श्रीरामपूर (प्रतिनिधी) आज शुक्रवारी दुपारी दोन ते चारवाजेच्या दिवसा ढवळ्या दरम्यान आऊटर सिग्नल वर उभी असलेल्या मालगाडीच्या एका बोगीचे दार फोडून त्यातील गव्हाची पोती लुटून नेण्याचा गंभीर प्रकार श्रीरामपुरात घडला या प्रकाराबद्दल शहरात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे दुपारी पचशतांब्या कडून घेणारी एक मालगाडी धान्याच्या पोत्यांची भरलेली होती सदरची गाडी सूतगिरणीच्या पुढे आल्यानंतर सिग्नल नसल्यामुळे अवतरला थांबले बजरंग चौक ते गोपीनाथ नगर भुयारी पूल यादरम्यान रेल्वेच्याएका बोगीचे दार आसपासच्या लोकांनी तोडले व त्यात गव्हाच्या पोत्यांची यथेच्छ लूट केली .बजरंग चौक ते गोपीनाथ नगर या परिसरातील नवी दिल्ली , राजवाडा परिसरात अनेक घरात सदरचे गव्हाचे पोते लोकांनी नेल्याची चर्चा असून रेल्वे पलीकडील भागातूनही ही लूट केली गेल्याची चर्चा आहे . सायंकाळी उशीरा रेल्वे पोलीस व शहर पोलीसांनी या भागातून दोन संशयित ताब्यात घेऊन तपास सुरु केल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सर्वत्र होत आहे .
Post a Comment