Latest Post

बेलापुर  (वार्ताहर )-श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथील व्यापारी राजेश  खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या  हंड्यात सापडलेल्या गुप्त धनात केवळ चांदीची  ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १०२० नाणी असे अंदाजे  सापडलेलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे गुप्तधन सापडले असुन  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहे.  

याबाबत  गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून दबक्या आवाजात सुरु  होती. सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा  गावात झाल्या नंतर    बेलापूर येथील राजेश खंटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे  रितसर अर्ज केला त्यात त्यांनी म्हटले   की माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची  विनंती केली होती. त्या नंतर जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र  भोसले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित ठिकाणी जावुन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या 

त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गावात येवुन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामात त्यांना ११ किलो ६  ग्राम चांदी मिळुन आली त्यात चार आणे किमतीची ४६ नाणी होती आठ आणे किमतीची ५८ नाणी तर दोन अरबी नाणी व एक रुपये किमतीची ९१४ नाणी अशी एकुण १०२०नाणी आढळून आली असून सदर गुप्त धन तहसीलदार पाटील यांनी  ताब्यात घेतले आहे,या वेळी पंच म्हणून पत्रकार देविदास देसाई पोलीस पाटील अशोक प्रधान विष्णूपंत डावरे सुवर्णकार अनिल मुंडलीक उपस्थित  होते या वेळी तहसीलदार पाटील यांच्या समवेत मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे पोलीस उपनिरीक्षक समाधान हवालदार अतुल लोटके मिलींद दुधाळ तुळशिराम शिंदे  अरुण अमोलीक पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम अजया डाकले रविंद्र खटोड सुधीर नवले उपस्थित होते.खोदकाम करतान आम्हाला तेथे हंडा सापडला  त्या हंड्यात चांदी बरोबर खाली सोन्याची नाणी होती आम्हा तिघांनाही तो उचलत नव्हता त्या वेळी आम्हाला पैसे देण्याचे अमिष दाखविले होते नंतर नकार दिला त्यामुळे आम्ही तक्रार केली          सुनिल गायकवाड  खोदकाम करणारे मजुर                                   खोदकाम करताना चांदीची नाणी सापडताच नेमके काय करावे अशा मनःस्थितीत काही कालावधी  गेला मग कायदेशिर सल्ला घेवुन आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार आज तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करुन सर्व चांदीची नाणी शासकीय जमा करण्यात आली  राजेश खटोड.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार आहे.या बाबत हाती आलेली माहीती अशी की बेलापुरगाव ही जुनी व मोठी बाजारपेठ होती त्या काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात असत  गावात असे अनेक जुने वाडे आहे  अशाच एका जागेचे खोदकाम काही मजुर करत होते त्यांना अचानक खोदताना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला त्यात बरेच सोने चांदी भरलेले होते तो हांडा घरमालकाने ताब्यात घेतला या बाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते परंतु ते पुर्ण न झाल्यामुळे गुप्तधनाचे बिंग फुटले अन या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर  बोभाटा झाला संबधीतांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले असुन काही चांदी घेवुन संबधीत नगरला गेले आहेत परतु   जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील त्या नंतर महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसुलच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगीतले आहे बेलापूरात गुप्तधन सापडल्याची चर्चा जिल्हाभर पसरली आहे त्यात फक्त चांदी असल्याचाच दावा करण्यात येत आहे ही घटना घडून तेरा चौदा दिवस झाले आहे मग इतक्या दिवस सर्वा जण गप्प का होते याची साखोल चौकशी झाल्यानंतर बरेच काही मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे या गुप्त धनाची चर्चा झाल्यानंतर पोलीसही सावध झाले असुन त्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

संक्रापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर मतदार संघात आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने ५० वर्ष रेंगाळलेली कामे सुरु करण्यात आली असुन कै जयंतराव ससाणे साहेबांचे तालुक्याच्या विकासाचे राहीलेले अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार लहु कानडे यांनी दिली                                        मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत संक्रापुर ते लांडेवाडी या एक कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमीपुजन आमदार लहु कानडे यांच्या हस्ते तसेच करण दादा ससाणे सचिन गुजर ईंद्रनाथ पा थोरात ज्ञानेश्वर मुरकुटे सुधीर नवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी करण ससाणे हे होते   या वेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की नेवासा फाटा ते बाभळेश्वर या १२५ कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्यात आली असुन मतदार संघातील ६५ रस्त्याच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी दिलेला आहे तालुक्यात दहा कोटी रुपयाच्या कामांचे उद़्घाटन करण्यात आले आहेत २० महीन्यात भरपुर कामे सुरु झाली असुन प्रत्येक गावात जावून तेथील कामे करणार आहे आपण जो विश्वास दाखविला त्याची परतफेड विकास कामांच्या रुपाने करणार आहे   मध्यंतरी आपण कोरोना सारख्या संकटाचा सामना केला दुसऱ्या लाटेत आपले अनेक मित्र नातेवाईक आपल्याला सोडून गेले आता तिसऱ्या लाटेत आपले नुकसान होवु नये या साठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे असेही ते म्हणाले या वेळी करण ससाणे सचिन गुजर संजय जगताप पत्रकार देविदास देसाई आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी वैभव गिरमे दवणगावचे सरपंच मेजर खपके गंगापुरचे सरपंच सतिश खडके ज्ञानेश्वर कोळसे दादा महाडीक शिवाजी होन संक्रापुर सोसायटीचे चेअरमन नबाजी जगताप पंडीतराव थोरात युनुस शेख अकील शेख कादरभाई शेख द्वारकनाथ चव्हाण काँन्ट्रक्टर नीखील जगताप उपअभियंता घोलप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकलाड शाखाधिकारी संसारे दावल शेख लक्ष्मण आहेर डाँक्टर सुरेश जगताप ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव सौ शांताबाई जाधव रोहीदास खपके ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण आप्पासाहेब बोरावके तुकाराम चव्हाण कचेश्वर जगताप अर्जुन होन कल्याणराव जगताप दादासाहेब जगताप सुनिल बोरावके राजु थोरात राजेंद्र जगताप संजय होन चंद्रभान जगताप किशोर जगताप कचेश्वर जगताप पापा शेख शकीला शेख हिराबाई जगताप ज्ञानदेव भांड सुधीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच संजय जगताप यांनी केले तर महेबुब शेख यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामराव होन यांनी केले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-लसीकरण दरम्यान गोंधळ गडबड वशिलेबाजी होवु नये म्हणून बेलापुर ग्रामस्थांनी सुरु केलेला टोकण पध्दतीचा अवलंब जिल्ह्यात केला जात असतानाच बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातच या नियमाला हरताळ फासला गेला                 लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून सर्व ग्रामस्थांच्या विचाराने सकाळी सहा ते सात पर्यंत टोकण देवुन नागरीकांना जेवण करुन ठराविक वेळ दिली जायची त्यामुळे लसीकरणात नियोजनबध्दता आली होती लस केव्हा किती उपलब्ध होईल याची माहीती ग्रामस्थांना व्हाँटस्अप द्वारे दिली जात असे कालही लस नसल्याचा संदेश सर्वत्र प्रसारीत करण्यात आला अन सकाळी लस मिळणार असल्याचा मेसेज वैद्यकीय अधिकाऱ्यांना आल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात ठेवुन काहींनी लस देण्याकरीता बाहेरगावचे नातेवाईक मित्रपरिवार यांना बोलावून घेतले लस नसताना आरोग्य केंद्रात गर्दी कशी झाली हे पहाण्याकरीता काही नागरीक त्या ठिकाणी गेले असता लस आली असल्याचे सांगण्यात आले ही बाब जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुनिल मुथा विशाल आंबेकर अजय डाकले यांना समजली ते त्या ठिकाणी गेले असता आरोग्य केंद्राबाहेर भली मोठी रांग लागलेली होती त्यात बहुतेक नागरीक बाहेरगावचे होते या बाबत जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  सुनिल मुथा यांनी संबधीत डाँक्टर व आरोग्य सेवकांना जाब विचारला या वेळी सुनील मुथा यांनी आरोप केला की या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लोक नागरीकांकडून पैसे घेवुन त्याना लस देत आहेत टोकण पध्दतीमुळे देवाणघेवाण करण्यास अडचण येत असल्यामुळे काहींनी नियोजनबध्द कार्यक्रम करुन टोकण पध्दत उधळून टाकण्याचा डाव आखला असुन या ठिकाणी कुणालाही पैसे घेवुन लस दिली जात असेल तर माझ्याशी किंवा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी अभिषेक खंडागळे यांचेशी संपर्क साधावा असे अवाहन सुनिल मुथा यांनी केले आहे प्राथमिक आरोग्य केद्रात आज आलेली लस दुसऱ्या टप्प्यातील नागरीकांना देण्यात आली या वेळी उक्कलगावचेही ग्रामस्थ संतप्त झाले होते.

राहुरी येथील बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समाजसेवी स्ंस्थेतर्फे आयोजित  फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक,वंचित चे जिल्हा महासचिव व बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर व समितीचे दुसरे संस्थापक डांँ संजय पाटील यांना अभिवादन सभेत जिल्हातील विविध पक्ष व संघटनेतर्फे  नुकतीच भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाची सुरूवात समितीचे संस्थापक सदस्य मुख्याध्यापक  मंगेश पगारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अकोले येथील समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार यांच्या निवडीने करण्यात आली.तसेच या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार,प्रमुख पाहुणे राहुरी न.पा चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,पंडुतात्या पवार,पत्रकार वसंतराव झावरे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,राहुरी खुर्द चे मा.सरपंच नंदुभाऊ डोळस डांँ प्रविण क्षीरसागर यांच्या हस्ते तथागत भगवान  बुध्द,डांँ बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित डांँ सुधीर  क्षीरसागर व कालकथित डांँ संजय पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.अध्यक्षबौध्दाचार्य संत्येंद्र तेलतुंबडे व बौध्दाचार्य संजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक त्रिशरण व पंचशिल घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत समितीचे संस्थापक व राहुरी खुर्द चे मां.सरपंच मधुकर साळवे यांनी संस्थेच्या पायाभरणी साठी डांँ सुधीर क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान व संस्थेंचे विविध कार्यांची आणि सध्यस्थितीची माहीती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अजयजी पवार यांनी डांँ सुधीरजी क्षीरसागर यांचे बुध्द विहाराचे स्वप्न साकार करण्यासाठी भरीव अशी आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन डांँ क्षीरसागर,डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांना भावपुर्ण आदरांजली वाहली. यावेळी राहुल जगताप यांनी ६००० रू. खुरसडगावचे मा.सरपंच बाबासाहेब पवार व लक्ष्मीकांत पवार यांनी २१००रू,पत्रकार अयुब पठाण यांनी ११००० रू.,लक्ष्मण जाधव सर यांनी ५०००रू,पडुतात्या पवार यांनी११११ रू.मदत समितीला  बुध्द विहारासाठी  जाहीर केली.या प्रसंगी जेष्ठ नेते पंडुतात्या पवार,जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे,पारनेर चे मा.नगराध्यक्ष शंकरजी नगरे,राहुरी चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,माजी सरपंच नंदुभाऊ डोळस,अँड.रावसाहेब मोहन,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव,आर पी आय चे तालुका प्रमुख विलासनाना साळवे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,मानवी हक्क आयोगाचे प्रविण लोखंडे,वंचित चे  राहुरी तालुकाध्यक्ष अनिल जाधव,श्रीरामपुर अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन,वंचित चे आप्पासाहेब मकासरे,बहुजन समाज पार्टीचे सुनिल तांबे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेशराव लांबे,मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी,राष्ट्रवादीचे अविनाश ओव्हळ ,भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड,डी वाय एस पी प्रसाद सांगळे,बाबुराव मकासरे,ईब्टाचे राजेंद्रजी विधाते,समाजसेवक लक्ष्मण जाधव सर,विजय कदम सर,रमेश पगारे,खराडे सर,पारधे गुरूजी,सरपंच बाचकर,सरपंच बर्डे,सावंत साहेब  शिवाजी पवार,शिवाजी देठे,अंबादास साखरे इ.नी कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर, तसेच कालकथित डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांच्या आठवणीला उजाळा देत भावपुर्ण  आदरांजली वाहीली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तमराव सातपुते तर आभार  मुख्याध्यापक विनितकुमार कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूणजी तुपविहीरे,मनोज घोगशे,विरूभाऊ ठोंबरे,समितीचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी राहुरी,श्रीरामपुर,राहाता,अहमदनगर,अकोले,पारनेर अशा जिल्हातील विविध ठीकाणावरून कार्यकर्त्यांनी या अभिवादन सभेत हजेरी लावली होती.


श्रीरामपुर (प्रतिनिधी) - सध्या राज्यात महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या विजबील वसुली विरुद्ध समाजवादी पार्टीतर्फे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादारसह स.पा.चे कार्यकर्ते उपस्थित होते.

 सध्या कोरोना संकटाने भरडला जात असलेला सर्वसामान्य नागरीक विज बिलाद्वारे संतप्त होत असुन आस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत अक्षरशः मेटाकुटीला आला आहे,

विजबीलप्रश्नी शासनाने "सक्तीची विजबील वसुली" या सोडलेल्या तुघलकी फर्मानामुळे नागरीकांच्या संकटात आणखी भर पडून मोठ्या संतापाचा सामना करणे त्यांना भाग पडत आहे,कोरोना महामारीच्या संकटाने देशात  सर्वसामान्यांसोबत सर्वच क्षेत्रातील नागरीक भयंकर त्रस्त झालेले आहेत, त्यात शासनाकडून कधीही अचानक लॉकडाऊनचे नियोजन करण्यात येते ,यामुळे सर्वसामान्य माणसाला आपण जगावे कसे ? हेच समजून येत नाही,भविष्याची चिंता नेहमीच सर्वसामान्य माणसाला काळजीत टाकत असते,उद्याचा दिवस कसा असेल  किंवा आपल्या कुटूंबाचे उदर निर्वाह कसा करता येईल याच काळजीने त्यांचे रोजचे जीवन  भरडून जात आहे, माहे एप्रिल आणि मे २०२१ असे सलग दोन महिने शासनाकडून लॉकडाऊन लावले गेले,सर्वसामान्यांच्या घरात रोज कमविणे आणि खाणे असा नित्यक्रम असतो, दोन महिने सर्वसामान्यांच्या हाताला काम नव्हते,त्यात विज बिल भरले नाही म्हणून विज कंपनीची माणसे घरातील विज कनेक्शन बंद करणेकामी घरातील माणसांवर बळजबरी करत आहेत, विजेची बिले भरा अन्यथा विज कनेक्शन बंद करतो अशी धमकी दिली जात आहे, सर्वसामान्य नागरीकांचा अंत पाहिला जात आहे, त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे ,रोजगार नाही,काम नाही , उद्योग धंदे बंद आहेत,अशा परिस्थितीत प्रपंचाचा गाडा सर्वसामान्य माणूस कसा बसा पुढे रेटत आहे, त्याला शासनाच्या वतीने काही तरी सहानुभूती पुर्वक मदत अथवा सवलतीच्या माध्यमातून अर्धे विज बिल माफ करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते,मात्र सहानूभुती ऐवजी जर राज्यशासनाकडून नागरीकांना त्रास देण्याची भुमिका स्विकारली जात असेलतर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.अबु आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या या गलथान कारभार तथा तुघलकी फरमानाविरुद्ध  तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे भाग पडेल, असा गंभीर इशारा या निवेदनात देण्यात आला आहे,

 यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, शहरसचिव अब्दुल सैय्यद, शहर कार्याध्यक्ष ईरफान पठान, सोशल मीडिया अध्यक्ष जकरिया सैय्यद, शहर सहसंघटक परवेज शेख, जब्बार भाई पठाण,जलील शेख, शाहिद शेख, युनूस पठाण, आदी मान्यवार उपस्थित होते.


राहुरी( प्रतिनिधी): राहुरी येथील  पत्रकार   रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no. 286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास Dysp संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

Dysp मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असले बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने  त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात  जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी     मिळवून  सदर गुन्ह्याचा  सखोल तपास केला. यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर  उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु  सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून  न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी  तथा श्रीरामपूर विभागाचे Dy.s.p. संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचे सह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र आज रोजी न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी कान्हु मोरे सह चार साथीदारांविरोधात 942 पानांचे दोषारोप पत्र दाखल.

आरोपींची नावे

1)कान्हु गंगाराम मोरे  2)लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी

3)तोफिक मुक्तार शेख 4)अक्षय सुरेश कुलथे

5)अनिल जनार्धन गावडे

राज्यभर गाजले प्रकरण

‌   पत्रकार रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते होते त्यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले होते.आरोपीच्या  अटकेकरिता विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटना यांनी निवेदने दिली होती.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget