Latest Post

नाशिक (प्रतिनिधी )नामदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन छत्रपती युवा सेनेच्या वतीने दिले निवेदन
मराठा समाजावरील गुन्हे सरसकट मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
ना. छगन भुजबळ साहेब
छत्रपती युवा सेनेच्या वतीने आज नामदार छगन भुजबळ यांची संस्थापक-अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली
 यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात 58 मोर्चे काढण्यात आले होते त्यामध्ये अनेक बांधवांवर तरुणांवर गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी आज नामदार छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
यावेळी भुजबळ साहेब म्हणाले की छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करून मराठा समाजातील मुलांचे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी रफिक तडवी मयुर दाते दीपक जाधव सतीश शिंदे उपस्थित होते

बुलढाणा-(11 दिसेंबर)-विगत 2 साल पहले बुलढाणा शहर पुलिस थाने में दाखिल अपराध की अंतिम सुनवाई में बुलढाणा कोर्ट ने आरोपी को पोक्सो कानून तथा जूनाइल जस्टिस अधिनियम की धाराओं को मद्देनजर रखते हुए आरोपी को 5 साल की सजा तथा 60 हजार रुपए का जुर्माना आज 11 दिसेंबर को ठोंका है.खास बात तो ये है कि आरोपी बुलढाणा के शासकीय निरीक्षण गृह/बालसुधार गृह में बतौर केअर टेकर कार्यरत था जो अपने कर्तव्य को भूल कर लड़कों के साथ ही अनैसर्गिक कृत्य की घटना को अंजाम दे रहा था.
     इस गंभीर मामले की शिकायत बुलढाणा शासकीय निरीक्षण गृह के अधीक्षक भाऊराव निमचंद राठोड ने 7 सितंबर 2017 को बुलढाणा शहर थाने में शिकायत दर्ज कराई जिसमे कहा गया कि,शासकीय निरीक्षण गृह के कर्मी केअर टेकर निवृत्ती बारिकराव राजपूत ने निरीक्षण गृह में रहनेवाले 2 लड़कों के साथ अश्लील हरकत करते हुए एक के साथ मे अनैसर्गिक संभोग किया है.अपराध दर्ज होने के बाद पुलिस ने आरोपी को गिफ्तार किया था.बुलढाणा कोर्ट में चार्जशीट दाखिल होने के बाद कोर्ट में 16 लोगों की गवाही दर्ज की गई तथा सरकार पक्ष की तरफ से जिला सरकारी अभियोक्ता एड.वसंत भटकर ने प्रभावी रूप से अपनी बात कोर्ट के सामने पेश करते हुए आरोपी को अधिक सज़ा देने की मांग कोर्ट से की.इस मामले में आज 11 दिसेंबर को प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश
श्री.महेंद्र के.महाजन ने अंतिम निर्णय सुनाते हुए आरोपी को पोक्सो कानून की धारा 9,10 के लिए दोषी मानते हुए 5 साल की सज़ा व 10 हज़ार का जुर्माना तथा ज्वेनाइल जस्टिस एक्ट की धारा 75 के तहत 5 साल की सज़ा व 50 हज़ार का जुर्माना सुनाया है.दोनों सज़ा एकसाथ चलेगी जबकि जुर्माने का भुगतान ना करने पर 1 साल सज़ा आरोपी को भुगतना पडेगी. जुर्माने की रकम में से 25 हज़ार की राशि पीड़ित बालक को देने का फरमान भी दिया गया है.इस मामले की जांच बुलढाणा शहर थाने के पीएसआई मनोज सुरवाडे व व्यंकटराव कवास ने की जबकि कोर्ट में पुलिस कर्मी किशोर कांबले का सहकार्य मिला.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-ऐनतपूर येथे सायंकाळी बिबट्याचा हल्लाबोल
श्रीरामपूर-तालुक्यातील ऐनतपूर बेलापूर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून तारेच्या संरक्षक कुंपणावरून आत प्रवेश करून बिबट्या शेळ्या ओढून नेत असल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी दहशत घेतली आहे.
              मंगळवारी रात्री ऐनतपूर येथील भाऊसाहेब कुताळ यांचे वस्तीवर सायंकाळी आठ वाजताच हल्ला चढवला. घरातील सर्वजण टीव्ही पाहत असतांना आठच्या सुमारास बिबट्याने तारेच्या सरंक्षक कुंपणावरून आत गोठयात प्रवेश केला. छोटा बोकडाचे कंबर पकडून परत उडी मारून बाहेर पळ काढला. यावेळी शेळ्या जोरजोरात ओरडल्याने वस्तीवरील सर्वजण बाहेर पळत आले.यावेळी विजेरी लावून पाहिले असता बिबट्याच्या तोंडात बोकड दिसला.वस्तीवरील तरुणांनी धाडस दाखवीत बिबट्याचा पाठलाग केला. यावेळी बिबट्याने तोंडातील बोकड टाकून पळ काढला.बोकड वाचवण्यात यश आले असले तरी त्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेसह यापूर्वी ही बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या उसतोडी सुरु झाल्याने ऊसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागल्याने बिबटया आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहे.

नेवासा  : तालुक्यातील जळके शिवारात ७ डिसेंबर रोजी आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे. या महिलेचा औरंगाबाद हद्दीत खून झाल्याचे समोर आले असून, नेवासा पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना मंगळवारी अटक केली. अटक आरोपींकडून आणखी एका खुनाचा उलगडा झाला असून पे्रमसंबंधात अडथळा होत असल्याने दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगल सोमनाथ दुसिंग (रा़ तांदुळवाडी ता़ गंगापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील जळके शिवारात कॅनॉलजवळ राजेंद्र जानकू सोनकांबळे यांच्या शेतालगत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मयत महिलेचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात सदर महिलेचा मृत्यू तोंड व गळा दाबल्यामुळे झाल्याचे समोर आल्याने खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. श्रीरामपूर सायबर सेल यांच्या मदतीने गुन्ह्याचा तांत्रिक  तपास केला. तेव्हा अमीन रज्जाक पठाण (वय ३५ रा. मज्जिदजवळ, बोलठाण तालुका गंगापूर जि. औरंगाबाद) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या गुन्ह्याचे रहस्य उलगडले़ अमीन याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या इतर साथीदारांचीही नावे सांगितली़. यामध्ये रतन छबुराव थोरात (वय २८ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर) सोनाली सुखदेव थोरात (वय २२ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर हल्ली रा.गिडेगाव ता.नेवासा) राहुल भाऊ उघाडे (वय ५० रा.गिडेगाव ता.नेवासा) यांनी मिळून हा खून केला. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, राहुल यादव, बबन तमनर, अशोक कुदाळे, भागवत शिंदे, अंकुश पोटे, केवल रजपुत, संदीप म्हस्के, कल्पना गावडे, मनिषा धाने, जयश्री काळे, चंद्रावती शिंदे यांनी आरोपींना अटक केली. ब्लॅकमेल केल्याने मारले मंगल हिला आरोपी अमीन रज्जाक पठाण याचे सोनाली थोरात हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब सोनाली हिचा पती सुखदेव थोरात याला समजली होती़. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अमीन पठाण, रतन थोरात व सोनाली थोरात यांनी सुखदेव थोरात याचा खून केला. सुखदेव याला मारल्याची बाब मंगल सोमनाथ दुसिंग हिला समजली होती. ती अमीन पठाण यास ब्लॅकमेल करून पैसे मागत असे. तिच्यासारख्या पैशाच्या मागणीला कंटाळून अखेर मंगल हिलाही सर्व आरोपींनी मिळून जोगेश्वरी- वाळुंज रस्त्यावर नेऊन तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह जळके शिवारात आणून टाकला. 

बेलापूर( प्रतिनिधी )- जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी चे नऊ लाख रुपये खर्चाचे  काम जिल्हा नियोजन समितीतून एक वर्षापूर्वी मंजूर केले परंतु ग्रामपंचायतच्या आडमुठे धोरणामुळे ते काम रखडले त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून तो निधी माझ्या गटातीलदुसर्या ग्रामपंचायतीला दिला असल्याचा खुलासा जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केला आहे                         याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की एक वर्षापूर्वी हे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केले होते व हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता वेळोवेळी पाठपुरावा करून ते काम करण्यास विनंती केली परंतु पदाधिकाऱ्यांनी व स्वयंघोषित पुढाऱ्याने या कामाची ई निवीदा न करता त्याचे  तीन तुकडे करून हे पैसे खर्च करण्याचा प्रयत्न  केला   त्यास मी विरोध केला व मी सुचवलेले काम न घेता दुसरे काम घेतले  हा निधी मंजूर करण्यास तुमचा काहीही संबंध नाही असे ग्रामसभेत सांगितले जिल्हा परिषदेचे एकही काम गावात होऊ देणार नाही असा चंग या गाव पुढाऱ्यांनी बांधला त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून माझ्या गटात असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग केला तसेच झेंडा चौक मेन रोड या रस्त्याकरीता  जिल्हा परिषदेतून सात लाख रुपये मंजूर केले होते परंतु हा रस्ता होऊ नये म्हणून संबंधित पुढाऱ्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली व हा रस्ता ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय करण्यात येऊ नये असे लेखी कळविले या रस्त्याबाबत काम होऊ नये म्हणून  मंजूर असलेली व्यायाम शाळा रद्द करून तो निधी रस्त्याकडे वळविला तसेच ग्रामसभेचा खोटा ठराव घेतला त्यामुळे मी रस्त्याचे मंजूर केलेले  कामही  रखडले बेलापूर गावात पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी आलेला असून त्यात एकही भरीव काम केले नाही 30 लाख रुपयांची लाईट बसवलेले आहे ते ही निकृष्ट दर्जाचे होते सर्व कामे तुकडे करून ई टेंडर न करता करण्याचा पदाधिकारी यांनी घाट घातलेला आहे व या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे   तक्रार केल्यामुळे त्यांची चौकशी सुरू झाली आणि या चौकशीमुळे बिथरलेल्या पदाधिकाऱ्यांनी मला बदनाम करण्यासाठी निखालस खोटे वृत्त दिले असल्याचा खुलासाही जिल्हा परिषद सदस्य यांनी केला असुन या पुढील काळात मी सुचविलेले काम करण्यास तयार असेल तर पुन्हा निधी देण्यास बांधील असल्याचेही नवले यांनी सांगितले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-उपचारा दरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून पेशंटच्या मृत्यूस जबाबदार धरून याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर पैसे न दिल्यास जिवे ठार व अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. संजय शंकर अनारसे (व्यवसाय, डॉक्टर, रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुरनं. 874/2019 आयपीसी 384, 385, 389 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उर्मिला रमेश गायकवाड या महिलेस दि. 21 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी डॉ. अनारसे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या पोटात गोळा असल्याने त्यांच्यावर 24 ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात तिची तब्येत बिघडल्याने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र तेथेही सुधारणा न झाल्याने या महिलेस नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे फरक न पडल्याने परत श्रीरामपुरात आणले. दि. 27 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेंशटचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आपल्या हॉस्पिटलची बदनामी न होण्यासाठी वरील तिनही आरोपींनी डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर जिवे ठार मारुन तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्यामुळे याबाबत डॉ. अनारसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केल्याने वरील तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय उजे करत आहेत.

बुलडाणा- 10 डिसेंबर (कासिम शेख)
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मागील 1 डिसेंबर पासून C1 नावाचा पट्टेदार वाघ आलेला असून तो सद्या याच जंगलात आहे.या वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्य करावे अशे चर्चा आज बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अशी भावना आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्हा व्यघ्र समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या मध्य भागी बुलडाणा, चिखली,मोताळा व खामगांव या चार तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य आहे जिथे बिबट,अस्वल लांडगे सारखे हिंस्र प्राण्या सह इतर अनेक जातीचे पशु पक्षी राहतात.अनेक वेळी इतर व्यघ्र प्रकालपातील वाघ इथे येऊन गेल्याचे बोलले जात आहे.मागील 1 डिसेंबरच्या रात्री या अभ्यारण्यात C1 नावाचा वाघ दाखल झाला.रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभ्यारण्यातुन निघुन तब्बल 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभ्यारण्यात आलेला आहे.वाइल्ड लाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया,देहरादूनचे अभ्यासक श्री.हुसैन सदर वाघाचा सतत पाठलाग करुण त्याच्यावर अभ्यास करत आहे.
C1 वाघाच्या या जंगलात प्रवेश केल्याने अकोला वन्यजीव विभाग सतर्क झालेला असून आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे.प्रत्येक जिल्ह्यात व्यघ्र समिति कागदोपत्री असून C1 वाघाच्या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यातील समिती ही चर्चेत आली आहे. जिल्हा एसपी या समितीचे अध्यक्ष असून आज आयोजित बैठकीवर सर्वांची नजर होती.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालयात आयोजित या समितीच्या बैठकीत बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे दोन एसीएफ रणजीत गायकवाड व संदीप गवारे,अकोट वन्यजीव विभागाचे एसीएफ लक्षण अवारे,  ज्ञानगंगा अभयारण्यचे दोन्ही आरएफओ डांगे व मयूर सुरवसे,बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख हजर होते.या वेळी ज्ञानगंगा अभयरण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगांव या मार्गावर अनेक ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावे, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वन्यजीवांच्या रक्षणासाठी सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद असते तरी काही
अधिकारी,राजकीय पुढारी व इतर काही लोक चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून बंद असलेला गेट उघडायला लावतात आता अत्यावश्यक सेवा वगळून कोणाच्याही वाहणाला रात्रीच्या वेळी अभयरण्यातून जाऊ द्यायचे नाही अशे ठरले व जे कोणीही गेट उघडन्यास भाग पड़त असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करावे तसेच C1 वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाला संयुक्तरित्य करायचे आहे अशी आपली जबाबदारी व्यक्त केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget