Latest Post

बुलढाणा - 24 मार्च
सरकारी अनाज की तस्करी की गुप्त जानकारी मिलने के बाद  चिखली तहसीलदार ने अपनी टीम के साथ एक गोडाउन पर छापा मारकर करीब 525 कट्टे चावल व गेहूं के पकडे हैं. इस मामले में के बाद अंढेरा पुलिस स्टेशन में अनाज तस्कर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.
      चिखली के तहसिलदार अजितकुमार येले को 23 मार्च की शाम में गुप्त जानकारी मिली कि ग्राम मेरा खुर्द के पास गुट क्र 36 में संतोष डोंगरदिवे के खेत स्थित जिनिंग की इमारत में सरकारी अनाज की कालाबाज़ारी कर ज़खीरा किया गया है पश्चात तहसीलदार येले ने अपनी टीम गठित कर रात 8:30 बजे के करीब चिखली तहसिल के ग्राम मेरा खुर्द के पास उक्त स्थान पर पहोंचे जहां उन्हें एक मालवाहू वाहन क्र MH 20 BT 3995 नज़र आई जो गेहूं के कट्टों से आधी भरी हुई थी पश्चात जिनिंग का जायज़ा लेने पर वहां गेहूं और चावल के पोतों का जखीरा नज़र आया. रात का अंधेरा हो जाने के कारण टीम वहीं रुकी रही और आज सुबह 8 बजे वहां मौजूद अनाज की गिनती की गई जिसमें 435 कट्टे चावल 180 क्विंटल और 89 कट्टे गेहूं 44 क्विंटल मिले जिसे सील कर दिया गया.इस कार्रवाई में चावल,गेहूं,पोते सीने की मशीन,मालवाहू वाहन इस प्रकार कुल 5 लाख 11 हज़ार का साहित्य जप्त किया गया है.तहसीलदार अजितकुमार येले की शिकायत पर अंढेरा पुलिस थाने में आरोपी मनोज पांडुरंग खेडेकर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम कज धारा 3,7 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.बता दे कि आरोपी मनोज खेडेकर चिखली कृषि उतपन्न बाज़ार समिति में संचालक है और जिसके पिता बुलढाणा जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष रहे चुके हैं.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आलेला नव्हता.          सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो कोणाच्याही संपर्कात आलेला नव्हता. त्याला लगेच नगर येथील एका रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरचा रुग्ण हा एका शहरातला असून तो विदेशातून किंवा अन्य कोणत्या गावातून आलेला नव्हता. हा वेगळा स्वतंत्र रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता लोकांनी मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २०८ जण संशयित असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी जवळपास १९७ जणांना घरी पाठविण्यात आलेले आहे. याशिवाय दोन जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोना महामारीने सर्वांना हतबल केले आहे. जगभरात प्रयत्न केले जात आहेत असे नाहीय, किंवा त्यांच्याकडे यंत्रणा नाहीय असे नाहीय. परंतू कोरोनाचा वेग एवढा आहे की, ते ही काही करू शकत नाहीत. यामुळे आज रात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची वेळ मी मागत आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन करत आहे. पुढील २१ दिवस लोकांनी घरातच थांबावे, ही कर्फ्यूसारखी स्थिती आहे. याला सहकार्य़ करावे असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले आहे. जर आपण २१ दिवस काळजी घेतली नाही तर आपण २१ वर्षे मागे जाऊ. कोरोना इन्फेक्टेड झालेल्या रुग्णाला सुरुवातीचे काही दिवस कोणतीय लक्षणे दिसत नाहीत. यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची शक्यता आहे, असेही मोदी म्हणाले.या लॉकडाऊनची आर्थिक किंमत नक्कीच देशाला सोसावी लागेल. परंतु यावेळी प्रत्येक भारतीयांचे जीवन वाचवणे ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. भारत सरकार, देशातील प्रत्येक राज्य सरकार, प्रत्येक स्थानिक संस्था यांची ही जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

अहमदनगर-दिनांक २४ / ०३ / २०२० रोजी श्री . दिलीप पवार , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि , जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे दोन इसम हे एक गावठी कटटा व जिवंत कडतुस हे विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोहेकॉ / मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , पोना / रविन्द्र आबासाहेब कर्डीले , संतोष लोढे , सचिन अडबल , पोकॉ / राहुल सोळंके , प्रकाश वाघ , मच्छींद्र बर्डे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे जावुन सापळा लावुन बातमीतील नमुद दोन इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव , पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव , पत्ता १ ) राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा चव्हाण वय २३ रा बेलापुर बु , खटकळी ता . श्रीरामपुर जि . अ . नगर २ ) सुलतान ऊर्फ इटकर मुक्तार शेख वय २४ रा . रामगड ता . श्रीरामपुर जि . अ . नगर असे सांगीतले . त्यांची पंचासमक्ष पोहेकॉ / मनोज गोसावी यांनी अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये ३० , ००० / - रु . किंमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ५०० रु . कि . चे जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेला असुन सदर बाबत श्रीरामपुर शहर पो . स्टे . येथे गुरनं . ॥ / २०२० , भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ . ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई श्रीरामपुर शहर पो . स्टे . हे करीत आहेत . * आरोपी नामे पण ऊर्फ राजेंद्र भिमा चव्हाण याचेविरुध्द दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे * १ . कालीकानगर पो स्टे , नाशीक गुरजी नं . ५८ / २००२ भा . द . वि कलम ३९९ , ४०२ २ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . २९९ / २०१८ आर्म अॅक्ट ४ / २५ ३ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४२५ / २०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ ४ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४०८ / २०१९ भा . द . वि कलम ३९९ , ४०२
सदरची कारवाई मा . श्री . सागर पाटील साहेब , प्रभारी पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . दिपाली काळे / कांबळे मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपुर व मा . श्री . राहुल मदने साहेब , उप . विभा . पोलीस अधिकारी साो , श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे .

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-  बेलापूर पोलीसांना आणखी  एक मृतदेह आढळून आला असुन तो वयोवृध्द ईसमाचा आहे बेलापूर श्रीरामपूर रोडवर असणार्या हाँटेल महाराष्ट्र समोर एका वयोवृध्द ईसमाचा मृतदेह आढळून आला असुन पुढील तपास हवालदार लोटके हे करत आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या कानिफनाथ मंदिराजवळ असणार्या काटवनात एका तरुणाने आत्महत्या केली असुन या आत्महत्ये बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे     बेलापूर येथील रविंद्र अरुण पाटोळे वय वर्ष २६ याने पढेगाव रस्त्यावर असणार्या कानिफनात मंदिराजवळ असणार्या काटवनात झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली या बाबतची फिर्याद मयताचा भाऊ सुभाष पाटोळे याने बेलापूर पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहीती समजताच अनेकांंनी बेलापूर पोलीस स्टेशनला गर्दी केली रविंद्र यांने आत्महत्या का केली याचे कारण समजले नसले तरी नागरीकात वेगवेगळी चर्चा चालु आहे घटनेची माहीती समजताच पोलीस हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत रविंद्र यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटलला हलविले

🔹जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद
♦5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही
बुलडाणा - 22  मार्च 
राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात आजपासून ते 31 मार्च 2020 चे मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.
      नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.
        किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*कलम 144 नुसार यावर असणार मनाई*
जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कायर्क्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा. कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशातंर्गत व परदेशी सहली. दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व संग्रहालये. खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस, राज्य परिवहन महामंडळ बसेस, रूग्ण व अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून अन्य व्यावसायिक वाहने. सर्व धार्मिक स्थळे भाविकांकरीता बंद राहतील, परंतु नित्य पुजा अर्चा 5 पेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.

*कलम 144 यांना लागू असणार नाही*
शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूगणालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी. शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, भाजीपाला व फळे विक्रेते, औषधालय, दवाखाने, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, पाच पेक्षा कमी व्यक्ती एकावेळी उपस्थित राहतील असे जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण. प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी. जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक), शासकीय / निमशासकीय कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget