Latest Post

मधुकर वक्ते कोपरगाव प्रातिनिधी
      कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल बिघडण्याला वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होत असलेली वनराई हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून अनियमित व कमी प्रमाणात होत असलेले पर्जन्यमान,अति उष्णता,काही भागात कमी पर्जन्यमान तर काही भागात महापूर अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अशीच राहिली तर भावी पिढीचे भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन  संजय वक्ते व त्यांचे मित्र पोपट सोळके  यांनी दिली आहे.या दोन मित्रांनी वृक्षारोपण करून एक निसर्गा विषय कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी वृक्षारोपण करतांना दिनकर सोळके, तेजेस वक्ते, राजू वक्ते, अनिल वक्ते, मधुकर वक्ते ,दिपक गरूड,आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर नगरपालिकेतील अविभाज्य भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यामुळे भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत,प्रभागात संजय नगर सोसायटी, रामनगर,संजयनगर परिसर,ईदगाह परिसर,अचानक नगर,गोपीनाथनगर परिसर,मिल्लतनगर च परिसर,उस्मानिया मस्जिद परिसर असा विस्तृत भाग आहे,यात सगळीकडे रस्ते खराब झालेले असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणे मुश्किल होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये अबाल वृद्ध,गर्भवती असणाऱ्या माता भगिनींना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते,अशा परिस्थितीत भागातील नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन त्यामध्ये सर्व रस्ते हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण अथवा गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक चेच करण्यात यावे अशी विनंती करण्यात येऊन रस्त्यांची सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली रस्ते होत असताना माती मिश्रित मुरुमाची न होता दीर्घ काळ टिकणारी अशी पक्क्या स्वरूपात करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली,
सदर निवेदनाची तात्काळ दखल न घेण्यात आल्यास नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलने करण्याची वेळ आजच्या कोरोना सारख्या महामारी मध्ये येऊ नये अशी नम्र विनंती या वेळी करण्यात आली.
यावेळी सदर निवेदनाची एक प्रत नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांना देण्यात आली,यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी निवेदनावर सह्या करून सदर निवेदन हे कोरोना चे प्रशासनिक नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात शरीफ भाई शेख,राहुल कुलकर्णी, रवि बोर्डे,मनीष पंचमुख, इम्रान भाई दारुवाला,इम्रान पटेल,बबलू म्हस्के,अभिजित चक्रे,आयुब पठाण,अविनाश पंडित आदी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितत देण्यात  आले.

बुलडाणा - 23 ऑगस्ट
बुलडाणा एलसीबीच्या एका पथका द्वारे केलेली कार्रवाईची बातमी फेसबुकच्या पेजवर पोस्ट झाली असता खामगांव येथील एका विघ्नसंतोषीने पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी कमेंट त्या फेसबुक पेजच्या पोस्ट खाली केल्याने त्याच्या विरोधात खामगांव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीची भूमिका महत्वाची असते. एलसीबीचे अधिकारी,कर्मचारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडते.अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा होतात परंतु काही विघ्नसंतोषींना एलसीबीची चांगली कामगिरी डोळ्यात सलते. बुलडाणा एलसीबीच्या एका पथकाने बुलडाणा येथील एका अट्टल मोबाइल चोराला अटक करून त्याच्याकडून काही मोबाइल जप्त केले होते.याची बातमी "पब्लिक ऍप" च्या फेसबुक पेजवर 25 जुलै रोजी प्रसारित झाली होती.या बातमी संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये खामगांव येथील आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने एलसीबी पथकाची अर्थात पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी व आक्षेपहार्य कमेंट पोस्ट केली आहे. याची बुलडाणा एलसीबीला माहिती झाली.या प्रकरणी फेसबुक वापरकर्ता इसम विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने अत्यंत बेजबाबदारपणाने सदरची पोस्ट प्रसारित केल्याने पोलिस दला विषयी समाजा मध्ये अप्रीतिची भावना निर्माण झाली आहे,त्यामुळे बुलडाणा एलसीबीच्या वतीने या प्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या तक्रारीवर फेसबुक पेजवर पोलिसा विरोधात आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे विरुद्ध पोलिस (अप्रीतिची भावना चेतावणे) अधिनियम 1922 ची कलम 3 अन्वये खामगांव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आहे.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून रघुनाथ आगळे हे २००३ साली सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रात्री झोपेत असताना अचानक दरवाजा वाजल्याच्या आवाज आला. यावेळी  आगळे यांच्या पत्नीने हॉलमध्ये येऊन पती रघुनाथ आगळे यांना उठविले. याचवेळी  घराचे दार तोडून चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके तर दुसºयाच्या हातात काहीतरी धारदार हत्यार होते. त्यातील एकाने श्री व सौ. आगळे  यांना गप्प बसा अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सौ. आगळे यांच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. तर दुसºयाने हातातील सोन्याची बांगडी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने ती बांगडी कापली. त्यावेळी सौ.आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यावेळी आगळे यांनी आरडाओरडा केल्याने बाहेर उभा असलेल्या चोरट्यांच्या साथीदाराने लवकर आवरा कोणीतरी येत आहे असे सांगितले. त्यावेळी हातातील कापलेली बांगडी खाली पडली. ती तशीच सोडून चारही चोरटे घराबाहेर पळून गेले. आरडाओरडा करीत आगळे हे त्यांच्या मागे पळाले असता घराच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उड्या मारून पाच जण पळून जातांना त्यांना दिसले. चोरट्यांनी १ लाख ४० हजार किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले आहे. याबाबत आगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा - 22 ऑगस्ट
हातनी ते दूधा या राष्ट्रीय माहामार्गा वरील घाटनांद्रा गावा जवळ बायपाससाठी शेत जमीनीचे भूसंपादन करु नये, अशी आग्रही मागणी करीत घाटनांद्रा येथील 7 शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण किंवा आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
     बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा  येथील शेतकऱ्यांनी याबाबत 21 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्र.753 चिखली ते भोकरदन म्हणजे हातनी ते दूधा या रस्त्यासाठी घाटनांद्रा गावाजवळ संबंधित विभाग बायपास करणार आहे.परंतु या बायपाससाठी आमच्या शेत जमीन अधिग्रहित केली जाणार,या ठीकाणी 3 पक्क्या विहीरी व 1 बोअरवेल आहे. या रस्त्यात पुर्वी सुध्दा आमची जमीनी गेल्याने आम्ही आगोदरच अल्पभूधारक झालो. पुर्वीचा रस्ता असतांना शासन नाहक बायपास रस्ता काढण्याबाबत नोटीस देत आहे. 14 जुलैला हरकत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपअधिक्षक भूमि अभिलेख बुलडाणा कार्यालयातून कोणत्याच प्रकारची विचारपूस झाली नाही,असे निवेदनात म्हटले आहे.पुर्वीचा रस्ता कायम ठेवून विकसीत करण्यात यावा,नवीन बायपास करण्यात येवू नये,अन्यथा आम्ही परिवारासह उपोषण किंवा आत्महत्या करू, असा इशारा शेतकरी दत्तू विठ्ठल पुरी, सुभाष भुसारी, गजानन भुसारी, भावराव भुसारी,भाऊसिंग सोळंके, मधुकर भुसारी, शेषराव भुसारी यांनी दिला आहे.

बुलडाणा - 19 ऑगस्ट
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षात असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यात पिवळे फेटे बांधून विधानसभेत धनगर आरक्षण मागत होते.आता हेच सत्तेत बसून एक वर्ष होऊन गेले पण धनगर आरक्षणाबद्दल तोंडात शब्द काढत नाही.ही राज्यातील दीड कोटी धनगर समाजाची अवहेलना आहे.या विरोधात जय मल्हार सेनेने 13 ऑगस्ट पासुन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामध्ये राज्यभरातून धनगर समाजाच्या वतीने 11 लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.आता पर्यंत 4 लाख पोस्टकार्ड पाठविले असून बुलडाणा जिल्ह्यातून 21 हजार कार्ड पाठवणार आहे. या माध्यमाने सत्तेतील नेत्यांना धनगर आरक्षणाची आठवण करून देणार आहेत.या संदर्भात आज 19 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील विश्राम भावनात जय मल्हार सेनेच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सरसेना पती लहु शेवाळे,श्रीमती रंजनाताई बोरसे,नामदेव बाजोडे,संतोष वरखेड़े,धोंडीराम गोयकर व इतर समाज बांधव हजर होते.

🔹नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
बुलडाणा - 19 ऑगस्ट
मागील दीड ते दोन वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील हातनी ते दुधा या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणकार्य संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना बसला होता तर यावर्षीही नियोजनशून्य कामामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.
      मागील दोन-तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.अशात 17 ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यातील रायपूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. हातनी ते दूधा या रायपूरहुन जाणाऱ्या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित नाल्या केल्या नाही,त्यामुळे पावसाचे पाणी अनेक शेतात शिरल्याने उभे पीक व शेतजमीन वाहून गेली आहे. रायपूर येथील शेतकरी तजम्मुल हक जियाउल हक यांच्या 3 एकर शेतात गोबी,कोथिंबीर व इतर भाजी पाल्याची लागवड त्यांनी उसनवारीने पैशे घेऊन केली मात्र त्यांच्या शेतात पाणी घुसले व पूर्ण पिक पाण्यात बुडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ठेकेदाराने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तजम्मुल हक यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget