटेन्शन  अलाउंस,अशा स्वरूपाचे अनेक रकमा थकीत आहे त्या अनुषंगाने Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषण   कर्त्याबरोबर सकारात्मक चर्चा करून सहाय्यक कामगार आयुक्त तसेच असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांचेशी पत्रव्यवहार करून उपोषणकर्ते यांचेशी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करून उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने विनंती करण्यात आली.

यावेळी उपोषणकर्ते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे आदींनी पोलीस विभागाने लक्ष देण्याची विनंती केली आणि आभार व्यक्त केले.


नाऊर ( वार्ताहर):। श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गरीब शेतकरी कुंटुंबातील  विलास अशोक देसाई (वय ४१  वर्ष ) हा तरुण विद्युत प्रवाहच्या पोलवरील तारेला चिकटून दुर्देवी अपघाती मृत्यु झाला. मयत विलास हा घरात एकुलता एक कमवता  मुलगा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.

     हाती आलेल्या वृत्तानुसार घडलेली घटना अशी की घराचा वीज पुरवठा गेल्या २ दिवसापासुन बंद होता या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क  साधला होता आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान संबधित महावितरणचा  कर्मचारी घटनास्थळी आला व विलास यास तु पोलवर चढुन विज जोडून घे असे म्हणून फिडर वरुन विज प्रवाह बंद करुन घटनास्थळी आला त्याच वेळी दुसर्या फिडरवरुन विज प्रवाह सुरुच होता ही बाब सांबधीत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही कट केलेली विज जोडणी करण्यासाठी संबधीत कर्मचाऱ्यांने विलास यास पोलवर चढण्याचा आग्रह धरला महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार विलास पोलवर चढला परंतु दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला जोराचा शाँक बसला व तो फेकला गेला परंतु त्याचा पाय वरच अडकला तसेच पोलवरील अँंगलला पँट अडकल्यामुळे तो जागेवरच मयत झाला  विलास गेला त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले . 

    मयत विलास हा अतिशय गरीब कुंटुबातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

*पप्पा उठा ना !*

    मुलगा तुषार मुलगी शुभांगी, साक्षी यांच्या पप्पा उठा ना, आमच्याशी बोला ना ! या हंबरड्याने अंत्यविधी जमलेल्या हजारो ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. महावितरणच्या गलथान कारभारा विषयी नागरिकामधुन संताप व्यक्त करण्यात येत असुन मयत विलासच्या कुंटूबियाला महावितरण ने तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.*

पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सतिश गोरे व कॉन्स्टेबल संतोष बडे हे करत आहे.

बेलापूर -(प्रतिनिधी ) येथील बाजारतळ परिसरात तरस या सहसा आपल्या परिसरात न आढळणार्‍या दुर्मिळ प्राण्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बेलापूर येथे सोमवारी संध्याकाळी तरस या प्राण्याचा संचार आढळून आला. दुर्मिळ प्रजाती वर्गातील हा प्राणी मांसाहारी मानला जातो. मेलेल्या प्राणी, पक्षांचे मांस व हाडे खावून गुजराण करणे हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तरस हा निशाचर असून अंगाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शिकार करत नाही. असे असले तरी रात्रीच्यावेळी शेळ्या, कोंबड्यांवर मात्र ताव मारतो.बिबट्याने शिकार करून खाऊन उरलेल्या मांस व हाडांचे अवशेष खाण्यासाठी तो भटकत असावा अशीही शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे हा प्राणी आढळल्याने याची गावभर चर्चा पसरली. तरस आढळून आल्याबाबत मोबाईलवर फोटोसह संदेश टाकून लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली. बेलापूर परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना त्यात तरस आढळल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अहमदनगर०६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी २९ वर्षीय सुमिता दिनेश जाधव राहणार म्हसे खुर्द, तालुका पारनेर ही महिला गावातून घराच्या दिशेने जाधववाडी रस्त्यावरून एकटी पायी जात असतांना, पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या, अनोळखी इसमाने सदर महिलेस चाकूचा धाक दाखवून, तिच्या जवळील सोन्याचे मंगळसुत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्याचा घटना घडली होती, सदर घटनेबाबत सुमिता दिनेश जाधव या महिलेने, दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं. ५६९/२०२१, भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने, समांतर तपास करीत असताना, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, सदर गुन्हा किरण मेहेत्रे, राहणार जामखेड याने केला असल्याची माहिती मिळताच.पोलीस निरीक्षक कटके यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदींना आरोपी संदर्भातील माहितीची शहानिशा करून, ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आरोपी नामे किरण अरुण मेहेत्रे, वय- २७ वर्षे, राहणार सदाफूले वस्ती, जामखेड,यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता. तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने, पोलिसांनी तो जप्त करुन,आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर की असून. या पुढील कार्यवाही पारनेर पोलीस करीत आहेत. आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून. त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )-नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असे मत माजी मंत्री  राधाकृष्ण विखे पा यांनी व्यक्त केले. जि प सदस्य शरद नवले यांच्या वस्तीवर स्नेह मेळावा व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया घेतली असता माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा म्हणाले की राज्यातील शासन सूडाचे राजकारण करत आहे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाही आँन लाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिक्षण मंत्री महोदयांना राज्यातील सर्व मुलांना मोफत टँब देण्याची सूचना केली होती अनेक मुलाकंडे छोटे छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांना निट समजत नाही मोबाईलला रेंजच नसते शाळा केव्हा सुरु होईल याचाही साधा निर्णय घेता आलेला नाही सर्व परीक्षेत हे सरकार नापास झाले आहे कुणालाच मदत करण्याची या सरकारची तयारी नाही  कोवीडमुळे अनेक स्थीत्यंतरे आली कोरोना लसीकरणाबाबत राज्याच केंद्रा विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात मोफत लस देण्याची घोषणा करुन लसीकरण सुरुही केले आहे गोरगरीबांना कोरोना काळात मोफत धान्य दिले आता तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात उतरले पाहीजे राजकारणाच्या पलीकडे जावुन तरुणाकरीचा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहीजे शरद नवले हा लढवय्या कार्यकर्ता आहे सभापती असताना त्यानी जिल्ह्यात चांगले काम केले प्रस्थापीताविरुध्द लढण्याचे काम शरद नवले यांनी केले आहे असेही विखे पा म्हणाले या वेळी भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते मा सभापती दिपक पटारे राधाकृष्ण आहेर गिरीधर पा आसने उपसभापती बाळासाहेब तोरणे सरपंच महेंद्र साळवी गणेश मुदगुले सचिन गिरमे शंतनु फोफसे रणजित श्रीगोड  नितीन भागडे अनिल थोरात नानासाहेब शिंदे सुनिल मुथा आजय डाकले शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा प्रविण बाठीया अरविंद साळवी डाँक्टर देविदास चोखर पंकज हिरण साहेबराव वाबळे प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख अकबर टिन मेकरवाले अशोक गवते मोहसीन सय्यद मुस्ताक शेख शफीक बागवान सुभाष अमोलीक पत्रकार देविदास देसाई प्रदिप आहेर सुनिल नवले दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम दिपक क्षत्रीय रमेश अमोलीक विशाल आंबेकर अमोल गाढे रामेश्वर सोमाणी बालू राशिनकर महेश ओहोळ अजिज शेख दादा कुताळ गोरख कुताळ गोपी दाणी विनायक जगताप श्रीराम मोरे मास्टर हुडे श्रीकांत अमोलीक आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिं प सदस्य शरद नवले यांनी केले तर अरविंद नवले यांनी सूत्रसंचलन केले तर चंद्रकांत नवले यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-डिझेल घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसेच नसल्यामुळे अनेक बसेस डेपोतच उभ्या करण्यात आल्या असुन यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे          परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड  यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचे सावट थोडेफार कमी झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी एस टी महामंडळाच्या आडमुठेपणामुळे नागरीक विशेषकरुन महीला वर्ग त्रस्त झाला आहे सध्या सणासुदीचे दिवस असुन या महीन्यात सणामुळे महीला वर्ग आपल्या माहेरी नातेवाईकाकडे जात असतो महीलांना सुरक्षित प्रवास हा केवळ एस टी बसचाच वाटत असल्यामुळे बसने प्रवास करण्यास महीला आग्रह धरतात असे असले तरी केवळ बसला इंधन नसल्यामुळे अनेक बस डेपोतच उभ्या आहेत बस नसल्यामुळे प्रवाशांची तर कुचंबणा होतेच परंतु बसचे चालक व वाहक यांनाही कामे राहीलेले नाहीत कोरोनामुळे बस बंद होती त्यामुळे त्यांना कामही नव्हते आता बस सुरु होवुन देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच उभ्या आहेत या नुकसानीस जबाबदार कोण ? एस टी महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत केवळ डिझेलमुळे बस डेपोत उभी राहत असेल तर त्या सारखे दुसरे दुर्दैव नाही  असा सवाल श्रीगोड यांनी केला आहे या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते खासदार आमदार यांना पाठविण्यात आलेल्या आहेत


बेलापुर  (प्रतिनिधी  )- एनसीआरटी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेच्या कमालपूर शाखेतील विद्यार्थीनी सायली उदरभरे हीने विशेष नैपुण्य मिळविले असुन तीला आता शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी आर टी यांच्या मार्फत इयत्ता आठवी साठी एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी )परीक्षा घेतली जाते सदर परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेमध्ये बेलापूर शिक्षण संस्थेचे काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालय कमालपूरमधील सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहे. यामध्ये इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कुमारी सायली उदरभरे हिचा अहमदनगर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक आलेला आहे.तिला इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षासाठी अर्थात 48 महिन्यांसाठी प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे 48000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

विशेष म्हणजे कोविड परिस्थितीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्कात नसून देखील सायली उदरभरे  या विद्यार्थीनीने हे सुयश संपादन केले आहे  . कुमारी सायली उदरभरे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री श्रीकांत साळुंके ,श्री.शशिकांत थोरात  व सहकारी शिक्षक यांचे बेलापूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गणपतलाल मुथा, सचिव श्री शरद  सोमाणी,चेअरमन श्री भरत साळुंके,माजी सरपंच भास्करराव पा. मुरकुटे ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश निवृत्ती गोरे, मुख्याध्यापक श्री पडवळ सर यांनी अभिनंदन केले आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget