Latest Post

बुलडाणा - 15 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव-चिखली मार्गावर कार अपघातात 2 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी 15 जानेवारीच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली.जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून  वर्तविण्यात येत आहे.
        सद्या पुण्यात स्थायिक लोक काही कामानिमित्त एमएच-30-एटी-3009 क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी येत असतांना आज बुधवारी पहाटे 7 वाजेच्या दरम्यान खामगांव-चिखली मार्गावरील अमडापूर या गावा नजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (50) व प्रीती विलास बहुरुपे (24) यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (60), स्नेहल श्रीकांत भोजने (27) व विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अमडापुर ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बुलडाणा - 15 जानेवारी 
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयास आज बुधवार ता.15 पासून हिवरा आश्रम ता.मेहकर येथे सुरूवात होत असून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या आसनस्थ रथारूढ प्रतिमेची सवाद्य शोभा यात्रा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 
        या शोभायात्रेसाठी पंचक्रोशीतील दिंड्या,पालख्या व भजनी मंडळे यांचे विवेकानंद नगरीकडे आगमन सुरू झाले आहे. दि 15 जानेवारी ते 17 जानेवारी असे तीनही दिवस यानिमित्त भरगच्च सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवटच्या दिवशी तीन लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात येईल. तीनही दिवस सकाळी थुट्टे शास्त्री महाराज यांचे व्याख्यान तर दि.15 जानेवारी रोजी विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे अनुभूती गायन व अभंग गायन,हभप येवले शास्त्री महाराज यांचे प्रवचन होईल. हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन,डॉ.विकास बाहेकर यांचे प्रवचन,विवेकानंद विचारदूत जान्हवी केळकर यांचे व्याख्यान,हभप महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन पार पडणार आहे. विवेकानंद जन्मोत्सव हा व्हिलेज ते ग्लोबल असा सर्वदूर पोहोचला असून, तीनही दिवस चालणा-या भरगच्च कार्यक्रमांचे विवेकानंद आश्रमाच्या युट्यूब वाहिनीसह सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.  गतवर्षी तब्बल साडेचार लाख भाविक व भारतीयांनी हे लाईव्ह प्रक्षेपण जगाच्या विविध भागात पाहिले होते. त्यादृष्टीने विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाने चोख नियोजन केले आहे.  तीनही दिवसांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी केले आहे.

गळनिंब(प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व संतलूक हास्पिटल श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व सिध्देश्वर चहा समिती यांच्या वतीने मोफप उपचार व शस्रक्रीया शिबिर नुकतेच संपन्न झाले.
 यावेळी हृदयरोग,मुतखडा,विषबाधा,बालरोग,हाडांचेविकार, किडनीविकार,सर्पदंश,मुत्रपिंड आदी रोगांवर तज्ञ डाॅक्टरानी मार्गदर्शन व मोफत उपचार करून औषध वाटप केले.
यावेळी डाॅ.शितल महाले,डाॅ.वर्षा भिसे,सिस्टर जॅकलिन,रिटा,लिमा,माधुरी,प्रिया,ब्रदर कीरण साळवे,योगेश सरोदे,अनिस इनामदार,आहद शेख,राहूल राऊत यांनी या शिबिरात रूग्णांची तपासणी करून सेवा पुरवली.या दरम्यान १६९ रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे पुरविण्यात आले.
यावेळी प्रवरा बॅंकेचे माजी संचालक भाऊसाहेब वडितके,मा.उपसरपंच गणपत चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,भगत भोसले,आण्णासाहेब वडितके,साहेबराव भोसले,पंढरीनाथ भोसले,राजु भोसले,साहेबराव चिंधे,चंद्रकांत भोसले,नानासाहेब शिंदे,प्रभाकर जाटे आदी उपस्थित होते.
    शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य संदिप शेरमाळे, सचिव कैलास ऐनोर,विलास ससाणे,भाऊराव विश्वासे,संजय शिंदे,मनोज तुपे,सह सिध्देश्वर चहा समितीचे सदस्य आदिंनी परीश्रम घेतले.

नेवासा (शहर प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथे नदीपात्रात सोमवारी आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली असून मागील वादाच्या कारणातून गंगापूर तालुक्यातील तरुणाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकल्या प्रकरणी किरण सुभाष हिवाळे (वय 23) रा. भीवधानोरा ता. गंगापूर याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी तालुक्यातील टोका येथील प्रवरा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. नेवासा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृतदेहाची तपासणी केली असता किरण सुभाष हिवाळे या नावाची पावती त्याच्या खिशात सापडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सदर तरुण गंगापूर तालुक्यातील भीवधानोरा येथील असल्याचे स्पष्ट झाले.भीवधानोरा येथे हिवाळे राहत असलेल्या दलित वस्तीमध्येच कानिफ माणिक मावस हा चोरून दारू विक्रीचा धंदा करत होता. एक वर्षांपूर्वी किरण याने वस्तीतील तरुण बिघडत असल्याचे कारण देत मावस यास वस्तीत दारू विक्री करू नका असे सांगितल्यानंतर मावस व त्याचा मित्र अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) यांनी किरणला मारहाण केली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्या दोघांनी किरण यास तुझ्यामुळे जेल मध्ये बसावे लागले असून तुझा काटा काढणार असल्याचे फोनवर तसेच समक्ष भेटून दमबाजी केली.किरण हा भेंडाळा येथील एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होता तो मागील आठवड्यात घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सदर माहिती सांगितली त्यानंतर दोन दिवस राहून तो पुन्हा हॉटेलवर कामासाठी गेला मात्र तीन दिवसांपासून त्याचा फोन लागत नव्हता. दरम्यान किरणचा मृतदेह प्रवरानदी पात्रात आढळून आल्याची माहिती हिवाळे यांना सोमवारी सायंकाळी समजल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह किरणचा असल्याची खात्री पटली.मृत किरण याच्या हाताला व गळ्याला दावे बांधून त्या दाव्याला दगड बांधलेला होता तसेच पोटाच्या बाजूला कशाने तरी खुपसल्याच्या खुणा दिसत होत्या. मृतदेह पाण्यात भिजल्याने फुगलेल्या अवस्थेत प्रवरासंगम प्रवरा नदी वरील पुलाखाली आढळून आला असल्याचे पोलिसांनी मृत किरण याच्या वडिलांना सांगितले.याबाबत मृत किरणचे वडील सुभाष हिवाळे यांनी मागील केसच्या कारणावरून जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कनिफ माणिक मावस (रा. भीवधानोरा ता. गंगापूर) व अशोक तुपे (रा. भेंडाळा ता. गंगापूर) या दोघांवर संशय व्यक्त करत यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 28/2019 भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. के. शेवाळे करीत आहेत.

बेलापूर प्रतिनिधी - अध्यात्माशिवाय खरे सुख नाही मोबाईल  ईंटरनेटच्या जमान्यात अध्यात्माची गोडी तरुण पिढीला लागावी हा दृष्टिकोन समोर ठेवुन वाचनालयास धार्मिक ग्रंथ भेट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी व्यक्त केले        इस्काँन परिवाराच्या वतीने बेलापूर ग्रामपंचायत वाचनालयास साडे अकरा हजार रुपयांचे ग्रंथ इस्काँनचे प्रचारक किरण गागरे यांनी भेट दिले त्या वेळी ते बोलता होते ते पुढे म्हणाले की  बेलापूरला प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेले केशव गोविंद मंदिर , शनीमहाराज मंदिर ,तसेच विठ्ठल मंदिर असून दुरदूरचे पर्यटक दर्शनभेट देण्यासाठी आवर्जून येतात,अशा बेलापूरला अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेली संत परंपरा देखील आहे,राष्ट्रीय संत आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज ,हभप गोपालबुवा हिरवे महाराज , तसेच पं.महेशजी व्यास यांनी भागवतधर्माची पताका देशात फडकावली आहे त्यामुळे धार्मिक परपंरा असलेल्या या गावाला धार्मिक ग्रंथ देण्याची अनेक वर्षापासुन ईच्छा होती ती आज पुर्ण झाली दिपक क्षत्रिय म्हणाले की   इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ )परिवारा पैकी बेलापूर मधील प्रचारक किरण गागरे ,त्यांच्या मातोश्री लतादेवी,व पत्नी सौ. कावेरी  देखील इस्कॉन च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे ,इस्कॉन परिवार सर्व जगात विखुरलेला आहे ,अनेक देशात  अतिभव्य कृष्ण मंदिरे असून पाकिस्तान मधेही बारा मंदिर आहेत.  ,  ग्रंथ हेच आयुष्याचा भवसागर तरून जाण्याचा मार्ग असल्याचे क्षत्रिय म्हणाले  , शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतिक,व आध्यात्मिक विकास हा ग्रंथ वाचनातूनच होतो , दर्जेदार अध्यात्मिक साहित्य जनसामान्यापर्यत जावे ह्या हेतूने त्यांनी अकरा हजार रुपयांचे ग्रंथ भेट दिले असल्याचे जेष्ठ , पत्रकार देविदास देसाई यांनी सांगितले या वेळी  ग्रंथ भेट दिल्याबद्दल किरण गागरे  यांचा सत्कार केला .या कार्यक्रम प्रसंगी किशोर नाना बोरुडे,लहानुभाऊ नागले,चंद्रकांत शेजुळ,गोविंदराव खरमाळे,मच्छिंद्र पुंड,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक,अशोक गवते,मनोज श्रीगोड ,गणेश मगर, आधार ग्रुपचे अमोल गाढे ,महेश ओहोळ ,सचिन मेहेत्रे , बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई,दिलीप दायमा ,दिपकसा क्षत्रिय ,इ हजर होते ,

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-परीवहन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ)कार्यालयात ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२० उद्घाटन सोहळा संपन्न झाला,
यावेळी उप विभागीय (प्रांत) अधिकारी अनिल पवार,
राज्य अधिस्विकॄती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान, राज्य परिवहन महामंडळाचे विद्याधर साठे,
 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक सकाळचे गौरव साळूंखे, टॅक्सी असोसिएशनचे सुनिल मुथा, मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी,गणेश पिंगळे, निलेश डहाके,जयश्री बागुल,विनोद घनवट, सहायक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे ,श्वेता कुलकर्णी, धिरजकुमार भामरे आरटीओ कार्यालयाचे मुख्य लिपिक दत्तात्रेय गाडेकर,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, पत्रकार स्वामिराज कुलथे,प्रेस फोटोग्राफर अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रांताधिकारी श्री.पवार म्हणाले की, हल्ली वाढत्या अपघातांची संख्या ही खुपच चिंतेची बाब ठरत असून सिमेवर शुर सैनिक किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यात जितके लोकं मॄत्यूमुखी पडत नाही त्यापेक्षा कितीतरीपटीने अपघातात प्राण गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे, याकरीता पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवयास देऊ नये, वाहन चालवितांना सर्वांनीच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण हमखास अपघातांवर काही अंशी नियंत्रण मिळवू शकू असेही ते म्हणाले.

आपल्या प्रस्ताविकात बोलताना श्री.खान म्हणाले की, दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२० साजरा करत असताना दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी शहरातून रस्ते सुरक्षेपर भव्य अशी रॅली काढण्यात आली यासोबतच सप्ताहभर  कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालय,साखर कारखाने,वर्कशॉप,तथा  रस्त्यांवर, विविध चौकांचौकांमध्ये रस्ते सुरक्षेपर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे यासोबतच वाहन चालकांचे आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी,रक्तदान शिबीरे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, तथा विविध शाळा, महाविद्यालयांत रस्ते सुरक्षेपर निबंध स्पर्धा आदी  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले,पुढे बोलताना ते म्हणाले की, अपघातात दर १७ मिनिटाला एक व्यक्ती मॄत्यूमुखी पडतो,ही मोठी खेदाची बाब आहे, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये देशात ५०टक्के  अपघात कमी करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू  आहे, आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास ७० टक्के अपघात हे टाळले जाऊ शकतात, याकरीता या अभियानात विविध शाळा, महाविद्यालय आणि श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, यासोबतच जर कोणी वाहतूक नियम मोडताना आढळुन आल्यास त्यावर योग्य कारवाई करत गांधीगीरीच्या माध्यमातून त्यास पुष्पगुच्छ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच आपल्या देशात उत्तर प्रदेश, तामिळनाडू,आणि महाराष्ट्र या राज्यांत अपघातांची संख्या अधिक प्रमाणात आहे, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करुन वाहने चालविणे हाच वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचा खरा उपाय असल्याचेही ते म्हणाले,

यावेळी दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे म्हणाले की, हल्ली अपघातांची संख्या ही इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिमच हाती घ्यावी असे वाटू लागले आहे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज निर्पराधांचे हकनाक बळी जात आहेत,यावर ठोस उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले,

यावेळी श्री.प्रकाश कुलथे म्हणाले की, राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांपेक्षा श्रीरामपूरचे आरटीओ कार्यालय खरोखरच खुप चांगलं आहे ही केवळ स्तूती नव्हेतर वास्तविक्ता आहे, या कार्यालयात वरीष्ठ अधिकाऱ्यांचं योग्य नियंत्रण आणि कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्यांचं शिस्तपालन मोठं कमालीचं आहे, इतर आरटीओ कार्यालयात केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वर्षांतून सात दिवस वाहतूकीच्या नियमांना उजाळणी मिळते मात्र राज्यात श्रीरामपुरचचं एक आरटीओ कार्यालय असं आहे जिथं आरटीओ अधिकाऱ्यांकरवी वर्षाच्या बाराही महिने रस्ता सुरक्षा सप्ताह असल्यासारखे वाटते,वाहन चालविण्याचे लायसन मिळविण्यासाठी अनेक नागरीक या आरटीओ कार्यालयात येतात, त्यांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन करताना रोजच आरटीओ अधिकाऱी दॄषष्टिपथास पडतात म्हणून असा भास होतो की, रस्ता सुरक्षा सप्ताह तर चालु झाला नव्हेना ?,असे या कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची कामे खरोखरच स्तूतीस पात्र ठरत असल्याचे ते म्हणाले,
पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ सात दिवसांचा असला तरी प्रत्येकाने तो वर्षेभर अंगीकारावा यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करुनच आपापली वाहने चालवावी,कुठलेही नशा पाणी न करता अपघातमुक्त वाहने चालविल्यास खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व सफल ठरेल असेही ते म्हणाले,

यावेळी बोलताना श्री.बाळासाहेब भांड म्हणाले की, केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह आहे म्हणून वाहतूकीचे नियम पाळायाची आणि वर्षभर मात्र वाहतूकीचे नियम मोडायाची असे न करता वर्षभर वाहतूकीचे नियम पाळूनच वाहने चालविल्यास बहूतांशीअपघातांवर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकू कसेही ते म्हणाले,

यावेळी श्री.सुनिल मुथा म्हणाले की, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख श्री.खान यांची कामे अत्यंत चांगली असल्याने तक्रारीचं कारणचं उरत नाही,मात्र कायदा राबविताना माणूसकीच्या भावनेतून कायदा राबविल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल, कारण सध्या वाहन चालक/मालक मोठ्या संकटाचा सामना करत हा व्यावसाय करत आहे, एस.टी.बस भाड्यापेक्षा कमी दरात प्रवाशांकडून भाडे आकारणी केली जात आहे म्हणून आरटीओ अधिकाऱी/कर्मचार्ऱ्यांनी देखील त्यांच्या समस्यांना योग्यरित्या समजून घ्याव्यात असेही ते म्हणाले,

निशिकांत दोंदे यांच्या श्रीसाईलिला वॄतवाहिनीने या कार्यक्रमाचे सुरेख असे लाईव्ह टेलिकास्ट केले,
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षेपर परीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले, यासोबतच उपस्थितांना रस्ते सुरक्षेपर प्रतिज्ञाही देण्यात आली.
सहायक मोटार वाहन निरीक्षक धिरजकूमार भामरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी आभार मानले,
या कार्यक्रमास आरटीओ कर्मचारी अभिजित कुऱ्हाडे, निशिकांत दोंदे, श्रीकांत शिंदे,सारंग पाटील, रावसाहेब शिंदे,भरत गुणावत, अभिजित जाधव, राजेंद्र गरड,अंकूश शेंडे,श्री.निंबाळकर मेजर,श्री.गावडे श्री.शिलावट,आनंद ओहोळ, युटीएल कर्मचारी अतिक शेख, मंगेश, प्रदिप नरवडे,विजय पाठक, भाऊसाहेब साळवे,गणेश सरोदे यांच्यासह वाहन चालक/मालक,टॢक चालक/मालक संघ/ टॅक्सी युनियन /रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाहन चालक/मालकांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि समस्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानात रस्ते सुरक्षेपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहनही  श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

मालेगाव । प्रतिनिधी -पोलीस विभागाच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था व शांतता अबाधित राखली जात असल्याने सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरणात राहता येते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.येथील राज्य राखीव पोलीस दल संकुलाचे उद्घाटन व हस्तांतरण ना. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर ताहेरा शेख, राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, धुळ्याचे समादेशक संजय पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता वृषाली जोशी आदी उपस्थित होते.अतीसंवेदनशील शहर म्हणून मालेगाव येथे एसआरपीएफ जवानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात ठेवून संरक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे सांगून ना. भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस दल नागरीकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सेवा बजावते. त्यामुळे नागरीकांना सुसह्य जीवन जगता येते. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता करणेही आवश्यक असून त्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.पोलीस विभागातून दरवर्षी ज्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्याच प्रमाणात दरवर्षी पोलीस भरतीत सातत्य राखणे देखील आवश्यक असल्याचे सांगत ना. भुजबळ म्हणाले की, देशांतर्गत संरक्षणासाठी पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले. राज्यात ७० हजार पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.चांगले काम केले तर बदनामी टळेल. मात्र कामात कुचराई केली तर विभागाची बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन करून पोलिसांच्या कार्यावरच शासन चांगले की वाईट हे ठरत असल्याचे स्पष्ट केले.एसआरपीएफ जवानांच्या कार्यक्षमतेमुळेच मालेगाव शहराची विकास व शांततेच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले की, संवेदनशील म्हणून ओळख असणार्‍या मालेगाव शहरात कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण्यात राज्य राखीव पोलीस दलाचा मोलाचा सहभाग आहे. या इमारतीच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ जवानांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, काँग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, धर्माआण्णा भामरे, नंदू सावंत, विजय पवार, संदीप पवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, राजेश अलीझाड, निलेश काकडे, भारत बेद, अमोल चौधरी, अनिल पवार आदींसह पोलीस व एसआरपी दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य राखीव पोलीस दलासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय, टीव्ही रूम, अद्यावत स्वयंपाक गृह, भोजन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या संकुलात साधारण ९६ कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था होवू शकेल. यासोबतच एक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा अधिकार्‍यांची राहण्याची सोय देखील संकुलात करण्यात आली आहे. या संकुलाच्या इमारतीत सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मलनिस्सारण प्रकल्प आदी सुविधा आहेत.डॉ. आरती सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget