Latest Post

शिर्डी जय शर्मा 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा ,महाविद्यालये बंद आहेत,  शिर्डी येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयही बंद आहे, शाळा बंद असल्याने व विद्यार्थी घरातच बसून आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाने मोबाईल ॲप्सद्वारे मुलांना घरबसल्या अभ्यास करता यावा, यासाठी सोय केली आहे ,विद्यार्थी घरी बसून या मोबाईल ॲपवर ऑनलाईन , व्हाट्सअप वर अभ्यास करू शकतो, अशी माहिती या  श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मनोज लोढा व मुख्याध्यापक कुठाळ यांनी दिली,
   सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व काही बंद आहे , शाळा, महाविद्यालय सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत, शिर्डी येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयही बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, सर्वजण घरातच आहेत, घरातल्या घरातच विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा अभ्यास करता यावा, यासाठी ही सुविधा  करण्यात आली आहे, सर्व वर्ग अध्यापक व विशेष शिक्षक व त्या वर्गाच्या पालकांचा ग्रुप तयार करून त्यामध्ये विविध विषयांची माहिती विविध मोबाईल ॲप द्वारे पुस्तके डाऊनलोड करू शकतात, शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत या मोबाईल द्वारे सोडवण्यासाठी सोय करण्यात आली आहे, तसेच पालकांनाही या मोबाईल ॲपद्वारे मुलांना शिकवता येणार आहे, या मोबाईलॲप वर आपल्या वर्गातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करता येईलच पण काही अडचण आल्यास आपापल्या वर्गशिक्षक किंवा त्या विषयाच्या शिक्षकांशीही  बोलून किंवा व्हाट्सअप द्वारे आपण समस्या सोडू शकता, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, या शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या मोबाईल शैक्षणिक ॲपचा उपयोग होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनच्या काळात घरात राहून आपला अभ्यास या मोबाईल  ॲपद्वारे  करावा, ह्या काळात मिळालेल्या सुट्टीचा चांगला उपयोग करावा, पालकांनीही या मोबाईल ॲप द्वारे विद्यार्थ्यांना शिकवावे ,काही अडचण आल्यास समजून सांगावे किंवा शिक्षकांशी संपर्क करावा ,यासाठी या शाळेचे सर्व शिक्षक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष ,सदस्य, शिक्षक सर्व प्रयत्न करीत आहेत ,त्यामुळे सर्वांनी आपल्या घरातच बसावे, विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये, पालकांनीही घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी या मोबाईल शैक्षणिक ॲप्स वापर मुलांना करता यावा म्हणून आपले मोबाईल मुलांना, विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी द्यावेत व स्वतः लक्ष ठेवावे, मुलांचे व आपले आरोग्य सांभाळावे, आपण व मुलांनाही घराबाहेर विनाकारण  पडू नये, आपला अधिकाधिक वेळ घरात  या मोबाईल ॲप द्वारे  अभ्यास करण्याकडे कसा जाईल, असे विद्यार्थ्यांनी पाहावे, या लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया , श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मनोज लोढा, मुख्याध्यापक   मुठाळ उपमुख्याध्यापिका बोराडे पर्यवेक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले असून या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक डुबल सर जाधव सर वाबळे सर वारुळे सर काळापहाड सर मुंगेकर सर डोमल सर ठाकरे सर यांच्यासह सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेत आहेत वया  या मोबाईलचा सर्व विद्यार्थी पालकांनी जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहनही  स्कूल कमिटीचे अध्यक्ष व शिक्षकांनी केले आहे.

बुलडाणा - 25 एप्रिल
एकीकडे देश कोरोनाशी लढत आहे तर दूसरी कडे काही विघ्नसंतोषी सोशल मिडियाचा वापर करून समाजात तेड निर्माण करण्याची संधी साधत आहे.असेच बुलडाणा जिल्ह्यातील 3 आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथक बुलडाणा च्या सतर्कतेने विविध कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यात 2 आरोपी बुलडाणा शहरातील तर एक आरोपी नांदुरा येथील आहे.
       या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पोलीस अधीक्षक बुलडाणा डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिलेल्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी स्वतःच्या अधिपत्याखाली असलेल्या दहशतवाद विरोधी पथक
बुलडाणाचे पोउपनि इम्रान इनामदार, पोहेकॉ साजीद शेख, पोहेकॉ श्रीकृष्ण चांदुरकर, पोकॉ सतीश जाधव व पोकॉ विजय वारुळे यांचे सह एक विशेष पथक तयार करुन कोरोना कोविड-19 या महामारीच्या अनुशंघाने जे लोक सोशल मिडीया साईट जसे फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, ट्वीटर, टीकटॉक इत्यादींचा वापर करुन समाजामध्ये या विषाणुबद्दल गैरसमज व भ्रम तथा जातीय द्वेष पसरविणारे पोस्ट प्रसारीत करुन अफवा पसरवितात अशा लोकांवर स्वतः सदर पथकासोबत बारीक लक्ष ठेवुन होते. या दरम्यान शासनाने केलेल्या कोरोना कोविड-19 संदर्भाने केलेल्या उपाययोजना व वेळोवेळी पारीत केलेल्या सुचनांचे उल्लंघन करुन सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या अशा प्रकारची समाज विघातक पोस्ट प्रसारीत करणारे इसम नामे १) राहुल भगवान बेंडवाल, २) अंकेश मुठठे दोघे रा. बुलडाणा व ३) फिरोजखान अमानुल्ला खान रा.नांदुरा यांची गोपनीय माहिती मिळालेवरुन त्यांचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या पोस्टची सखोल पडताळणी करुन सदर तिन्ही आरोपी विरुध्द कलम 188 ,295 अ ,190 भादंवि सह कलम 52 , 54 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कलमांन्वये पो.स्टे. बुलडाणा शहर व पो.स्टे. नांदुरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना दक्षता बाळगावी व चुकीची माहिती देणारे पोस्ट प्रसारीत करु नये अन्यथा सूचनांचे भंग करणा-यांवर प्रचलित कायदयान्वये कार्यवाही करण्यात येईल असा इशारा एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिला आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी ) अक्षयतृतीयाला लागणाऱ्या मातीच्या करा, केळी ह्या बनवण्याचे काम दरवर्षी  मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रुई व परिसरात होत असते ,मात्र सध्याच्या लॉकडॉऊन परिस्थितीमुळे करा, केळी बनवण्याचे काम कमी झाले असून यावर्षी करा केळी दिसेनासे झाले आहेत,
सध्या कोरोना मुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, त्यामुळे करा केळी बनवण्याचे काम ही बंद आहे ,रूईला  दरवर्षी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या करा केळी बनवण्यात येत होत्या ,तसेच माठ, रांजण या उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येतात , मात्र यावर्षी कोरोना मुळे सर्व बंद आहे, कुंभार कारागीर व मजूर लॉकडाऊन चे नियम व सामाजीक दुरीचे भान ठेवत
असल्यामुळे कामावर येत नाहीत, शिवाय करा केळी माठ यांना लागणारे कच्चामाल वाहतूक बंद असल्यामुळे तेही मिळत नाही,घरातील सदस्याकंडून घरातल्याघरात करा केळी काही प्रमाणात येथे बनविण्यात येत असली तरी या करा केळीना विक्रीसाठी मार्केट सध्या उपलब्ध नाही ,सध्या लॉकडाऊन चा काळ सुरू आहे ,अत्यावश्यक  सेवा सोडून  सर्व बंद आहे , रस्ते ओस पडले आहेत,  सर्वजण आपापल्या घरात आहेत , बाहेर फिरणे गुन्हा आहे  ,त्यामुळे  कराकेळी घेण्यास कोण येणार। असा प्रश्न आहे,  याच कालावधीत अक्षय तृतीया हा सण येत आहे ,त्यामुळे करा, केळी विक्री करणे मुश्कील आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच यावर्षी अगदी कमी प्रमाणात व तेही घरातल्या घरात मातीच्या करा केळी बनवण्याचे काम सुरू आहे, वही  रांजण माठ करा केळी  चुली  बनवण्याची कला  वडिलोपार्जित  करत असून  ही कला जोपासण्यासाठी  हा धंदा  परवडत नसला तरी आम्ही करत असल्याचे रूई येथील पारंपरिक हा व्यवसाय करणारे कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे व सागर कुसाळकर यांनी सांगितले, तसेच शिर्डीला द्वारकामाईत व मंदिर परिसरात श्री साईबाबा हयात असताना दिवे लावण्यास सुरुवात झाली होती सुमारे1 35 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे, पूर्वीपासून  आम्ही शिर्डीत पणत्या दुकानदारांना  होलसेल देतो, आता मीही येथे दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या चाकावर बनवून देतो ,सध्या कोरोनामुळे प्रथमच शिर्डीत या पणत्या विक्री बंद आहे त्यामुळे हातावर काम करणारे आम्ही कारागीर मोठ्या आर्थिक संकटात आलो आहे, शासनानेही आमच्यासारख्या कारागीर कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले,
 करा ,केळी ही अक्षयतृतीयाला पूजनासाठी लागते, त्यामुळे  काहीजण आमच्या कडे  येऊन ही करा केळी खरेदी करत आहेत ,मात्र यावर्षी लॉक डाऊन मुळे सर्व सण-उत्सव हे शांततेच व परंपरेला फाटा देत घराघरात साजरे करण्यात येत आहेत, त्यामुळे अक्षयतृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असला तरीही घरातच हा सण यावर्षी साध्या पद्धतीने साजरा  होणार आहे, सध्या सर्वजण  लॉकडाऊन मुळे घरात आहे, आर्थिक अडचण होत आहे  ,तरीही लॉक डाऊन चे नियम पाळून  सोशल डिस्टंन्स ठेवून  या कोरोणा चा मुकाबला सर्वांनी करू या।।  असेही यावेळी   या कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे यांनी सांगितले.

मालेगाव : येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच, शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासन धास्तावले आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे.राज्यातील कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, त्यामुळे शासन व प्रशासन गतीने कामाला लागले आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट ठरले असून, राज्यात मालेगाव हा एकमेव असा तालुका ठरला आहे, जेथे बाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे, तर तेथील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दोन अंकी झाली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मालेगावमधील यंत्रणा अधिक प्रभावी व कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार मालेगावमध्ये आणखी सहा कोरोनाबाधित आढळले असून, यापूर्वीच्या बाधिताच्या एकाच कुटुंबातीलच हे नवीन सहा रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालेगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध पोलिसांतर्फे कडक कारवाई केली जात आहे. मालेगावच्या सीमेलगत असलेल्या खेडेगावात मात्र लॉकडाउन नुसते नावापुरते आहे की काय, असा सवाल सर्वसामान्य जागरूक नागरिक विचारत आहेत. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठं असलेल्या दाभाडी गावाचा विस्तार बऱ्याचं प्रमाणात झालाय. वाड्या-वस्त्यांनी विकसित झालेल्या गावात संचारबंदीचा बोजवारा उडाल्याचे चित्र बघावयास मिळतंय. पोलीस आल्यावर बाजूला होणं आणि नंतर आहे तसेच वर्तन बघावयास मिळतंय, त्यामुळे भविष्यात कुणी कोरोना आणल्यास परिस्थिती चिंंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सिल्लोड,  एका तरुणाने खदानीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्यासुमारास तालुक्यातील तळनी येथे घडली. दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण मृतदेह मिळून आला नाही. अखेर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री उशिरा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार होते.
         पंजाब सुंदरसिंग ठाकूर (32 रा. तळनी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
      घटनेची माहिती अशी की, मयत तरुण आपल्या भावासह दुचाकीवरुण तळनी शिवारातील मंदिराकडे जात होते. या दरम्यान रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पंजाबने खदानीतील पाण्यात उडी मारली. उडी मारताच त्याच्या भावाने आरडा- ओरड केली. शेजारील शेतकरी मदतीला धावुन येई पर्यंत पंजाब पाण्याच्या तळाशी बुडाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण पाणी आधीक खोलवर असल्याने रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते.
अग्निशामक दल पाचारण
      यंदा तालुक्यात तब्बल 23 दिवस अवकाळी पाऊस झाल्याने सर्व जलसाठे तुडुंब भरले होते. यामुळे या खदानीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बरेच प्रयत्न केले. पण यश न आल्याने अखेर अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री 11 वाजेच्यासुमारास अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाथर्डी : येथील किराणा दुकानाचे गोडवून फोडून खाद्य तेलाचे डबे चोरणारे चोरटे जेरबंद करुन ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी), सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नगरपालिका शाँपिंग गाळ्यामध्ये होलसेल किराणा मालाचे गोडवून लाँकडाऊनमध्ये बंद आहे. दि.१३ ते १९ एप्रिल या दरम्यान, गोडाऊनचे शेटर तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५० हजार ९२० रुपयाचे खाद्यतेल डबे चोरुन नेल्याची पाथर्डी पोलीस ठाण्यात अल्पेश अशोक भंडारी यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा रंगनाथ गायकवाड व त्याच्या साथीदार मिळून केला असल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती, त्यानुषंगाने पाथर्डी येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता, रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी) याने सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) अशा सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली टेम्पो (क्र.एमएच २४, एबी ५८१३) आणि चोरलेले तेलाचे डबे असा एकूण ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवीदास काळे, पोना रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रमजानुल मुबारक लेख मालिका नं.(१)
""अल्लाच्या करुणेचा महिना""
आज" चांद रात मुबारक"" इस्लामी कालगणनेनुसार मोहर्रम हा पहिला (१)महिना रमजान (९)नववा महिना. इस्लामी महीन्याची सुरुवात चंद्रमा नुसार होते , कोणताही महिना असो सुरुवात चंद्रकोर नुसार होते त्याला चांदरात असं म्हणतात .प्रत्येक महिन्याच्या अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी
चंद्रदर्शनाने सुरुवात होऊन  आठवा (८)शाबान महिन्याचा 30 व्या दिवशी चंद्र कोर दिसते त्याला अनन्य- साधारण महत्व प्राप्त झालेले आहे,""पवित्ररमजानुल मुबारक की" चांदरात ""आसे म्हणतात.  दुसऱ्या दिवशी रमजानुल मुबारक चा पहिला रोजास सुरुवात होते ,बांधव आप आपल्या नातेवाईकांना ,स्वकीयांना, दोस्तांना देऊन फोन करून ,व्हाट्सअप, फेसबुक twiter च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन चांद मुबारक च्या  शुभेच्छा ,शुभ चिंतन देतात ,आप आपसात शुभेच्छाची आदानप्रदान करून ऐका सुखद पर्वाला सुरुवात होते ,बालगोपालांचा आनंद गगनात मावेनासा होतो ,
प्रेषित हजरत मोहम्मद यांनी हादीसच्या सांगितल्यानुसार तुम्ही ज्या वेळेस पहिले चंद्रकोर बघाल त्यावेळेस अल्लाहा(परमेश्वरा )जवळ शुभ- शुभ चांगले जे तुम्हाला मागता येईल ती करुणा मागता येईल तेवढी करूणा  मांगा , सुखरूप आरोग्य  मांगा ,अल्लाहाकरीमचा वाद आहे की मी ती पुर्ण करेल व त्यावेळचे  पूण्य तुम्हाला
 नक्कीच  प्राप्त होईल .
अब्दुल्लाह बिन उमर( रजी .)हे प्रेषितांचे मिञ सांगतात की प्रेषित मोहम्मद (  स्व) यांनी म्हटले आहे की" चंद्रदर्शन बघून दुसऱ्या दिवशी रमजान चा रोजा (उपवास )धरा व चंद्रदर्शन करूनच रोजाची ( सांगता )ईप्तार करा  "(बुखारी शरीफ(ह. 1906),
आबु-हुरैरा( रजि.) ही हेच सांगतात की "चंद्रदर्शन करुनच रोजा धरा व ईप्तार ही(,रोजा समाप्त )  करा , जर पावसाळ्यात  आकाशात ढग आलेले आसल्यास ,चंद्रदर्शन होत नसल्यास ३० रोजे पुर्ण करावेत"(बुखारी शरिफ - हा.१९०९)
त्याच राञी पविञ रमजानुल मुबारक पर्वाची भक्तीभावाने सुरुवात होवुन बांधव आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करुन मगरिबच्या नमाज नंतर रमजान महीन्याच्या  विशिष्ट पुण्यप्राप्ताची खास " तरावीह नमाज" ची तय्यारीला लागतात  व घरातील भगिनी ,माता ,सकाळच्या " सेहरी " च्या तैय्यारीस लागतात ,लहानबाळगोपाळांचा उत्साह तर गगऩात मावेानासा राहतो ,

परंतु यंदाच्या वर्षांचे सर्व जगामधे जो  CORONA Virus ,COVID-19 या महाभयंकर महामारीने हाहाकार,. धुमाकुळ घातल्यामुळे व आपल्या भारत देशात सुध्दा धुमाकुळ चालु आहे, त्या महामारीच्या  आजारापासुन बचाव करण्यासाठी,व कुणालाही corona ची लागण होवु नये म्हणुन आपल्याला  सरकारने व WHO  या जागतिक आरोग्यसंघटनेने ,सांगितलेल्या protocol , व आदेशानुसार व आप- आपल्या मौलाना व संबधीत मस्जिद प्रमुखांच्या
सुचनेनुसार
"आपुन स्वत:च्या घरामधेच राहुन  नमाज , रोजा , तरावीह नमाज , कुराण तिलावत ,ई जी काही रमजानुल मुबारक चे पुण्य कर्मे आहेत सर्व घरामधे राहुनच करावेत , व पुण्य हासील करावेत ,आपल्या
 दररोजच्या दुआमधे  आल्लाहा करीम जवळ दुआ ,याचना ,करुणा करा ,की जगात जे corona ,covid-19 ने जो धुमाकुळ चालु आहे त्यातुन जगातील सर्व मानव जातीची पशु ,प्राणीमाञांची सुखरुप व  निरोगी  राहण्याची प्रार्थना करावी ""
आप- आपल्या घरामधे SOCIAL- DISTANCES ,पाळुन व साबणाने वारंवार हात स्वच्छ धुऊन , घरामधेच राहुन , मास्क MASK चा वापर करुन ,  स्वतःहाला ,घरातील सर्व मंडळींना ,मोहल्ले ,गल्लीतील,गावातील,.शहरातील  ,भारतातील,सर्वांची काळजी घ्यावी व सरकार ,प्रशासनास सहकार्य करुन corona च्या युध्दात ,आपण विजयी होवू ।।।
लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपुर, ९२७१६४००१४ )
STAY HOME ,
STAY HEALTHY ,
You Healthy , Nation Healthy ""

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget