Latest Post

शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )कोपरगाव तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) धारकांना मे,2020 व जून,2020 या दोन महिन्‍यांच्‍या कालावधीत सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार आहे. कोपरगाव तालुक्‍यात 16 हजार 777 शिधापत्रिकाधारक असून एकूण  65 हजार 146 लाभार्थी  आहेत. त्‍यांना 3 हजार 6 क्विंटल गहू व 2 हजार 3 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. गहू 8 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो  या दराने प्रतिमाह 2 किलो असे  एकूण पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्‍यात येणार आहे.
           शिधापत्रिकाधारकांच्‍या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्‍या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्‍या शिधापत्रिकाधारकांना विहीत केलेल्‍या दराने व परिमाणात धान्‍य देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्‍या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्‍या शिधापत्रिकाधारकांनाही  या योजनेचा लाभ घेता येईल. अन्‍नधान्‍य वितरणाची प्रक्रिया सुरु  करण्‍यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता सर्व संबधितांनी घ्यावी. असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कोपरगांव योगेश चंद्रे यांनी केले आहे.

(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, शिर्डीतही त्यामुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन ,विमानतळ हे सुद्धा शांत शांत आहे, निर्मनुष्य झालेल्या या सार्वजनिक ठिकाणी आणि आता मोकाट कुत्री ,जनावरे यांनी माणसांची जागा घेतली की काय। असे दिसून येत आहे, वर्दळ नसल्यामुळे प्राणी आता मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत, असे चित्र या काळात  दिसत आहेत, गावे ,शहरे बंद असल्याने व सर्व जण आपापल्या घरात असल्याने , वन्य प्राणी ,पाळीव प्राणी ,मोकाट जनावरे  आता सार्वजनिक ठिकाणी दिसू लागले आहेत ,दररोज ग्रामीण भागात दर्शनासाठी गर्दीने भरलेले मंदिरे आता उन्हामुळे व वर्दळ नसल्याने तेथे मोकाट जनावरे आश्रय घेत आहेत, शिर्डीचे नेहमी गजबजलेले साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक निर्मनुष्य झाले असून 
तेथे ते मोकाट कुत्री आता फिरताना दिसतात,तसेच ग्रामीण भागात तर उन्हाळ्याच्या चटक्यामुळे म्हणा की लॉकडाऊनच्या शांत शांत वातावरणामुळे म्हणा हरीण, कोल्हे ,वानर आदी वन्य प्राणी गावाच्या आसपास येऊ लागले आहेत, एवढेच नाही तर शांत वातावरण व कडक उन्हाळा यामुळे बिळातले साप  बाहेर येऊन रस्त्यावर, मनुष्यवस्तीत दिसू लागले आहेत, कोळपेवाडी येथे नुकतीच एक  धामीन सर्पमित्रांनी पकडली, तसेचअश्वी परिसरातही मुंगूस आणि सापाची लढाईत नुकतेच एका सापाला जीवदान सर्पमित्राने दिले ,सध्या मनुष्यासाठी संचारबंदी आहे, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, मोकाट जनावरे यांना मात्र यावरून  ग्रामीण भागात सध्या मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. 


 श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना श्रीरामपूर तालुक्यात एक रुग्ण वगळता दक्ष पोलीस अधिकारी कार्य तत्पर  महसुल अधिकारी यांच्या ठोस निर्णयामुळे कोरोनावर श्रीरामपूरकरांंनी विजयच मिळविला असेच म्हणावे लागेल लाँक डाऊनची घोषणा होताच अप्पर पोलीस अधिक्षक डाँ दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम तयार केला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवुन नागरिकांना घरातच बसण्याचे अवाहन केले ज्यांनी महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या आदेशाला जुमानले नाही त्यांना दांडुक्यांचा प्रसादही मिळाला काही चांगले निर्णय घेण्याकरीता काही कठोर नियमांचे पालन करावेच लागते हे या अधिकार्यांनी कृतीतुन दाखवुन दिले उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  मसुद खान यांनी वैयक्तिक लक्ष देवुन नागरीकाना घरातच बसण्याचे वारवार अवाहन
केले ज्यांनी या अवाहनाला जुमानले नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली काही ठिकाणी  पोलीसांनी कडक भूमिका घेतली त्यावेळी काहींनी नाराजीचा सुर आवळला परंतु आज आपल्या तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण  सापडला नाही नव्हे महसुल अधिकारी व पोलीस खात्याने आपल्या तालुक्यात कोरोनाला डोके वर काढुच दिले नाही त्या करीता कठोरात कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तरी अधिकारी मागे हटले नाही त्यानां श्रीरामपूर नगरपालीका तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीनी देखील सहकार्य केले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे दररोज सकाळपासुनच शहरात पायी गस्त घालत होते त्याचा परिणाम असा झाला की फार गरज असेल तरच श्रीरामपूरचा नागरीक बाहेर पडत होता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी देखील तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला या कालावधीत गरजवंताना मदत करण्यास देखील  श्रीरामपूरकर मागे हाटले नाही अनेक सेवा भावी संस्था नागरीक मदतीसाठी पुढे आहे कोरोनाच्या या सांकटकाळात माणूसकी जिवत असल्याचेही पहावयास मिळाले. 

शिर्डी/प्रतिनिधि जय शर्मा  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये विविध उपाययोजनांचे आदेश पारित केले असून त्याची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच जिल्हयामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध लागू करण्यात आले असून इतर जिल्हयातून अहमदनगर जिल्हयात पर्यायाने तालुक्यात नागरिकांच्या  विनापरवाना ये-जा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभममीवर काही नागरिक अथवा स्थानिकांचे नातेवाईक, पाहुणे बेकायदेशीरपणे राहाता तालुक्यात प्रवेश करत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही कृती आक्षेपार्ह असून शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी आहे.
              राहाता तालुका अथवा परिसरात नवीन व्यक्ती, बाहेरगावचे पाहूणे आल्यास स्थानिकांनी यासंबधीची माहिती तात्काळ तालुका प्रशासनास अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून संबंधीताची चौकशी करून योग्य ती वैद्यकीय कार्यवाही करता येईल व संभाव्य धोका टाळता येईल. बाहेरगावाहून आलेल्यांची माहीती लपवून ठेवल्यास संबधितांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. मदतीसाठी तालुका नियंत्रण कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक क्र.02423-242853 वर संपर्क साधावा. नागरिकांनी घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
            प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

अहमदनगर दि.२८- नगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय २४), सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० सर्व रा.वरशिंदे, ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ एप्रिलला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास साताराला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साई गंगा हाँटेलजवळ ट्रक थांबवली. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर ( रा.मोहाडी पिंपळादेवी, जि.धुळे) यांनी दिली होती. या गुन्हाता तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते याने व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन शोध घेऊन आरोपी संतोष विधाते याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पकडले. संतोष याला विचारणा केली असता,त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच, सदरचा गुन्हा हा साथीदार सागर विधाते व आप्पासाहेब वाडकर सर्वांनी सागर यांच्या स्पलेंडर मोटारसायकलवर जाऊन केलीची कबुली दिली. यानंतर उर्वरित सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० दोघे रा.वरशिंदे, ता.राहुरी) याचा शोध घेऊन पकडण्यात आले.यावेळी चोरलेली रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले, ५ हजार रुपयाचा एम आयचा मोबाईल, स्पलेंडर गाडी (एमएच १७, एआर ३३३४) असा एकूण ३५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

शिर्डी राजेंद्र गडकरी - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, या लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात आहेत, गावात, शहरात सर्वत्र कर्फ्यू लागू आहे, सर्व बंद आहे ,त्यामुळे पशुपक्षी, प्राणी, वन्य प्राणी आता गावात, शहरात मन मोकळे बिनधास्त फिरताना ,संचार करताना दिसून येत आहे, माणसांना संचारबंदी आहे ,परंतु प्राणि मात्र मुक्त संचार करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे.सध्या देशात कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,रस्ते ओस पडले आहे, गावे ,शहरे शांत आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत त्यामुळे गावात, शहरात, गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी, आता नेहमी प्रेमाणे गजबजलेले ,गर्दीने फुलले वातावरण  दिसून येत नाही ,अशा गर्दी नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी वानर, हरिण,मोर, अशा प्रकारचे वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पशु पक्षी गावात शहरात मनमोकळेपणे फिरताना दिसून येत आहे, उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ओस पडल्याने प्राणी बिनधास्त  अशा ठिकाणी अधून मधून  दिसून येत आहेत मग , बस स्टॅन्ड असो की, रेल्वे स्थानक असो  मंदिरे असो की बाजारतळअसो, अशा ठिकाणी आता ह्या प्राण्यांनी मनुष्याची जागा घेतल्याचे दिसून येत आहे, शिर्डीच्या गजबजलेल्या साईनगर रेल्वे स्टेशन मध्ये सर्व सामसूम आहे अशा निर्मनुष्य साईनगर रेल्वे स्टेशनमध्ये मात्र उन्हाळ्यात उष्णतेपासून  बचाव करण्यासाठी कुत्रेही रेल्वे स्टेशनमध्ये मनसोक्त आनंद घेत आहेत तर ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाऊन मुळे मंदिरे बंद आहेत, अशा मंदिरांच्या सभामंडपात गावातील भटके कुत्रे ,शेळ्या ,गाया दुपारच्या वेळी मस्त आराम करताना दिसून येत आहेत, मानवाची जागा या  काळात हे प्राणी आता भरून काढता की काय असे वाटत आहे। अनेक वांनरे ,माकडे, जंगलातून गावात शहरात येत आहे,व दिसू लागले आहेत, उन्हाळ्यातील पाण्याच्या आशेने म्हणा किंवा शांत शांत वातावरण मनात पण असे प्राणी गावात आता दिसत आहेत, त्यात सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, या उकाड्यामुळे बिळातले सर्प आता हळूहळू बाहेर येऊ लागले असून त्यांचाही संचार सार्वजनिक ठिकाणी वाढल्याचे दिसून येत आहे, आजच  आश्वी येथे मुंगसाच्या तावडीतून एका सापाला  सर्पमित्राने वाचवले,  तर कोळपेवाडी कारखान्यावर  कोब्रा नागासारखी दिसणारी लांबलचक धामीण  दुसऱ्या एका सर्पमित्राने  पकडली , यावरून हे साप आता बीळा  बाहेर    व सार्वजनिक परिसरात  वावरू लागले आहेत , हे दिसून येते ,सध्या  कडक उन्हाळ्यामुळे   पशु, पक्षी वन्यप्राणी  पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कासावीस करू लागली  आहे , त्यामुळे असे हे प्राणी  पाण्याच्या ओढीने  गावाकडे येऊ लागले आहेत , कोल्हे, मोर तर परिसरातील काही ठिकाणी  वाड्या-वस्त्यांवर लांडगे हे आता दिसू लागले आहेत ,त्यात  लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने  गजबजलेले  गावे शहरे दिसत नाही,  त्यामुळे  असे वन्यप्राणी बिनधास्त संचार करताना दिसू लागले आहेत,  गावातील, शहरातील मोकाट असणारे पाळीव प्राणी, कुत्रे ,डुकरे , बैल,  गाढवे यांनाही सध्या उदर निर्वाहासाठी मोठी धावपळ करावी लागत दिसत आहे, राहाता तालुक्यातील शिंगवे रुई  भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहे, हा कडक उन्हाळा जाणवायला लागल्यापासून ही हरणे आता संचारबंदीचा फायदा घेत गावाच्या जवळ संचार करताना दिसू लागले आहेत, या बंद काळात पाळीव जनावरे यांच्या चाराचाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

शिर्डी राजेंद्र गडकरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू  असून सर्व बंद आहे ,तरीही काही व्यक्ती विनाकारण व परवानगी न घेता या गावातून दुसऱ्या गावात जात असतात ,अशाच संगमनेर येथुन  ५ व्यक्तींना विनापरवाना,विनाकारण व मास्क न लावता। सावळीविहीरवाडीला आल्यानंतर व त्यांची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सावळीविहीर वाडी येथे ५व्यक्ती संगमनेर येथुनआल्यामुळे व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डी व सावळीविहिर परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,
  । कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे , राज्यात साथ निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे, शासकीय कर्मचारी, डॉक्टर पोलीस सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहेत ,मात्र या काळात घरात राहणे उचित असताना काही व्यक्ती विनाकारण व विनापरवाना या गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात, त्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते, हा धोका असूनही दिनांक 27 रोजी संगमनेर येथील मदिनानगर येथून ५ व्यक्ती  विनाकारण व विनापरवाना, गुपचुपपणे राहता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे आल्या होत्या , शिर्डी पोलीसांनि  त्वरित सावळीविहीरवाडी गाठली व येथे येऊन अधिक तपास केल्यानंतर येथे मदिनानगर संगमनेर येथुन आलेल्या जब्बार अब्दुल पठाण वय 37 , सादीका जब्बार पठाण वय 31, निसार नूरमंहम्मद अन्सारी वय55, शबाना निसार अन्सारी वय 50, सुफिया निसार अन्सारी 24 अशा एकूण पाच व्यक्तीच्या तोंडाला मास्क न लावता, विनाकारण, विनापरवाना सावळीविहीरवाडी येथे आल्याचे स्पष्ट झाले ,त्यामुळे या  व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली असता ते कोणाला न सांगता संगमनेरहून सावळीविहीरवाडी येथे आले होते, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे,व लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे,, संचारबंदी जारी असतानाही विनाकारण फिरणे, या सर्व आरोपांमुळे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या ५ व्यक्तींवरभा,द,वि,कलम१८८(२),२६९,२७१व सात रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये तीन महिला आहेत, यामुळे मात्र शिर्डी सावळीवीहिर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा होत होत्या,
राहाता तालुक्यात असा प्रथमच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजते, सध्या कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू असताना, सर्व घरा-घरात असताना काही लोक जाणीवपूर्वक आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, असे कोणी नवीन लोक आपल्या गावात आल्याचे समजताच किंवा अनोळखी नवीन लोक येऊन राहत असेल तर त्यांची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला द्यावी ,असे आवाहनही  शिर्डी पोलिसांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget