Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-मागील आठवड्यात नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी केली होती या ऑडिओ क्लिप ची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील चौकशी श्रीरामपुर Dy.s.p संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली आहे   

पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा.मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक इसम यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती

     त्या क्लिप मध्ये P.I  करे समोरच्या व्यक्तीला ' तुम्ही पिंपळगाव मध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा मी पोलीस स्टेशन मधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील.येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील' अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक , व्हाट्सऍप आणि विविध समाज  माध्यामा द्वारे व्हायरल होत आहे

ही क्लिप कोणी व्हायरल केली?समोरील बोलणारा व्यक्ती कोण? या प्रकरणात अजून कोणा कोणाचा समावेश आहे?याची सविस्तर चौकशी Dy.s.p.संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार आहे.

 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली                येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले

नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेलापूर (वार्ताहर)ःस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेलापूर बु।। ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असुन प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात १५ आँगस्ट पासुन करण्यात येणार असल्याची माहीती जि प सदस्य शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे                                         . या अभियानातंर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे घरोघर जावुन सर्वेक्षण करण्यात येणार असून  कौटुंबिक आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार आहे.त्यात त्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहीती असणार आहे घरातील सदस्यांना कोणते आजार आहेत कोवीड लसीचे किती डोस केव्हा घेतले या बाबतची सर्व माहीती संकलीत केली जाणार आहे                                        या  अभियानाचा मान्यवरांच्या हस्ते स्वातंंञ्यदिनाचे औचित्य साधुन  शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,आरोग्याधिकारी डॉ.देविदास चोखर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,प्रकाश पा. नाईक, जालिंदर कु-हे, ज्येष्ठ पञकार मारुती राशिनकर,भास्कर बंगाळ,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,पञकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गवले, सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम प्रकाश कु-हे,प्रभात कु-हे,सुरेश अमोलिक,शफीक बागवान,किशोर खरोटे,गणेश बंगाळ,जिना शेख, बाबा शेख,अकबर सय्यद अजिज शेख आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सामाजीक , शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जाणकारांनी एकत्र  येवुन व्यापारी ,कष्टकरी ,सर्वसामान्य नागरीकासाठी सुरु केलेल्या गांवकरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल असा विश्वास महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यानी व्यक्त केला. जि .प .सदस्य शरद नवले व साहेबराव वाबळे यांच्या नेतृत्वाखाली गांवकरी ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे उद्धाटन सद्गुरु नारायणगीरीजी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाण नेवासा येथील मठाधिपती महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यांच्या हस्ते संपन्न झाले  त्या वेळी बोलताना महंत उध्दव महाराज मंडलीक म्हणाले की आपला जिल्हा हा सहकार चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गांवकरी पतंसंस्थेमुळे बेलापुरच्या वैभवात आणखी भर पडली आहे मोठ्या बँंकाकडे कर्ज मागणी करताना अनेक कागदपत्रांची तरतुद करावी लागते त्यामुळे व्यापारी ,कष्टकरी लोकांचा कल पतसंस्थेकडे वाढत आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची उत्तम सेवा घडो असेही मंडलीक महाराज म्हणाले या वेळी संस्थेचे सभासद १३०० असुन उद्धाटनापूर्वीच संस्थेकडे ५० लाख रुपयांच्यापुढे ठेवी गोळा जमा झाल्या असल्याची माहीती पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे व व्हा चेअरमन रामेश्वर सोमाणी यांनी दिली या वेळी माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात जि प सदस्य शरद  नवले पंडीत महेशजी व्यास रणजीत श्रीगोड भास्कर खंडागळे गिरीधर पा आसने नितीन भागडे युवराज भोसले सुनिल साठे हरिष थोरात किशोर कलांगडे अमोल शेटे विलास शेटे प. स. सदस्य अरुण पा. नाईक युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे सरपंच महेंद्र साळवी सुभाष अमोलीक रावसाहेब अमोलीक प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर संजय गोरे  जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई मारुती राशिनकर ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम अजिज शेख हाजी ईस्माईल शेख प्रकाश पा नाईक मोहसीन सय्यद अनील पवार आदिसह सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी केले तर विशाल आंबेकर यांनी आभार मानले.

 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली                येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले

नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )--बेलापूरातून अल्पवयीन मुलगी गेल्या वीस दिवसापासून गायब असून या विषयांमध्ये आरोपी आयुब शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे .या गुन्ह्याच्या तपासामध्ये एल सी बी ला सामील करून घेण्यात आलेले आहे. मुलीचा तपास  लवकरात लवकर लावून आरोपीला कडक शासन करू असे अश्वासन श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके साहेब यांनी दिल्यामुळे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले                             सुमारे दीड तास हे रास्ता रोको आंदोलन चालले होते पोलीस अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अश्वासनानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

गेल्या 20 दिवसा पूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही या घटनेच्या निषेधार्थ  महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बेलापूर  श्रीरामपुर चौकात रास्ता रोको करण्यात आला होता.  उपविभागीय पोलिस अधिकारी  संदीप मिटके  यांनी  रास्ता रोको आंदोलध मागे घेण्याचे आवाहन केले . त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार 'तहसीलदार प्रशांत ,पाटील पोलीस  निरीक्षक संजय सानप  आदींनी निवेदन स्विकारले .

*या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ, भाजपचे नेते प्रकाश चित्ते. शिवप्रतिष्ठानचे प्रवीण , जय श्रीराम मंडळाचे भरत , जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे  सुनील मुथ्था भाजपा नेत्या पुष्पाताई हरदास, सौ किरण सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, महाराणा प्रताप सामाजिक प्रतिष्ठानचे सुहास पवार ,राजेंद्र चव्हाण , संदीप पवार , लक्ष्मण साळुंके , नरहरी पवार ,रामभाऊ पवार ,संतोष चव्हाण , कैलास पवार , नवनाथ पवार,  रवी चव्हाण ,राजु पडवळ ,  विजय पवार , केशव गोविंद ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

*यावेळी बोलताना विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ , म्हणाले की गेल्या वीस दिवसांपासून पोलिस प्रशासनाने अपहरण झालेल्या मुलीच्या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून कुठल्याही स्वरूपात तपास पुढे सरकलेला नाही याचा निषेध करून डॉक्टर शिरसाठ पुढे म्हणाले की मुलीचा तपास लवकर न लागल्यास या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाईल असा इशारा डॉक्टर शिरसाठ यांनी दिला यावेळी बोलताना भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले लव जिहाद च्या घटनांचा सर्व हिंदू समाजाच्या कुटुंबांमध्ये प्रचार आणि प्रसार करून सर्व हिंदू समाजाला जागृत केले पाहिजे व आपल्या मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविले पाहिजे. यापूर्वी भेर्डापूर येथे असा प्रकार घडला होता त्याही वेळेला पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावे लागले. आंदोलना शिवाय पळवून नेलेल्या मुलींचा तपासच लागत नाही या घटनेचा मी निषेध करतो अशा पळून नेलेल्या मुलींच्या विषयांमध्ये पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास श्रीरामपूरातील सामाजिक संतुलन बिघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  यावेळी त्यांनी दिला.

* यावेळी बोलताना सुनील मुथ्था म्हणाले की पोलीस नुसत्या आश्वासनांवर दिवस काढून हिंदू समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहेत. तपासावर त्यांचे लक्ष केंद्रित नाही पोलिसांनी मुलीचा तपास लवकर न लावल्यास आम्ही सर्व प्रथम बेलापूर बंद करू असा इशारा मुथा यांनी दिला 

*या  वेळी सचिन दोडकर ,सौ पुष्पाताई हरदास , शुभम हरदास ,आदींची भाषणे झाली .याप्रसंगी घिसाडी समाज बांधव व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .


बेलापूर-(प्रतिनिधी  )-सुजाण व समृध्द पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय गरजेचे असुन खरे ज्ञान हे ग्रंथालयातूनच मिळते असे उदगार  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा ,सतिश पावसे यांनी काढले ग्रंथालय दिनानिमित्त बोलतना.ते पुढे म्हणाले की, आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ रंगनाथन यांचे अनन्य साधारण योगदान आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुले करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांनीच रुजवला .नंतर तो जोपासण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.  डॉ.रंगनाथन यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ रंगनाथन यांचा वाढदिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून आपण साजरा करतो. यानिमित्ताने वाचन संस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वाढावी यासाठी ग्रंथालयांचे महत्त्व आहे .प्रा. पावसे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील अतिशय महत्वाचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाचे स्थापना केली . ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .पुढे ते असेही म्हणाले की,  वाचनालयांचा ग्रामीण भागात महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालय वाचकाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ग्रंथामुळे स्वतःची माहिती व ज्ञान यात भर पडते . माणूस समृद्ध होतो. त्याचे विचार समृद्ध होतात.वाचनाने माणूस विवेकी बनतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्व वाढत आहे. त्यादृष्टीने ही नव ग्रंथ पालांना ई-लायब्ररीची देखील संधी उपलब्ध झाली आहे .सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे . त्याचा उपयोग करून बुद्धीची मशागत करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय समितीचे प्रा.अशोक थोरात व प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी केले. डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते झाले.प्रा.सुनिल विधाटे यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget