Latest Post

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव, शेरी चिखलठाण परिसरात काल ढगफुटीसारखा प्रकार घडला. सुमारे साडेचार तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने तुडूंब भरलेले बंधारेही फुटले तर अनेक शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना त्यात आता ढगफुटीसारखे प्रकार घडत असल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.म्हैसगाव परिसरात ढगफुटी होऊन झालेल्या पावसामुळे केदारेश्वर मंदिराजवळील म्हैस ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला. शेरी येथील तलाव फुटण्याची शक्यता असल्याने तलावाच्या सांडव्याचा भाग मोठा करुन तलावातील पाणी कमी करण्यास स्थानिक तरुणांना सांगितले. एकूणच पावसामुळे या भागात सर्वत्र पाणी भरलेले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरातील 5 ते 6 जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेले बंधारेही फुटले तर रस्त्यावरुन सुमारे 30 फुट पाणी वाहत होते.सोमवारी पहाटे 4 पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हैसगाव परिसराला अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी 11.30 वाजता केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) ओढ्याच्या पुलावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, बुळे पठार भागातील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी या भागात गेलेले तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, मंडलाधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक असे सर्वच अधिकारी सकाळपासून पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते.

प्रतिनिधी) शिर्डीनजीकच असलेल्या निमगाव हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविणारा व त्याच्या साथीदारांसह सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना शिर्डी शहराजवळच सदर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पो. हे. कॉ. इरफान शेख, बाबासाहेब काकड, संदीप गडाख, बाबासाहेब सातपुते, विशाल मेद, ज्ञानेश्वर सुपेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शालिनी सोळसे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात या सर्व कर्मचारी अधिकारी या पथकाने निघोज निमगाव हद्दीत रात्री 12 च्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.बनावट गिर्‍हाईक बनून आपल्या कर्मचार्‍याला पाठवून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले. निघोज निमगाव हद्दीतील हॉटेल साईधनचा मॅनेजर विष्णू अर्जुन ठोंबरे, रा. वैजापूर यांच्यासह गणेश सीताराम कानडे, सुनील शिवाजी दुशिंग, सचिन रामभाऊ शेळके, अक्षय भाऊसाहेब बगळे, गोपीनाथ रावसाहेब हिंगे, हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिला, मुलींना पैशाचे प्रलोभन देऊन वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून ग्राहकांना मुली पुरवून सदरचा कुंटणखाना चालवताना आढळून आले. या सर्व आरोपी विरोधात स्रियांचा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 भादंवि कलम 366 अ बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 26 अन्वये शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी घरगुती, लॉजिंग वर सुद्धा यांची करडी नजर असून लवकरच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. काळाराम मंदिर परिसर, जिजामाता चौक परिसरात कचर्‍याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व नागरिकांची देखील आहे. पण श्रीरामपूर शहरात दोघेही आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण परसले आहे. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे या कचर्‍याच्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याठिकाणी डासांचे प्रमाण वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. तसेच प्लॅस्टिकमुळे ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी साचून त्याचे रुपांतर दुर्गंधीत झाले आहे. उघड्यावर कचरा पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान’ यामध्ये सहभाग घेतला आहे. याबाबत केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. तरी देखील शहर स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचा ठेका नगरपालिकेने दिलेला आहे. याआगोदर दररोज कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत होती. परंतु काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांमधून एकदा घंटागाडी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. काही नागरिक घरातच कचर्‍याची साठवणूक करुन ठेवतात. तर अनेक नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकून देतात. तो कचरा तसाच राहिल्याने दुर्गंधी सुटते. एकंदरीतच शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.पालिकेने कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प राबवावा.

बुलडाणा- 4 नोव्हेबर
नकली सामान विकण्याचा प्रमाण वाढलेला असून नकली बीडी सुद्धा विकल्या जात आहे व सरकारी टैक्स भरून व्यवसाय करणाऱ्या बीडी उद्योगला फटका बसत असून कामगारावर ही याचा परिणाम दिसून येत आहे.अशाच प्रकारे बुलडाणा जिल्ह्यात नकली ऊंट बीडी विकणारे 4 लोकांवर गुन्हा दाखल करुण त्यांना अटक करण्यात आले आहे.यात मुख्य सूत्रधार देऊळगांव महि येथील आहे.
      पोलिस कडून मिळालेली माहिती प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात ऊंट बीडीचे नकली लेबल, सील पट्टी, क्राफ्ट तैयार करून विक्री होत असल्याची माहिती फिर्यादी भास्कर पंडित सेल्स एग्जीक्यूटिव रा. नाशिक यानी दिल्या नंतर त्यांनी संशयित केलेले ठिकाणे दुसरबीड गावातील मदन शिवाजी बुधवत समृद्धि किराणा दुकान व ग्राम शेंदुर्जन येथील सागर अरविंद शिंगणे नामक इसमास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली त्यांनी माहिती दिली की सदर ऊंट बीडीचे माल देऊळगांव मही येथील वैष्णवी किराना चे मालक ज्ञानेश्वर चेके व रविंद्र अंबादास टाले यांच्या कडून खरेदी केल्याचे सांगितले.या प्रकरणी पोलीस स्टेशन किनगांव राजा येथे आरोपी मदन शिवाजी बुधवत रा.दुसरबीड याच्या विरोधात तर पोलीस स्टेशन साखरखेरडा येथे आरोपी सागर अरविंद शिंगणे रा.शेंदुर्जन,ज्ञानेश्वर नारायण चेके रा.देऊळगांव मही व रविंद्र अंबादास टाले रा.खैरव यांच्या विरुद्ध भादवी कलम 420,सहकलम 102,103,104 व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 63 व इतर कलमान्वय गुन्हा दाखल कण्यात आलेला आहे.यात तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.तर हे नकली बीडीचे माल कुठे व कोणी तैयार करते?याचे मुख्यसूत्रधार कोण?हे पोलीस तपासात निष्पन्न होने गरजेचे आहे.
     सदर कार्यवाही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटिल भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली अपर पुलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे नेतृत्वात आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणाचे डीवायएसपी डी.बी. तड़वी, पोलीस स्टेशन साखरखेरडाचे ठानेदार संग्राम पाटील,पोलीस स्टेशन किनगांव राजाचे ठानेदार सोमनाथ पवार,पोउनि भाईदास माळी व दोन्ही ठाण्याचे स्टाफ यांनी संयुक्तरित्य केली आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडून न्यायनिवाडा होणार आहे. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून तीचेवर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीका टिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
     तरी नागरिकांनी खालील सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे.

जमाव करून थांबू नये.
-------------------------------
सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
---------------------------------
निकालानंतर गुलाल उधळू नये.
----------------------------------
 फटाके वाजवू नयेत.
-----------------------------------
 सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
------------------------------------
 महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
------------------------------------
 निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत.
------------------------------------
 घोषणाबाजी जल्लोष करू नये.
------------------------------------
 मिरवणुका रॅली काढू नये.
------------------------------------
 भाषण बाजी करू नये.
------------------------------------
 कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
------------------------------------
 कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये..
------------------------------------
       सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल.
     तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम
कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
------------------------------------
कलम 295 (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा  करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
------------------------------------
⭕ कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.
   🙏 तरी सर्व नागरिकांना *शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे
💯%आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष आहे

            श्रीहरी बहिरट
          पोलीस निरीक्षक
     श्रीरामपूर शहर पो.ठाणे

अहमदनगर (प्रतिनिधी) मोटारसायकली चोरी करून त्या विक्री करणारा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून चोरीच्या बुलेटसह सहा गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सुरज शिवाजी शिंदे (रा. बुरूडगाव रोड, आयटीआय कॉलेजजवळ) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुनील गुगळे यांची बुलेट 15 ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती. ही बुलेट शिंदे याने चोरली असून ती विक्रीसाठी तो नवनागापूरच्या सह्याद्री चौकात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलिसांचे पथक नियुक्त करून कारवाईचे आदेश दिले. शिंदे हा बुलेटसह येताना दिसताच पोलीस पथकाने त्याला अडविले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र नंतर त्याने चोरीची कबुली दिली. ही मोटारसायकल जप्त करत आणखी विचारपूस करता त्याने चोरीच्या मोटारसायकली पोलिसांना दाखविल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोदाम टिळक रोडला गेल्या सहा-सात महिन्यापासून शिंदे हा नगर शहरात मोटारसायकली चोरी करत होता. चोरीच्या मोटारसायकलला गिर्‍हाईक न मिळाल्याने त्याने त्या टिळक रोडला भाडोत्री खोलीत राहत असलेल्या आईच्या खोलीशेजारीला मोकळ्या जागेत बारदाण्याखाली झाकून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-  एका शेतकऱ्यांने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकार्या समोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगार्यास आग लावल्याची घटना बेलापूर खूर्द येथे घडली आहे                बेलापूर खुर्द येथील  आशा रामराव महाडिक व रामराव नारायण महाडीक यांच्या एक  एकर  शेतात सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते नुकत्याच झालेल्या पावसाने काढणीस  आलेले सोयाबीन पूर्णता भिजून गेले अनेक ठिकाणी तयार सोयाबीन ला मोड फुटले शासनाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासनाच्या आदेशानुसार बेलापूर खुर्द येथील  ग्रामसेवक सी डी  तुंबारे भाऊसाहेब कृषि अधिकारी तनपुरे   तसेच कोतवाल सुनील बाराहते पोलीस पाटील नर्सरी उमेश बाराहते व बेलापूर खुर्द चे पोलीस पाटील युवराज जोशी हे सर्वजण महाडिक यांच्या शेतात पंचनामा करण्याकरता गेले होते तयार झालेल्या सोयाबीनला पुर्णपणे कोंब फुटले होते  सोयाबीनची अवस्था पाहून संबंधित शेतकऱ्याचा राग अनावर झाला पंचनामा फोटो सातबारा विमा  पावती आदि कागदपत्राची पूर्तता  केल्यानंतरही शासन मदत तरी किती देणार त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने संबधीत अधिकार्या समक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली हे पाहून पंचनामे झालेले अधिकारीही ही गोंधळून गेले या बाबत कामगार तलाठी विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कृषि अधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या समक्ष पंचनामा करुन कागदपत्र  माझ्याकडे  जमा झालेली आहे सदर शेतकऱ्याने तयार झालेली सोयाबीन पावसाने भिजल्यामुळे त्यास मोड फुटलेले होते असे शिंदे यांनी सांगितले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget