बुलडाणा- 20 डिसेंबर
केंद्र सरकारने नागरीकता संशोधन विधेयक पारीत करुन देशभरातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत असून या पार्श्र्वभुमीवर बुलढाणा मध्ये सुद्धा आज 20 डिसेंबर रोजी एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत काही कार्यकर्त्यांनी मुंडन केले तसेच CAA बिलाची प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.
या वेळी प्रशासनाला देण्या आलेल्या निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.9 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत आणी 11 डिसेंबर 2018 रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल 2019 (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अॅक्ट 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या लोकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे असून सदर कायदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज एमआईएमचे जिल्हाध्यक्ष शहज़ाद खान यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले मुंडन करुण या कायद्याच्या प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात दानिश शेख,समीर खान,डॉ. मोबीन खान,शाकिर रज़ा,एड.ज़ुबैर मिर्ज़ा,मो.मौसूफ,मौलाना मजीद खान,हफीज़ खान सह जिल्हा भरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
Post a Comment