Latest Post

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी कामकाजाच्या दुसर्याच दिवशी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वार्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेवुन फिरत आहे उपविभागीय अधिकारी संदिपं मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सानप ऐ पी आय संभाजी पाटील पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या अधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असुन संबधीता विरुध्द आर्म आँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपुर येथील एका व्हाँटसअप गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मजकुर टाकल्याबद्दल दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असुन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिला आहे.श्रीरामपुर येथील एका गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकण्यात आली होती ही बाब बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्या लक्षात आणुन दिली  पोलीस निरीक्षक सानप यांनी तातडीने संबधीत गृप अँडमीनला बोलावुन घेतले व संबधीत आक्षेपार्ह पोस्ट बद्दल विचारणा केली त्यांनी ही पोस्ट  दोन युवकांनी टाकली असुन त्या नंतर गृपचे सेटींग बदलुन ओन्ली अँडमीन असे करण्यात आल्याचेही सांगितले त्यामुळे पोलीस निरीक्षक सानप यांनी त्या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले पोलीस स्टेशनला आणल्या नंतर त्या दोघांनी ती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे कबुल केले त्यां नंतर त्यांचेवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पोस्ट टाकून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला होता पोलीसा निरीक्षक सानप यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजुन सांगीतले व अशा प्रकारे पोस्ट टाकणार्या व्यक्ती विरुध्द कडक कारवाई  केली जाईल सोशल मिडीया हे चांगले प्रसार माध्यम असले तरी त्याचा गैरवापर कुणी करु नये व्हाँटस्अप गृप फेस बुक ट्विटर वर कुणी कुणाचा अपमान मानहानी होईल अशी पोस्ट टाकल्यास वा फाँरवर्ड केल्यास गृप अँडमीनसह पोस्ट फाँरवर्ड करणारावर कडक कारवाई केली जाईल सर्व व्हाँटस्अप गृपवर पोलीसांची नजर आहे समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये असे अवाहनही पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राजनीति समाचार चे पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेचे सभासद शेख खलील शेख यासीन राहणार मालेगाव यांची महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मालेगाव शहर संघटक पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिली खलील शेख हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेय संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेशी एकनिष्ठ असून सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो याच बरोबर राजनीती समाचार या वृत्तपत्रातून त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यांच्या या कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची निवड केली तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बिके सौदागर प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के शेख नाशिक जिल्हा सचिव वहाब खान महेबुबखान नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर पठाण चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास पठारे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष असलम बिनसाद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख मालेगाव शहर अध्यक्ष इलियास छोटू मिया राहता तालुका अध्यक्ष विजय खरात राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी तसेच अकबर भाई शेख ,अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, मुरलीधर किंगर ,साईनाथ बनकर ,,लक्ष्मण साठे आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील नवीन वसाहत असलेल्या मिल्लत नगर या भागाकडे नगरपालिकेचे लक्ष नसून गेल्या पाच दिवसांपासून या परिसरामध्ये कचऱ्याची गाडी देखील फिरकलेली नाही. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे व गवत वाढले असून त्यांची साफसफाई देखील होत नाही. त्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव नागरिक सहन करीत आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील नगरपालिका या भागाकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून नगरपालिकेचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

मिल्लत नगर भागातील दोन्ही नगरसेवक या भागाकडे फिरकत नाहीत. रस्ते, गटारी, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन या समस्या अनेक दिवसांपासून आहेच. या भागामध्ये जो एक रस्ता तयार केला आहे त्या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली असून इतर रस्त्यांचे डांबरीकरण झाले त्याचवेळी हा रस्ता केला आहे. मात्र या रस्त्याचे डांबर केले कुठे ? असा प्रश्न या भागातील रहिवासी युसुफ लाखानी यांनी विचारला आहे.  ओपन स्पेस तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात झाडेझुडपे, गवत वाढले असून यामधून मोठे साप निघतात. नगराध्यक्षांना  प्रत्यक्ष जागेवर आणून सर्व परिसर दाखवण्यात आला. त्यांनी लवकरात लवकर सफाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन महिने होऊन देखील ही सफाई झालेली नाही. या भागांमध्ये काही ठिकाणी अजून रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाईपलाईन नसल्यामुळे सध्या असलेल्या नळांना  मोटर लावून देखील पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक मात्र पाणीटंचाईने हैराण झालेले आहेत. पालिकेने तातडीने या भागामध्ये लक्ष द्यावे अन्यथा येत्या नगर पालिका निवडणुकीत प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  शहरातील अस्वच्छता दुर होऊन स्वच्छता निर्माण व्हावी याउद्देशाने श्रीरामपूर नगर परिषदेमार्फत श्रीरामपूर शहरातील भुयारी गटारीचे नियोजन करून शहरात विविध ठिकाणी भुयारी गटारींची कामे करण्यात आली,

मात्र सदरील कामे ही अर्धवट आणि अपूर्ण असल्याचे दिसून येते आहे, यामुळे शहरातील नागरीकांचा त्रास वाचण्याऐवजी वाढला असून याची प्रचंड चिड सध्या शहरातील नागरीकांमध्ये बघावयास मिळत आहे,

कारण या भुयारी गटारींचे अर्धवट झालेल्या कामांचा सर्वसामान्य नागरीकांना काहीही लाभ होत नाही, याउलट जास्तच मनस्ताप आणि त्रास वाढला आहे, सदरील भुयारी गटारीत कोणीही आपापल्या स्वतःच्या घरातील ड्रेनेज /बाथरुम घाण पाण्याचे कनेक्शन जोडून मोकळा होत आहे, व त्याचा त्रास इतरांना होत आहे, तसेच श्रीरामपूर शहरातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच्या गटारी देखील नेहमीच तुंबलेल्या दिसून येतात,त्यांची वेळोवेळी नित्य नियमाने योग्य साफसफाई होत नाही, शहरातील बहुतांश रस्त्यावरुन खळखळून हे दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी वाहत असते, तथा वेळोवेळी कचरा उचलणारी घंटागाडी देखील येत नसल्यामुळे रस्त्यावर नेहमीच कचऱ्याचे ढीगारे बघावयास मिळतात,त्याचा सर्वच नागरिकांना मोठा त्रास होत होत असून या कमालीच्या अस्वच्छतेमुळे भविष्यकाळात शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची शक्यता ही नाकारता येऊच शकत नाही,

कधीतरी महिन्यातून एखादेवेळी  सदरील कचरा घंटागाडी येते, फक्त त्यावेळीच कचरा कुंड्या साफ दिसतात,मात्र दुसर्यादिवशी  पुन्हा त्या कचऱ्याने ओसांडून वाहताना दिसून येतात, याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यालयात समक्ष भेटून, तथा तोंडी व लेखी समस्या मांडूनही सदरीलबाबी रस्त्यावरील कचऱ्याची तसेच तुंबलेल्या गटारीची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन स्वच्छतेबाबत कुठलीही सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे,

याकरीता मा.मुख्याधिकारी

 साहेबांनी जे.जे.फाऊंडेशनच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे  तथा प्रथम भुयारी गटारीच्या नियोजनाचे काय झाले याचा खुलासा करावा आणि याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने सदरील प्रकरणी नियमितपणे कमीतकमी दिवसांततरी गटारी साफ करण्यात याव्यात,तथा कचरा उचलणारी घंटागाडी ही दैनंदिन पाठविण्यात यावी, याबाबत आपण मा.मुख्याधिकारी साहेबांनी स्वत: जातीने लक्ष घालावे अन्यथा या गंभीर प्रकरणी याविरोधात जे.जे. फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आपल्या मित्र परिवारासह लोकशाही मार्गाने श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनासह अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत तथा यापासून निर्माण झालेल्या बर्या वा वाईट परिणामास संबंधित श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनच जबाबदार राहील असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सदरील निवेदन हे मा.मुख्यधिकार्यासह मा.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,आमदार, खासदार आणि सर्व प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या या निवेदनावर जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार,असिफ तंबोली, अय्युब पठान, अल्तमश शेख, दानिश पठान,जकरिया सैय्यद, अरबाज कुरैशी, मुबसशीर पठान, शाहिद शेख, शकील शेख, गुड्डू जमादार, अनवर तंबोली, मोसीन कुरैशी,नईम बागवान, शादाब पठान,फरहान शेख,आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


 बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक विश्लेषन

बेलापुर ( देविदास देसाई )- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रात्रीतुन झालेली युती अमान्य झाल्यामुळे अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका जनता विकास अघाडीला बसल्यामुळे त्यांना केवळ सहाच जागेवर समाधान मानावे लागले  मात्र गावकरी मंडळाने गाव विकासाचा आराखडा जनते सामोर ठेवुन सत्ताधार्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे सभामधुन काढले ते जनतेला भावले त्यामुळे गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या                                             प्रभाग क्रमांक एक हा जनता अघाडीचा अभेद्य प्रभाग होता प्रत्येक निवडणूकीत या प्रभागात जनता अघाडीने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो विजयी होत होता परंतु या निवडणूकीत जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड उभे होते परंतु यांवेळी त्यांचीही दमछाक झाली या प्रभागात सलग दोन पंच वार्षिक सदस्य राहीलेल्या शेख शिरीन जावेद यांना पराभव पत्करावा लागला तो ही केवळ ४५ मतांनी त्यात काहींना कोणते बटन दाबावयाचे हे न समजल्यामुळे नोटा बटन दाबले गेले तसेच जनता अघाडीने नाकारल्यामुळे सय्यद बेगम अबुताहेर यांनी अपक्ष निवडणूक लढविली त्यात त्यांना ९० मते मिळाली अपक्ष उमेदवारांचा फटका हा शिरीन शेख यांना बसला व गावकरी मंडळाचा विजय झाला रंजना बोरुडे या ही केवळ २१ मताच्या फराकाने विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील अपक्ष उमेदवार कैलास चायल मुळे चुरशीची लढाई झाली दोन वेळेस सरपंच राहीलेले भरत साळुंके यांचा केवळ ६८ मतांनी विजय झाला गांवकरी मंडळाचे प्रफुल्ल डावरे यांनी जोरदार लढत दिली त्यांना ५५४ मते मिळाली तर अपक्ष असलेले कैलास चायल यांनी ५४१ मते मिळविली तर याच प्रभागात चुकुन उमेदवारी अर्ज राहीलेल्या पवार नंदा अनिल यांचा फटका जनता अघाडीलाच बसला या ठिकाणी गावकरी मंडळाच्या सविता उत्तम आमोलीक ६१ मताच्या फरकाने विजयी झाल्या तर  नंदा पवार यांनी जाहीरपणे जनता अघाडीला पाठींबा दिलेला असतानाही त्यांना ८६ मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन हा अरुण पा नाईक यांच गड म्हणून ओळखला जात होता या भागातुन कुठल्याही निवडणूकीत अरुण पा नाईक यांना मताधैक्य असायचे परंतु या वेळी नवखा तरुण तडफदार उमेदवार अभिषेक खंडागळे याने ४४० मताच्या फरकाने विजयी झाला अरुण पा नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांना ५७८ मते मिळाली तर अपक्ष असणारे शेख नवाज ईलीयास यांना ४५६ मते मिळाली प्रभाग क्रमांक  पाच मध्ये साळवी महेंद्र जगन्नाथ हे २१६ मताच्या फरकाने विजयी झाले या ठिकाणी अपक्ष उमेदवार अच्छेलाल यादव यांना १०७ मते मिळाली सुविध भोसले यांना ६२ मते मिळाली तर नोटा १७ मते मिळाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये मिना अरविंद साळवी या ५२ मताच्या फरकाने विजयी झाल्या तेथे कविता झीने यांना ९३ मते मिळाली या ठिकाणीही अपक्षामुळे गडबड झाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवखे उमेदवार चंद्रकांत नवले हे १४७ मताच्या फरकाने विजयी झाले या प्रभागात तीन जण अपक्ष उभे होते  प्रकाश पाटणी यांना ६३ अच्छेलाल यादव यांना ६३  राशिनकर राजेंद्र  यांना ५४ मते मिळाली त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी सर्व उमेदवारांची बेरीज वजाबाकी बिघडवण्याचे काम केले हे ही तितकेच  सत्य आहे.

श्रीरामपूर :-( प्रतिनिधी)आय.पी. एस. पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी श्रीरामपूर शहरातील तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ उत्कृष्टपणे पूर्ण केला शहरात कायदा व सुव्यवस्था दृढ करण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाचे संरक्षणाची काळजी घेतली विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात शहर व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले होते. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले होते. आज रोजी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून श्रीरामपूर करांचा निरोप घेतला. यावेळी त्यांना निरोप देणे करिता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या

अप्पर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक श्री. मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खान साहेब आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी गेल्या तीन महिने उत्कृष्टपणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, शेख गुलाब भाई वायरमन इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद,स्वप्नील सोनार, फकीर मोहंमद शेख, देविदास देसाई, जयेश सावंत, सुभाषराव गायकवाड, अमन शेख, शहबाज पठाण, रुषीकेष पोल.सचीन केदार, रोहित भोसले,युनूस इनामदार, हर हर ,अमोल शिरसाट, अँड.डोके, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, राजमोहंमद शेख, कलीम बिनसाद, मोहसीन शेख,आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र लघु उत्त पत्र व पत्रकार संघ च्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की श्रीरामपूर शहरासाठी असाच निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी द्यावा.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget