Latest Post

शिर्डी (राजेंद्र।गडकरी)
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असताना व देश, राज्य मोठ्या संकटातून जात असताना सर्व कार्यक्रम, समारंभ  बंद आहेत, त्यामुळे अनेकांचे लग्न ,वाढदिवस, समारंभ रद्द किंवा साध्या पद्धतीने होत आहेत, अशाच सावळीविहीर येथील किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून साध्या पद्धतीने व येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कचे मोफत वाटप करुन साजरा करण्यात आला,
सध्या लॉग डॉउन मुळे सर्व धार्मिक तसेच लग्न, समारंभ वाढदिवस व विविध कार्यक्रम बंद आहेत, सध्या लग्नसराई असतानाही लग्न रद्द होतायेत किंवा अगदी दहा-बारा लोकांच्या उपस्थितीत लग्न लागत आहेत, तसेच वाढदिवसाचे ही मोठ्या प्रमाणात होणारे कार्यक्रम रद्द होत आहेत ,असेच सावळीविहीर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण राजेंद्र आगलावे यांनी आपला वाढदिवस अगदी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना ज्याना मास्क नाही ,अशांना थांबवून मोफत मास्क वाटप केले, तसेच लॉकडाऊन चे नियम त्यांना समजून सांगण्यात आले, आपल्या वाढदिवसानिमित्त दिवसभर त्यांनी व त्यांच्या काही मोजक्या एक-दोन मित्रांनी व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी लॉक डॉउन चे नियम पाळत हा कार्यक्रम नगर-मनमाड रस्त्यावर सावळीविहीर येथे राबवला व आपला वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला ,या उपक्रमाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  व्यापारी व जनतेच्या मागणीवरून नगरपालिकेने शहरातील दुकाने सुरू केली आहेत. गेल्या दोन दिवसापासून शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या कामी मिळत आहे. नगरपालिकेने चांगले नियोजन केले आहे. परंतु शहराच्या बऱ्याच भागांमध्ये रस्ते बंद असल्यामुळे लोकांना बाजारपेठेत यायला मोठा त्रास होत आहे. विशेषतः दवाखान्यामध्ये जाणाऱ्या रुग्णांना हे अडथळ्यांचे अग्निदिव्य पार करावे लागत आहे. तरी नगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने तातडीने शहरातील बंद असलेले महत्त्वाचे रस्ते अडथळे दूर करून सुरू करावेत अशी मागणी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे.
 दोन दिवसापूर्वी नगरपालिकेने व्यापारी असोसिएशनच्या मागणीवरून चांगल्या प्रकारचे नियोजन करून श्रीरामपुर शहरातील बाजारपेठ जनतेसाठी खुली केली आहे. जनता जनार्दन सुद्धा नगरपालिकेच्या नियोजनाला मनापासून दाद देत असून निश्चित केलेले सर्व नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा शहरातील बाजारपेठ सुरळीत सुरु झाली. परंतु हे होत असताना शहरातील बरेच रस्ते अद्याप ही बंद आहेत. गोंधवणी, संजय नगर, मिल्लत नगर या भागाला जोडणारा गोंधवणी रोड सय्यद बाबा चौकापासून दशमेश चौकापर्यंत तीन ठिकाणी अद्याप बंद आहे. महत्वाच्या हॉस्पिटल कडे जाणारे शहरातील अनेक रस्ते बंद आहेत .त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी फार मोठा वळसा घालून रुग्णांना यावे लागत आहे. त्यातून अनेक रुग्णांचे जीवाचे हाल होत आहेत. म्हणून हे जे रस्ते बंद केलेले आहेत ते सुरू करावेत. बाजारपेठ खुली केली आहे तर रस्ते बंद ठेवण्याला काही अर्थ नाही. संध्याकाळी पाच नंतर ते बंद करण्याची देखील व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ही नगरसेवक ताराचंद रणदिवे यांनी केली आहे .
 

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईच्या घाटकोपर येथे राहत असलेल्या 30 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील 30 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.करोना बाधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहत असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने तिला नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास जाणवत होता. तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात ती बाधित असल्याचे आढळले.मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो सध्या मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावी (पाथर्डी तालुक्यात) परतायचे होते. मात्र, वाटेत या महिलेला त्रास जाणवत होता. नगरमध्ये आल्यावर त्रास वाढल्याने संबधीत महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली आणि स्त्राव घेवून चाचणीसाठी पाठविण्यात आला. त्यात ती महिला बाधित असल्याचे आढळून आले. यापूर्वीही जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेली व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तो बाधित रुग्ण आष्टी (जि. बीड) येथील होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल मध्ये उपचार केले होते.दरम्यान गुरूवारी रात्री उशीरा 19 व्यक्तींचे घशातील स्त्राव शुक्रवारी रात्री पुण्याला पाठविण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी 40 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 799 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 694 स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. सध्या 13 रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

बेलापूर येथील कॉलेज ची  माजी विद्यार्थिनी प्रेरणा क्षत्रिय (माळोकर) यांनी
 "लढा  कोरोनाशी" हा  प्रबोधनात्मक व्हिडीओ तिच्या एस एस के कीटी ग्रूप च्या माध्यमातून  सद्या सोशल मीडियावर बराच गाजतो आहे, प्रेरणा क्षत्रिय ( माळोकर) ह्या बेलापूर येथील पत्रकार दिपकसा क्षत्रिय यांच्या कन्या आहेत .मुळातच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक पारितोषिक तिने पटकाविले असून कुकीज अँड बेकरीज  चे येवल्यात ट्रेनिंग सेंटर चालावत असून ऑफिशियल ब्युटीशीयन म्हणून कार्यरत आहेत ,"कोरोनाशी लढा " या उपक्रमाबद्दल तीचे कॉलेजच्या प्राचार्या साहित्यिक डॉ.गुंफा कोकाटे ,तसेच  अशोक स .सा.कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे , व अनेक मान्यवरांनी तिचे सर्वत्र अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

दिनांक १३/०५/२०२० रोजी फिर्यादी श्री. मुकेश कुमार जयस्वाल, वय- २७ वर्षे, धंदा- ट्रक ड्रायव्हर, रा. घुलेवाडी फाटा,संगमनेर, ता- संगमनेर हे त्यांचे ताब्यातील ट्रक नं. एमएच-१५-डी.के-६६०० ही घेवून क्लिनर कलामुद्दीन इद्रीसी याचेसह नांदेड येथून परभणी, माजलगांव, गढी, खरवंडी, पाथर्डी, अ.नगर मार्ग संगमनेर येथे जात असताना दुपारी ३/३० वा.चे सुमारास टाकळी फाटा, ता- पाथर्डी येथे आले असता पाठीमागून टेम्पो नं. एमएच-१६-सीसी-६७०८ यामधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीचे ट्रकला टेम्पो आडवा लावून ट्रक अडवून फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील टेपरेकॉर्डर असा एकूण ३०,०००/-रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला. त्याबाबत फिर्यादी यांनी दि. १४/०५/२०२० रोजी पाथर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २६७/२०२०, भादवि कलम ३९४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वरिष्ठांचे आदेशाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील पोलीस कर्मचारी पोना संतोष लोढे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, प्रकाश वाघ, रविन्द्र पुंगासे, विनोद मासाळकर, जालिंद माने अशांनी मिळून तात्काळ पाथर्डी येथे जावून फिर्यादी यांची भेट घेवून गुन्ह्यातील आरोपी व त्यांचे वर्णनाबाबत माहीती घेतली.त्यानंतर श्री. मंदार जवळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, तसेच त्यांचे कार्यालयातील पोकॉ/सागर बुधवंत, चालक पोका/ संदीप चव्हाण, पाथर्डी पो.स्टे. चे पोनिरित्नपारखी, पोहेकॉ अरविंद चव्हाण, काकासाहेब राख, चालक पोहेकॉ/तांबे असे सर्वजण मिळून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा जाकीर शेख, रा. कुंदे टाकळी, तापाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहीती पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळाल्याने
त्या माहीतीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे (१) जाकीर सुभान शेख वय २४ वर्ष रा. कुंदे टाकळी, ता- पाथर्डी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वसात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार रुपचंद आंधळे, शंकर कुंदे व गोकुळ फंदे अशांनी मिळुन रुपचंद आंधळे याचे जवळील टेम्पो मधुन जावुन केला असल्याचे माहिती दिल्याने त्यावरुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे (२) शंकर नारायण कुँदे वय २६ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी (३) रुपचंद श्रीधर आंधळे वय २८ वर्ष रा.जिरेवाडी ता.पाथर्डी (४) गोकुळ राधाकिसन कुँदे वय २५ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी यांना वेगवेगळया ठिकाणा वरुन ताब्यात घेतले आहे. आरोपी कडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला ९,००,०००/- रु. किमतीचा टेम्पो नंबर एमएच-१६-सी.सी-६७०८ हा जप्त करण्यात आलेला असुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सागर पाटील सा अपर र अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. श्री. मंदार जवळे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-कोरोना विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या कोरोना वरिअर्स यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना आणखी  स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा या जगातून लवकर नायनाट व्हावा यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत शिर्डी व परिसरात हजारो साई भक्तांनी आपल्या घरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले, या या उपक्रमात शिर्डी व परिसरातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते,जगभरात कोरोनाने हाहाकार माजला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व
प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे, असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत,यालॉकडाउन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवीत आहेत, अशा सर्वाना  पूर्ती मिळावी मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज साकडे घालण्यात आलेआहे, शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत शिर्डी व परिसरातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण विस्तृत स्वरूपात शिर्डी व परिसरात घराघरात करण्यात आले, लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला, असाच सामूहिक पण घराघरात श्री साई चरित्र पारायणा चा दुसरा टप्पा पुढच्या गुरुवारी दिनांक 21 मे रोजी संपूर्ण राहता तालुक्यात गावागावात होणार आहे ,,तसेच गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात असाच श्री साई चरित्र पारायणा चा सामूहिक पण घराघरात  धार्मिक उपक्रम राबवला जाणार असून गुरुवार दिनांक   4 जून रोजी संपूर्ण देशभर असाच उपक्रम राबवला जाणार आहे, त्यानंतर 11 जून 20 20 रोजी संपूर्ण जगात करोडच्या संख्येने अनेक देशात साईभक्त असून या सर्व साईभक्तांच्या द्वारे संपूर्ण जगात असेच घराघरात राहून कुटुंब सदस्य कडून श्री साई चरित्र ग्रंथाचे मनोभावे पारायण करण्यात येणार आहे, तरी पुढच्या गुरुवारी ही तालुक्यातील प्रत्येक गावातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री साई निर्माण ग्रुप चे अध्यक्ष विजुभाऊ कोते यांनी व श्री साई निर्माण ग्रुप द्वारकमाई प्रतिष्ठान व साई संदेश प्रतिष्ठानने केले आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुक्यातील शिर्डी जवळील साकुरी शिवारात एका विहिरी मध्ये एक महिला पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, लॉकडाउनच्या काळातच ही घटना घडल्याने या परिसरात मोठी चर्चा होत आहे,
 शिर्डी जवळील साकुरी शिवारात साई अपार्टमेंट नजीकच्या एका विहिरीत आज गुरुवारी तेथील एका व्यक्तीच्या पाहण्यात ही मृत महिला विहिरीत पडलेली दिसली, त्यामुळे या व्यक्तीने या विहीर मालकाला व  राहता पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर येथे  काही  लोक व पोलीस येऊन पाहणी केली असताही ही महिला पंजाबी ड्रेस घातलेल्या अवस्थेत पालथी पाण्यात विहिरीत पडलेली होती, दहा ते बारा दिवसांपूर्वी ही महिला या विहिरीत पडलेली असावी असा तेथील परिस्थिती वरून अंदाज व्यक्त होत होता, सध्या लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहेत ,त्यामुळे या विहिरीच्या परिसरात कोण येते, कोण जाते ,हे लवकर लक्षात येत नाही ,त्यामुळे ही घटना घडून काही दिवस झाले असावेत,लॉकडाउनमुळे ही घटना लवकर लक्षात आली नाही, जेव्हा या परिसरात एक व्यक्तीने विहिरीत यामृत महिलेला बघितली, त्यानंतर या घटनेची ची चर्चा सुरु झाली ,यासंदर्भात राहता पोलीस स्टेशनची संपर्क केला असता राहता परिसरात कोणतीही महिलेची मिसिंग केस नसल्याचे सांगण्यात आले, या घटनेसंदर्भात राहता पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत, मात्र ही घटना लॉक डाऊन च्या बंद काळात घडल्यामुळे शिर्डी व परिसरातउलट सुलट मोठी चर्चा घडत आहे, ही आत्महत्याच असावी, असा अनेकांचा कयास आहे व तसे परिसरात बोलले जात होते, मात्र ही महिला कोण कुठून आली व ही घटना कधी घडली हे गुलदस्त्यात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget