Latest Post

शिर्डी ।जितेश लोकचंदानी ।    निवासी संपादक 
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीचे कामे सुरू झाली आहेत, सध्या गहू सोगंणीची कामे जोरात सुरू आहेत ,परंतु या  लॉकडाऊन काळात शेतमजूर मिळेनासे  झाले आहे ,त्याचप्रमाणे परराज्यातून दरवर्षाप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने, स्थानिक हार्वेस्टर वाल्यांनी अचानक याचा फायदा घेत गहू काढण्यासाठी प्रत्येक एकराचे भाव वाढवले आहेत, त्यामुळे मुळातच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखीन मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे,
   सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, यापूर्वी शेतीचे कामे बंद होते, परंतु केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतीच शेतीच्या कामाला लॉकडाऊन चे नियम पाळत सवलत दिली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात शेतातील उभे पीके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे ,सध्या गहू करण्याचे काम जोरात सुरू आहे ,मात्र सध्या  शेतमजूरही मिळेनासे झाले आहे ,त्यामुळे  शेतकरी ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसत आहेत, मात्र हार्वेस्टर मशीन मालकाकडून, चालकाकडून  भावही वाढवण्यात आला आहे, सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे , शेतातील उत्पादित धान्य, कांदा , फुले ,फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाऱ्या वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे, सर्वजण कामधंदे सोडून आत्तापर्यंत घरात होते ,परंतु आता शासनाने शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात आल्यामुळे, आता  शेतकरी शेतीच्या कामावर  जोर देत आहे,गहू सोंगणीला आल्यामुळे व तो  लवकर  काढणे गरजेचे असल्यामुळे मात्र नेहमीप्रमाणे  या लॉक डाऊन काळात शेतमजूर मिळत नसल्याने नाविलाजाने हार्वेस्टर मशीन द्वारे गहू काढले जात आहेत, मात्र त्यामुळे या हार्वेस्टरवाल्यांना मोठा भाव आला आहे, त्यांनी या पंधरा-वीस दिवसातच प्रति एकर पाचशे,सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे, पूर्वी गहू काढण्यासाठी प्रती एकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता, परंतु आता हाच प्रति एकर भाव 2000 व त्यापुढे गेला आहे, शिवाय  हार्वेस्टरवाल्यांना अनेकदा सांगूनही  लवकर ते येत नाहीत , आता या हार्वेस्टर वाल्यांकडे नंबर  लावण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे,  शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वैतागले आहेत
  , सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असताना व शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना, सवलती देत असताना ,दुसरीकडे मात्र हे खाजगी हार्वेस्टर मशीन वाले शेतकऱ्यांना लुटत आहेत, या परिस्थितीचा फायदा हार्वेस्टर
 वाल्यांकडून घेण्यात येत आहेत, मुळातच पंजाब मधून येणारे हार्वेस्टर काही वर्षापासून येथील हार्वेस्टर वाल्यांनी त्यांना या भागात येऊ दिले नाही, स्थानिक हार्वेस्टर वाले परराज्यातील हार्वेस्टर वाल्यांना आपल्या गावात थांबून देत नाही, ते आल्यानंतर स्पर्धा निर्माण होते व त्यातून प्रति एकर गहू काढण्याचे भावही कमी होतात, तरी काही पंजाब हरियाणा मधून गेल्या दहा-बारा वर्षांपासून ठराविक अशी हार्वेस्टरवाले या भागात येत होतेच, मात्र यावर्षी पंजाब, हरियाणा मधून हार्वेस्टर मशीन या लॉकडाऊन मुळे भागात आले नाहीत , ,शिवाय सध्या कोरोणाच्या परिस्थितीमुळे एकही हार्वेस्टर मशीन परराज्यातून आपल्या राज्यात , राहता तालुक्यात यावर्षी आल्याचे दिसत नाही ,याचाच फायदा घेत तालुक्यातील हार्वेस्टर मालकांनी आता गहू काढण्यासाठी प्रत्येक एकरा चे भाव अचानक पाचशे ते सहाशे रुपये वाढवले आहे ,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना परत एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,यावर  जिल्हाधिकारी तहसीलदार  तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी  विशेष लक्ष घालून  या  हार्वेस्टर वाल्यांनी वाढवलेल्या  भावाबद्दल  योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे ,असे मत राहता तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी) आज शुक्रवारी दुपारी दोन ते चारवाजेच्या दिवसा ढवळ्या दरम्यान आऊटर सिग्नल वर उभी असलेल्या मालगाडीच्या एका बोगीचे दार फोडून त्यातील गव्हाची पोती लुटून नेण्याचा गंभीर प्रकार श्रीरामपुरात घडला या प्रकाराबद्दल शहरात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे दुपारी पचशतांब्या कडून घेणारी एक मालगाडी धान्याच्या पोत्यांची भरलेली होती सदरची गाडी सूतगिरणीच्या पुढे आल्यानंतर सिग्नल नसल्यामुळे अवतरला थांबले बजरंग चौक ते गोपीनाथ नगर भुयारी पूल यादरम्यान रेल्वेच्याएका बोगीचे दार आसपासच्या लोकांनी तोडले व त्यात गव्हाच्या पोत्यांची यथेच्छ लूट केली .बजरंग चौक ते गोपीनाथ नगर या परिसरातील नवी दिल्ली , राजवाडा परिसरात अनेक घरात सदरचे गव्हाचे पोते लोकांनी नेल्याची चर्चा असून रेल्वे पलीकडील भागातूनही ही लूट केली गेल्याची चर्चा आहे . सायंकाळी उशीरा रेल्वे पोलीस व शहर पोलीसांनी या भागातून दोन संशयित ताब्यात घेऊन तपास सुरु केल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सर्वत्र होत आहे .

बुलडाणा - 10 एप्रिल लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र शुकशुकाट असतांना आज एका बंद घरातून तब्बल 27 क्विंटल गांजाचे घबाड एलसीबीच्या हाती लागले आहे. अंदाजीत 94 लाख रुपयांचा हा गांजा असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे. 
        बुलडाणा शहरातील चिखली मार्गावरील बालाजी नगरालगत येळगाव शिवारात एका कुलुपबंद घरात ह्या गांज्याचा साठा मिळून आला.या प्रकरणी मनोज जुलालसिंह झाडे व गजानन सुल्तानसिंह मांझा रा.कुऱ्हा गोतमारा ता. मातोळा या 2 अरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.नशेबाजांमध्ये गांजाची क्रेझ अधिक असून बुलडाणा जिल्ह्यात व शहरात मोठ्या प्रमाणात गांजा विकला जात असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ गांजाच्या मोठ्या तस्करांवर लक्ष केंद्रित करुन होते. मात्र छुप्या मार्गाने विक्रेते गांजा विक्री व साठेबाजी करीत असल्याने या गांजाच्या तस्करावर बारीक लक्ष ठेवून असताना आज 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एमएच 28 एझेड 0236 क्रमांकाची कार थांबविली असता त्यामध्ये गांजाच्या 3 गोण्या आढळून आल्या. आरोपीला पोलिसी खाक्या दाखविला असता आरोपी मनोज झाडे याच्या मालकीच्या कुलुपबंद घरातून तब्बल 94 लाख रुपयांचे 27 क्विंटल 3 किलो गांजा घबाड सापडला आहे. ही कारवाई दुपारी 12 वाजतापासून तर रात्री उशीरा पर्यंत एलसीबी प्रमूख महेंद्र देशमूख यांच्या मार्गदर्शनात सुरु होती.या कार्रवाइत पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख,सपोनि इंगळे पीएसआई इमरान इनामदार , सुधाकर काळे,अताउल्ला खान,सुनील खरात, संजय नागवे, विजय सोनुने, अमोल अंभोरे, नदीम शेख सह इतर कर्मचारी सहभागी होते.

शिर्डी राजकुमार गडकरी - सध्या देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला असल्याने सर्वकाही ठप्प आहे,  अत्यावश्यक  सेवा सोडून सर्व बंद आहे, मात्र सध्या शेतीचे पिके सोंगण्याची कामे महत्त्वाची असल्याने शेतीच्या कामा करता या लॉक डाउन काळात नियम पाळत व दक्षता  घेत सवलत देण्यात आली आहे ,मात्र या सवलतीचा दुरुपयोग होताना दिसत असून लॉक डाऊन चे नियम व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाळण्यात येणारी दक्षता, शेतकरी, शेतमजूर बहुतांशी महिला शेतमजूर अनेक  ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात घेत नसताना दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात  व गावा गावात, खेड्यापाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, परंतु जरअसे नियम
पाळले गेले नाहीत तर ग्रामीण भागातही कोरोनाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते ,अशी भीती काही जाणकार व्यक्त करताना दिसत आहे,
   सध्या जगात त्याचप्रमाणे भारतातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे ,14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे ,या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, मात्र सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे ,पिके सोगंणीला आल्यामुळे महत्त्वाची आहेत, त्यामुळे हा विचार करून केंद्र सरकारने ,,केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात येऊन काही सवलत दिली, मात्र कोरोचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क व सेल्फ डिस्टन्स  ठेवण्याची जरूरत आहे, सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे ,असे असतानाही ग्रामीण भागात अनेक शेतमजुर, महिलामजूर, मात्र शेतीकामासाठी जाताना किंवा  गहू ,मका कापणीसाठी,
कांदा काढण्यासाठी गावातून मळ्यात, किंवा ह्या वाडी वरून त्या वाडी वर ट्रॅक्टर, मालवाहतूक रिक्षा मध्ये एकत्र  जाताना, येताना एकत्रितपणे दिसत आहे, तसेच शेतात पिकांची सोगंणी करताना, एकत्रित गप्पा मारताना, शेजारी शेजारी बसून जेवण करताना, दिसून येत आहे ,त्याच प्रमाणे हार्वेस्टर व इतर शेती उपयोगी मशनरी यांचा शेतीसाठी वापर करताना शेतमजूर कोरोनाचा संसर्ग होईल म्हणून घेण्यात येणारी कोणतीही दक्षता घेताना दिसत नाही, सोशल डिस्टन्स  पाळला जात नाही  अनेकदा तोंडाला रुमाल किंवा मास्कही नसतो, ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी हा प्रकार सध्या सर्रास पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात वाड्या,  वस्त्यावर लॉकडाऊन काळात नियमाची ऐशीतैशी तशी झाल्याची दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, परंतु अशा पद्धतीने ग्रामीण भागात जर दक्षता न घेता, शेतीची कामे सामूहिक पद्धतीने करण्यात आली, तर मात्र कोरोनाचा धोका ग्रामीण भागात वाढवू शकतो, त्यामुळे जरी  केंद्रसरकारने शेतीच्या कामांसाठी लॉक डाऊन मधून सवलत दिली असली तरी स्वतःची सुरक्षा,  व कोरोना चा संसर्ग होऊ नये, म्हणून घ्यावयाची दक्षता पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी ही आपल्या गावात शेतकरी शेतमजूर, महिला कामगार, यांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर  अशिक्षित, गोरगरीब  लोकांची संख्या  अधिकआहे,  त्यामुळे त्यांना रोजीरोटीसाठी काम करणे गरजेचे आहे , ह्याचाच मुळे  मजूर व विशेषतः महिला शेतमजूर  सध्या शेतीच्या कामाला  जातायेत , परंतु म्हणावी तशी दक्षता  त्यांच्याकडून घेण्यात येत नाही ,या अशिक्षित व आडाणी लोकांना  कोरेना संबंधी अधिक माहिती नाही ,
त्यामुळे प्रत्येक  गावात, वाड्या-वस्त्यांवर शेतीत काम करताना किंवा ट्रॅक्टर, इतर वाहना मधून एकत्रित शेती कामाला जाणारे मजूर, विशेषता महिला शेतमजूर,कांदा काढण्यासाठी एकत्रित शेत ,रानात दिसणारे शेतमजूर,महिला, यांनाही माहिती व जनजागृती करून लॉकडाऊन काळात व इतर वेळीही मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत शेतात काम करावे, शेतमजूर, महिला शेतमजूर व शेती मालकाच्या कुटुंबाने सुद्धा दक्षता घेण्याची सूचना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी करावी, असे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक बोलतआहे.

 बुलढाणा - 10 अप्रैल- कोरोना वायरस का विषय संपूर्ण देश मे बडा गंभीर मुद्दा बना हुआ है जिस से निपटने के लिए शासन हर मुमकिन कोशिश कर रहा है किंतु इस मुसीबत की घडी में भी कुछ लोग जातीय रंग देकर सोशल मीडिया के माध्यम से समाज मे नफरत और अफवाह फैलाने का काम कर रहे है.बुलढाणा जिले में व्हाट्सएप पर कोरोना को लेकर अफवाह फैलानेवाले एक डॉक्टर पर रायपुर पुलिस थाने में अपराध दर्ज किया गया है.हालांकि प्रशासन इस बात से सचेत कर रहा है कि, सोशल मीडिया पर कोरोना के संबंध में कोई अफवाह और जातीय भावना को आहत करनेवाली पोस्ट वायरल ना करें.
    बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम रायपुर निवासी डॉक्टर पी.आर.खंडागले ने चार-पांच दिन पहले अपने परिसर के  व्हाट्सएप ग्रुप पर कोरोना को लेकर एक विशेष समाज को  जिम्मेदार बताते हुए उनसे किसी प्रकार की वस्तु ना खरिदे ऐसी एक पोस्ट 3 एप्रैल को वायरल किया था. यह पोस्ट वायरल होने के बाद कुछ जागरूक नागरिक रायपुर पुलिस स्टेशन गए और उन्होंने पुलिस को डॉ.खंडागले की आपत्तिजनक पोस्ट से अवगत कराया.विशेष धर्म के लोगों के प्रति समाज मे द्वेष फैलाने के इस मामले की गंभीरता को समझते हुए रायपुर पुलिस थाने में पुलिस कांस्टेबल विजय पैठने की शिकायत पर एक खास समाज के प्रति कोरोना को लेकर अफवाह फैलानेवाले आरोपी डॉ.पी.आर.खंडागले के खिलाफ  भादवी की धारा 505(2) तथा आपदा व्यवस्थापन कानून 2005 की कलम 52,54 के तहत 7 अप्रैल को अपराध दर्ज किया गया है.मामले की अधिक जांच थानेदार सुभाष दुधाल के मार्गदर्शन में जारी है.

(भारतकुमार उदावंत व रवी भागवत)
श्रीरामपूर- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वच स्तरातून जनजागृती सुरू आहे. आशा वेळी व्यंगचित्रकार मागे कसे राहतील.समाजसेवेचा वसा घेतलेले येथील व्यंगचित्रकार भारतकुमार उदावंत व रवी भागवत या जोडगोळीने व्यंगचित्रांच्या माध्यमातून जन जागृती सूरु केलीय. विशेष म्हणजे ही व्यंगचित्रे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असल्याने त्यांच्या या कामाला देशभरातून दाद मिळत आहे.
कोरोनाने जगभर हाहाकार माजविलेला असतानाही शहरी व ग्रामीण भागातील अनेक लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवताना दिसत आहेत, त्यांच्या या कृत्यामुळे ते त्यांच्यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. आशा महाभागांना कोरोनाच्या भयावह वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी भागवत व उदावंत यांनी व्यंगचित्रांचा मार्ग निवडला. त्यास दोघांनीही समर्पक घोषवाक्य व वातरतीकांची जोड दिली.
उदावंत व भागवत यांच्या व्यंगचित्रात यमराज केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यास त्यांनी कोरोनाचे रूप दिले आहे. आता तरी हो 'शहाणा, बाहेर जाण्यास नको शोधू बहाणा', 'घरात थांबणे हीच खरी देशसेवा', 'गर्दी आहे कोरोनाचे ठिकाण, त्यापेक्षा पसंत करा मकान', 'रस्त्यांवर फिरणाऱ्या मूर्खांचा जिरेल माज, घरी बसणाऱ्याना मिळणार दीर्घायुष्याचा ताज', 'कचरा टाकलं उघड्यावरी, विषाणू येतील तुमच्या घरी', ,'बचना है, बाचाना है, घरमे रहकर कोरोना को हराना है', ;करोनाशी द्यायची आहे फाईट, त्यासाठी घरी राहणे काय आहे वाईट', आशा एकचढ एक घोषवाक्ये व वात्रटिकांच्या मदतीने दोघांचेही समाजप्रबोधन सुरू आहे. ही घोषवाक्ये मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी असल्याने व्हाट्सआप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, शेयरइट, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांमधून त्यांच्या या उपक्रमास मोठी पसंती मिळत आहे. राज्याबरोबरच गुजरात, कर्नाटक, हायद्राबाद आदी ठिकाणाहून अनेक चाहत्यांनी त्यांना दूरध्वनी करून कामाचे कौतुक केले असल्याचे उदावंत यांनी संगीतले.
गुरू-शिष्याच्या या जोडीने यापूर्वीही अनेकदा आपल्या कलेचा उपयोग करून समाजातील गरजूंना मदत उभी केली आहे. चार वर्षांपूर्वी चैताली येतील दीपक राजगुडे या ब्लड कॅन्सरच्या रुग्णासाठी दोघांनी रस्त्यावर उतरून लोकांची चित्रे काढली, त्यास कला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला त्यानंतर नांदूर येथील मनीष सादाफळ या या प्लास्टिक ऍनिमिया च्या रुग्णासाठी तसेच भोकर येथील रामकृष्ण भोईटे या दाम्पत्याच्या अनाथ मुलांसाठीही असाच उपक्रम राबविला. त्यांनी आशा उपक्रमातून आतापर्यंत एक लाखाहून अधिक राशी उभारली व संपूर्ण रक्कम संबंधितांना शासकीय अधिकाऱ्यांमरफत सुपूर्द केली आहे.
याशिवाय चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर करतात. पन्नास हुन अधिक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी आतापर्यंत आपली प्रात्यक्षिके सादर केली आहेत. याशिवाय अनेक दैनिके, मासिके व दिवाळी विशेषांकातून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत असतात. दोघेही सातत्याने व्यसनमुक्ती, हुंडाबळी, विजबचत, पाणी बचत, एड्स जनजागृती, वृक्ष बचाव आदी सामाजिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतात.आतापर्यंत त्यांच्या व्यंगचित्रांची मुबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सोलापूर आदींसह अनेक ठिकाणी प्रदर्शने भरली आहेत. उदावंत यांच्या गणपती व मूषक यांच्या व्यंगचित्र मालिकेचे राज्यात एकाच वेळी शंभर ठिकाणी प्रदर्शने होण्याचा विक्रम झाला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन राज्यसरकारने त्यांना २००९ साली महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानीतही केले आहे. उदावंत यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन दोन वर्षांपूर्वी मुंबई येथील जहांगीर कलादालनात भरले होते. त्यासही त्यावेळी मोठा प्रतिसाद लाभला. भागवत यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या 30 पुस्तकांची महाराष्ट्र शासनाने प्रगत शिक्षण महाराष्ट्र या योजनेसाठी गेल्यावर्षी निवड केली होती. तसेच या दोघांच्याही पाठीवर कलारसिक माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची थाप पडली आहे.
सत्यजितचेही पाऊलावर पाऊल
भरतकुमार उदावंत यांचा मुलगा सत्यजित हादेखील उत्कृष्ट उदयोन्मुख चित्रकार आहे. काही वर्षांपूर्वी चित्रकलेच्या फाउंडेशन परीक्षेत तो राज्यात पहिला आला होता. समाजप्रधानाच्या कार्यात त्याने उदावंत भागवत या गुरुशिष्याच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे. त्यानेही हा महामारीच्या काळात डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्या कार्यास सॅल्युट करणारे चित्र रेखाटले आहे, त्याच्या या चित्रासदेखील कलारसिकांची मोठी पसंती मिळत आहे.

शिर्डी - लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर रक्‍ताची गरज भासण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे नियमित रक्‍तदान करणा-या रक्‍तदात्‍यांना व रक्‍त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्‍तगट श्री साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावीत असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
श्री.डोंगरे म्‍हणाले, सध्‍या महाराष्‍ट्र शासनाकडून विविध सामाजिक संस्‍था व संघटंना रक्‍तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सूचना देणेत येत आहेत. याकरीता असंख्‍य रक्‍तदाते स्‍वतःहुन रक्‍तदान करणेकामी पुढे येत असले तरी कोरोना विषाणु हा फुप्‍फुसाचा आजार असलेमुळे त्‍यासाठी रक्‍ताची फारशी गरज भासत नाही. तसेच आजतागायत श्री साईनाथ रक्‍तपेढीमध्‍ये पुरेसा रक्‍तसाठा उपलब्‍ध असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्‍यात आल्‍यामुळे वारंवार होणारे रस्‍ते अपघात हे पुर्णपणे थांबलेले आहेत. तसेच तातडीची आवश्‍यकता सोडून इतर रुग्‍णांना रुग्‍णालयात न जाण्‍याच्‍या सूचना देखील सरकारी पातळीवर देण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे दैनंदिन अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया या सध्‍यास्थितीला पुढे ढकलण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे म्‍हणावी तितकी रक्‍ताची गरज रुग्‍णालयास भासत नाही.
तसेच सर्वसाधारणपणे रक्‍तदानानंतर विविध प्रकारच्‍या चाचण्‍या होऊन ते रक्‍त ३५ दिवस रक्‍तपेढीमध्‍ये  साठवले जाते. रक्‍ताची मागणी बघता व त्‍याची टिकाऊ क्षमता पाहता रक्‍तसाठा सांभाळणे अवघड आहे. मागणी नसेल तर दात्‍यांचे हे अमुल्‍य रक्‍त वाया जाण्‍याची शक्‍यता आहे. रक्‍तदात्‍याने एकदा रक्‍त दिल्‍यानंतर पुढील तीन महिने रक्‍तदान करु नये असा नियम आहे. त्‍यामुळे आता गरज नसताना रक्‍तदान केले तर अशा नियमित रक्‍तदात्‍यांची टंचाई ही लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर भासण्‍याची शक्‍यता आहे.
याकरीता नियमित रक्‍तदान करणा-या रक्‍तदात्‍यांनी, ज्‍यांना रक्‍तदान करावयाची इच्‍छा आहे व रक्‍त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्‍तगटासह श्री साईबाबा संस्‍थानच्‍या श्री साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावेत जेणे करुन रक्‍ताची टंचाई भासल्‍यास रक्‍तदात्‍यांना संपर्क करुन रक्‍त उपलब्‍ध करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरीता (०२४२३) २५८५२५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावे असे ही श्री.डोंगरे यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget