Latest Post

 बुलडाणा - 15 सप्टेंबर
रात्रीच्या दरम्यान शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे.
       विहिरित बिबट पडल्याची घटना आज रविवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान मोहना खुर्द ता. मेहकर येथे समोर आली.शंकरराव लाटे यांची मोहना खुर्द शिवारात शेती असून या शेतातील विहिरीत काल शनिवार रात्रीच्या दरम्यान एक ते दोन वर्षाचा बिबट्या पडला होता. आज सकाळी या विहिरीवर पाणी आणण्यासाठी तुषार ताकतोडे हा युवक गेला असता त्याला विहिरीत लोखंडी कडीला दोन पाय अडकून बिबट्या लटकलेला दिसून आला त्यामुळे त्याने घाबरून जात शेजारील शेतातील लोकांना याची माहिती सांगितली. त्यानंतर शेतमालक शंकरराव लाटे तसेच वनपाल एस. वाय.बोबडे यांना माहिती देण्यात आल्यानंतर उपवन संरक्षक बुलडाणा  संजय माळी, सहाय्यक वनसंरक्षक मेहकर संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पी.आर.तोंडीलायता,वनपाल एस. वाय. बोबडे, वनरक्षक के.बी. धनगर यांनी घटनास्थळी पोहोचत गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सदर बिबट्यास विहिरीतुन बाहेर काढताच त्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.बिबट्या विहिरीत पडलेला असल्याची माहिती पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

अहमदनगर : मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड अंडा गँगचा सदस्य भु-या उर्फ मुजीब अजीज खान (वय ३०) याच्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे़ भु-या खान याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हाणामारी, दंगा, आर्मअ‍ॅक्ट, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिसांनी एमपीडीएतंर्गत प्रस्ताव पाठविला होता़ एमपीडीएतंर्गत नुकतीच कारवाई झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याचा भु-या खान हा साथीदार आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहायक निरिक्षक प्रविण पाटील, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रविंद्र कर्डिले, किरण जाधव, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 


श्रीरामपूर:-समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्यावतीने श्रीरामपूर नगरपालिका यांना निवेदन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तसेच श्रीरामपुर शहरातील सर्व रहदारीचे रस्ते दुरुस्ती करणे या संदर्भात दिनांक 13.9.2019 रोजी निवेदन देण्यात आले यामध्ये श्रीरामपुर शहरातील अंतर्गत रस्त्याचे उदघाटन होतात परंतु त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येत नाही किंवा नवीन रस्ता तयार करण्यात येत नाही फक्त रस्त्याचे उदघाटन करून फोटोसेशन करून वृत्तपत्रात बातमी दिली जाते व सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते व त्यांच्या भावना दुखावल्या जातात अशा बे जबाबदार अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच श्रीरामपूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे मध्यंतरी मोकाट कुत्र्यांमुळे वार्ड नंबर 2 मधील व्यक्तींना कुत्रे चावले या चावलेल्या कुत्र्यांमुळे त्यांचे निधन झाले अशा मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने वेळीच बंदोबस्तसमाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्यावतीने श्रीरामपूर नगरपालिका यांना निवेदन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तसेच श्रीरामपुर शहरातील सर्व रहदारीचे रस्ते दुरुस्ती करणे या संदर्भात दिनांक 13.9.2019 रोजी निवेदन देण्यात आले यामध्ये श्रीरामपुर शहरातील अंतर्गत रस्त्याचे उदघाटन होतात परंतु त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येत नाही किंवा नवीन रस्ता तयार करण्यात येत नाही फक्त रस्त्याचे उदघाटन करून फोटोसेशन करून वृत्तपत्रात बातमी दिली जाते व सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते व त्यांच्या भावना दुखावल्या जातात अशा बे जबाबदार अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच श्रीरामपूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे मध्यंतरी मोकाट कुत्र्यांमुळे वार्ड नंबर 2 मधील व्यक्तींना कुत्रे चावले या चावलेल्या कुत्र्यांमुळे त्यांचे निधन झाले अशा मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने वेळीच बंदोबस्त करण्यात यावा हे मोकाट कुत्रे गाडी च्या पाठीमागे धावत असतात त्यामुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात इजा व अपघात होते झालेला असून वार्ड नंबर 2 मध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे कारण तिकडे लोकवस्तीत जास्त दाट असल्याने व परिसरात पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहतात यामुळे कुत्र्यांना रान मोकळे झाले आहे तसेच कित्येक घटना कुत्र्याने चावा घेतल्याची घडले आहेत तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा बंदोबस्त तसेच शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम न झाल्यास आम्ही नगरपालिकेच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नगरपालिकेने दखल घ्यावी या दरम्यान आंदोलन नगरपालिकेच्याआवारात कुत्रे सोडणे ,त्याच प्रमाणे आंदोलन करण्यात येईल याची संबंधितांनी दहा दिवसाच्या आत दखल घ्यावी अन्यथा आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही संबंधित अधिकारी व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी असे समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले. 

सिल्लोड, : डेंग्यु सदृश आजराने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. डेंग्यु सदृश आजराची लागन झालेल्या महिलांवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरु असतांना एका महिलेचा शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास, तर दुसऱ्या महिलेचा रात्री 8 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

      दैवशाला साेमिनाथ शेळके (22), कडूबाई शेषराव मानकर (50) दोघे रा. वडाळा असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

    या बाबत अधिक माहिती अशी की, वडाळा गावात  डेंग्यु सदृश तपाची लागन झाल्याने अनेक रुग्ण तापाने फणफणत होते. ही माहिती आमठाणा आरोग्य केंद्राला दिल्याने तेथील आरोग्य पथकाने सहा- सात दिवसांपूर्वी गावात येऊन रुग्णांवर उपचार केले व दोन- तीन दिवसांनी परत येऊ म्हणून गेले. यानंतर तापाची लागन वाढतच गेली व आरोग्य पथक ही फिरकले नाही. यामुळे लागन झालेल्या वरील दोन महिलांना तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात रुख्मणबाई या महिलेचा शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तर कडूबाई या महिलेचा रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचार दरम्यान मृत्यू झाला.
 याच गावातील साक्षी साईनाथ शेळके (19), किरण सुधाकर शेळके (6) या दोन मुलांना ही या आजाराची लागन झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते.
  गावात तापाची लागन झाल्याची माहिती देऊन ही आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतले नाही. एकदा उपचार करुण गेलेले पथक त्यानंतर फिरकलेच नाही. यामुळे लागन वाढत गेली. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर कदाचित महिला दगावल्या नसत्या.-
शिवाजी शेळके, उपसरपंच, वडाळा

आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात जाऊन रुग्णांवर उपचार केले. गावा शेजारी गाजर गवत तसेच गटार तुंबल्याचे पथकास निदर्शनास आले होते. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला परिसर स्वच्छ करण्याचे लेखी पत्र ही दिले होते. रविवारी सकाळीच गावात रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक जाणार आहे 
डॉ. योगेश राठोड वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र आमठाणा.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.14, दीनदयाळ अंत्योदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिल्लोड नगर परिषद अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना प्रति गट 10 हजार या प्रमाणे फिरता निधी चे वाटप माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते  करण्यात आले.
   
      यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती तथा नगरपरिषदेचे गटनेता नंदकिशोर सहारे, संचालक दामुअण्णा गव्हाणे, शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे , मुख्याधिकारी सय्यद रफिक, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

      सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने महिला बचत गटाच्या माध्यमातून सबलीकरण व सक्षमीकरणा चे काम अविरतपणे सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक बचत आणि त्यातून होणारे फायदे तसेच यासाठी सरकार कडून मिळत असलेल्या सुविधांसाठी नगर परिषदेच्या वतीने महिलांमध्ये जनजागृती करण्यात येते.

दीनदयाळ अंत्योदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील  महिला बचत गटांना यापूर्वी 19 आणि शुक्रवार ( दि.13 ) रोजी 13 अशा एकूण 32 महिला बचत गटांना प्रति गट 10 हजार रुपये या प्रमाणे 3 लाख 20 हजार रुपयांचा फिरता निधी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे.

    कार्यक्रमास नगरसेवक शकुंताबाई बन्सोड, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, विठ्ठल सपकाळ, शेख बाबर, सुनील दुधे,मतीन देशमुख, रातनकुमार डोभाळ, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, अनिस कुरेशी, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, आरेफ पठाण, जितू आरके, मोईन पठाण,  मनोज झंवर, अकील वसईकर ,सांडू मिर्झा, रईस मुजावर, शेख मोहसीन, शेख सलीम , उपमुख्याधिकारी अजहर पठाण, प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी, समुदाय संघटक हरीश पैठणे, सुनीता श्रीखंडे ( आरके ) यांच्यासह महिला बचत गटांचे पदाधिकारी , सदस्य व महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


रास्ट्रभाषा ,रास्ट्रवाद रास्ट्रगित हे स्वातन्त्र भारताचे तिन बिनबिंदु
भराडी प्रतिनिधि, भारत या रास्ट्रा रास्ट्रातिल नागरिकाना सर्वच बाबतित एक करण्याचे काम रास्ट्रभाषा म्हणुन हिंदी करते तर रास्ट्रभाषा, रास्ट्रवाद ,रास्ट्रध्वज हे तिन मानबिंदु असल्याने हिंदिला महत्वपूर्ण स्तान भारतात असल्याचे मनोगत आदर्श ,सेवानिवृत्त शिक्षक श्री.पी. डी. सुरडकर यांनी हिंदी दिनानिमित्त येथिल ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात केले.
श्री. सुरडकर यांनी  'तू है हिंदी मेरी तू है मेरी जान है!
सारे जग मे तु भारत की पहचान है!
या कवितेच्या ओऴी तालासुरात गाऊन मुलाना उत्साहित केले.
पुढे बोलतानी श्री. सुरडकर म्हणाले की ,हिंदी साहित्याचा इतिहास खुप जुना असुन त्याला संत कबिर, तुलसिदास तर आधुनिक तत्वज्ञानी निरज यांचा संदर्भ येतो. यावेऴी त्यानी विविध हिंदी लेखक, कवी, साहित्यतज्ञानचा संदर्भ देत हिंदि विषयात रुची वाढेल याकरिता विद्यार्थी, शिक्षकानचे उदबोधन केले.
भारतीय संविधानाने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.म्हणून दरवर्षी आपण 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा करतो. हिंदी भाषा भारतात अनेकते मधून एकतेला प्रस्थपित करणारी मुख्य भाषा म्हणून ओळखली जाते.
हिंदी दिनानिमित्त 'हिंदीका व्यावहारिक जिवन मे महत्व ' या विषयावर आयोजित  निबंध स्पर्धेत प्राथमिक गटातून (इ.5 वी ते 7 वी) प्रथम येणारी अपर्णा पोपट वाघ  301,द्वितीय मदार सोहेल 201,तृतीय पठाण रेहान खान 101रु यांना रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच माध्यमिक गट (इ.8 वी ते10 वी) मधून प्रथम येणारी स्वाती आग्रे 301, द्वितीय भावेश काकडे 201, तसेच तृतीय आरती साळवे हिला 101रु देण्यात आले.
तसेच 'शालेयस्तरपर छात्रोको मिलनेवाले अंतर्गत गुण हानिकारक या लाभकारक' या विषयावर घेण्यात आलेल्या  वादविवाद स्पर्धामध्ये  प्राथमिक गटातून प्रथम येणाऱ्या गणेश मरमट याला बक्षीस म्हणून 301 रु, द्वितीय अपर्णा वाघ हिला 201,आणि तृतीय येणाऱ्या उमेश नेव्हारे याला 101 रु.दिले गेले.
तसेच माध्यमिक गटातून  प्रथम येणारी शिवानी शिंदे हिला 301, द्वितीय कावेरी गोंगे 201,आणि तृतीय निकिता पंडितला 101 रु. दिले गेले.
या स्पर्धेत नंदिनी शिंदे, नेतल सोनसिंग राठोड, मयुरी प्रकाश काकडे,दिनेश काकडे,दिव्या चिकणे, वैष्णवी जल्हाऱ, रोहिणी शिंदे,निकिता बारवाल,चंचल थोरात, निकिता राजपूत,सोनल महाजन,रोहित वाणी,ऋषिकेश मनगटे,दीपाली साळवे इ.विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे परीक्षण  सहशिक्षक श्री. सोनवणे ए.डी, सोनोने डी. एम. व श्रीमती टाकळकर ए. पी. यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. गव्हाणे व्हि. एच. यांनी आणि शेवटी आभार शाळेचे  मुख्याध्यापक श्री. जाधव आर.एस.  यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षकवृंद, शालेय वाहन चालक मालक, पालक हजर होते.

सिल्लोड (  प्रतिनिधी ) दि.13, गरिबांना आरोग्याच्या मोफत सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने आयुष्यमान भारत ही योजना आणली आहे. मोठ्या लोकांना आजार झाल्यास त्यांना सर्वकाही शक्य होते. मात्र गरिबांना जर मोठा आजार झाला तर त्यांच्याकडे उपचारासाठी पैसा नसतो. 2011 च्या आर्थिक निकषावर हा लाभ देण्यात येणार असून आयुष्यमान भारत चे कार्ड दाखविल्यास मोठ्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार होणार असल्याने आयुष्यमान भारत ही गरिबांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
  सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील लाभार्थ्यांना आयुष्यामान भारत योजनेच्या ई - कार्ड चे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्षा राजश्री निकम , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती तथा न.प. चे गतनेते नंदकिशोर सहारे, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुदर्शन अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पूढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, या योजनेच्या फॉर्म साठी सरकारने 50 रुपये नाममात्र शुल्क आकारले होते. यामध्ये सिल्लोड नगर परिषदेने 20 रुपये शुल्क भरणार असून लाभार्त्यांना केवळ 30 रुपये शुल्क भरायचे आहे.
  या योजनेसाठी सरकारने आपला विमा भरला असल्याने लाभार्त्यांना मोफत उपचार मिळणार आहे. एकूण 1250 उपचारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच लहान मुलांना जर कर्करोग झाला असेल तर त्याचा ही उपचार या योजनेत होईल आणि जर ज्येष्ठ नागरिकांचे गुढगे - पाय दुखत असेल तर गरज भासल्यास सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या योजनेत होणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ठ केले.

   नगर परिषदेच्या बाबतीत बोलत आतांना अब्दुल सत्तार म्हणाले की , शहरात विविध ठिकाणी गरिबांना घेरे बांधून देण्यासाठी नगर परिषदेने जागा आरक्षित केली आहे . प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बे घरांना आम्ही घरे देणार असल्याचे सांगितले. खडकपूर्णा  पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर असून लवकरच ही योजना कार्यान्वित होईल. ही योजना कार्यान्वित होताच शहरात भूमिगत गटारी आणि शहराच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र निर्मितीला चालना मिळणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ठ केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे उपसभापती तथा नगर परिषदेतील गटनेते नंदकिशोर सहारे यांनी केले. प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्र संचालन केले तर मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक नरसिंग चव्हाण , सतिष ताठे, दामुअन्न गव्हाणे, सुरेश आहेर, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रवी रासने, दशरथ बर्डे, श्रवण गिरी, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे, अजंठा सरपंच दुर्गाबाई पवार, पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा जगताप ,  स्वाती जवखेडे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, आसिफ देशमुख, धर्यशील तायडे, शांतीलाल बसय्ये, सरपंच रवि काळे, राम कटारिया, नगरसेवक शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, विठ्ठल सपकाळ, शेख बाबर, सुनील दुधे,मतीन देशमुख, रातनकुमार डोभाळ, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, अनिस कुरेशी, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, आरेफ पठाण, जितू आरके, मोईन पठाण,  मनोज झंवर, अकील वसईकर , शिवा गौर, सुभाष करवंदे, भास्कर आहेर,आदींसह महिला बचत गटाच्या पदाधिकारी, योजनेचे लाभार्थी व महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget