डांँ क्षीरसागर व डांँ पाटील यांना सर्वपक्षीय आदरांजली.

राहुरी येथील बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समाजसेवी स्ंस्थेतर्फे आयोजित  फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक,वंचित चे जिल्हा महासचिव व बोधिसत्व डांँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर व समितीचे दुसरे संस्थापक डांँ संजय पाटील यांना अभिवादन सभेत जिल्हातील विविध पक्ष व संघटनेतर्फे  नुकतीच भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाची सुरूवात समितीचे संस्थापक सदस्य मुख्याध्यापक  मंगेश पगारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अकोले येथील समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार यांच्या निवडीने करण्यात आली.तसेच या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अजयजी पवार,प्रमुख पाहुणे राहुरी न.पा चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,पंडुतात्या पवार,पत्रकार वसंतराव झावरे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,राहुरी खुर्द चे मा.सरपंच नंदुभाऊ डोळस डांँ प्रविण क्षीरसागर यांच्या हस्ते तथागत भगवान  बुध्द,डांँ बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित डांँ सुधीर  क्षीरसागर व कालकथित डांँ संजय पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.अध्यक्षबौध्दाचार्य संत्येंद्र तेलतुंबडे व बौध्दाचार्य संजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक त्रिशरण व पंचशिल घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत समितीचे संस्थापक व राहुरी खुर्द चे मां.सरपंच मधुकर साळवे यांनी संस्थेच्या पायाभरणी साठी डांँ सुधीर क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान व संस्थेंचे विविध कार्यांची आणि सध्यस्थितीची माहीती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अजयजी पवार यांनी डांँ सुधीरजी क्षीरसागर यांचे बुध्द विहाराचे स्वप्न साकार करण्यासाठी भरीव अशी आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन डांँ क्षीरसागर,डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांना भावपुर्ण आदरांजली वाहली. यावेळी राहुल जगताप यांनी ६००० रू. खुरसडगावचे मा.सरपंच बाबासाहेब पवार व लक्ष्मीकांत पवार यांनी २१००रू,पत्रकार अयुब पठाण यांनी ११००० रू.,लक्ष्मण जाधव सर यांनी ५०००रू,पडुतात्या पवार यांनी११११ रू.मदत समितीला  बुध्द विहारासाठी  जाहीर केली.या प्रसंगी जेष्ठ नेते पंडुतात्या पवार,जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे,पारनेर चे मा.नगराध्यक्ष शंकरजी नगरे,राहुरी चे उपनराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी,माजी सरपंच नंदुभाऊ डोळस,अँड.रावसाहेब मोहन,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव,आर पी आय चे तालुका प्रमुख विलासनाना साळवे,आर पी आय चे बाळासाहेब जाधव,मानवी हक्क आयोगाचे प्रविण लोखंडे,वंचित चे  राहुरी तालुकाध्यक्ष अनिल जाधव,श्रीरामपुर अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन,वंचित चे आप्पासाहेब मकासरे,बहुजन समाज पार्टीचे सुनिल तांबे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेशराव लांबे,मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी,राष्ट्रवादीचे अविनाश ओव्हळ ,भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड,डी वाय एस पी प्रसाद सांगळे,बाबुराव मकासरे,ईब्टाचे राजेंद्रजी विधाते,समाजसेवक लक्ष्मण जाधव सर,विजय कदम सर,रमेश पगारे,खराडे सर,पारधे गुरूजी,सरपंच बाचकर,सरपंच बर्डे,सावंत साहेब  शिवाजी पवार,शिवाजी देठे,अंबादास साखरे इ.नी कालकथित डांँ सुधीर क्षीरसागर, तसेच कालकथित डांँ संजय पाटील,दादासाहेब साठे व विजयराव कदम यांच्या आठवणीला उजाळा देत भावपुर्ण  आदरांजली वाहीली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तमराव सातपुते तर आभार  मुख्याध्यापक विनितकुमार कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूणजी तुपविहीरे,मनोज घोगशे,विरूभाऊ ठोंबरे,समितीचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी राहुरी,श्रीरामपुर,राहाता,अहमदनगर,अकोले,पारनेर अशा जिल्हातील विविध ठीकाणावरून कार्यकर्त्यांनी या अभिवादन सभेत हजेरी लावली होती.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget