Latest Post

बुलडाणा - 3 जुलै
बुलडाणा-धाड मार्गावर हतेडी जवळ भरधाव 2 दूचाकीच्या भिषण धडकेत 2 जण ठार  झाल्याची घटना आज 3 जुलै रोजी घडली आहे.
      बुलडाणा येथील गणेश नगर भागात राहणारे 36 वर्षीय अनिल तेजराव डुकरे हे बुलडाणा तालुक्यातील हतेडीच्या विद्युत उपकेंद्रवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.आज सकाळी ते ड्यूटीवर दूचाकीने उपकेंद्राकडे जात असतांना हतेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने  त्यांना जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात  अनिल डुकरे व समोरचा दुचाकी चालक गणेश बर्डे रा.तांदुळवाडी हे दोघे जण गंभीर जख्मी झाले.त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता अनिल डुकरे यांना डॉक्टरने मृत घोषित केले तर गणेश बर्डे याला जास्त मार लागल्याने पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले होते. मात्र तो अत्यावस्थ असल्याने त्याला सायंकाळी अमरावती येथे रेफर करण्यात आले असता त्याची ही प्राणज्योत मालवली असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय रामपुरे करीत आहे.

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- पोलिसांनी पाठलाग केल्याने व वाळूने भरलेल्या वाहनाला कट मारल्याने देवगड येथे अपघात झाला. या अपघातास या दोघा पोलिसांसोबत पिकअपचा मालक व त्यांचे दोन साथीदार जबाबदार आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी मदत करण्याऐवजी या दोघा पोलिसांसह वाळूतस्करांनी पळ काढला. हे पाचही जण माझ्या पतीच्या व इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत वाहन चालकाच्या पत्नीने तालुका पोलिसांकडे केली आहे.संगमनेर तालुक्यातील देवगड फाट्याजवळ वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता वादग्रस्त होत चालले आहे. पोलिसांनी पाठलाग केल्यामुळेच या वाहनाचा अपघात झाला होता. अशी चर्चा होत असताना मयत वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद व मामा जमशीद आय्युब शेख यांनी तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन थेट पोलिसांचे नाव घेऊन आरोप केला आहे.वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 28 जून रोजी रात्री 2 वाजता मोईन फारुख पठाण, भैय्यू उर्फ इस्माईल शेख, आवेज नासिर शेख (सर्व रा. नाईकवाडीपुरा, संगमनेर) हे आमच्या संगमनेर खुर्द येथील घरी आले. पतीस झोपेतून उठून वाळूने भरलेली गाडी घेऊन जाण्यास सांगितले. पतीने नकार दिला असता दमदाटी व शिवीगाळ करून गाडी घेऊन जाण्यास सांगितले.आपला पती वाळू भरलेली पिकअप घेऊन जात असताना दोन पोलीसांनी त्यांच्या वाहनातून वाळूच्या पिकअपचा जोर्वे नाका ते देवगड मंदिरापर्यंत पाठलाग केला. ते सफेद रंगाच्या झायलो गाडीमधून पाठलाग करत होते. (या गाडीचा क्रमांकही या तक्रार अर्जात दिला आहे.) पोलीस पाठलाग करत असल्यामुळे पतीने आपल्या वाहनाचा वेग वाढविला. पोलिसांनी पिकअपला कट मारल्यामुळे वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात माझा पती व दोन मजुरांचा मृत्यू झाला.अपघातात जखमी असलेल्या अक्षय माळी या मजुराने पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र अपघात पाहून त्यांनी पोबारा केला. काही वेळानंतर मोईम पठाण व अन्य त्याचे साथीदारही घटनास्थळी आले. मात्र त्यांनीही मदत न करता पळ काढला. या अपघातास पोलीस व संगमनेरचे वाळूतस्कर जबाबदार असल्याने या सर्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बुशरा या महिलेने केली आहे.पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप अपघातातील मयत वाहनचालकाच्या पत्नीने केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बाहेरील पोलीस मध्यरात्री संगमनेरात कशासाठी आले होते? अवैध वाळू उपशाबाबत कारवाईचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रश्न विचारला जात आहे. हे पोलीस ज्या झायलो वाहनातून पाठलाग करत होते ते वाहन नेमके कुणाचे होते? वाहन मालकाने या पोलिसांना वाहन का दिले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.अपघातातील मयत वाहनचालकाची पत्नी व काही ग्रामस्थ तालुका पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. संतप्त ग्रामस्थ तब्बल तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात थांबले. मात्र एकाही अधिकार्‍याने त्यांची भेट घेतली नाही. यानंतर या ग्रामस्थांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेले साडे तीन महिने कोरोना पासून अलिप्त राहिलेल्या श्रीरामपूर शहरांमध्ये देखील आठवड्याभरात दहा रुग्ण आढळल्याने शहरवासीयांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून इतर शहराप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहरात हा रोग अधिक वाढू नये म्हणून प्रशासनाने तातडीने किमान आठवड्याभरासाठी श्रीरामपूर शहरात लॉक डाऊन लागू करावा अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. नगराध्यक्षाअनुराधा आदिक यांनी याबाबत यापूर्वीच प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने नियमावर बोट ठेवत त्या पत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरांमध्ये आज करोना वाढत आहे. वेळीच उपाययोजना केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. शहरांमध्ये सापडलेले रुग्ण हे वेगवेगळ्या भागातील आहेत. गोंधवणी रोड, वार्ड नंबर 2, कांदा मार्केट परिसर, बेलापूर रोड आदी विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. शहराची बाजारपेठ उघडल्यापासून शहरांमध्ये रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. ग्रामीण तसेच शेजारच्या तालुक्यातील लोक दररोज बाजारपेठेत येत आहेत. बाजारपेठ सुरू करताना प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याकडे सर्वच घटक सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. बहुतांश नागरिक गाडीवर असताना किंवा दुकानात जाताना मास्कचा वापर करीत नाही. दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. सॅनिटायझर चा वापर केला जात नाही. सुरक्षित अंतर राखले जात नाही. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने शहरात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ती रोखण्यासाठी प्रशासन, नगरपालिका आणि गृहखाते यांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन लॉक डाउन लागू करून त्याची कडक अंमलबजावणी करावी. शहराच्या काही भागांमध्ये प्रशासनाला मदत करण्याच्या नावाखाली काही लोक विनाकारण गर्दी करतात. टोळके बनवून चौकामध्ये उभे राहतात. त्यांनासुद्धा रोखण्याची गरज आहे.  पोलिसांचे हस्तक असणारे काही घटक हे प्रशासनाला मदतीच्या नावाखाली चुकीचे सल्ले देतात अशीही चर्चा असून पोलिसांनी या लोकांना दूर ठेवणे आवश्यक आहे. नगरपालिका कर्मचारी शहरांमध्ये शिस्त लावण्यासाठी कमी पडतात. हे काम पोलिसांना दिले पाहिजे. कारण पालिका कर्मचाऱ्यांचे कोणीच ऐकत नाही. तेव्हा जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यापासून बोध घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.घरातील एकाच व्यक्तीने जाऊन सर्व कामे करावीत. विनाकारण रस्त्यांवर किंवा दुकानात किंवा कार्यालयात गर्दी करू नये.अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
श्रीरामपूर शहरामध्ये लॉक डाऊन लागू करण्याची नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केलेली मागणी योग्य होती . परंतु त्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे
कडक अंमलबजावणीची गरज
शहरांमध्ये वाढती रुग्णांची संख्या पाहता बाजारपेठ बंद करून लॉक डाऊन ची कडकअंमलबजावणी करावी . विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावे, तसेच ही माहिती लपविणाऱ्या लोकांवरही कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात दरोडा टाकण्यार्‍या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. अधिक उकल केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपीकडून दरोड्यातील चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र, सहा मोटारसायकल, तीन इलेक्ट्रिक विद्युत पंप असे मिळून 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील अनिल लहू गायकवाड, चंद्रकांत सुरेश गायकवाड दोघे रा. भिंगाण ता. श्रीगोंदा आणि अनिल संभा काळे रा. पिंपळवाडी ता. कर्जत यांची तुरुंगात रवानगी केली आहे.याबाबत सविस्तर अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले की दि.15 एप्रिल 2020 रोजी पहाटे श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्ती वरील एका घरावर सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरला होता.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सोपवला असता वरील दरोड्यातील आरोपी शेडगाव ता. श्रीगोंदा शिवारात आलेले आहेत. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत सापळा टाकून 30 जूनच्या पहाटे चार वाजता आरोपींना जेरबंद केले. सदर आरोपींनी नऊ ठिकाणी विविध गुन्हे केल्याची कबुली देऊन अन्य पाच साथीदारांची नावे पोलिसांना दिल्याने पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध घेतला असता ते आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.अटकेतील आरोपींकडून तीन मोटारसायकल हस्तगत केल्या. त्यांनी अजून विकलेल्या तीन मोटारसायकली इंदापूर जि. पुणे येथून हस्तगत केल्या तर तीन इलेक्ट्रिक मोटारी श्रीगोंदा येथील सोनवणे नामक भंगारवाल्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अहमदनगर-दिनांक ०१/०७/२०२० रोजी पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारांकडून
बातमी मिळाली कि, पाथर्डी ते खरवंडी कासार जाणारे रोडवर तुळजवाडी फाटा येथे दोन इसम हे त्यांचे जवळील लाल काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी घेवून येणार आहेत. अशी माहीती मिळाल्याने पोनि/दिलीप पवार यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदरची माहीती देवून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणे कामी रवाना केले.त्यानंतर सथानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोना ज्ञानेश्वर शिंदे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकॉरिणजित जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून दोन पंचासह पाथर्डी ते खरवंडी कासार जाणारे रोडवर तुळजवाडी फाटा येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच दोन संशईत इसम हे लाल काळ्या रंगाच्या पल्सर-२२० मोटार सायकलवरुन खरवंडी कासार बाजूकडून येताना दिसले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची खात्री झाल्याने त्यांनी सदर मोटार सायकल स्वारांना त्यांची मोटार सायकल थांबविण्याचा इशारा केला. मोटार सायकल स्वारांनी त्यांचे मोटार सायकलचा वेग कमी करताच पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. पथकातील अधिकाऱ्यांनी सदर मोटार सायकल स्वारांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे पत्ते २) रोहीदास उर्फ रोहीत अशोक गायकवाड, वय-२३ वर्षे, रा. खरवंडी कासार, ता- पाथर्डी, २) दादासाहेब उर्फ लक्ष्मण मल्हारी वाळके, वय-२० वर्षे, रा. कोरडगांव, ता- पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये २५,०००/-रु. किं. चे गावठी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा), ४००/-रु. किं. चे दोन जिवंत काडतूसे व १,००,०००/-रु. किं. ची बजाज पल्सर-२२० मो.सा.नं. एमएच-०३-डीएफ-१२२२ असा एकूण १,२५,४००/-रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. वरील नमुद दोन्ही इसम हे गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिर रित्या कब्नात
बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकों/३७ संदीप विनायक चव्हाण, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी पाथर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ॥ ४१३/२०२०, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरची कौतुकास्पद कामगीरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक,अहमदनगर, मा. डॉ. श्री. सागर पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. मंदार जवळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरात काल ५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात दोन मुले, दोन महिला व एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दिवशी एकदम पाच रुग्ण आढळून आल्याने शहरात एक चिंतेचा विषय बनला आहे.परवा दिवशी पाठविलेल्या १७ करोना चाचणी अहवालापैकी ११ अहवाल काल प्राप्त झाले असून त्यात महावितरण अधिकार्‍यांच्या कुटुंबातील चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून पाचवा रासकरनगर वॉर्ड नं. ७ मधील एका तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. श्रीरामपूर शहरात एकाच दिवशी पाच रुग्ण सापडल्यामुळे शहरात चिंतेचा विषय ठरला आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरगावाच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे कोरोना समीतीने तातडीची बैठक घेवुन मास्क न वापरणार्यावर शंभर रुपये दंड व सँनिटायझर व सोशल डिस्टनचे पालन न करणार्या व्यवसायीकांना २००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. केसापूर तालुका राहुरी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे बेलापूरात भितीचे वातावरण पसरले आहे कारण केसापूर येथील त्या रुग्णचा वावर हा बेलापूर गावातच होता  त्यामुळे कोरोना कमीटीने तातडीची बैठक घेवुन विनाकारण गावात फिरणार्यावर कायदेशिर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे गावात मास्क न वापरणार्या नागरीकांना शंभर रुपये दंड तसेच सँनिटायझर सोशल डिस्टन्स व ईतर नियमाचे उल्लंघन करणार्या व्यवसायीकांना दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला तसेच गावातील सर्व नागरीकांची घरोघर जावून आरोग्य तपासणी करणार असल्याचे आरोग्य अधीकारी डाँ देविदास चोखर यांनी बैठकीत सांगुन नियमाचे पालन करा कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करा बाहेर गावातील व्यक्ती गावात आल्यास तातडीने कळवा सायंकाळी पाच नंतर जी दुकाने दरवाजा बंद करुन चालु राहतील त्या दुकानावर देखील  दंडात्मक कारवाई करण्याची सुचना सुनिल मुथा यांनी केली रविवारी जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी काही सदस्यांनी  केली त्यावर एकमत होवु शकले नाही त्यामुळे जनता कर्फ्यूचा निर्णय स्थगीत करण्यात आला लग्न व इतर समारंभास ५० पेक्षा अधिक गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी अंत्यविधी दशक्रिया विधीच्या वेळेसही गर्दी कमी  असावी असेही बैठकीत ठरविण्यात आले बाहेर गावातील व्यापारी व्यवसायीकास गावात येवु देवु नये गावात नविन आलेल्या व्यक्तीचे नाव पंचायतीस कळविणे आवश्यक आहे असेही सर्वानुमते ठरविण्यात आले  नाभिक संघटनेच्या वतीने दहा दिवस व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे सर्वांनी अभिनंदन केले या वेळी भरत साळुंके डाँ देविदास चोखर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई सरंपच राधाताई बोबले पोलीस पाटील अशोक प्रधान अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे शिवसेना शहर प्रमुख  अशोक पवार राम पौळ अजय डाकले सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद अनिल मुंडलीक चंद्रकांत नाईक नामदेव बोंबले आदि उपस्थित होते शेवटी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget