शिर्डी (राजेंद्र गडकरी ) अक्षयतृतीयाला लागणाऱ्या मातीच्या करा, केळी ह्या बनवण्याचे काम दरवर्षी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रुई व परिसरात होत असते ,मात्र सध्याच्या लॉकडॉऊन परिस्थितीमुळे करा, केळी बनवण्याचे काम कमी झाले असून यावर्षी करा केळी दिसेनासे झाले आहेत,
सध्या कोरोना मुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, त्यामुळे करा केळी बनवण्याचे काम ही बंद आहे ,रूईला दरवर्षी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या करा केळी बनवण्यात येत होत्या ,तसेच माठ, रांजण या उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येतात , मात्र यावर्षी कोरोना मुळे सर्व बंद आहे, कुंभार कारागीर व मजूर लॉकडाऊन चे नियम व सामाजीक दुरीचे भान ठेवत
असल्यामुळे कामावर येत नाहीत, शिवाय करा केळी माठ यांना लागणारे कच्चामाल वाहतूक बंद असल्यामुळे तेही मिळत नाही,घरातील सदस्याकंडून घरातल्याघरात करा केळी काही प्रमाणात येथे बनविण्यात येत असली तरी या करा केळीना विक्रीसाठी मार्केट सध्या उपलब्ध नाही ,सध्या लॉकडाऊन चा काळ सुरू आहे ,अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे , रस्ते ओस पडले आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत , बाहेर फिरणे गुन्हा आहे ,त्यामुळे कराकेळी घेण्यास कोण येणार। असा प्रश्न आहे, याच कालावधीत अक्षय तृतीया हा सण येत आहे ,त्यामुळे करा, केळी विक्री करणे मुश्कील आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच यावर्षी अगदी कमी प्रमाणात व तेही घरातल्या घरात मातीच्या करा केळी बनवण्याचे काम सुरू आहे, वही रांजण माठ करा केळी चुली बनवण्याची कला वडिलोपार्जित करत असून ही कला जोपासण्यासाठी हा धंदा परवडत नसला तरी आम्ही करत असल्याचे रूई येथील पारंपरिक हा व्यवसाय करणारे कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे व सागर कुसाळकर यांनी सांगितले, तसेच शिर्डीला द्वारकामाईत व मंदिर परिसरात श्री साईबाबा हयात असताना दिवे लावण्यास सुरुवात झाली होती सुमारे1 35 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे, पूर्वीपासून आम्ही शिर्डीत पणत्या दुकानदारांना होलसेल देतो, आता मीही येथे दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या चाकावर बनवून देतो ,सध्या कोरोनामुळे प्रथमच शिर्डीत या पणत्या विक्री बंद आहे त्यामुळे हातावर काम करणारे आम्ही कारागीर मोठ्या आर्थिक संकटात आलो आहे, शासनानेही आमच्यासारख्या कारागीर कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले,
करा ,केळी ही अक्षयतृतीयाला पूजनासाठी लागते, त्यामुळे काहीजण आमच्या कडे येऊन ही करा केळी खरेदी करत आहेत ,मात्र यावर्षी लॉक डाऊन मुळे सर्व सण-उत्सव हे शांततेच व परंपरेला फाटा देत घराघरात साजरे करण्यात येत आहेत, त्यामुळे अक्षयतृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असला तरीही घरातच हा सण यावर्षी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, सध्या सर्वजण लॉकडाऊन मुळे घरात आहे, आर्थिक अडचण होत आहे ,तरीही लॉक डाऊन चे नियम पाळून सोशल डिस्टंन्स ठेवून या कोरोणा चा मुकाबला सर्वांनी करू या।। असेही यावेळी या कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे यांनी सांगितले.
सध्या कोरोना मुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, त्यामुळे करा केळी बनवण्याचे काम ही बंद आहे ,रूईला दरवर्षी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या करा केळी बनवण्यात येत होत्या ,तसेच माठ, रांजण या उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येतात , मात्र यावर्षी कोरोना मुळे सर्व बंद आहे, कुंभार कारागीर व मजूर लॉकडाऊन चे नियम व सामाजीक दुरीचे भान ठेवत
असल्यामुळे कामावर येत नाहीत, शिवाय करा केळी माठ यांना लागणारे कच्चामाल वाहतूक बंद असल्यामुळे तेही मिळत नाही,घरातील सदस्याकंडून घरातल्याघरात करा केळी काही प्रमाणात येथे बनविण्यात येत असली तरी या करा केळीना विक्रीसाठी मार्केट सध्या उपलब्ध नाही ,सध्या लॉकडाऊन चा काळ सुरू आहे ,अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे , रस्ते ओस पडले आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत , बाहेर फिरणे गुन्हा आहे ,त्यामुळे कराकेळी घेण्यास कोण येणार। असा प्रश्न आहे, याच कालावधीत अक्षय तृतीया हा सण येत आहे ,त्यामुळे करा, केळी विक्री करणे मुश्कील आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच यावर्षी अगदी कमी प्रमाणात व तेही घरातल्या घरात मातीच्या करा केळी बनवण्याचे काम सुरू आहे, वही रांजण माठ करा केळी चुली बनवण्याची कला वडिलोपार्जित करत असून ही कला जोपासण्यासाठी हा धंदा परवडत नसला तरी आम्ही करत असल्याचे रूई येथील पारंपरिक हा व्यवसाय करणारे कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे व सागर कुसाळकर यांनी सांगितले, तसेच शिर्डीला द्वारकामाईत व मंदिर परिसरात श्री साईबाबा हयात असताना दिवे लावण्यास सुरुवात झाली होती सुमारे1 35 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे, पूर्वीपासून आम्ही शिर्डीत पणत्या दुकानदारांना होलसेल देतो, आता मीही येथे दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या चाकावर बनवून देतो ,सध्या कोरोनामुळे प्रथमच शिर्डीत या पणत्या विक्री बंद आहे त्यामुळे हातावर काम करणारे आम्ही कारागीर मोठ्या आर्थिक संकटात आलो आहे, शासनानेही आमच्यासारख्या कारागीर कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले,
करा ,केळी ही अक्षयतृतीयाला पूजनासाठी लागते, त्यामुळे काहीजण आमच्या कडे येऊन ही करा केळी खरेदी करत आहेत ,मात्र यावर्षी लॉक डाऊन मुळे सर्व सण-उत्सव हे शांततेच व परंपरेला फाटा देत घराघरात साजरे करण्यात येत आहेत, त्यामुळे अक्षयतृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असला तरीही घरातच हा सण यावर्षी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, सध्या सर्वजण लॉकडाऊन मुळे घरात आहे, आर्थिक अडचण होत आहे ,तरीही लॉक डाऊन चे नियम पाळून सोशल डिस्टंन्स ठेवून या कोरोणा चा मुकाबला सर्वांनी करू या।। असेही यावेळी या कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे यांनी सांगितले.
Post a Comment