Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-परीवहन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ)कार्यालयात ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२० उद्घाटन सोहळा संपन्न झाला,
यावेळी उप विभागीय (प्रांत) अधिकारी अनिल पवार,
राज्य अधिस्विकॄती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान, राज्य परिवहन महामंडळाचे विद्याधर साठे,
 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक सकाळचे गौरव साळूंखे, टॅक्सी असोसिएशनचे सुनिल मुथा, मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी,गणेश पिंगळे, निलेश डहाके,जयश्री बागुल,विनोद घनवट, सहायक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे ,श्वेता कुलकर्णी, धिरजकुमार भामरे आरटीओ कार्यालयाचे मुख्य लिपिक दत्तात्रेय गाडेकर,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, पत्रकार स्वामिराज कुलथे,प्रेस फोटोग्राफर अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रांताधिकारी श्री.पवार म्हणाले की, हल्ली वाढत्या अपघातांची संख्या ही खुपच चिंतेची बाब ठरत असून सिमेवर शुर सैनिक किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यात जितके लोकं मॄत्यूमुखी पडत नाही त्यापेक्षा कितीतरीपटीने अपघातात प्राण गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे, याकरीता पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवयास देऊ नये, वाहन चालवितांना सर्वांनीच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण हमखास अपघातांवर काही अंशी नियंत्रण मिळवू शकू असेही ते म्हणाले.

आपल्या प्रस्ताविकात बोलताना श्री.खान म्हणाले की, दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२० साजरा करत असताना दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी शहरातून रस्ते सुरक्षेपर भव्य अशी रॅली काढण्यात आली यासोबतच सप्ताहभर  कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालय,साखर कारखाने,वर्कशॉप,तथा  रस्त्यांवर, विविध चौकांचौकांमध्ये रस्ते सुरक्षेपर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे यासोबतच वाहन चालकांचे आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी,रक्तदान शिबीरे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, तथा विविध शाळा, महाविद्यालयांत रस्ते सुरक्षेपर निबंध स्पर्धा आदी  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले,पुढे बोलताना ते म्हणाले की, अपघातात दर १७ मिनिटाला एक व्यक्ती मॄत्यूमुखी पडतो,ही मोठी खेदाची बाब आहे, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये देशात ५०टक्के  अपघात कमी करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू  आहे, आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास ७० टक्के अपघात हे टाळले जाऊ शकतात, याकरीता या अभियानात विविध शाळा, महाविद्यालय आणि श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, यासोबतच जर कोणी वाहतूक नियम मोडताना आढळुन आल्यास त्यावर योग्य कारवाई करत गांधीगीरीच्या माध्यमातून त्यास पुष्पगुच्छ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच आपल्या देशात उत्तर प्रदेश, तामिळनाडू,आणि महाराष्ट्र या राज्यांत अपघातांची संख्या अधिक प्रमाणात आहे, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करुन वाहने चालविणे हाच वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचा खरा उपाय असल्याचेही ते म्हणाले,

यावेळी दैनिक जयबाबाचे अॅड.कैलास आगे म्हणाले की, हल्ली अपघातांची संख्या ही इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिमच हाती घ्यावी असे वाटू लागले आहे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज निर्पराधांचे हकनाक बळी जात आहेत,यावर ठोस उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले,

यावेळी श्री.प्रकाश कुलथे म्हणाले की, राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांपेक्षा श्रीरामपूरचे आरटीओ कार्यालय खरोखरच खुप चांगलं आहे ही केवळ स्तूती नव्हेतर वास्तविक्ता आहे, या कार्यालयात वरीष्ठ अधिकाऱ्यांचं योग्य नियंत्रण आणि कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्यांचं शिस्तपालन मोठं कमालीचं आहे, इतर आरटीओ कार्यालयात केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वर्षांतून सात दिवस वाहतूकीच्या नियमांना उजाळणी मिळते मात्र राज्यात श्रीरामपुरचचं एक आरटीओ कार्यालय असं आहे जिथं आरटीओ अधिकाऱ्यांकरवी वर्षाच्या बाराही महिने रस्ता सुरक्षा सप्ताह असल्यासारखे वाटते,वाहन चालविण्याचे लायसन मिळविण्यासाठी अनेक नागरीक या आरटीओ कार्यालयात येतात, त्यांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन करताना रोजच आरटीओ अधिकाऱी दॄषष्टिपथास पडतात म्हणून असा भास होतो की, रस्ता सुरक्षा सप्ताह तर चालु झाला नव्हेना ?,असे या कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची कामे खरोखरच स्तूतीस पात्र ठरत असल्याचे ते म्हणाले,
पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ सात दिवसांचा असला तरी प्रत्येकाने तो वर्षेभर अंगीकारावा यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करुनच आपापली वाहने चालवावी,कुठलेही नशा पाणी न करता अपघातमुक्त वाहने चालविल्यास खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व सफल ठरेल असेही ते म्हणाले,

यावेळी बोलताना श्री.बाळासाहेब भांड म्हणाले की, केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह आहे म्हणून वाहतूकीचे नियम पाळायाची आणि वर्षभर मात्र वाहतूकीचे नियम मोडायाची असे न करता वर्षभर वाहतूकीचे नियम पाळूनच वाहने चालविल्यास बहूतांशीअपघातांवर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकू कसेही ते म्हणाले,

यावेळी श्री.सुनिल मुथा म्हणाले की, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख श्री.खान यांची कामे अत्यंत चांगली असल्याने तक्रारीचं कारणचं उरत नाही,मात्र कायदा राबविताना माणूसकीच्या भावनेतून कायदा राबविल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल, कारण सध्या वाहन चालक/मालक मोठ्या संकटाचा सामना करत हा व्यावसाय करत आहे, एस.टी.बस भाड्यापेक्षा कमी दरात प्रवाशांकडून भाडे आकारणी केली जात आहे म्हणून आरटीओ अधिकाऱी/कर्मचार्ऱ्यांनी देखील त्यांच्या समस्यांना योग्यरित्या समजून घ्याव्यात असेही ते म्हणाले,

निशिकांत दोंदे यांच्या श्रीसाईलिला वॄतवाहिनीने या कार्यक्रमाचे सुरेख असे लाईव्ह टेलिकास्ट केले,
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षेपर परीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले, यासोबतच उपस्थितांना रस्ते सुरक्षेपर प्रतिज्ञाही देण्यात आली.
सहायक मोटार वाहन निरीक्षक धिरजकूमार भामरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी आभार मानले,
या कार्यक्रमास आरटीओ कर्मचारी अभिजित कुऱ्हाडे, निशिकांत दोंदे, श्रीकांत शिंदे,सारंग पाटील, रावसाहेब शिंदे,भरत गुणावत, अभिजित जाधव, राजेंद्र गरड,अंकूश शेंडे,श्री.निंबाळकर मेजर,श्री.गावडे श्री.शिलावट,आनंद ओहोळ, युटीएल कर्मचारी अतिक शेख, मंगेश, प्रदिप नरवडे,विजय पाठक, भाऊसाहेब साळवे,गणेश सरोदे यांच्यासह वाहन चालक/मालक,टॢक चालक/मालक संघ/ टॅक्सी युनियन /रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाहन चालक/मालकांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि समस्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानात रस्ते सुरक्षेपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहनही  श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

मालेगाव । प्रतिनिधी -पोलीस विभागाच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था व शांतता अबाधित राखली जात असल्याने सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरणात राहता येते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.येथील राज्य राखीव पोलीस दल संकुलाचे उद्घाटन व हस्तांतरण ना. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर ताहेरा शेख, राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, धुळ्याचे समादेशक संजय पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता वृषाली जोशी आदी उपस्थित होते.अतीसंवेदनशील शहर म्हणून मालेगाव येथे एसआरपीएफ जवानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात ठेवून संरक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे सांगून ना. भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस दल नागरीकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सेवा बजावते. त्यामुळे नागरीकांना सुसह्य जीवन जगता येते. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता करणेही आवश्यक असून त्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.पोलीस विभागातून दरवर्षी ज्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्याच प्रमाणात दरवर्षी पोलीस भरतीत सातत्य राखणे देखील आवश्यक असल्याचे सांगत ना. भुजबळ म्हणाले की, देशांतर्गत संरक्षणासाठी पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले. राज्यात ७० हजार पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.चांगले काम केले तर बदनामी टळेल. मात्र कामात कुचराई केली तर विभागाची बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन करून पोलिसांच्या कार्यावरच शासन चांगले की वाईट हे ठरत असल्याचे स्पष्ट केले.एसआरपीएफ जवानांच्या कार्यक्षमतेमुळेच मालेगाव शहराची विकास व शांततेच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले की, संवेदनशील म्हणून ओळख असणार्‍या मालेगाव शहरात कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण्यात राज्य राखीव पोलीस दलाचा मोलाचा सहभाग आहे. या इमारतीच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ जवानांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, काँग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, धर्माआण्णा भामरे, नंदू सावंत, विजय पवार, संदीप पवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, राजेश अलीझाड, निलेश काकडे, भारत बेद, अमोल चौधरी, अनिल पवार आदींसह पोलीस व एसआरपी दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य राखीव पोलीस दलासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय, टीव्ही रूम, अद्यावत स्वयंपाक गृह, भोजन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या संकुलात साधारण ९६ कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था होवू शकेल. यासोबतच एक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा अधिकार्‍यांची राहण्याची सोय देखील संकुलात करण्यात आली आहे. या संकुलाच्या इमारतीत सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मलनिस्सारण प्रकल्प आदी सुविधा आहेत.डॉ. आरती सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक.

बुलडाणा - (कासिम शेख) 13 जानेवारी

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव च्या शासकीय गोडावून मधून आलेल्या रेशन तालुका स्तरीय शासकीय गोडाऊन मध्ये न नेता भर रस्त्यात दुसऱ्या वाहनात टाकत असल्याचा प्रकार 9 जानेवारीला उघडकीस आला होता.या प्रकरणी आखेर मेहकर गोदामपाल एस. आर.राठोडला आज जिल्हाधिकारी यांनी आपले कर्तव्यता कसूरीचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे मात्र आपल्या कामात चूक करणाऱ्या वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही कण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
        भारतीय खाद्य निगमचे मुख्य गोदाम हे बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला असून येथूनच संपूर्ण तालुका स्तरीय शासकीय धान्य गोदामा पर्यंत शासकीय धान्य वाहतुकीचा ठेका 
गौरी इंटरप्राइज़ेस ने घेतलेला आहे. टप्पा क्रमांक 1 ची वाहतूक करतांना खामगांवहुन शासकीय धान्य घेऊन निघालेला वाहन तालुका स्तरीय गोदाम पर्यंत पोहोंचने अपेक्षित आहे परंतु 9 जानेवारीला खामगांवहुन निघालेला ट्रक मेहकरच्या शासकीय गोदामा पर्यंत पोहोचलाच नाही व शहरातील एका ठिकाणी ट्रक मधील शासकीय 20 टन धान्य इतर दोन वाहनात भरल्या जात असल्याची बाब समोर आली शासकीय नियमाला डावलून हे अनाधिकृत काम स्वता गोडाऊन किपर आणि कंत्राटदार करीत आहे सदर माल रेशन दुकानदारांना वितरीत करत असल्याचा प्रकार उघड झाला.याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना
दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता सदरचा माल हा द्वार पोच योजनेद्वारे दुकानदारांना पोहचवत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा माल दुकानदारांना जाणार होता की काळ्या बाजारात हा प्रश्न अनउत्तरित आहे.ही अनियमितता जिल्हाधिकारी पर्यंत जाऊन पोहोचली होती. संपूर्ण प्रकारणाची चौकशी करुन मेहकर मेहकर तहसीलदार यांनी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवले.शेवटी मेहकर गोदामपाल एस.आर.राठोड (अव्वल कारकून) यांना आज एका आदेशानव्य महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 चे नियम 4 (1) (अ) नुसार शासकीय सेवेतून निलंबित कण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा(सामान्य आस्थापना) येथे निश्चित करण्यात आले आहे.एकीकडे  गोदामपाल राठोडने चूक केली म्हणून प्रशासकीय कार्यवाही करत निलंबित करण्यात आले तर तितकीच चूक वाहतूक ठेकेदारची ही आहे. आता प्रशासन वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही करणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण )  :-
 डुकराच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात आज दुपारी एक1. 45 च्या दरम्यान घडली 
याबाबत मिळालेली माहिती अशी की कोल्हार सोनगाव रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत काही मुले लघुशंकेसाठी गेले असता शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या खाली उकरलेल्या बोगद्यातून प्रवेश करीत एका डुकराने वैभव संदीप माळी (वय 7 वर्ष ,राहणार अंबिकानगर )
या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अचानक हल्ला केला या डुकराने या मुलाच्या छातीवर चावा घेऊन त्याला जखमी केले त्यामुळे तो मुलगा भयभीत झाला ही घटना काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांना सांगितली मुख्याध्यापिका देशमुख व शिक्षिका सुंबे तसेच शिक्षक शरद तांबे यांनी या विद्यार्थ्याला तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी दाखल केले 
आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोलप यांनी या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करून खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले.
 दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोल्हार भगवतीपुर मधील मोकाट कुत्रे डुकराचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.

बुलडाणा-13 जानेवारी
दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोतया परिक्षार्थी परीक्षा देत असल्याचा गंभीर  प्रकार  समोर आलाय. बुलडाणा येथील संजय दांडगे याच्या आसनावर औरंगाबाद जिल्ह्यातील राजेवाडीच्या चंदन बहुरे या आरोपीला परीक्षा देतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
       बुलडाणा येथील शारदा विद्यालयात 12 जानेवारीला अनुसुचित जमातीची विशेष भरती मोहीम सरळसेवा भरती आयोग, आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी परिक्षा घेण्यात आली.  आरोग्य सेवक पदाची परीक्षा देत असतांना बुलडाणा येथाल संजय विनायक दांडगे याच्या आसन क्र. 1491 वर चंदन बहुरे हा संशयास्पद परीक्षार्थी केंद्राध्यक्ष पवार यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन व पॅन कार्ड आढळून आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संजय हिवाळे यांनी फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात भादवी ची कलम 420 नुसार गून्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक कण्यात आलेआहे. 
.

अहमदनगर – विना परवाना गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीसाच्या हातावर तुरी देत पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. या प्रकरणामुळे 'कोतवाली' पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोतवाली पोलीसांनी तीन दिवसापूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता.दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलीसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रांत:विधिसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धूम ठोकली.
कर्मचाऱ्यांने त्याचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

उम्मती फौंडेशनच्या 'उम्मती मॅरेज ब्युरो' या मोफत विवाह ब्युरोच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'उम्मती मॅरेज ब्युरो' चे उदघाटनासाठी अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना खलील तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुफ्ती रिजवान, वकील संघाचे मा.अध्यक्ष अ‍ॅड. वाय. के.शेख, अ‍ॅड.रफिक शेख टी. सी, प्रा.बँकेचे संचालक पत्रकार सलीम पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, अल्तमश पटेल, मेहबूब कुरेशी, मौलाना इस्माईल, डॉ.अफरोज तांबोळी, साजिद मिर्जा आदी उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी हे विवाह ब्युरो संपूर्णपणे मोफत असून यात सर्वधर्मीय तरुण मुला-मुलींच्या बायोडाटाची संपूर्ण आणि अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे दालन उपलब्ध आहे तसेच हा मॅरेज ब्युरो विवाहयोग्य उमेदवारांच्या सामन्याचे तपशील जाणून पालकांची तातडीची गरज भागवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. अध्यक्ष मौलाना खलील यांनी ब्युरोच्या कार्यप्रणाली विषयी उपस्थित पालकवर्गांना कानमंत्र दिला. अ‍ॅड. वाय.के.शेख यांनी विवाह ब्युरोच्या कायदेविषयक विविध बाबींचा ऊहापोह केला. ईतर सर्व मान्यवरांनी 'उम्मती' च्या अभिनव मोफत उपक्रमाचे तोंडभर कौतुक करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अ‍ॅड.आरिफ शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण, खजिनदार शाकिफ शेख, समीर शेख, माजिद मिर्जा, डॉ.सुदर्शन रानवडे, इंजि.अयाज शेख, दानिश पठाण, अरबाज बेग, सुलतान शहा, नवेद तांबोळी, शाहरुख बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget