Latest Post

शिर्डी (राजेंद्र गडकरी) राज्यपातळीवर  नुकत्याच घेण्यात आलेल्या डॉक्टर सी व्ही रामन  बालवैज्ञानिक परीक्षेत  शारदा विद्या मंदिर राहाता शाळेचा इयत्ता 8 विचा विद्यार्थी चि अखिलेश दत्तात्रय गायकवाड हा महाराष्ट्र राज्यात 5वा व अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर पास झाला आहे, त्याला या परीक्षेत 150 पैकी 130 गुण मिळाले आहे ,मागील वर्षी देखील अखिलेश हा ह्या परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला होता, अहमदनगर येथील जनसेवा प्रतिष्ठान तर्फे डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा राज्यपातळीवर  दरवर्षी घेण्यात येते यावर्षी येथे घेण्यात आली होती अशा या  राज्य पातळीवरील स्पर्धेत  चिरंजीव अखिलेश गायकवाड हा जिल्ह्यात यावर्षीही दुसरा आला आहे,
मागीलवेळी   या परीक्षेचे प्रमुख  अरुण तुपविहिरेसर यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे नामांकित शास्त्रज्ञ बोलवून खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता व चिरंजीव आखिलेशचे कौतुक व अभिनंदन केले होते,
य परीक्षेत सायन्स कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन विविध उपकरणे व प्रयोग बनवून घेतात व भावी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो,
ही परीक्षा कठिण व अधिक खडतर  असते,
अखिलेश गायकवाड हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता गायकवाड व प्राथमिक शिक्षिका वैशाली गायकवाड(बेहेळे) यांचा मुलगा असून त्याचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण जि प शाळा एकरूखे, ता ,राहाता येथे झाले आहे, ग्रामीण भागातील  विद्यार्थी  आपल्या परिश्रम व अभ्यासातून  असा पुढे जाऊ शकतो, हे अखिलेश ने या परीक्षेद्वारे दाखवून दिले आहे ,या त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व विभाग अधिकारी, पदाधिकारी ,पत्रकार, मित्रमंडळी यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे, व जिल्ह्यातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव  दुकानदार व त्यांचे मदतनीस  यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर  मेडिकल चेकअप करून त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणीआँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री व पुरवठा मंत्री यांच्याकडे केली असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.या बाबत माहीती देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी सांगितले  फेडरेशन च्या वतीने  वेळोवेळी स्व स्त धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांचे मेडिकल चेकअप करून घेणे बाबत तसेच त्यांना विमा संरक्षण देणेबाबत पुरवठा विभागाकडे वेळोवेळी  मागणी केली आहे परंतु त्यावर कुठलीच.कार्यवाही झालेली नाही ,गोरेगाव ,मुंबई येथील शिधावाटप  प्राधिकारपत्रधारक  यांची  कोरोना  तपासणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा विलगीकरण करण्यात आले आहे व त्यांचे शिधावाटप दुकान 18/ 5 /2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आपण जर वरील प्रमाणे विचार केला तर एका शिधावाटप दुकानात कमीतकमी दिवसाला शंभर जणांना टोकन दिले जाते व या दुकानदारांचा धान्य वितरण करीत असताना  नागरिकांशी संपर्क येत असतो तसेच त्यांच्या कामगारांचाही नागरिकांशी संपर्क येत असतो आज आपण जर पाहिले तर मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यंत जास्त प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण असलेली शहरे आहेत, तसेच वरील शहराप्रमाणे तरी अन्य शहरांमध्ये कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, व यास वेळीच आळा बसला पाहिजे धान्य दुकानदारांच्या मागे त्यांचे कुटुंब असते  दुकानदार व त्यांचे कामगार यांची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे, कोरोना सारख्या संकट काळात  ते  नागरिकांना अविरत सेवा देत आहेत  त्या  सेवा देत असतानाही ही त्यांना अनेक संकटाशी सामनाही करावा लागतो, तसेच त्यांचा धान्य वितरण करीत असताना नागरिकांशी संबंध येत असल्यामुळे कोरोना साथीचा गुणाकारात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही , म्हणून प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी माझी आपणास विनंती आहे की  आपण राज्यातील सर्व धान्य दुकानदारांची तसेच त्यांच्या कामगारांची आरोग्य तपासणी  करून घ्यावीत . 22 एप्रिल 2020 रोजी रेशनिंग दुकानदारांना  त्यांच्या कामगारांना व अन्नपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना विमा संदर्भातील फाईल अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहसचिव यांनी वित्त विभागाकडे पाठविली आहे , आज एवढे आपत्तीकालीन परिस्थिती असतानासुद्धा 15 दिवस झाले तरी विमा संरक्षण फाईल वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली नाही ही खूप खेदजनक बाब आहे अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कामे मार्गी लावली गेली पाहिजेत.तरी आम्ही सूचित करतो की राज्यातील सर्व धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांची आरोग्य तपासणी करावी  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दुकानदारांच्या आरोग्य तपासणी बाबत महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग ,जिल्हाधिकारी यांना सूचना  देण्यात यावेत जेणे करून कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल तसेच वरील सर्व बाबी बघता त्यांची विमासंरक्षण फाईल लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी  ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशन च्या वतीने करण्यात आली असल्याची माहीती देसाई  यांनी दिली आहे.

कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलीस हवालदार सुरजकुमार जीवन अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात १८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश दत्तू बर्डे, सतीष (लल्लू) दत्तू बर्डे, जयश्री गणेश बर्डे, रेणुका शिवाजी वाघ, लहानू रंभू देवकर, दीपक (बोब्या) पिंपळे, ब्राम्हणगाव येथील रिक्षाचालक राकेश (पूर्ण नाव  माहित नाही), जना रोनोबा देवकर, दत्तू रोनोबा देवकर, राजेंद्र निवृत्ती देवकर, परशुराम निवृत्ती देवकर, महेश परशुराम देवकर, अतुल राजेंद्र देवकर, सुमित राजेंद्र देवकर, मच्छिंद्र जना देवकर, संजय देवकर, संदिप जनार्धन देवकर (सर्व रा.टाकळी, ता.कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जनांपैकी करोनाच्या संशयित तीन रुग्णाचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली आहे. तर इतर दोघांना श्रीरामपूर येथे क्वॉरंटाईन करण्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.रुग्णाच्या स्त्राव नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. स्त्राव नमुने चाचणीनंतर लॅबने रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यासह दत्तनगर परिसरातील लोकांसाठी दिलासादायक बाब आहे.करोनाचा संशयित रुग्ण सापडल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली होती. तर संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या करोना व्हायरसने ग्रामीण भागांतही प्रवेश केला, अशी चर्चा सुरू झाली होती. या संशयितांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील लॅबमधून संशयित रुग्णाच्या घशाच्या स्त्राव नमुन्याचे अहवाल आल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला असून, रुग्णाना करोनाची लागण झाली नसून प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते .श्रीरामपूर तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यांमधून नागरिकांचे येणे सुरूच आहे. त्यात दत्तनगरमध्ये आतापर्यंत बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह पंधरा नागरिकांना येथील डी.पॉल शाळेत क्वॉरंटाईन केले आहे. परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गावांतील विविध भागांत जाऊन कोरोना संदर्भात वेळोवेळी जनजागृती करीत आहेत.

टिळकनगर (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जणांपैकी दोन जणांना करोना सदृश्य लक्षणे आढळल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दोघांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवत दोघांचे घशाचे स्त्राव नमुने पुण्याला पाठविले आहेत. त्यांना अहमदनगर येथेच क्वारंटाइन केले आहे. तर इतर तिघांना श्रीरामपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रातोरात संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.करोनावर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील दत्तनगर परिसरातील बरेच नागरिक मुंबई, पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यापैकी करोनाच्या भीतीने मुंबईहून एक कुटूंब मंगळवारी दत्तनगर परिसरात चक्क रिक्षात आले.ग्रामस्थांच्या लक्षात येताच काहींनी सतर्कता दाखवीत ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मुंबईहून आलेल्या या पाच जणांची तपासणी केली असता त्यापैकी दोन जणांना खोकला व ताप असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाने तत्परतेने दोघांना अहमदनगर येथे हलविले व लगेचच त्यांच्या घशाचे स्त्राव घेऊन पुण्याला पाठविले.आज दुपारपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली. तर उर्वरित तिघांना श्रीरामपूर येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह येथे क्वारंटाइन करण्यात आले. तसेच ज्यांच्या घरी मुंबईहून हे पाचही आले होते त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.दोघांना अहमदनगर येथे नेताच सोशल मीडियावर दत्तनगर येथे करोनाचा संसर्ग असलेला रुग्ण सापडल्याची काहींनी अफवा पसरवली. सोशल मीडियात वेगाने पसरणार्‍या अफवांमुळे एकूण वातावरण गोंधळाचे, संशयाचे, भीतीची होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. करोनाबाबत कुणीही अफवा, खोटे वृत्त, माहिती पसरवू नये.नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे. असे आवाहन जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, जि.प. सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकलोळ, भीमराज बागुल, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर आदींनी केले आहे.दरम्यान, या व्यक्तींनी प्रवास करण्याचा अथवा स्थलांतर करण्याबाबतचा परवाना न घेता प्रवास केला. व प्रवासा दरम्यान साथीचा रोग होऊ नये यासाठी काही खबरदारी न घेता आरोपी नं 1 ते 4 यांनी नालासोपारा मुंबई ते श्रीरामपूर असे रिक्षा (नं. एम.एच. 48 बी.एफ. 1253) हिच्यामध्ये प्रवास करुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 918/2020 भा. द. वि. कलम 188, 269 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर ओंकार कारखेले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹महसूल विभागाची परवानगी नसतांना खोदला रस्ता
🔹संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडला
बुलडाणा - 7 मे
जळगांव जामोद तालुक्यातील इस्लामपुर गावा जवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तैयार होत असलेल्या इस्लामपुर उपसा सिंचन योजनेच्या आता पर्यंतच्या झालेल्या कामात  मोठ्या प्रमाणात भरष्टाचार झाल्याची ओरड नेहमी होत असते परंतु काही राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी आपले घशे भरून घेतल्यानेच संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची घटना आज पुन्हा समोर आली आहे.ठेकेदाराने महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच इस्लामपुर-हाशमपुर व शेत रास्ता खोदुन टाकला ही माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर काम बंद पाडला आहे.
      तापी पाठबंधारे विभाग अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यात इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे.जळगाव खानदेश जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनुर धारणाचा तसेच जिगांव धरणाचे पाणी पाइप द्वारे इस्लामपुर योजनेत आणले जाईल व हा पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे.या योजनेत शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली जाणार असून अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन शासनाला विकली आहे.योजेनेच्या कामा संदर्भात अनेक वेळी भरष्टाचार झाल्याचे आरोप होत असतात.अनेक राजकीय नेते व तापी पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी "वाहती गंगेत आपले हाथ धोऊन टाकले" अशी चर्चा नेहमी समोर येत असते.राजकिय नेते व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने योजनेचा ठेकेदार सामान्य शेतकऱ्यांवर दबाव टाकून आपली मरजीने काम करीत आहे.आज 7 मे रोजी ठेकेदाराने इस्लामपुर ते हाशमपुर व इतर शेतात जाणारा रस्ता महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच खोदुन टाकल्याने स्थानिक शेतकरी आक्रमक झाले होते व त्यांनी सदर काम बंद पाडला.रस्ते खोदुन टाकण्याची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली का? अशी माहिती जेंव्हा तहसीलदार यांच्याशी काहीनी घेतली असता तहसीलदार यांनी अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, अशे सांगितले.शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांचा धाक दाखवून तापी पाठबंधारे विभागाचे राणे, किशोर चौधरी तसेच ठेकेदारा आपली मनमानी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा काम करीत असून आम्हाला सदर खोदलेले रस्ते सुरु जैसेथे करून द्यावे अशी मागणी स्थानिक शेतकरी अबरार खान,तस्लीम खान,ज़ियाउल्लाह खान,राज़ीक खान,शराफत खान,नज़ाकत खान,सखाउल्लाह खान,शफीक खान,ज़मीर पटेल व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथ नगर येथील शेतमजुरी करनारया  सुतगिरनी परीसरातील आर्चना तिड्के व सरोदे  या  महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चाल ल्या आस्ता फरगडे वस्ती वरील मारुती मंदीर समोरील वळनावर आयशर टेम्पो क्र.Mh-17 BD 0015 या टेम्पोच्या मद्यधुंद ड्रायव्हर ने  निर्दयी पने फरफटत नेऊन धडक दिली आस्ता एका  महिलेच्या डोक्यावरुन पुढील टायर गेल्याने सदर महिला जागीच ठार झाली. दरम्यान दुसरी महिला कामगार हौस्पिटल येथे उपचार साठी नेली आस्ता तीची ही परिस्थीती गंभीर आसल्याचे समजते.       

या रोडवर सतत छोटे मोठे आपघात होत आसतात. या रस्त्यावर लॉक डाउन आसल्यामुळ  मोठ्या प्रमानात वाहतुक सुरु आसून वाळू तस्करी ही मोठ्या प्रमाणात चालते. रात्री बेरात्री वाळू वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत आस्ते. या वाहतुकिचा प्रशासनाने बंदोबस्त करावा आशी मागनी संतप्त नागरिकांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget