Latest Post

बुलडाणा- 20 डिसेंबर (कासिम शेख)5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा पायी प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर निघालेला "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट पट्टेदार वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील "ज्ञानगंगा अभयारण्यात" दाखल झाला होता व 15 दिवस या जंगलात राहून आपल्या सुरक्षित आधिवास किंवा वाघिनच्या शोधात हा वाघ आता अजिंठा पर्वत रांगा ओलांडत पुढे जात असल्याची गोपनीय माहिती "बिंदास न्यूज़" च्या हाती लागली आहे."ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्या मुळे अधिकारी निराश झाले तरी काही कामचोर कर्मचारी खुश झालेले आहे.या वाघच्या आगमनाने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती परंतु आता तो निघुन गेल्याने त्यांचा कामाचा भार कमी झाला आहे.
        यवतमाळच्या "टिपेश्वर अभयारण्यात" 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.आपली आईला सोडून हा वाघ तेलंगाना राज्यातील आदिलाबादच्या जंगलात फिरून महाराष्ट्रात परत आला व नांदेड, हिंगोली,परभणी,वाशिमहुन बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाला. 5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास केल्यावर असे वाटत होते की हा वाघ आता "ज्ञानगंगा अभ्यारण्यात" थांबणार व इथेच राहणार परंतु जवळपास 15 दिवस या अभयारण्यात खुप फिरल्यानंतर शेवटी हा वाघ अभ्यारण्याच्या बाहेर निघाला व बुलडाणा शहरा जवळून जात राजुर घाट गाठले व मग अजिंठा पर्वत रांगेत आपली वाट काढत पुढे निघालेला आहे.सद्या हा वाघ विदर्भ- मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याचे कळाले.अजिंठा पर्वत रांग औरंगाबाद,बुलडाणा जालना व जळगांव खान्देश या जिल्ह्यात पसरलेली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील "गौताळा औट्रमघाट अभयारण्य" चा काही भाग जळगाव जिल्ह्यात ही विस्तारलेला आहे व C1 वाघ आता याच अभ्यारण्यच्या दिशेने जाऊ शकतो असा कयास लावण्यात येत आहे.मात्र या वाघच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघ "ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्याची माहिती उघड होऊ नये, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : विद्यालयातील विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला दामिनी व निर्भया पथकातील पोलिसांनी तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडले. तरुणावर प्रतिबंधक कारवाई करीत भावासमोर समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पथकातील पोलिसांनी दिली.

      पालोद येथील यशवंत विद्यालयात लागून असलेल्या छोट्या- छोट्या गावांचे विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील विद्यार्थीनींची गावातील एक तरुण नेहमी छेड काढत होता. यामुळे तरुणाच्या नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून या विद्यार्थीनींनी ही माहिती  दामिनी पथकाला दिली. शुक्रवारी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पंडित इंगळे, सहायक फौसदार भगवान भिसे, विठ्ठल डोके, नायसे, महिला पोलिस मंगला ढोले, सिता ढाकणे यांनी सकाळी पालोद येथे जाऊन पाळत ठेवली व छेड काढणाऱ्या तरुणाला पकडले.

     या तरुणावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली व त्याच्या भावासमोर त्याला समज देऊन भावासमक्ष सोडून दिले. शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची छेड काढतात. याला आळा घालण्यासाठी नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाची पालोद येथे ही पहिली कारवाई केली. या पथकाची शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर करडी नजर राहणार आहे.
      शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची रोडरोमिओ छेड काढतात. परंतु त्यांच्या विरोधात कुणी तक्रार करत नाही. यामुळे रोडरोमिओंच्या अशा प्रकाराला बळ मिळते. याला आळा घालण्यासाठी महिला, विद्यार्थीनींनी भीती न बाळगता पोलिसांना कळवावे असे आवाहन पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : धडाकेबाज कारवाई, कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई तालुक्यातील आमठाणा येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी तिघांन विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
        तेजराव वाळुबा बावस्कर (60), युनूस शेख उमर शेख (30), व शेख शरीफ शेख दाऊद (51) तिघे रा. आमठाणा अशी मटका घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आमठाणा येथील चौफुलीवर दोघे तर बाजार पट्टीत एक जण कल्याण मटका घेत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली. माहिती मिळताच किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचारी हरिदास आहेर, दिनेश पुसे यांना सोबत घेऊन आमठाणा येथे सापळा लावला असता चौफुलीवर तेजराव बावस्कर, युनूस शेख, तर बाजार पट्टीत शेख शरीफ मटका घेताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 5 हजार 370 रुपये मिळून आले, अशी माहिती किरण बिडवे यांनी दिली.
       मटका घेणारे तेजराव बावस्कर, युनूस शेख यांना धंदा कुणाला देता असे पोलिसांनी विचारले असता आम्ही शेख कालू (आमठाणा) यांना देतो. ते राजू शिंदे (घाटनांद्रा) यांना तर राजू शिंदे हे विजय सिंघवी (भराड़ी) यांना देतो असे सांगितले, तर शेख शरीफ यांनी हाजी पटेल (देऊळगाव बाजार) यांना देतो असे सांगितले.
   

बुलडाणा- 20 डिसेंबर
केंद्र सरकारने नागरीकता संशोधन विधेयक पारीत करुन देशभरातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत असून या पार्श्र्वभुमीवर बुलढाणा मध्ये सुद्धा आज 20 डिसेंबर रोजी एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत काही कार्यकर्त्यांनी मुंडन केले तसेच CAA बिलाची प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.
      या वेळी प्रशासनाला देण्या आलेल्या निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.9 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत आणी 11 डिसेंबर 2018 रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल 2019 (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अ‍ॅक्ट 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या लोकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे असून सदर कायदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज एमआईएमचे जिल्हाध्यक्ष शहज़ाद खान यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले मुंडन करुण या कायद्याच्या प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात दानिश शेख,समीर खान,डॉ. मोबीन खान,शाकिर रज़ा,एड.ज़ुबैर मिर्ज़ा,मो.मौसूफ,मौलाना मजीद खान,हफीज़ खान सह जिल्हा भरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

प्रतिनिधी :-
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आज  हवेतून तब्बल ७१ कि. मी. ची भ्रमंती केली.
      पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकारातील ११ वी जागतिक स्पर्धा जून २०२० मध्ये ब्राझील येथे होऊ घातली असून तंबाल तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेल्या देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे मार्गदर्शन घेणेसाठी व सराव करणेसाठी देशभरातील खेळाडू सध्या देवळाली प्रवरा येथे येत आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून भारतीय स्थल सेनेचे रिटा. कर्नल हिमांशू सील आज देवळाली प्रवरा येथे आले व आप्पासाहेब ढुस यांचे सोबत सराव केला. 
      आज सकाळी राहुरी एम आय डी सी परिसरातून सकाळी ०७.२३ वा आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी स्वतंत्र पॅरामोटर साहित्यावर उड्डाण घेतले व जवळपास १००० फूट उंची वरून  राहुरी एम आय डी सी येथून राहुरी  फॅक्टरी मार्गे श्रीरामपूर रस्ता समोर ठेवून देवळाली प्रवरा, नरसळी, बेलापूर, श्रीरामपूर वरून थेट खैरी निमगाव गाठले. 
      खैरी निमगाव येथील आप्पासाहेब ढुस यांचे मेव्हणे एकनाथ चंद्रभान कालांगडे यांचे वस्तीला वळसा घालून ढुस व कर्नल सील यांनी पुन्हा खैरी निमगाव, श्रीरामपूर मार्गे बेलापूर देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी ते राहुरी एम आय डी सी परिसर असा परतीचा प्रवास पूर्ण करून सकाळी ०८.५४ वा. जेथून उड्डाण केले तेथेच यशस्वी लँडिंग केले. 
     आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी थोर२५० या इंजिनाचा वापर करून प्रत्येकी ०८ लिटर इंधनात तासी ६४ कि. मी. वेगाने ०१:३१:०४ इतक्या विक्रमी वेळेत हा प्रवास पूर्ण करीत पुढील जागतिक स्पर्धेच्या सरावाचा श्रीगणेशा केला.
     हे उड्डाण यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब क्षीरसागर व जेम्स पाळंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोल्हार प्रतिनिधी : (साईप्रसाद कुंभकर्ण ) 
महाराष्ट्र चे वैभव अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या 25 डिसेंबरला संपन्न होणार आहे. शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी 50 गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर 4200चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे.
शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहकार्यातून शिवाश्रमाची भव्य इमारतीची निर्मिती झाल्याची भावना तनपुरे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

समाजातील दिव्यांग घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षासाठी अंध अपंग निराधारांना आधार व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी बनण्याची स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना येथे मार्गदर्शन केंद्रामार्फत राजपत्रित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारातून आर्थिक पाठबळ निर्मितीचा या केंद्राचा हेतू असून, हे केंद्र निवासी स्वरूपाचे असून निराधार व्यक्तींना या केंद्राचा मोठा आधार लाभणार आहे. दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून डॉ.विजय तनपुरे यांची धडपड सुरू आहे. 

आपल्या शिवगर्जना व शिवायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तनपुरे महाराज बाजुला ठेवत आहे. त्यांचे गुरू राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे शिवाश्रमाची स्वप्न होते .त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, परंतु अडथळ्यांची शर्यत पार करत असताना त्यांना अपयश येत होते. त्यामुळे जोपर्यंत शिवाश्रम निर्मिती होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार त्यांनी साडेचार वर्षांपूर्वी केला. त्यामुळे सुमारे साडेचार वर्षापासून तनपुरे महाराज अनवाणी महाराष्ट्रभर फिरत कार्यक्रम करत आहे .

शिवाश्रमाची निर्मिती झाल्यामुळे त्यांचा हा संकल्प तडीस जाणार आहे.शिवाश्रम हा समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीतून उभा रहात असून अनेकांनी यथाशक्ती त्यासाठी योगदान दिले आहे याशिवाय श्रमाच्या निर्मितीमध्ये मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते त्यांची पत्नी शीला, मुलगा दीपक, सून वनिता हे अहोरात्र शिवाश्रम निर्मितीसाठी कुठलेही अपेक्षा व्यक्त न करता एक आपल्या घरचेच कार्य म्हणून त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे.शिवाश्रम बांधकामाच्या निर्मितीत लागणारे सर्व सहकार्य तसेच मदतनिधी व वस्तू रूपाने दानशूरांना शिवाश्रमासाठी सर्व प्रकारची मदत केली जात आहे. शिवाश्रमाची निर्मिती यापूर्वी शिर्डी येथे विमानतळ परिसरात होणार होती परंतु तिथे मूळ जागेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तेथील शिवाश्रम बांधकामास स्थगिती देण्यात आली.

दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवाश्रमाचे सिन्नर तालुक्यातील मेंढी या गावामध्ये सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात लोकार्पण कार्यक्रम होणार असून, त्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे दुपारी चार वाजता कीर्तन होणार असून त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
शिवाश्रमाच्या या लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार छत्रपती संभाजी महाराज , महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू ,श्री.कृष्णप्रकाशजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुमंतबापू हंबीर,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार पुण्याच्या लिज्जत पापड चे संचालक सुरेश कोते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गावचे भूमिपुत्र व सध्या दिल्ली नोएडा येथील सुदर्शन न्युज चॅनेल चे संचालक सुरेश चव्हाणके सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे माजी आमदार राजाभाऊ वाजे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे संगमनेरचे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी पुण्याचे शिवभक्त अभिनेते सचिन गवळी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद महाजन शांतीवन( बीड) चे दीपक नागरगोजे पुण्याचे उद्योजक विजय सेठी , गुजरातचे योगेंद्र सहानी  आदी मान्यवर या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्‍हान शिवाश्रमाचे वतीने करण्यात आले आहे.

कोल्हार :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश  व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ,स्कूलच्या प्रांगणात श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार रवी भागवत व भरतकुमार उदावंत यांनी सादर केलेल्या व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला कुंचल्याच्या अवघ्या काही फटकार्यातून या जोडीने देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यंगचित्रे साकारली न्यू इंग्लिश स्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते 
प्रारंभी विविध क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य शशिकांत सोनवणे ,उपप्राचार्य चौधरी ,पर्यवेक्षक, गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख गुंजाळ, गुरुकुल चे समन्वयक निंबाळकर ,सचिन खंडागळे, दीपक मगर ,कलाशिक्षक ए.जी नवले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुंभकर्ण आदी उपस्थित होते 
यावेळी श्रुती खंडागळे, श्रेया खंडागळे गौरी गाढे शाजिया शेख या विद्यार्थ्यांचे सत्कार झाले इयत्ता नववी मध्ये हस्त  चित्रांच्या पाठांचे महत्व भागवत यांनी विशद केले
उदरनिर्वाहासाठी विविध उद्योग करण्याबरोबर आपण पु ल देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कलेशी मैत्री आवश्यक जोडावी व जीवनातील खरा आनंद मिळावा असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले उदावंत यांनी आपल्या खास शैलीत वात्रटिका सादर करून विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचा संदेश दिला लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण झाल्यास तरुणपणी मुलांची पावले भरकटली जात नाहीत व्यायाम व सोबत कलेची जोड यामुळे तरुण पिढी व्यसनापासून दूर ठेवली जाऊ शकते 
 अशी आशा त्यांनी व्यक्त केली पाहुण्यांचा परिचय पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन खंडागळे यांनी केले तर आभार दीपक मगर यांनी मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget