पोलीस अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या अश्वासना नंतर भाजपा हिंदुत्ववादीसंघटनेचे रस्ता रोको आंदोलन मागे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )--बेलापूरातून अल्पवयीन मुलगी गेल्या वीस दिवसापासून गायब असून या विषयांमध्ये आरोपी आयुब शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे .या गुन्ह्याच्या तपासामध्ये एल सी बी ला सामील करून घेण्यात आलेले आहे. मुलीचा तपास  लवकरात लवकर लावून आरोपीला कडक शासन करू असे अश्वासन श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके साहेब यांनी दिल्यामुळे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले                             सुमारे दीड तास हे रास्ता रोको आंदोलन चालले होते पोलीस अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अश्वासनानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

गेल्या 20 दिवसा पूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही या घटनेच्या निषेधार्थ  महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बेलापूर  श्रीरामपुर चौकात रास्ता रोको करण्यात आला होता.  उपविभागीय पोलिस अधिकारी  संदीप मिटके  यांनी  रास्ता रोको आंदोलध मागे घेण्याचे आवाहन केले . त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार 'तहसीलदार प्रशांत ,पाटील पोलीस  निरीक्षक संजय सानप  आदींनी निवेदन स्विकारले .

*या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ, भाजपचे नेते प्रकाश चित्ते. शिवप्रतिष्ठानचे प्रवीण , जय श्रीराम मंडळाचे भरत , जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे  सुनील मुथ्था भाजपा नेत्या पुष्पाताई हरदास, सौ किरण सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, महाराणा प्रताप सामाजिक प्रतिष्ठानचे सुहास पवार ,राजेंद्र चव्हाण , संदीप पवार , लक्ष्मण साळुंके , नरहरी पवार ,रामभाऊ पवार ,संतोष चव्हाण , कैलास पवार , नवनाथ पवार,  रवी चव्हाण ,राजु पडवळ ,  विजय पवार , केशव गोविंद ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

*यावेळी बोलताना विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ , म्हणाले की गेल्या वीस दिवसांपासून पोलिस प्रशासनाने अपहरण झालेल्या मुलीच्या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून कुठल्याही स्वरूपात तपास पुढे सरकलेला नाही याचा निषेध करून डॉक्टर शिरसाठ पुढे म्हणाले की मुलीचा तपास लवकर न लागल्यास या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाईल असा इशारा डॉक्टर शिरसाठ यांनी दिला यावेळी बोलताना भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले लव जिहाद च्या घटनांचा सर्व हिंदू समाजाच्या कुटुंबांमध्ये प्रचार आणि प्रसार करून सर्व हिंदू समाजाला जागृत केले पाहिजे व आपल्या मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविले पाहिजे. यापूर्वी भेर्डापूर येथे असा प्रकार घडला होता त्याही वेळेला पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावे लागले. आंदोलना शिवाय पळवून नेलेल्या मुलींचा तपासच लागत नाही या घटनेचा मी निषेध करतो अशा पळून नेलेल्या मुलींच्या विषयांमध्ये पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास श्रीरामपूरातील सामाजिक संतुलन बिघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  यावेळी त्यांनी दिला.

* यावेळी बोलताना सुनील मुथ्था म्हणाले की पोलीस नुसत्या आश्वासनांवर दिवस काढून हिंदू समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहेत. तपासावर त्यांचे लक्ष केंद्रित नाही पोलिसांनी मुलीचा तपास लवकर न लावल्यास आम्ही सर्व प्रथम बेलापूर बंद करू असा इशारा मुथा यांनी दिला 

*या  वेळी सचिन दोडकर ,सौ पुष्पाताई हरदास , शुभम हरदास ,आदींची भाषणे झाली .याप्रसंगी घिसाडी समाज बांधव व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget