Latest Post


श्रीरामपुर शहरातील वार्ड नंबर 1 मिल्लात नगर याठिकाणी शाह अंजुमान मुस्लिम जमाअत खाना (शादी हॉल )मंगल कार्याचे नुकत्याच पायाभरणीचा कार्यक्रम झाला श्रीरामपुर शहरातील शाह अंजुमन मुस्लिम जमाअत खाना शादी हॉल मंगल कार्यालयाचे भूमिपूजन महाराष्ट्र शाह अंजुमान मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री हाजी रहमान शाह हाजी मासूम शाह मालेगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील शाह प्रमुख श्री रमजान हैदर शाह होते तसेच माहिती देताना प्रवक्ता श्री याकूब हाजी रुबाब शाह यांनी सांगितले की श्रीरामपूर शाह समाजाचे स्वप्न 1994 पासून स्वतःच्या जमाअत खाना व्हावा म्हणून समाज बांधवांकडून सन 2004 पासून वर्गणी गोळा करण्याचे काम हाती घेतले होते व समाज बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सन 2015 मध्ये मिल्लत नगर या ठिकाणी पाच गुंठे जागा या समाजाचे नावाने रक्कम रुपये चाळीस लाखाला खरेदी केले आता या जागेवर रुपये 80 लाखांची एक सुंदर भव्य इमारत लवकरात लवकर समाज बांधवांकडून पैसे गोळा करून बांधण्याचा संकल्प केला आहे
अध्यक्ष श्री याकूब भाई शाह यांनी रक्कम 75000, महाराष्ट्र अध्यक्ष रहमान शाह यांनी रक्कम 1 लाख अकरा हजार ,रौफ भाई शाह यांनी रक्कम रुपये 50000 ,इम्तियाज बबलू शाह यांनी रुपये 50000, आरिफ बुद्धा शाह यांनी रुपये 50000, तर मालेगाव चे नगरसेवक अनिस भाई शाह यांनी रुपये रक्कम 25000 माजी शिक्षण संचालक श्री रामचंद्र जाधव सर यांनी रुपये रक्कम 11000 व स्थानिक शाह समाजाचे वरचे नागरिकांनी जमाअत खाना व्हावा म्हणून देणगी देण्याचे कबूल केले आहे ही जागा सर्व शुभकार्यासाठी सर्व धर्मियांसाठी देण्यात येणार आह
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष हमीद नवाज शाह नगरसेवक हाजी मुक्तार शाह गफार दाऊद शाह हे होते तर कुराण खानी (आशीर्वाद )जामा मशिदीचे चे मौलाना हजरत हाजी इमदाद साहब शहर काजी अकबर अली शाह समाजाचे पदाधिकारी उपाध्‍यक्ष आमीन यासिन शाह सचिव जमील इब्राहिम शाह सहसचिव हाजी सलीम मेहबूब शाह खजिनदार फिरोज वजीर शाह सहखजिनदार हाजी जलील हाजी खलील शाह कार्याध्यक्ष राऊफ उस्मान शाह युनुस हारून शाह तसेच सल्लागार सर्वस्वी चांद इमाम शाह गफूर सांडू शाह जावेद (भोला भाई )शाह अन्वर हाजी रशीद शाह फिरोज हाजी रसूल शाह नसरुद्दीन अब्बास शाह तसेच शहरातील मान्यवर श्री अविनाश दादा, उपनगराध्यक्ष करण दादा सासाने श्री सचिन भाऊ गुजर नगरसेवक हाजी अंजुम भाई, कलीम भाई कुरेशी ,शाह छप्परबंद स.स.अध्यक्ष आरमान बुगा शाह शाह खासदार समाजाचे अध्यक्ष गफार कासम शाह शाह छप्परबंद उर्दू हायस्कूल चे चेअरमन फारुख कासम शाळा आणि महाराष्ट्रातील शहा जमातीचे सन्माननीय तसेच सुरत शहरातील शाह समाजाचे बांधव देखील या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी होणे कामी शहरातील ए बी ग्रुप, बाबर पुरा ग्रुप ,अल बदर ग्रुप ,आणि शहा समाजाच्या युवक कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार हाजी उमराली शाह यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाह समाजाचे अध्यक्ष श्री याकूब हाजी रुबाब शाह यांनी केले

औरंगाबाद:भारतीय जनता पक्षात प्रवेशाला झालेल्या विरोधाने दुखावलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आज थेट मातोश्रीवर दाखल झाले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. विधान परिषदेत शिवसेनेला मदत केल्यानंतर सत्तार यांची सेनेसोबत जवळीक वाढली होती. गेल्या आठवडाभरात ते पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अंबादास दानवे यांच्या संपर्कात होते. भाजप प्रवेशाचा हिरवा सिग्नल न मिळाल्याने सत्तार काल रात्रीच मुंबई ला रावण झाले. आज सकाळी मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधले.
सिल्लोड भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आ. अब्दुल सत्तार यांचा भारतीय जनता पार्टी तिल प्रवेश जवळपास अनिश्चित मानला जात होता. काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर सत्तार  भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सूक होते.  अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी प्रवेशाचा मार्गही सुकर केला होता. मात्र तालुक्‍यातील दिग्गज भाजप नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला. सुरेश बनकर, सुनील मिरकर यांच्यासह जवळपास ५० वर पदाधिकारी कार्यकर्ते थेट मुख्यमंत्र्यांना जाऊनही भेटले. त्यामुळे सत्तार यांचा प्रवेश लांबला. माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला हिरवा सिग्नल दिला नाही. गेल्याच आठवड्यात महाजनादेश यात्रेनिमित्त सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या यात्रेतही सत्तार यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे सत्तार यांच्या कार्यकर्त्यांसह कमालीचे अस्वस्थ झाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्यावा असा दबाव निर्माण झाल्यानेच सत्तार यांनी तातडीने सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे बोलले जाते.
टोकाचा विरोध...
 सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड तालुक्यातून टोकाचा विरोध होत होता. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याने भाजप वरिष्ठ सावध झाले.  गेली वीस वर्ष सत्तार भाजप विरोधात लढत आले आहेत. त्याची सलही अजून कार्यकर्त्यांच्या मनात ताजी आहे. परिणामी सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
दरम्यान अब्दुल सत्तार काल रात्रीच तातडीने मुंबईला रवाना झाले. मोजक्या कार्यकर्त्यांसह सत्तार आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

राहुरी प्रतिनिधी,
देवळाली प्रवरा येथे दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी सोपान वरखडे यांच्या वस्तीवरील कुञ्याची शिकार करुन शिकार घेवून जात असताना एक दिड वर्ष वय असलेला बिबट्या संजय साविञा वरखडे यांच्या शेतातील विहीरीत पडला. सोमवारी दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहीरीत पिंजरा सोडून बिबट्यास बाहेर काढले आणि डिग्रस येथील नर्सरीत त्याच्यावर उपचार करण्यासाठी घेऊन गेले.
              याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील वाणी वरखडे वस्ती वरील संजय साविञा वरखडे यांच्या शेतातील विहीरीत दिनांक २ सप्टेंबर रोजी राञी एक बिबट्या कुत्र्याची शिकार घेवून जात असताना विहीरीत पडला. जिव वाचविण्यासाठी बिबट्या बराच वेळ विहीरीच्या कपारीवर बसुन होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लहानबाई संजय वरखडे या शेतात चारा काढण्यासाठी गेल्या. चारा काढीत असताना विहीरीतून बिबट्याचा गुर गुरण्याचा व डरकाळी फोडल्याचा आवाज आल्याने लहानबाई यांनी विहीरीत डोकावून पाहीले असता विहीरीतील कपारीवर बिबट्या दिसताच त्यांनी मोठ्याने आरडा ओरडा करुन त्यांनी पती संजय वरखडे यांना बिबट्याची माहीती दिली. त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना माहिती दिली. नगराध्यक्ष कदम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
          घटनास्थळी वन विभागाचे वनपाल गोरक्षनाथ लोंढे, सचिन गायकवाड, वामन लांबे, बाळासाहेब दिघे, जयराम सागर, प्रदीप कोहकडे, लक्ष्मण किनकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.  वरखडे शेतातील विहीरीतील बिबट्याची पाहणी करुन उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने विहीरीत पिंजरा सोडुन बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळविले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातून पिंजरा काढणे अवघड होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी  स्वतःचे वाहनाच्या साहय्याने पिंजरा बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी नगराध्यक्ष कदम पुर्णपणे चिखलाने भरले होते. मात्र बिबट्यामुळे कोणालाही ईजा होऊ नये. यासाठी त्यांनी कसलाही विचार न करता चिखलात उभे राहून मदत कार्य केले.
      यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पञकाशी बोलताना सांगितले की, मी व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस यांच्यासह प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांची चालू असलेली कामे पाहणी करीत असताना वाणी वरखडे वस्ती वरील नागरीकांनी विहीरीत बिबट्या पडल्याची माहीती मोबाईल द्वारे दिली. तात्काळ त्या ठिकाणी पोहचून काय मदत करता येते ते पाहिले. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी शेतात साचलेले होते. कोणतेही साधन घातले तरी ते चिखलात फसणार होते. त्यामुळे स्वतः कडील रेसर जीप चिखलात घालून स्वतः पिंजरा शेता बाहेर काढण्यास मदत केली. राजकारणाच्या वेळी राजकारण करायचे आणी मदतीच्या वेळी मदत करायची हे माझे कर्तव्य आहे, असे कदम यांनी सांगितले.
         वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकरी व नागरीक जगन्नाथ वरखडे, चेतन कदम, कारभारी वरखडे, मंजाबापू वरखडे, प्रदीप नालकर, अभिजित नालकर, बाळासाहेब वरखडे, मयुर मोरे, संदीप कदम, सुनिल खांदे, राजेंद्र मोरे, सतिष वाजे, आदेश जाधव, मनोज डोंगरे आदींनी मदत केली.

औरंगाबाद:भारतीय जनता पक्षात प्रवेशाला झालेल्या विरोधाने दुखावलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आज थेट मातोश्रीवर दाखल झाले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. विधान परिषदेत शिवसेनेला मदत केल्यानंतर सत्तार यांची सेनेसोबत जवळीक वाढली होती. गेल्या आठवडाभरात ते पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अंबादास दानवे यांच्या संपर्कात होते. भाजप प्रवेशाचा हिरवा सिग्नल न मिळाल्याने सत्तार काल रात्रीच मुंबई ला रावण झाले. आज सकाळी मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधले.
सिल्लोड भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आ. अब्दुल सत्तार यांचा भारतीय जनता पार्टी तिल प्रवेश जवळपास अनिश्चित मानला जात होता. काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर सत्तार  भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सूक होते.  अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी प्रवेशाचा मार्गही सुकर केला होता. मात्र तालुक्‍यातील दिग्गज भाजप नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला. सुरेश बनकर, सुनील मिरकर यांच्यासह जवळपास ५० वर पदाधिकारी कार्यकर्ते थेट मुख्यमंत्र्यांना जाऊनही भेटले. त्यामुळे सत्तार यांचा प्रवेश लांबला. माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला हिरवा सिग्नल दिला नाही. गेल्याच आठवड्यात महाजनादेश यात्रेनिमित्त सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या यात्रेतही सत्तार यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे सत्तार यांच्या कार्यकर्त्यांसह कमालीचे अस्वस्थ झाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्यावा असा दबाव निर्माण झाल्यानेच सत्तार यांनी तातडीने सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे बोलले जाते.
टोकाचा विरोध...
 सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड तालुक्यातून टोकाचा विरोध होत होता. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याने भाजप वरिष्ठ सावध झाले.  गेली वीस वर्ष सत्तार भाजप विरोधात लढत आले आहेत. त्याची सलही अजून कार्यकर्त्यांच्या मनात ताजी आहे. परिणामी सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
दरम्यान अब्दुल सत्तार काल रात्रीच तातडीने मुंबईला रवाना झाले. मोजक्या कार्यकर्त्यांसह सत्तार आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शेवगाव---शेवगाव बसस्थानकांच्या नुतनीकरणामध्ये यापुर्वीचे खाजगी करणाचे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा हे यापुर्वीच्या शासनाचे धोरण रद्द करुन शासनामार्फत परीवहन महामंडळाच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
       शेवगाव येथे तीन कोटी २७ लाख रुपये खर्चुन एस.टी बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे भुमिपूजन कोनशीलेचे अनावरण परीवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज शनिवार  रोजी भर पावसात संपन्न झाले. यावेळी आ. मोनिका राजळे, विभाग नियंत्रक विजय गिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अरूण मुंढे, अशोक आहुजा, शिवसेना तालुकाप्रमुख अँड. अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर, सुनिल जगताप, सिध्दार्थ काटे, तुषार वैदय, कचरु चोथे, गणेश कराड आदी प्रमुख उपथित होते. रावते म्हणाले की, मराठवाडयाला जोडणा-या व जिल्हयातील उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे असलेल्या शेवगाव आगाराची दूरावस्था झाली होती. आ.मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये प्रवाशाबरोबरच येथील व्यावसायिकांचीही सोय पाहिली जाईल. एस.टी मुळे दिव्यांग, जेष्ठ नागरीक, विदयार्थी यांची सोय झालेली असतांना सर्वच जण खाजगी वाहतूकीचे कौतुक करतो ते चुकीचे आहे. राज्यातील बसस्थानकांच्या मालकीच्या जागा स्वत:च्या मालकीच्या समजून अनेकजण त्याचा गैरवापर करत असल्याचे आढळून आल्याने आता राज्यशासनाने पुढाकार घेवून सर्व बसस्थानकांचा विकास महामंडळामार्फत करण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या १९२ ठिकाणी या पद्धतीने कामे सुरु करण्यात आली आहेत.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आगार प्रमुख वासुदेव देवराज यांनी तर प्रास्ताविक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख भरत लोहकरे यांनी केले. तर शितल पुरनाळे यांनी आभार मानले.
प्रतीनीधी आलीम शेख

सिल्लोड, प्रतिनिधी : एकीकडे गळ्यातील दागीने चोरणाऱ्यांनी महिला व पोलिसांच्या नाकीदम आणला आहे, तर दुसरीकडे ऐंशी हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे सापडलेले दागीने तालुक्यातील पळशी येथील तरुणाने प्रामाणिक पणा व उदारता दाखवत महिलेला परत केले. हरवलेले दागीने परत मिळाल्याने विवाहीत महिलेला आनंद अश्रु अवरेनासे झाले. तरुणाची उदारता व प्रामाणिक पणाचे सर्वच कौतुक करीत आहेत.

       रंजीत महेताप जोनवाळ (रा. पळशी) असे दागीने परत देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

    त्याचे झाले असे की, वर्षा पवन महेर ही विवाहीत महिला शुक्रवारी (दि. 30) दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या भावासोबत दुचाकीवरुन आईला भेटण्यासाठी तपोवण वस्तीकडे जात असतांना तिच्या पिशवीत ठेवलेली सोन्याची एकदानी व गहू मनी पोत रस्त्याने पडली. याच दरम्यान रंजीत जोनवाळ हा तरुण शेतातून घरी येत असतांना त्याला रस्त्यावर पडलेले दागीने सापडले.

       दागीने हरवल्याचे लक्षात येताच महिलेला धक्काच बसला. तिने अधी ही बाब आईला सांगितली व नंतर पतीला. त्यांनी बराच शोध घेतला. पण दागीने सापडले नाही. शनिवारी (दि. 31) दागीने सापडल्याची माहिती तरुणाने गावातील नागरिकांना दिली व त्या महिलेचा शोध घेऊन परत करण्याचा प्रमाणिक पणा दाखवला. नागरिकांनी दागीने सापडल्याची माहिती मंदिरावरील लाउस्पिकरवरुण गावात दिली. हरवलेले दागीने सापल्याची माहीती मिळताच त्या महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. माजी उपसरपंच नारायण बडक, भाऊसाहेब बडक, सिताराम पुंगळे, रविंद्र देखणे आदींच्या समक्ष तरुणाने पत्नीच्या हस्ते महिलेला दागीने परत केले.
     दागीने सापडल्याची वार्ता गावात पसरताच महिलांनी मोठी गर्दी केली होती. परंतु दागीन्याचे डिझाईन, वजन, कुठल्या रस्त्यावर हरवले याची आधी खात्री करुण घेतली. त्यानंतर महिलेला दागीने परत देण्यात आले.


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. 4 सप्टेंबर रोजी ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप तसेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत चालली असून आमदार कांबळे यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील आणखी एक काँग्रेस आमदार सत्ताधार्‍यांच्या गळाला लागला आहे. दरम्यान, शनिवारी उशिरा रात्री या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का दिला.लोकसभा निवडणुकीच्यावेळी राहात्यातील तत्कालीन काँग्रेस नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी उशिरा सायंकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर शहर प्रमुख सचिन बडदे यांच्यासमवेत आमदार भाऊसाहेब कांबळे एका खास विमानाने मुंबईला दाखल झाले. शिवसेनेच्यावतीने त्यांच्यासाठी पुणे येथून खास विमानाची सोय करण्यात आली होती. मुंबई येथे त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते रघुनाथ कुचिक, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर शहर प्रमुख सचिन बडदे उपस्थित होते. आमदार कांबळे येत्या 4 सप्टेंबर रोजी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget