Latest Post


सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हजारो हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व लहान- मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहिल्या. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री झालेल्या या पावसाने मागील विक्रम मोडीत काढले. तालुक्यात रात्री सरासरी 78 मि. मी. पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील काही गावांमध्ये जुन्या घरांची पडझड झाली असून दोन वर्षांपासून कोरडा असलेला निल्लोड प्रकल्प तुडुंब भरला आहे. सिल्लोड शहरातील काही भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. या पावसात धामणी- पिरोळा येथील मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. रात्री झालेल्या या मुसळधार  पावसामुळे नागरिकांनी रात्र अक्षरशः  जागून काढावी लागली.

         तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून  शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी आदी पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली. तालुक्यात रात्री सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक 100 मि. मी. पाऊस निल्लोड मंडळामध्ये झाला. त्याखालोखाल भराडी 95, बोरगाव बाजार 84, अजिंठा 72, अंभई 69, गोळेगाव 68, आमठाणा 68, तर सिल्लोड मंडळात 67 मि. मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने काही माती बांधांना फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळीच दखल घेत सांडव्याची रुंदी वाढवल्याने संभाव्य धोका टळला.

       गेल्या पंधरादिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या ऐन सोंगनीच्या हंगामातच पावसाने लावून धरल्याने मकाच्या कणसांना कोंब फुटली आहे, तर कपाशीच्या परिपक्व कैऱ्या कुजत आहेत. गेल्या पंधरादिवसात तालुक्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अनेक रस्त्यांवरील वाहतुक ठप्प
रात्री झालेल्या या पावसामुळे अजिंठा- बुलढाणा मार्गावरील रायघोळ नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होती. शिवाय अंभई- उंडणगाव, उपळी- भराडी, केळगाव- आमठाणा, म्हसला- भराडी या रस्त्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्याने काही तास वाहतूक ठप्प होती. सिल्लोड- औरंगाबाद महामार्गावरील बनकिन्होळाजवळील पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी निल्लोड, सताळ पिंप्रीकडून वळवण्यात आली होती.


25 मेंढया दगावल्या


   रात्री झालेल्या या मुसळधार पावसात धामणी- पिरोळा येथील अशोक गोरे, शिवाजी गोरे, सखाराम गोरे या मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. एकीकडे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले, तर दुसरीकडे मेंढया दगावल्याने या मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दगावलेल्या मेंढयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मेंढपाळांनी केली आहे. दरम्यान पशुधन अधिकारी, तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला.

धानोरा येथे नागरिकांचे स्थलांतर

 
धानोरा येथील माती बांध तुडुंब भरुन सांडव्यातून पाणी निघाल्याने नदीला पूर आला. यामुळे शेतवस्त्यांवरील घरांना पाणी लागले होते. शिवाय माती बांध फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत शेतवस्त्यांवरील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले होते.

आता ओला दुष्काळ

      सलग दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला होता. यंदा पावसाच्या मेहेरबानीमुळे पिके जोमात आली होती. परंतु ऐन सोंगनीच्या हंगामात परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. यामुळे दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे, तर यंदा ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.2, परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत, शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल अशी ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

परतीच्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना ना. शिंदे बोलत होते.

या दरम्यान शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, उदयसिंग राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड देवयानी डोंनगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना अटी व शर्ती बाजूला ठेवून पीक विमा काढलेल्या व विमा न काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची तसेच रब्बी पिकासाठी बियाणे व खते मोफत देण्यात यावे, जनावरांना आता दावणीवर चारा उपलब्ध करण्याची मागणी केली.

यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहेत. विमा कंपनी यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फार किचकट अटी न लावता नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जितके नुकसान तितके भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत तसेच जनावरांना चारा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.

सिल्लोड : (जि.औरंगाबाद) : तालूक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तालूक्यातील सर्व नदी, नाले तुडुंब भरून वहात आहेत. तालुक्यातील शेतशिवार पाण्याखाली गेली आहेत. महसूल विभागांची पथके तालुक्यात रवाना झाली आहेत. धानोरा (ता.सिल्लोड) येथील पाझर तलावाने धोक्याची पातळी घाठली असून, तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तलाव पायथ्याच्या परिसरातील कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांनी आवश्यक साहित्य घेऊन सुरक्षित ठिकान गाठले आहे. तालुक्यात उडालेल्या पावसाच्या हाहाकाराने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून, घरांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

बुलढाणा - 2 नवंबर
बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम देवलघाट के 3 युवक आज दोपहर 3 बजे के समय पैनगंगा नदी में डूब गए थे जिन्हें कुछ युवकों ने बचा लिया है जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है.फिलहाल तीनों युवकों पर बुलढाणा के अस्पताल में उपचार जारी है. 
      प्राप्त जानकारी के अनुसार बुलढाणा से सटे ग्राम देवलघाट के कुछ युवक गांव के पास पैनगंगा नदी पर बने कट्टे पर नहाने के लिए आज 2 नवंबर को दोपहर 3 बजे के करीब गए थे. सबसे पहले फुरकान अहमद अब्दुल वाहब उर्फ बब्बू(28) ने पानी में छलांग लगाई जो भंवर में फंस गया था जिसे बचाने के लिए जुनैद हफीज़ देशख(27) और शेख जाकिर शेख यूनुस (27) ने छलांग लगाई किंतु यह दोनों भी तेज बहाव की चपेट में आ गए जिन्हें किसी तरह वहां मौजूद अन्य युवकों ने बचा लिया और उन्हें बाहर रोड पर ले आए तथा गंभीर हालत वाले दो युवक बब्बू और ज़ाकिर को तत्काल शेख जफर के वाहन से बुलढाणा उपचार के लिए ले जाया गया.जबकि इसी बीच बुलढाणा के पूर्व विधायक हर्षवर्धन सपकाल पाडली की दिशा में जा रहे थे जिन्हें देवलघाट के पास भीड़ दिखाई दी उन्हें जब पता चला तो उन्होंने फौरन अपने वाहन को पलटाया और जुनैद देशमुख को अपने वाहन में डालकर फौरन बुलढाणा के सरकारी अस्पताल में एडमिट कराया.बब्बू और ज़ाकिर पर बुलढाणा के मेहेतरे हॉस्पिटल में उपचार जारी है जबकि जुनैद देशमुख पर सरकारी अस्पताल में उपचार जारी.नायब तहसीलदार पवार, देवलघाट के मंडल अधिकारी राऊत व पटवारी कोलसे अस्पताल पहोंचे थे.

औरंगाबाद : शहरातील सेव्हन हिल विद्यानगर परिसरात बनावट नोटा विक्री करणार्‍या दोघांना सापळा लावून पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. तर या टोळीतील एकाला आझाद चौक, सिडको येथून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मदतीने अटक करण्यात आली.  शेख समरान रशिद (२४,रा. नेहरुनगर) सैय्यद सैफ सय्यद असफ(२४,रा. नेहरु नगर  ) आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मदयार (२२.रा. रांजणगाव शेणपुंजी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शहरात  बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग सुरु आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान एपीआय घनश्याम सोनवणे यांना विद्यानगर परिसरात बनावट नोटाचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यांनी  या भागात सापळा लावला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास सय्यद सैफ हा दुचाकीवर विद्यानगरात आला. त्याठिकाणी सय्यद सलीमला १०० रु. दराच्या बनावट नोटा देतांना सोनवणे यांनी दोघांना ताब्यात घेतले. सैफ ने जप्त केलेल्या नोटा आझाद चौकातील शे.समरान रशीदकडून घेतल्याचे सांगितले. यानंतर रशीद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट नोटांचे संबंध मालेगाव, नाशिक, बदनापूरपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बोगस १२ हजार ४०० रुपये, प्रिंटर, कागद असा एकूण ८६ हजार ८०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांचे एक पथक त्याच्या अटकेसाठी नाशिककडे रवाना झाले आहे.

राहुरी(वार्ताहर)- मुळा धरणातून वांबोरी चारीद्वारे पाथर्डी तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज मिरी येथे पोहोचणार असून वांबोरी चारीला पाणी सुरू असेपर्यंत वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, कुठेही लिकेज होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना दिल्या आहेत. या भागातील सर्व तलाव, बंधारे भरल्याशिवाय पाणी बंद करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सकाळी मुळा धरणातून वांबोरी चारीला माजी खासदार प्रसाद तनपुरे, जेऊरचे जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता सायली पाटील, शाखाअभियंता पी. पी. तनपुरे, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे, वांबोरी चारी विद्युत विभागाचे उपअभियंता दिलीप ढिकले, शाखाअभियंता भरत पाटोळे उपस्थित होते.माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी चारीच्या वीज बिलाची माहिती घेऊन वीज बिल भरण्यासाठी शासन 80 टक्के रक्कम देत असून उर्वरित रक्कम ही शेतकर्‍यांनी भरायची असून लाभधारक शेतकर्‍यांनी आपली बाकी त्वरित भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले.कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी तनपुरे यांच्या सूचनांचे पालन करून दखल घेतली जाईल, असे सांगितले. वांबोरी चारीचे आजअखेर 1 कोटी रुपये वीजबिल थकीत असून त्यापैकी 40 लाख रुपये भरण्यात आल्याचे सांगितले.जर 3 पंप 24 तास सुरू राहिले तर महिन्याला 20 लाख रुपये वीजबिल येत असल्याचे सांगितले.धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यातून प्रथम मिरी, मजले चिंचोली, शिराळ, या भागातील तलाव भरण्यात येऊन मग इतर भागात पाणी सोडण्यात येईल. यावेळी केशर पतसंस्थेचे अध्यक्ष सागर तनपुरे, सलीम शेख, साजीद शेख, आर. के. पवार, पी. आर. बाचकर, भाऊसाहेब गुलदगड, राजू गरड उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे हे पक्षाच्या बैठकीसाठी मुंबई येथे गेल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते.

शासनाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदांराचे उत्पन्न वाढावे या साठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असुन या सर्व उपक्रमा ऐवजी दुकानदारांना  मार्जिन  वाढवुन द्यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे या बाबत दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी पुढे म्हटले आहे की शासनाने स्वस्त धान्य पारदर्शकता आणण्याकरीता पाँज मशिन आणल्या त्यामुळे धान्य दुकानाचा कारभार पारदर्शी झाला दुकानदार सघंटनानी वेळोवेळी शासनाकडे कमीशन मार्जिन  वाढवुन मिळणे बाबत मागणी केलेली होती परंतु शासनाने त्या कडे डोळेझाक करत दुकानदारांना  एस बँकेच्या माध्यमातून बँकींग व्यवहार करण्याची परवानगी दिली त्यास संघटनेने विरोध केला नंतर बि बियाणे परवाना दिला त्या नंतर भाजीपाला दुध अंडी विकण्याची परवानगी दिली आता स्टेशनरी विकण्याची मुभा दिली दुकानदार संघटनेच्या प्रमुख मागणीला बगल देवुन हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहे संघटनैची एकच मागणी आहे कमीशन ,मार्जिन वाढवुन मिळावी .शासनाने केरोसीन बंद करुन अनेक विक्रेत्यांचा रोजगार हिसकावुन घेतला आहे त्यांना कुठलाच पर्याय न देता त्यांचा व्यवसाय बंद केला आता रेशन व्यवसाय देखील  त्याच मार्गावर असुन राज्यात ५५ हजार रेशन दुकानदाराचे प्रपंच या व्यवसायावरअवलंबुन आहे याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्यासह कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे सचिव रज्जाक पठाण माणिक जाधव कैलास बोरावके गजानन खाडे गणपत भांगरे रावसाहेब भगत सुरेश उभेदळ विजय दिघे मुकुंद सोनटक्के विश्वासराव जाधव वहाडणे बाबा कराड मोहीते बाबासाहेब ढाकणे आदिंनी केली आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget