बुलडाणा - 19 ऑगस्ट
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षात असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यात पिवळे फेटे बांधून विधानसभेत धनगर आरक्षण मागत होते.आता हेच सत्तेत बसून एक वर्ष होऊन गेले पण धनगर आरक्षणाबद्दल तोंडात शब्द काढत नाही.ही राज्यातील दीड कोटी धनगर समाजाची अवहेलना आहे.या विरोधात जय मल्हार सेनेने 13 ऑगस्ट पासुन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यामध्ये राज्यभरातून धनगर समाजाच्या वतीने 11 लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.आता पर्यंत 4 लाख पोस्टकार्ड पाठविले असून बुलडाणा जिल्ह्यातून 21 हजार कार्ड पाठवणार आहे. या माध्यमाने सत्तेतील नेत्यांना धनगर आरक्षणाची आठवण करून देणार आहेत.या संदर्भात आज 19 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील विश्राम भावनात जय मल्हार सेनेच्या वतीने पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सरसेना पती लहु शेवाळे,श्रीमती रंजनाताई बोरसे,नामदेव बाजोडे,संतोष वरखेड़े,धोंडीराम गोयकर व इतर समाज बांधव हजर होते.
Post a Comment