Latest Post

बुलढाणा - 23 फरवरी
AIMIM के पूर्व विधायक वारिस पठान ने हाल में 100 करोड हिंदुओं पर 15 करोड मुसलमान भारी है,ऐसा विवादित बयान दिया जिस पर काफी बवाल होने के बाद पठान ने माफी भी मांग ली किंतु पठान के विवादित बयान पर अब भी तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है. बुलढाणा जिले के ग्राम जांबुलधाबा में 22 फरवरी को आयोजित शिव छत्रपती जयंती के कार्यक्रम को संबोधित करते हुए बुलढाणा से शिवसेना के विधायक संजय गायकवाड की जुबान फिसल गई और उन्होंने के लिए अपशब्दों का इस्तेमाल करते हुए सोमवार को मुंबई में "खडा फाड" देने की चेतावनी दे दी है.विधायक गायकवाड के इस विवादित भाषण का वीडियो सोशल मीडिया पर बड़ी तेजी से वायरल हो रहा है.इस भाषण का अनुवाद पाठकों के लिए जस का तस पेश है जो इस तरह से है,,,
भाषण का अनुवाद :- मराठी से हिंदी
हमारे घर की शेरनियां बाहर आ गई तो तुम इतना घबरा गए,हम साथ मे आ गए तो क्या करेंगे,मेरा तो वारिस पठान को इतना ही कहना है "देशद्रोही लांडया" अब तक तुमने जितनी महिलाएं घर मे रखे, उन महिलाओं को गुलाम बना कर रखे,उन्हें बाहर नही आने दिया,उन्हें बताया कि मिलिट्री आएगी तुम्हे घर से निकालेगी,तुम्हे इस देश से बाहर करेगी,सब को झूठ बोलकर बाहर लाया और फिर कहा कि 15 करोड मुसलमान 100 करोड हिन्दू पर भारी पडेगा,, ऐसा ही कहा ना,,तू भूल गया वारिस पठान,,,शिवराया का मावला तेरी लाखों की फौज पर 500 मावले भारी है,ये तू भूल गया,,आज भी शिवराया की जमात इस राज्य में जिंदा है,,तू 15 करोड की क्या बात करता है मैं तुझे सोमवार को विधानसभा में मिलता हुँ तू अपनी माँ का लाल होगा तो मुझे वहां बता 15 करोड तुझे खड़ा नही फाड दिया तो मैं मेरे बाप की औलाद नही.

गळनिंब (प्रतिनिधी)-- समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा सिध्देश्वर चहा चौक बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने सुरू करून समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला त्यातूनच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला              
गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील सिद्धेश्वर चहा चौक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर किरण तुपे व शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणारे रावसाहेब चासकर यांना विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहीरट बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा . बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे प्रवरा कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बिनसाद न्यूजचे संपादक असलम बिनसाद प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर पंचायत समिती सदस्या कल्याणी काळे एडवोकेट रवींद्र हाळनोर प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब वडीतके अनिल थोरात संजय कुदनर,उपसभापती आण्णासाहेब शिंदे, तुकाराम चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,हेड काॅन्सटेबल पोकळे, लोंढे,आदी उपस्थित होते  यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर किरण तुपे म्हणाले की वैद्यकीय सेवा करताना अनेक ठिकाणी सन्मान झाले परंतु माझ्या मायभूमीतील जन्मभूमी तील झालेला सन्मान  हा काही वेगळाच आहे या सन्मानाने मी भारावून गेलो असून माझे कार्य करण्यास मला आणखी ऊर्जा मिळाली आहे यावेळी पत्रकार देविदास देसाई, बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यवंशी,चासकर सर, यांचीही भाषणे झाली यावेळी गळनिंब व परिसरात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा .डॉक्टर  विजय कडनोर, डॉक्टर अनुराधा चिंधे, प्राध्यापक डॉक्टर किरण थोरात, प्राध्यापक सुयोग चिंधे, ऋषिकेश बाचकर, प्राध्यापक रवींद्र मारकड, प्राध्यापक अनिल चिंधे, प्राध्यापक ज्योती चिंधे, अक्षय पिलगर, प्रतिभा कडनर आदिचांही  संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमास आदिनाथ वडितके,  बोरुडे सर. सौ चित्ते मॅडम, गळनिंब चे सरपंच संदीप जाटे, उपसरपंच दशरथ चिंधे, सेवा संस्थेचे चेअरमन विष्णु चिंधे, आप्पासाहेब मारकड, शामराव काळे, साहेबराव भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मच्छिंद्र खेमनर गणेश डोमाळे, कैलास ऐनोर संजय वडीतके, अजित देठे, संजय शिंदे, संदीप शेरमाळे, अशोक कडनोर, सचिन चिंधे, भाऊसाहेब विश्वासे, संदीप कचरे, इंद्रभान चिंधे, केशव कडनोर, मनोज विश्वासे मंजाबापू खेमनर, महेश चिंधे, गणेश कडनोर सौरभ वडितके, हनुमान गायकवाड सचिन चिंधे, सयाजी भोसले, राहुल शेरमाळे, श्रीधर शिंदे, रोहित विश्वासे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव चिंधे सर यांनी केले तर कैलास ऐनोर यांनी आभार मानले प्रास्ताविक संदीप शेरमाळे यांनी केले


बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- बेलापूर  व परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे बंद घरे पाहुन त्याच घरात चोर्या झाल्या असुन दिवसा बंद घराची टेहाळणी करुन रात्री चोरी करणारी टोळी सक्रीय झालेली आसावी असा अंदाज आहे      बेलापूर  ऐनतपुर येथील गट नंबर ८१ मधील विहीरीवर असलेले २० हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले या बाबत बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली श्रीरामपूर  बेलापूर रोडवरील काही सी सी टि व्ही कँमेरँतही गाडीवर जनरेटर नेताना चोरटे कैद झालेले आहे ही बाब नवले यांनी बेलापूर पोलीसांच्या निदर्शनास आणुन दिली परंतु काहीच कारवाई  झाली नसल्याचे नवले यांचे म्हणणे आहे त्यांनतर चारच दिवसांनी श्रीमती माया कैलास ढवळे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी साडे सात तोळे सोन्याचे दागीने लंपास केले या घरातुन जवळपास पावणे दोन लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला या बाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने श्वान पथक तसेच ठसे तज्ञाना निमंत्रीत केले होते  त्यांनतर दोनच दिवसानी पोलीस स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणार्या एस टी स्टँडची कँटिंन चोरट्यांनी फोडली कँटींनचा मागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन कँटींनच्या गल्ल्यातील आठशे रुपये रोख एक कुरमुर्याची गोणी चहा पावडर साखर लपांस केली काल पुन्हा चोरट्यानी अनेक बंद घरांना टारगेट केले लक्ष्मी नारायण नगर मधील दिपक जधव यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथे काहीच हाती लागले नाही त्यांनतंर रमेश मिसाळ व राजेंद्र भराटे यांचेही बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही बेलापूर येथील पटारे यांची मोटार सायकल चोरट्यांनी चोरुन नेली असुन सलग घडणार्या या घटनामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे  बेलापूर  पोलीस या घटनाचा तपास करत असुन आत्ता पर्यत फक्त एकच गुन्हा दाखल झालेला आहे.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर शहरात मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे वतीने हिंदवी सम्राज्याचे संस्थापक एक आदर्श शासनकर्ता तसेच शौर्य,पराक्रम,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक,नियोजनबद्ध प्रशासन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभूतपूर्व अशी भव्य पायी शोभायात्रेने,ढोल ताशाचे गजरात,आनंदाने साजरी करण्यात आली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगल आरती करण्यात आली.त्यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,किशोरअण्णा निर्मळ,आ.लहू कानडे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी आ.भानुदास मुरकुटे,मंजुश्री मुरकुटे,नारायण डावखर,वंदना मुरकुटे,अशोक थोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिमा पूजन झाल्यावर शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांची वेशभूषा असलेले कलाकार दोन रथातून विराजमान होते.
मिरवणूक सुरु होताना प्रथम महिला,पुरुष सवार असलेले घोडेस्वार होते.त्यावेळी पारंपारिक वेशात,पारंपारिक वाद्द्यासह वाघ्या मुरळी,पोतराज,आदींनी आपली कला सदर केली.त्यामागे शिवरायाचे झेंडे हातात घेऊन भव्य पायी शोभायात्रा फटाक्याची  आतिषबाजी करीत थत्ते ग्राउंड बेलापूर रोड ते शिवाजी रोडमार्गे मेनरोड मार्गे परत थत्ते ग्राउंडला आल्यावर विसर्जन करण्यात आले.फार मोठ्या संख्येने महिला पुरुष,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,विद्यार्थी,बालके सह्भागी झाले होते.सर्व महिला पुरुषांनी भगवे फेटे बांधल्याने आकर्षक मिरवणूक दिसत होती.राममंदिर चौकात भजनी मंडळाने शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावा अप्रतिम सादर करण्यात आला.इतका मोठा उत्साह यावर्षी जास्त दिसत होता.शहरात.चौकाचौकात,गावागावात प्रचंड उत्साह जाणवला.शिवजयंती महोत्सवाचे नियोजन मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर,जिजाऊ महिला मंडळ,वधूवर सूचक मंडळ,युवा ग्रुप,यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव,शिवजयंती उत्सव अध्यक्ष किशोरअण्णा निर्मळ,यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरगे,भागवत लासुरे,रावसाहेब तोडमल,व सर्व सहकारी,महिला मंडळ सीमा जाधव व सहकारी, तसेच युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याठिकाणी शिवाजी महाराज यांची अप्रतिम रांगोळी व सर्व रस्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या प्रज्ञा सातपुते,कलावती देशमुख,ज्योती कवडे,घातल्या होत्या.आभार प्रदर्शन विलासराव जाधव यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे. परंतु मी ज्या खुर्चीवर आहे. त्याठिकाणाहून या कायद्याच्या विरोधात ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. माझी खुर्ची राजकारण करण्याची नाही, अशी भुमिका नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केली.नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळेच्या विषयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध असल्याचे अंजुम शेख, मुजफ्फर शेख यांनी सांगितले. अन् पालिकेच्या सभागृहाने तसा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान या कायद्याचे समर्थन व विरोध करणार्‍या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी नगराध्यक्षा यांनी आपली भुमिका स्पष्ट केली यावेळी मुजफ्फर शेख म्हणाले की, एका जातीला टार्गेट करुन हा कायदा करण्यात आला आहे. मात्र, हा देश सर्वांचा आहे. कोणाच्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही. हा कायदा देशातील 130 कोटी लोकांना रांगेत उभा करणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत. आमचे पुरावे काढायला गेले, तर देशच आमच्या नावावर करावा लागेल, असे मुजफ्फर शेख म्हणाले.या कायद्याचा त्रास हिंदू समाजातील लोकांनाही होणार आहे. मात्र, मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे. सरकारला या कायद्याच्या आडून आरक्षण संपवायचे आहे. आम्ही 600 वर्ष राज्य केले आहे, मेलो तरी आम्ही येथेच राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला काढण्याचा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले.यावेळी अंजुम शेख यांनी पालिकेत काँग्रेसचे 22 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 6 असून त्यांची भुमिका या कायद्यास विरोध करण्याची आहे. त्यामुळे कोण हजर आहे, किंवा नाही याचे आम्हाला घेणेदेणे नाही. ज्यांना ठरावाचा विरोध करायचा त्यांना करू द्या, ज्यांना समर्थन द्यायचे ते देणार आहेत, असे ते म्हणाले.अंजुम शेख यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात जो ठराव मांडला त्या ठरावाला आमचा पाठिंबा असल्याचे नगरसेवक संजय फंड यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नगसेवक रवी पाटील, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास आमचा पाठिंबा असल्याचे लेखीपत्र नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना दिले. त्यानंतर प्रत्येकाने यावर आपली भूमिका मांडावी असे ठरले.यावेळी रवी पाटील म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. येथील मुस्लिमांना आमचा विरोध नाही, परंतु बाहेरून येणार्‍यांना विरोध आहे. फाळणी झाली तेव्हा 25 टक्के हिंदू पाकिस्तानामध्ये होते, आज ते एक ते दोन टक्केही राहिले नाहीत, मात्र त्यावेळी जेवढे मुस्लिम बांधव भारतात होते, ते कित्येक पटीने वाढले आहेत.याचा अर्थ येथे सर्वांना चांगल्या वातावरणात राहता येते, हे स्पष्ट होते. प्रत्येक देशात आपल्या देशातील नागरिकांची नोंद असते. आपल्याकडेही शिस्त लागली पाहिजे. त्यामुळे या कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाचे किरण लुणिया यांनी हा कायदा देशहिताचा आहे, त्यामुळे या कायद्यास आमचे पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले.यावेळी प्रत्येक नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले. उपस्थित नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध दर्शविला तर सात नगरसेवकांनी समर्थन केले. शेवटी प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हा ठराव संमत होणार नाही, असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका : नगराध्यक्षा सी.ए.ए. व एन.आर.सी. विरोधात ठराव करण्याबाबत पत्र दिल्याने सभागृहात संभ्रामावस्था निर्माण झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात न घेता अजेंड्यावर घेऊन बहुमताच्या बाजूने ठराव होईल, माझी भुमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध करून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे.

बुलडाणा - 18 फेब्रूवारी
राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in  या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
       डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी,असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात मोक्का सारखा कायदा लावता येईल का याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे गृह विभागाला सांगण्यात आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास सामान्य नागरिकांनीही सावध राहून यासंदर्भात आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 4782 प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल करण्यात आले आहे.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर इतर राज्यांनी देखील गुटखा या अन्न पदार्थांवर प्रतिबंध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून चोरी/छुप्या मार्गाने हे अन्न पदार्थांची वाहतूक करुन विक्री केली जाते असे लक्षात आल्याने. गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द / निलंबित करण्याबाबत प्रशासनाने शासनाच्या मान्यतेने परिपत्रक काढलेले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर नगरपालिका भुयारी गटार अपहार प्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांनी 29 माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहे. त्यात काही विद्यमान व सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश आहे.श्रीरामपूर नगरपालिकेत केंद्र व राज्य सरकार यांच्या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात आली. परंतु त्यामध्ये अपहार झाल्याची तक्रार मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख इशु सिंधू यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. आता या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे या करत आहेत.या प्रकरणाच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी तपासी अधिकारी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी पालिकेतील सुमारे 29 आजी-माजी नगरसेवक व नगरसेविकांना समजपत्र पाठविले आहे. त्यांना दि. 20, 22 व 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलवले आहे.हे समजपत्र बाजावलेल्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक भारती अनिल कांबळे, शेख अंजुम परवेज मुसा अहंमद, मुजफ्फर पापाभाई शेख, श्रीनिवास लक्ष्मीनारायण बिहाणी, राजेश अलघ, सुभाष विठ्ठल गांगड तर माजी नगसेवकांमध्ये सौ. सुधा संतोष कांबळे, आशिष विजय धनवटे, सौ. शेख निलोफर महंमद, रवींद्र गिरधारीलाल गुलाटी, राजश्री राजेंद्र सोनवणे, सुमैया मुनीर उर्फ मुन्ना पठाण, श्याम अर्जुन अढांगळे, जायदाबी कलीम कुरेशी, अण्णासाहेब रेवजी डावखर, राजन चुग, मंगल सुभाष तोरणे, कांचन दिलीप सानप, संगीता अरुण मंडलिक, व्यंकटरमन कैलास नारायण, शेख सायरा सलीम, राघेश्वरी सुनील मोरे, राजेंद्र नानासाहेब म्हांकाळे, मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, निर्मला भाऊसाहेब मुळे, दत्तात्रय साबळे, कल्याण बुधमल कुंकूलोळ यांचा समावेश आहे. या 29 जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नगरसेविका रजियाबी शब्बीर जहागीरदार यांचे डिसेंबर 2018 मध्ये निधन झाले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget