February 2023

श्रीरामपुर-मराठी भाषेत सर्व प्रकारचे साहित्य प्रकार उपलब्ध असल्याने ती सर्वंकष आणि समृद्ध आहे.त्यामुळे संपूर्ण जग मराठी भाषेचा गजर आणि जागर करीत असल्याचे प्रतिपादन पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांनी केले आहे.

               मॉडेल इंग्लिश स्कुल येथे मराठी गौरव दिनाचे  आयोजन करण्यात आले होते  त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या तृप्ती करीर होत्या.यावेळी मराठी गौरव पिठावर संस्थेच्या अध्यक्षा मैमकौरजी सेठी,संचालक रतनसिंगजी सेठी, बलजीत कौरजी सेठी,उपमुख्याध्यापक विनोद जोशी,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

उपप्राचार्य जोशी,सुतार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनाथ कुताळ पुढे म्हणाले की मॉडेल इंग्रजी माध्यमाची शाळा असतानाही फक्त इंग्रजीचाच विचार न करता मराठी भाषाही समृद्ध ठेवली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य ग्रंथ दिंडी काढली होती.तर पोवाडे,कविता,पंढरीची वारी अन भजने, स्फूर्ती गीते आदींसह मराठी साहित्य प्रकारातील वैविध्यपूर्ण सादरीकरण करून बाल पिढीतही मराठी भाषा कशी समृद्ध आहे हे दाखवुन दिले.

           स्वागत आयुष बागूल याने,परिचय कार्तिक आसने या विद्यार्थांनी तर प्राची सुर्यवंशी, तन्मय खटाणे,ओम शिंदे,अभिराज लोंढे यांनी मनोगत,कविता,पोवाडा सादर केला.विद्यार्थ्यानी ग्रंथदिडी,शिवाजी महाराज,विठ्ठल रूख्मिनी ,लेझिम,'होता जीवा म्हणून वाचला शिवा' यावर आधारीत पोवाडा, असे साहित्याचे अनेक पैलू सादर केले. आर्या लोंढे व आर्यन सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर आयुष बागुल याने स्वागत केले शेवटी विराज चौधरी याने आभार मानले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आत्तापर्यंत मी सहा ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. त्यापैकी पाच ठिकाणी शिक्षण मंडळे होती. त्यामुळे नगरपालिका शाळांच्या समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत .वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील नगरपालिकेच्या सर्व शाळा अत्याधुनिक करण्यासाठी पालिकेने योजना तयार केली असून प्रत्येक शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देणार आहोत.तसेच इतर सर्व भौतिक सुविधा पुरविल्या जातील. पालिकेची उर्दू शाळा क्रमांक पाच ही आमचा मानबिंदू आहे. या शाळेची प्रगती नेत्र दीपक असून आजच्या स्पर्धेच्या युगात शाळेने आपली पटसंख्या आणि गुणवत्ता टिकवून ठेवली. त्यामुळे ही शाळा आज जिल्ह्यात नावाजलेली आहे.पालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत स्पर्धेत मिळवलेले यश भविष्यात शहराला नवीन खेळाडू मिळवून देतील असा आशावाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.

येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच च्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मुख्तार शाह होते. व्यासपीठावर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अविनाश आदिक,प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, नगरसेवक संजय छल्लारे,ताराचंद रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते मुक्तार मणियार, माजी नगरसेवक दत्तात्रय सानप, राजेंद्र सोनवणे, याकूबभाई बागवान,

कलीम कुरेशी,हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जयंत चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकिल सुन्नाभाई, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संतोष मते,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण तसेच सरवरअली मास्टर, युवा नेते तौफिक शेख, जमील शाह, शफी शाह, फयाज कुरेशी, जाफर शाह,जिजामाता तरुण मंडळाचे उपाध्यक्ष संजय साळवे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगरसेवक संजय छल्लारे तसेच अशोक उपाध्ये यांनी उर्दू शाळेच्या प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला. मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली या शाळेची प्रगतीची घौडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात नगरसेवक मुख्तार शाह यांनी शुभेच्छा दिल्या.

*आदिकांची फटकेबाजी*

या कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी अचानकपणे दिलेल्या  भेटी प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगताने कार्यक्रमाची रंगत वाढवली.त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत व्यासपीठावरील उपस्थित माजी नगरसेवकांना चिमटे घेतले. हे सर्वजण माझे चांगले मित्र आहेत. यांच्यामुळे मी घडलो असे सांगत यातील अनेक जण मला दररोज मेसेज करीत असतात. वेगवेगळी चित्रे व फुले ते पाठवित असतात.मला आनंद एकाच गोष्टीचा आहे कि त्यांनी अजून कमळाचे फुल मला पाठवलेले नाही असे ते म्हणताच एकच हंशा पिकला.शाळा क्रमांक पाचच्या प्रगतीचे कौतुक करत अविनाश आदिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

प्रास्ताविक भाषणात शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख यांनी शाळेमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल माजी अध्यक्ष रज्जाक पठाण यांचा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, मुख्याध्यापक जलील शेख, शाळा क्रमांक सहाच्या उपाध्यापिका लता औटी यांचा सत्कार करण्यात आला तर शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक सिद्दीक शेख हे उमराह यात्रेसाठी रवाना होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसे दुपारच्या सत्रात शाळेचे स्नेहसंमेलन पार पाडले यामध्ये सर्वच वर्गांनी बहारदार कार्यक्रम सादर केले विशेषतः शाळा क्रमांक नऊच्या बेटीया आणि शाळा क्रमांक पाच च्या कव्वालीने उपस्थित प्रेक्षकांची खूप व्हावा मिळवली .

होते. दुपार सत्रात शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, लिपिक रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे,माजी संचालक नानासाहेब बडाख,माध्यमिक सोसायटीचे संचालक सूर्यकांत डावखर, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर सय्यद,विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमोडे, कार्याध्यक्ष शाम पटारे, गणेश पिंगळे, केंद्रप्रमुख वाघुजी पटारे, शिक्षक नेते जब्बार सय्यद, मुख्याध्यापक राजू थोरात,परवीन शेख, जावेद शेख,समीरखान पठाण,जलील शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.

बेलापुर (देविदास देसाई  )- जळगाव येथील जैन इर्रीगेशन कंपनी व जैन हाईटेक प्लँट फँक्टरी या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण कसत असलेली परंपरागत शेती सोडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुनच शेती करण्याचा निर्धार बेलापुरातील शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.                               सार्थक एजन्सी व बेलापुर विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने जळगाव येथील कै.भवरलालजी जैन यांच्या संशोधनातुन व योगदानातुन उभारलेल्या जैन प्रकल्पाची पहाणी करण्यात आली.शेती करण्याच्या नवनविन पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आपल्या जीवनात कसा वापर करता येईल या उद्धेशाने सहलीचे नियोजन करण्यात आले होते.छं.श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सहल जळगाव करीता रवाना झाली.जैन प्रकल्पाचे संचालक अभय जैन यांनी सर्वांच्या निवासाची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती.दुसऱ्या दिवशीं सकाळी सात वाजता आमची सहल मार्गदर्शकासह सुरु झाली. आंबा, पेरु, सिताफळ, डाळींब, सत्रा,नारळ, लिंबु,चिकु,केळी सफरचंद या फळबागाची पहाणी केली,संबधीत मार्गदर्शक प्रत्येक फळबागेविषयी सविस्तर माहीती देत होते.फळबाग लागवड करताना सरी किंवा बेड पुर्व पश्चिम दिशेनेच पाडावे जेणे करुन प्रत्येक झाडाला भरपुर सुर्यप्रकाश मिळाला पाहीजे. वेगवेगळ्या फळ पिकाच्या दोन झाडामधील अंतर किती असावे याचीही माहीती देण्यात आली .फळझाडांची उंची ही मर्यादित ठेवली पाहीजे हे सर्व फळबागाची पहाणी करताना सांगण्यात आले,त्याचे कारण फळांची काढणी व रोगराई व्यवस्थापन सोईस्कर व्हावे.फळ बागेला खते व पाणी कसे द्यावे याची सविस्तर माहीती देण्यात आली.पाणी थेंबान अन पिक जोमान हा मुलमंत्र सर्वांनी जपावा तसेच पाणी अमूल्य आहे त्याचा अति वापर करु नका ते पिकालाही अन जमिनीलाही मारक आहे हे तज्ञव्यक्तीकडून प्रात्याक्षीकासह दाखविण्यात आले. फळबाग तसेच पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्याकरीता निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रीप नळ्यांची माहीती देण्यात आली. मिनी स्प्रिंकलर, मायक्रो स्प्रिंकलर, रेनपोर्ट,मेटल इम्पँक्ट स्प्रिंकलर, रेनगन, प्लास्टिक इम्पँक्ट स्प्रिंकलर ,क्विक कनेक्ट पाईप, त्याची वापरण्याची पद्धत ,येणारा खर्च, होणारी बचत,मिळणारे शाश्वत उत्पन्न या विषयी सखोल माहीती देण्यात आली.पिकाला पाणी देण्याकरीता स्वयंचलित सेफ्टीवाँल्व यंत्रणा दाखवीण्यात आली. वेगवेगळी फील्ट्रेशन संसाधने,सँण्ड सेपरेटर व पॉली फिटींग्ज याची प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली.ठिंबक सिंचन यंत्राचा वापर केल्याने ७०% पाण्याची बचत होते त्यामुळे तेवढ्या पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते,तसेंच पीकही लवकर हाती येते.खत वापराची कार्यक्षमता ५०% पर्यत वाढते खताचा खर्च,अंतर मशागतीचा खर्च व मजुरीच्या खर्चातही बचत होते तसेच चढ उताराच्या जमीनीतही एकसारखा पाणी पुरवठा होतो याची महत्वपुर्ण माहीती मिळाली.ही सर्व माहीती घेवुन आम्ही पुढे कांदा लागवड सिंचन पध्दतीची माहीती घेण्यासाठी  गेलो. बेड पध्दतीने लागवड केलेले कांदे व पिकावर रोग व किडी प्रादुर्भाव न होण्यासाठी आसपास लागवड केलेली फुलझाडे याचेही ज्ञान अवगत झाले.प्रत्येक पीकात झेंडु सारखी फुलझाडे लावावीत हे आवर्जुन सांगण्यात आले. फुल झाडामुळे मधमाशी येते व परागीभवन चांगल्या प्रकारे  होते.रासायनिक औषधाच्या अति वापरामुळे निसर्गातील मधमाशीचे प्रमाण कमी होत चालले असुन मधमाशी संपली तर मानवी जीवनचं काय संपूर्ण जिवसृष्टी देखील नाहीशी होईल त्यामुळे रासायनिक औषधाचा वापर कमी करण्याचाही सल्ला मार्गदर्शकांनी दिला.दौरा यशस्वी होण्याकरिता जैन कंपनी चे जिल्हा व्यवस्थापक श्री सचिन डोंगरे तसेच श्री अजय डाकले व संतोष डाकले यांनी मार्गदर्शन केले.या सहलीत बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले ,विलास मेहेत्रे ,ज्ञानदेव वाबळे ,दत्ता कुऱ्हे विजय खंडागळे ,देविदास देसाई संतोष डाकले ,भरत साळूंके ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक अशोक कुऱ्हे अय्याज सय्यद ,जाकीर शेख ,विश़्वनाथ गवते ,कलेश सातभाई ,किरण नवले ,सुरेश कापसे ,डाँक्टर मिलींद बडधे ,नामदेव बोंबले ,अनिल पवार ,विपुल नवले ,सौरभ पवार, हरिष बडाख ,आदिसह अनेक सभासद सहलीत सहभागी झाले होते .पहाटे चार वाजता आम्ही सुखरुप बेलापुरात उतरलो पण येताना शेतीकरीता नविन ऊर्जा घेवुनच

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक बाल संस्कार केंद्राचे भुमीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले या वेळी सर्व मान्यवरांनी गावाच्या वैभवात भर टाकणारे हे संस्कार केंद्र असुन केंद्र उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे अवाहन केले               श्री स्वामी समर्थ केंद्रांची बेलापुरात सन १९९१ ला सुरुवात झाली सुरुवातीला हे केंद्र महादेव मंदीर येथे सुरु झाले या केंद्रास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा यांनी जागा उपलब्ध करुन दिली सन २०१७ पासुन नविन जागेत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात आले या ठिकाणी जागा उपलब्ध होती परंतु  या ठिकाणी चांगले संस्कार केंद्र उभे रहावे ही अनेक सेवेकऱ्यांची मनापासुन ईच्छा होती अखेर विविध मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष  सुनिल मुथा ,प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण आप्पासाहेब थोरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सुवालाल लुक्कड रविंद्र खटोड सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे साहेबराव वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्रताप सरोदे ,उंदिरगाव केंद्र भारत कोळसे, राधु पवार ,दिनेश वैद्य, बाबासाहेब शेटे, हिम्मतराव धुमाळ, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, किरण भांड, ज्योतीताई भांड, भगीरथ मुंडलीक, कैलासा देसाई , दत्तात्रय कुऱ्हे  ,योगेश शिंदे ,जनार्धन शिंदे ,विलास कुऱ्हे  ,जालींदर गाढे ,अशोक राशिनकर ,विजर धुमाळ  आदिसह असंख्य सेवेकरी उपस्थित होते या वेळी महीला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कल्पना थोरात यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले शेवटी विठ्ठल गाडे मामा यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दिपावली प्रमाणेच गुढी पाडवा व डाँक्टर  बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेला शंभर रुपयात  आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे जनतेचा सण गोड होणार आहे                                       सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी गोड व्हावी या करीता शासनाने शंभर रुपयात एक लिटर पामतेल एक किलो रवा एक किलो साखर एक किलो हरभरा दाळ देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता आता नविन मराठी वर्ष सुरु होत आहे पहीलाच सण  गुढी पाडवा आहे तसेच महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे त्यामुळे नागरीकांना हे ही सण आनंदात साजरे करता यावेत या करीता राज्यातील एक कोटी ६३ लाख कुटुंबांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे  दिपावली सणाच्या कालावधीत अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा उशिराने पोहोचला होता परंतु आता शासनाने वेळेत हा शिधा पोहोच करण्याची खबरदारी घ्यावी अशीच सर्व सामान्य नागरीकांची मागणी आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )- आर्थिक नियोजना बाबत बेलापुर ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलविले नाही ?त्या सभेचा अजेंडा दाखवा ? म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला यावर सरपंच-उपसरपंच यांनी आक्रमक होत प्रतिउत्तर दिले. गरमा-गरमीच्या वातावरणात जि प सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकल्यामुळे ग्रामसभा शांततेत पार पडली     बेलापुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मराठी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाजण्यास सुरुवात केली त्या  वेळी ही सभा केव्हा घेतली आम्हाला निरोप का दिला नाही ?असा सवाल सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड यांनी केला त्यावर वाद सुरु झाला या वादात उपसरपंच अभिषेक खंडागळे  प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा अशी विचारणा करताच वातावरण चांगलेच तापले त्यामुळे पोलीस देखील तातडीने ग्रामसभेस उपस्थित झाले. जि प सदस्य शदर नवले यानी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करु असे सांगुन तो विषय थांबविला त्या नंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% निधी मागासवर्गीयासाठी खर्च करणे हा नियम असताना तो  का केला नाही असा सवाल विजय शेलार यांनी केला.चंद्रकांत नाईक यांनीही दलीत वस्तींना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेले नाही असा खुलासा केला.प्रफुल्ल डावरे यांनी अनेक ठिकाणी नविन बांधकाम झालेली असुन त्याचे रिव्हीजन करा वा नविन नियमानुसार आकारणी करा जेणेकरुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल अशी मागणी केली.हाजी इस्माईल शेख यांनी गावातील रस्त्यावरील अतिक्रमण गोविंद वाबळे व राकेश कुंभकर्ण यांनी फ्लेक्स बोर्डाबाबत नियम बनवावेत कलेश सातभाई, संजय रासकर यांनी सातभाई वसाहतीतील स्मशानभुमीचा लागलेला फेर कसा रद्द झाला अशी विचारणा केली. याबाबत सरपंच महेंद्र साळवी यांनी सदरचा फेर २०१० सालीच रद्द झालेला असून जागा ताब्यात घेण्या याबाबत कार्यवाही करू असे सांगितले.बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी पाणी पुरवठा योजनेची माहीती व आराखडा याची माहीती नागरीकांना द्यावी अशी मागणी केली या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष असुन पाणी पुरवठा योजनेकरीता १२६ कोटी रुपये निधी मिळविणारी पहीली ग्रामपंचायत ठरली असुन या योजनेकरीता पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा खासदार सदाशिव लोखडे आमदार लहु कानडे तसेच दिपक पटारे, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे  या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्याच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली मा ,जि प शरद नवले यांनी १२६ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा  योजनेची सविस्तर माहीती दिली  पाणी पुरवठा योजनेकरीता जमीन मिळावी या करीता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे संजय शिरसाठ मुस्ताक शेख यांचा सत्कार करण्यात आला तसेच नविन पाणी पुरवठा योजनेतील टाक्यासाठी  जागा देणारे माधव कुऱ्हे प्रकाश मेहेत्रे नामदेव मेहेत्रे मनोज मेहेत्रे जनार्धन दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी तबस्सुम बागवान सौ शिला पोळ स्वाती आमोलीक प्रियंका कुऱ्हे जालींदर कुऱ्हे  प्रकाश नवले लहानु नागले भाऊसाहेब तेलोरे दत्ता कुऱ्हे  प्रकाश नवले प्रभाकर कुऱ्हे  विशाल आंबेकर अमोल गाढे अजिज शेख अय्याज सय्यद जाकीर शेख भाऊसाहेब कुताळ महेश कुऱ्हे सचिन वाघ सुरेश कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीत शांत व संयमी असणारे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा आक्रमक पवित्रा पहिल्यादाच विरोधकांनी अनुभवला.


श्रीरामपूर - येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळाचे लोकप्रिय प्रशासन अधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे हे उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात प्रशासनाधिकारी पटारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते.महाराज ही त्यांची खूप काळजी घेत होते.त्यांच्या आजोबांनी मूल बाळ होण्यासाठी नवस केल्यामुळे झालेल्या मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अत्यंत ओजस्वी स्वरात सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी भाषणे सादर केली.

प्रस्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मुस्लिम सरदार या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या फौजेमध्ये 35% मुस्लिम सैन्य होते तसेच महाराजांनी कुरआन शरीफ सुद्धा अवगत केले होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासन अधिकारी पटारे साहेब यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ मुर्तुजा व आभार प्रदर्शन एजाज चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) बारावी परीक्षा हा शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा आणि दिशा दर्शक टप्पा असुन तो पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावुन यश संपादन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.अशोक एज्युकेशन सोसायटी संचलित शिरसगाव येथील  न्यु इंग्लिश स्कूल व कनिष्ठ वानिज्य महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित "अनुभवाचे बोल" या विशेष कार्यक्रमात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गवले बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी ऐन परीक्षा काळात अकारण दडपण घेतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. त्यातुन मनात गोंधळ निर्माण होतो. त्यासाठी मानसिक संतुलन स्थिर ठेवणे अत्यावश्यक आहे. पेपरला सामोरे जाताना केलेल्या अध्ययनाचे वारंवार चिंतन, मनन करणे अपेक्षित ठरते. असे सांगत त्यांनी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करुन अधिक गुण संपादन करण्याच्या काही युक्त्या सांगुन प्रा.गवले यांनी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रास्ताविक व परिचय  या उपक्रमाचे संयोजक प्रा. राजेंद्र  वधवानी यांनी केले. प्राचार्या सौ. सुमती औताडे यांनी प्रा. गवले यांचा सन्मान केला. यावेळी पर्यवेक्षक व्ही. आय. थोरात, लेखनिक शशिकांत गवारे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कु.कांचन गवारे,कु.श्रृतीका गवारे, मंगेश रुद्राक्षे कु.गायत्री आदी विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले. प्रा .सुनिता अहीरे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील ईनामदार मस्जिदशेजारी असलेल्या दोन खोल्यांना अचानक आग लागली सुदैवानी कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही शुक्रवारची नमाज अदा करण्या आगोदर ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला                                येथील ईनामदार मस्जिद लगत असलेल्या दोन खोल्यांना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शाँर्ट सर्किटमुळे आग लागली आशुतोष गोरे यांनी सर्व प्रथम धुर निघताना पाहीले त्यांनी तातडीने आरडा ओरड केली आसपासचे नागरीक जमा झाले काही नागरीकांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळविले ते बाहेरगावी होते तरी देखील त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला सुचित केले तसेच ग्रामपंचायत टँकर व ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पाठविले.आग लागल्याचे सामजताच गावातील विज पुरवठा बंद करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके हाजी इस्माईल शेख मोहसीन सय्यद अशोक गवते पत्रकार दिलीप दायमा पापा मुलानी समीर जहागीरदार आकीब शेख आदिसह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. काही वेळातच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला अन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या नंतर पोलीस प्रशासन व महावितरण चे अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.आज शुक्रवार असल्यामुळे दुपारी मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी जमा होणार होते परंतु त्यापुर्वीच ही घटना घडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बेलापूर (वार्ताहर )- अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीच्या चेहेऱ्यालाच पाळीव कुत्र्याने चावा घेतला असुन अहमदनगर येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु आहेत या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे                    या बाबत पोलीस सूत्राकडून समजलेली हाकीकत अशी की  पढेगाव रोड शालोम चर्चच्या पाठीमागे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन च्या सुमारास आयेशा दस्तगीर शेख ही मुलगी ( वय वर्ष 9 ) खेळत असताना टायगर नावाच्या कुत्र्याने  तिच्या तोंडाला व इतर ठिकाणी चावा घेऊन तिला  गंभीर जखमी केले  गंभीर जखमी अवस्थेत मुलीला प्रथम श्रीरामपूर येथील शिरसगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले चेहेऱ्याची जखम फार मोठी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करुन त्या मुलीस नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले  जखमी आयेशास अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे कुत्र्याने त्या मुलीच्या गालाचाच लचका तोडला असुन  मुलीची तब्येत गंभीर  असल्याचे नातेवाईकांनी सांगितले या बाबत मुलीची आई निलोफर दस्तगीर शेख हिने बेलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून बेलापुर पोलीसांनी शेलार यांच्या विरुद्ध भा द वि कलम २८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन  पुढील तपास बेलापुर पोलीस करीत आहे.

श्रीरामपूर - नागरिकांच्या सेवेसाठी नेमण्यात आलेले, शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्या बजावीत नसल्याने. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास,सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. ज्यात श्रीरामपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या. निष्क्रिय तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष, व सतत दालन बंद करून गायब असल्याने. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून. शासनाकडून मिळणाऱ्या मोफत आरोग्य साधने,सर्रासपणे खाजगी मेडीकल मध्ये विकली जात असल्याचेही निदर्शनास आल्याने. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची अवस्थाच बिकट झाल्याने. कर्तव्यात कसून करणाऱ्या, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा,अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने. गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे दिला आहे. सदरचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,जिल्हा सरचिटणीस शरद बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण देवकर, शहराध्यक्ष दौलत गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष गोरख शेजुळ, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पटारे आदींनी दिले आहे.

श्रीरामपूर -विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सह, त्यांच्या शारिरीक क्षमतेत वाढ होण्या करिता. विविध मैदानी क्रिडा तसेच खेळांचे प्रशिक्षण दिले जातात. ज्यात मुला मुलींच्या आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने, त्यांना मार्शल आर्ट,तायकांदो या सारखे प्रशिक्षण देखील दिले जात आहेत. या सर्वांच्या चालता श्रीरामपूर शहरातील शेकडो मुल- मुली, मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्लोबल मार्शल आर्टच्या माध्यमातून. मागील ३ महिन्यांपासून मोफत तायक्वांदो कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. सदरचे प्रशिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांची, शहरातील काँग्रेस भवन वार्ड नंबर ६ या ठिकाणी. नुकतीच कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाली. यावेळी परिक्षणार्थी मुला मुलींनी आत्मसाद केलेल्या मार्शल आर्ट, तायकांदोचे प्रत्येक्षिके सादर करून. उपस्थित मान्यवरांसह पालकांचे मन मोहून घेतले. यावेळी प्रशिक्षक जुबेर बिनसाद,पूजा गतिर,अबू बकर बिनसाद,अशोक शिंदे,शुभम पवार,शोएब पटेल गौरव काळे, आदींच्या निरीक्षणाखाली कलर बेल्ट एक्झाम संपन्न झाल्या. तसेच सेल्फ डिफेन्स आज काळाची गरज असून, ते आपल्याला करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून,जास्तीत जात मैदानी खेळ खेळावेत,जेणे करून आपले शरीर निरोगी, धष्टपुष्ट राहून. बुद्धीचा देखील चांगला विकास होईल.तसेच भालाफेक,कबड्डी, खो-खो, क्रिकेट,अथलेटिक, तायक्वांदो,आर्चरी, रनिंग,अशा खेळांच्या मधून. अनेक पदके मिळवून,आपल्या पालकांचे नाव श्रीरामपूर शहरचे, जिल्ह्याचे नाव राज्य नाही तर देश पातळीवर चमकव्यात. अशा शुभेच्छा ग्लोबल मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष, मास्टर कलीम बिनसाद यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.

बेलापूर ( वार्ताहर) पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असुन पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेलापुर व परिसरातील पत्रकारांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ..               पत्रकारवरील हल्ल्याबाबत  पोलिसांनी तसेच शासनाने दखल घेवुन आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .रत्नागिरी येथील पत्रकार शशीकांत वारीसे यांनी वृत्तपत्रात बातमी छापली म्हणून त्यांना गाडीची धडक देवुन ठार मारण्यात आले अशा गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे . पत्रकारांना

संरक्षण  देण्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवश्यक ते पावले उचलावीत असेही निवेदनात म्हटले आहे.

.बेलापूर येथे औटपोस्टचे हेड कॉ अतुल लोटके पोलिस हेड कॉ रामेश्वर ढोकणे भारत तमनर नंदु लोखंडे  यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनावर भास्कर खंडागळे अशोक गाडेकर  देवीदास देसाई ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ शरद थोरात  भरत थोरात दिलीप  दायमा किशोर कदम दिपक क्षत्रिय सुहास शेलार  आदीसह पत्रकारांच्या  सह्या आहे. 


 

राज्यात व देशांमध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींचे पुन्हा एकदा वर्चस्व.

हिगोली (१२/२/२३):दि १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी हिंगोली येथे महाराष्ट्र क्रीडा संचालनालय,पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल १७ वर्षा खालील मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुलीच्या गटात पुणे विभागाचे नेतृत्व करत मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने अंतिम सामन्यात नागपूर विभागाचा  पराभव करून विजेतेपद पटकावले. कर्णधार ओजस्वी बचुटे हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणे विभाग संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर विभाग व लातूर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यामध्ये मिलेनियम संघाकडून श्रीया गोठस्कर,नंदिनी भागवत,ओजस्वी बचुटे,निधी पाटील,अनन्या गोसावी,श्रावणी काळे,रिद्धी देसाई यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती संघास विजेतेपद मिळवून दिले. विजयी संघाचे मिलेनियम नॅशनल स्कूलचे डायरेक्टर मा.अन्वित फाठक यांनी अभिनंदन केले.विजयी खेळाडूंना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे,सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी या कालावधीत उक्कलगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहाची सांगता ह भ प जगन्नथ महाराज पाटील भिवंडी यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे            उक्कलगावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान देवस्थानच्या प्रांगणात महंत रामगिरीजी महाराज व  महंत उध्दवगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वअखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असुन त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकडा भजन , सकाळी ६.३० ते ७ आरती , सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यत प्रसादभोजन सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरिकिर्तन अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वरी  ग्रंथ मिरवणूक सायंकाळी ७ ते ९ ह भ प अरुणगीरीजी महाराज भामाठाण यांचे किर्तन व गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वाणीभुषण ह भ प जगन्नाथ महाराज पाटील  भिवंडी यांच्या  काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असुन त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सायंकाळी ७ ते ९ हरी किर्तन नंतर महाप्रसाद असा उपक्रम सप्ताहभर सुरु आहे  ह भ प बाबा महाराज मोरे ह भ प नामदेव महाराज मोरे ह भ प रविंद्र महाराज मुठे ,ह भ प उल्हास महाराज तांबे ह भ प बाबासाहेब  महाराज ससाणे हे व्यासपीठ चालक म्हणून काम पहात आहेत तरी भावीकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-माझी लहान लहान वीस बालके असुन त्यांना दोन घास भरविण्यासाठी माझ्या झोळीत काहीतरी दान टाका आपल्या दानने त्या चिमुकल्यांचा एक दिवस तरी भागेल अशी आर्त हाक श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी दिली               निमित्त होते संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे            बेलापुर सुवर्णकार समाजाच्या वतीने बेलापुरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी म जि प सदस्य  शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड भरत साळूंके विलास मेहेत्रे  प्रशांत लढ्ढा एकनाथ उर्फ लहानु नागले दत्ता कुऱ्हे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम उपस्थित होते संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री हरिहर केशव गोविंद मदिरात ह भ प कृष्णानंद महाराजाचे प्रवचन ठेवण्यात आले होते त्या वेळी उपस्थितीतांना संबोधीत करताना कृष्णानंद महाराज म्हणाले की महाराष्ट्र ही साधु संताची भुमी आहे समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम संतानी केलेले आहे संत हे कुणा एका समाजाचे नाहीत त्यांनी संपुर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपले जिवन समर्पित केलेले आहे मी स्वतं अनाथ आहे ते दुःख काय असते हे मला ठाऊक आहे त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षी मी अनाथ मुलांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे आज श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात अठरा अनाथ बालके  आहेत त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मी किर्तन प्रवचन करत आहे सर्वांचे चहा पाणी नाष्टा जेवण त्याच बरोबर शिक्षण  हा सर्व खर्च भागविणे अवघड काम आहे त्यामुळे आपण शक्य होईल तेवढी मदत या लहानग्यांना करावी आसे अवाहनही कृष्णानंद महाराजांनी शेवटी केले सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अनिल मुंडलीक यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२३-२४ या वर्षीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला असुन या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहे प्रशासकांच्या कार्यकाळात  बाजार समीतीचा नफा तसेच ठेवीत देखील  मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे                           श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असुन प्रशासकाच्या कार्याकाळात बाजार समीतीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे माहे डिसेंबर २०२१ अखेर समीतीला ५लाख ८३ हजार रुपये नफा होता तर माहे डीसेंबर २०२२ अखेर ४५ लाख रुपये नफा झालेला आहे तर माहे आँक्टोंबर पर्यत मुदत ठेवी ४५ लाख होत्या .जानेवारी २०२३ अखेर या ठेवी १ कोटी २० लाख इतक्या झालेल्या आहेत प्रशासकांनी पुढील काळात अनेक विकास कामे हाती घेतलेली असुन सी एन जी पंप उभारणी जनावरांचा बाजार पूर्ववत चालु करणे ,मोकळा कांदा खरेदीसाठी जमीन खरेदी करणे ,बेलापुर उपबाजार आवारात २८ दुकानगाळे व १४ गोडावुन असे २ कोटी ५० लाख रुपयाचे काम प्रागती पथावर आहे महाराष्ट्र शासनाकडून शेती महामंडळाच्या उर्वरीत ५० एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासाकांनी तयार केलेला आहे  तसेच श्रीरामपुर बाजार समीतीतील मेन गेट ते कांदा मार्केट रोड काँक्रिटीकरणासाठी रुपये १२ लाख कांदा मार्केट रोड काँंक्रीटीकरणासाठी रुपये ७० लाख मुख्य बाजार समीतीत शाँपींग सेंपर करीता रुपये २ कोटी ५० लाख भाजीपाला मार्केट दुकानगाळे रुपये ४०लाख बेलापुर उपबाजार शाँपींग सेंटर १ कोटी १५ लाख बेलापुर रोड अंतर्गत काँक्रीटीकरण रुपये ६५ लाख ,टाकळीभान रोड काँक्रीटीकरण रुपये १ कोटी १० लाख या प्रमाणे एकुण ७ कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बाजार समीतीचे प्रशासक दिपक नागरगोजे व बाजार समीतीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या कार्यकाळात बाजार समीतीच्या उत्पन्नात तसेच वैभवातही वाढ होत आहे शेतकरी व्यापारी वर्गांना मिळणाऱ्या सुविधातही वाढ झाली असुन शेतकरी व्यापारी बंधुनी प्रशासक नागरगोजे व प्रभारी सचिव वाबळे यांना धन्यवाद दिले आहेत

श्रीरामपूर - प्रचंड गर्दी ...महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत साहित्यिकांना ऐकण्यासाठी जमलेला जनसागर ...तीन वेळा खुर्च्या मागवूनही कमी पडणारी जागा ...प्रत्येक वक्त्याला ऐकण्यासाठी तल्लीन झालेला श्रोता वर्ग ...श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे बोलत जाणारा वक्ता आणि शेवटी त्याला थांबवण्यासाठी दिली जाणारी आमदार कानडे यांची चिठ्ठी ...हे चित्र होते काल आमदार लहुजी कानडे यांच्या यशोधन या कार्यालयाच्या मागील प्रांगणात झालेल्या लोक हक्क फाउंडेशनच्या पुरस्कार वितरणाचे.निमित्त होते राज्याचे माजी महसूल मंत्री, सुसंस्कृत विचारांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे.आमदार लहुजी कानडे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, शिक्षक नेते अंकुश कानडे यांच्या नीटनेटक्या नियोजनातून साकार झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते दैनिक सकाळचे माजी संपादक, राज्यातील एक नामवंत विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे. व्यासपिठावर उपस्थिती होती महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष,प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर,ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे पुतणे श्री भारदे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समिती श्रीरामपूरचे माजी सभापती,श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र इंद्रनाथ पाटील थोरात,कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांची. शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी आदींनी सभा मंडप खच्चून भरला होता.आमदार कानडे प्रमुख असलेल्या लोकहक्क फाउंडेशन तर्फे हा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक भाषणामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी लोकहक्क फाउंडेशन मार्फत राबविल्या गेलेल्या उपक्रमांची माहिती देताना ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्याचा उपक्रम आपण गेल्या काही वर्षापासून सुरू केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक, सेवाभावी कार्यकर्ते यांचा गौरव करतानाच तालुक्यातील ज्या भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रांमध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. त्यांचही गौरव या निमित्ताने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील सुमारे 80 गुणवंतांचा गौरव काल या समारंभात करण्यात आला. शिवाय राज्यातील नामवंत असे वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ साहित्यीक,प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर,तालुक्याचे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांना जीवनगौरव पुरस्कार यानिमित्ताने प्रदान करण्यात आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास मांडला. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करीत असताना आजचे शासनकर्ते हे समाजामध्ये कशाप्रकारे द्वेष पसरवित आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी आपल्या मार्मिक भाषणातून समाजात सध्या सुरू असलेल्या दांभिकपणावर गंभीरपणे टीका केली. समाज जोडण्याऐवजी समाज तोडण्याचे काम कशा पद्धतीने होत आहे हे त्यांनी सोदाहरण नमूद केले.समारंभाचे प्रमुख अतिथी, दैनिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांचे भाषण म्हणजे ओजस्वी विचारांची पेरणी होती. फुले,आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेताना आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने समाजाचे विघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.आपल्या अस्खलित वाणीने त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते बोलत असताना सभामंडपामध्ये अत्यंत शांतता होती. श्रीरामपूरला यापूर्वी सात आठ वेळा येऊन गेलो. भाषणे केली. मात्र आजच्या एवढी गर्दी यापूर्वी कधी नव्हती. याचे श्रेय आमदार कानडेंना जाते असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर आपल्या खणखणीत शैलीने प्रहार करताना त्यांनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या धोरणांचा देखील तडाखेबंद समाचार घेतला.आमदार कानडे यांच्या मैत्रीचा समर्पक उल्लेख करताना लहुजी कानडे यांच्या रूपाने विधिमंडळामध्ये बहुजन चळवळीचा एक चेहरा पोहोचला.साहित्यिक, कवि,अधिकारी म्हणून त्यांचे योगदान कदापि विसरता येणे शक्य नाही. आमच्यातला एक साहित्यिक विधिमंडळात लोक प्रतिनिधी म्हणून पोहोचला याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.अत्यंत निट नेटका, नियोजनबद्ध व देखणा समारंभ या निमित्ताने श्रीरामपूरकरांना अनुभवावयास मिळाला. उपस्थित सर्व श्रोत्यांनी देखील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांचे विचार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीरामपूरकरांना ऐकायला मिळाले याबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला व आमदार लहुजी कानडे, अशोक नाना कानडे व त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ॲडवोकेट समीन बागवान यांनी केले तर ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नामवंत दिग्गज उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर तालुका राहुरी येथील जाधव वस्तीवरील जाधव ट्रान्सफार्मरला कोल्हार फिडरवरुन विज पुरवठा होत असल्यामुळे कमी दाबाने विज मिळत असुन जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा केला जावा अशी मागणी संक्रापुर येथील शेतकऱ्यांनी राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे                                     राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बेलापुर येथील कबंड्डी स्पर्धेच्या उद़्घाटनाकरीता आले असता संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन आपल्या व्यथा मांडल्या पाणी असुनही विज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेक समस्याचा सामना करावा लागत असुन संक्रापुर येथील जाधव डी पी ला कोल्हार येथुन विज पुरवठा केला जातो हे अंतर फार मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने विज पुरवठा होतो त्याचा परिणाम विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर जळणे अशा घटना वारवार घडत आहे त्यामुळे पाणी असुनही पिके जळून चाललेली आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या ट्रांन्सफार्मरला जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा जोडण्यात यावा जेणे करुन विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर वेळोवेळी नादुरुस्त होणे असे प्रकार होणार नाहीत अशी मागणी शेतकऱ्यांनी नामदार विखे यांच्याकडे केली आहे आपण वैयक्तिक लाक्ष घालुन आमची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे   या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,पत्रकार देविदास देसाई , नबाजी जगताप ,कल्याणराव जगताप राजाभाऊ थोरात, विकास पा थोरात पंडीतराव थोरात, संजय जगताप, राजेंद्र जगताप ,विश्वनाथ जगताप, शशिकांत माकोने ,नंदकुमार लोंढे, बाळासाहेब जाधव ,नारायण जाधव, बाळासाहेब गुंड, सुभाष दाते, वसंत बर्डे आदि शेतकरी उपस्थित  होते.

बेलापूर (प्रतिनिधी)ःबेलापूर बुll ग्रामापचायतीच्या शतकपूर्ती निमित्ताने अहमदनगर  जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने गावकरी मंडळाने आयोजित केलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी  स्पर्धेत आझाद, टाकळीभान चा संघ विजेता तर किरण गंगवाल मित्रमंडळ बेलापूर संघ उपविजेता ठरला.                            जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपच अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळ बेलापूर कबड्डी संघ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु-ऐनतपूर च्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  ग्रामिण भागात प्रथमच मॅट वर कबड्डी स्पर्धा भरविण्याचा मान बेलापुर गावाने गावकरी मंडळाच्या माध्यमातून मिळवीला या स्पर्धा दिवस रात्र विद्युत प्रकाश झोतात  जि.प.प्राथमिक शाळेच्या मैदानावर खेळविण्यात आल्या .या स्पर्धेचा भव्य उदघाटन सोहळा राज्याचे महसूल  व दुग्ध विकास मंत्री नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते,जालिंदर कु-हे यांचे अध्यतेखाली तसेच भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे,जिल्हा संघटक नितीन दिनकर,अॕड.बाळासाहेब खंडागळे ,भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा,नानासाहेब शिंदे,डाॕ.नितीन आसने,भिमा बागुल,माजी नगरसेवक दीपक चव्हाण,रवी पाटील,रुपेश हरकल हाजी इस्माईल शेख ,प्रफुल्ल डावरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेत आझाद, टाकळीभान संघाने प्रथम क्रमांक मिळवीला  (रु.५१००० गावकरी मंडळ, बेलापूर पुरस्कृत),किरण गंगवाल मित्रमंडळ संघाने द्वितीय क्रमांक मिळवीला (रु.४१००० चव्हाण कंस्ट्रक्शन,श्रीरामपूर पुरस्कृत ),रणवीर, भेंडा संघाने तृतिय क्रमांक तर (रु.३१००० श्री. संजय शिंदे, बेलापूर पुरस्कृत )आणि जगदंबा, भोकर संघास चतुर्थ (रु.२१००० श्री. शफिक आतार, बेलापूर पुरस्कृत) क्रमांकाचे बक्षिस मिळाले  याशिवाय उत्कृष्ट संघाचा पुरस्कार बेलापूर कबड्डी संघास(रु.५१०० बाळासाहेब दाणी पुरस्कृत), उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार(रु.५१०० कृष्णा कलेक्शन, पुरस्कृत)

 राहुल धनवटे या खेळाडूस,उत्कृष्ट चढाईपटू(रु.५१०० देवा ग्रुप बेलापूर  पुरस्कृत )गणेश कांबळे या खेळाडूस,उत्कृष्ट पकडपटू (रु.५१०० साई फर्निचर, रामगड पुरस्कृत)अशी वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली.विजेत्या संघांना व खेळाडूंना मेनरोड मित्र मंडळ, बेलापूर च्या सौजन्याने ट्रॉफी चे देखील वितरण करण्यात आले.   स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महानंद चे चेअरमन, जिल्हा जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे, गणेश महाराज शिंदे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे  यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.                                   स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन पञकार देवीदास देसाई, संतोष मते,प्रविण जमधडे व प्रियंका यादव यांनी केले. तसेच एस.न्यूजचे जयेश सावंत व तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद यांनी स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण राजस्थानी गृह उद्योग, बेलापूर बु चे संचालक बाळूशेठ लड्डा यांच्या सौजन्याने केले.सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गावकरी मंडळाचे सर्व सदस्य, बेलापूर कबड्डी संघाचे आजी-माजी खेळाडू बेलापुर ग्रामस्थ आदिंनी परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त बेलापुर ग्रामपंचायतीने मुख्य ध्वजस्तंभाचे सुशोभिकरण केले असुन राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे पुजन करण्यात आले आहे या ध्वजस्तंभामुळे बेलापुरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे                       बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजस्तंभाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय बेलापुर ग्रामपंचायतीने घेतला.त्यानुसार सदरचे काम बेलापूरचे सुपुत्र,सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले ख्यातनाम शिल्पकार श्री.प्रशांत विनायकराव बंगाळ यांच्यावर सोपविले होते या सुशोभिकरणारासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री.शरद नवले यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध केला.श्री.प्रशांत बंगाळ यांनी अत्यंत कल्पकतेने विजय स्तंभाचा आराखडा बनविला.सदर काम संपूर्ण दगडी असून, या कामासाठी बसाल्ट या महाराष्ट्राच्या  अग्निजन्य स्थानिक दगडाचा वापर केला आहे.सदर दगड वेरुळ-अजिंठा या जगप्रसिध्द लेण्यांमध्ये आढळतो.                  या कलाकृतीच्या मध्यभागी नविन ध्वजस्तंभ बसविण्यात आला आहे.त्याभोवती अष्टकोनी  चबुत-याचे बांधकाम करण्यात आले.अष्टकोन हे चांगले आरोग्य व भविष्याचे प्रतिक मानले जाते.त्यावर कमळाचे नक्षीकाम आहे.कमळ हे शुध्दतेचे व पाविञ्याचे प्रतिक आहे.कमळ चिखलातून उगवते यातून आपल्याला लढवैय्या वृत्ती शिकण्यास मिळते.तसेच यात फुलांचेही नक्षीकाम आहे.फुल हे आनंद व शांततेचे प्रतिक आहे.                                          या अष्टकोनी चौथ-यास दिवे बसविण्यात आलेले आहेत.दिवा हे प्रकाशाचे तसेच  नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतिक आहे. यात चार दिशांना चार हत्ती आहेत.जे शक्ती व ऐश्वर्याचे प्रतिक असून चारही दिशांनी येणाऱ्या नागरीकांचे  स्वागत करतात.असा भास निर्माण होतो अशा त-हेने अत्यंत कल्पकतेने विविध प्रतिकांचा वापर विजय स्तंभासाठी करण्यात आला आहे.सदरचे काम अल्पावधीतच पूर्ण करण्यात आले आहे .हा विजय स्तंभ गावाच्या प्रवेश चौकाची शोभा वाढविणारा ठरणार आहे.तसेच सदरचा आकर्षक विजय स्तंभ गावासाठी भुषणावह ठरणार आहे.स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवी व बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या  शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधुन मा जि प सदस्य शदर नवले यांच्या भरीव अशा आर्थिक योगदानातून  सदरचे सुशोभिकरण होत असुन याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी दिली असुन बेलापुरचे नागरीक व ख्यातनाम शिल्पकार प्रशांत बंगाळ यांनी अतिशय कमी खर्चात कमी वेळात हे काम पुर्ण करुन दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले आहे.

श्रीरामपूर - पत्रकारिते सोबत सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असलेल्या आणि पत्रकारांवर झालेल्या अन्यायाप्रसंगी धावून जाणाऱ्या तथा त्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा उभारत त्यांना योग्य न्याय मिळवून देणाऱ्या अशी राज्यभरात ख्यातीप्राप्त असलेल्या महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील अपूर्वा हॉलच्या भव्य अशा सभागृहात हा रौप्य महोत्सव व गुण गौरव सोहळा पार पडला.

महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघास ३० वर्ष पुर्ण होऊन ३१ व्या वर्षात पदार्पण करत असताना दैनिक सार्वतम चे संपादक स्व.वसंतरावजी देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांबरोबरच वैद्यकीय, सामाजिक,शैक्षणिक,अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मापत्र देवून गौरविण्यात आले.


महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार पत्रकार संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक अभयशेठ बाफना हे होते,

याप्रसंगी भारतमातेची प्रतिमा आणि संविधान प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,सार्वमत चे संपादक स्व.वसंतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान कादर शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकार संघाची भुमिका विषद केली.

यावेळी दूरदर्शनचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी

ज्येष्ठ पत्रकार प्रा.पद्माकर शिंपी सर, बेलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, डॉ.अक्षय शिरसाठ,डॉ. मुस्ताक निजामी, डॉ. तोफिक शेख, ॲड. सुभाषराव जंगले,सामाजिक कार्यकर्ते विजय खाजेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार,उर्दू बचाव कमिटीचे अब्दुल्लाभाई चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिर्झा लालमोहम्मद पठाण, एन एम पी न्यूज चैनल चे संपादक शौकत पठाण,समता फाऊंडेशनचे संस्थापक शौकतभाई शेख, माऊली वृद्धाश्रमचे संस्थापक सुभाषराव वाघुंडे,रेड क्रॉस सोसायटीचे  सुनिल साळवे सर, एमआयएमचे उत्तर जिल्हाध्यक्ष आदिल  मखदुमी,पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख (SS),,पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इम्रान एस. शेख, समाजवादी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव केदारे, पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूरभाई पठाण,नाशिक जिल्हा सचिव वहाबखान पठाण,पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा.ज्ञानेश्वर गवळी, प्रा.पद्माकर शिंपी,ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, ॲड.सुभाषराव जंगले, कॉम्रेड सुखदेव केदारे,चांदवड येथील पत्रकार फिरोज पठाण, पत्रकार संघाचे  प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार,पत्रकार मन्सूर पठाण, एमआयएमचे आदिल मखदुमी,अब्दुल्लाभाई चौधरी, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली.

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांच्या हस्तलिखित पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय शेठ बाफना यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.अक्षय दिलीप शिरसाट, डॉ. मुस्ताक निजामी, डॉ. तोफिक शेख,अध्यापक सुनील साळवे सर, अध्यापिका रेहाना गणी मुजावर मॅडम, सुभाषराव वाघुंडे,आदिल मखदुमी, फिरोज सुलतान पठाण,जोएफ युनूस जमादार, अझहर हनीफ शेख,सय्यद मिर्झा लालमोहम्मद पठाण, देविदास अगस्ती देसाई, विजय शांताराम शेलार, उस्मान के. शेख, मुजम्मिल भैय्या शेख, सुखदेव सोमा केदारे, नवनाथ खुरसणे, सूर्यकांत शंकर गोसावी, सखाराम मोतीराम पगारे,शौकत अब्दुलकादर शेख,अब्दुल्ला हसन चौधरी, शहानवाज चांद बेगमपुरे, मन्सूरभाई पठाण,वहाबखान मेहबूबखान पठाण,असलम अवद बिनसाद, मोहम्मद हनीफ तांबोळी, आदी मान्यवरांच्या कार्यांचा सन्मान करत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास आर के न्यूज चे संपादक राहुल कोळगे, पत्रकार संघाचे बेलापूर शाखाध्यक्ष मुसा सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, पत्रकार कासमभाई शेख, पत्रकार एजाज सय्यद,पत्रकार रसूल सय्यद, पत्रकार बानूबी पठाण, पत्रकार संगीता भालेराव, पत्रकार आरती सोनवणे, पत्रकार अनिसभाई शेख, आफताब शेख, पत्रकार अबुजर शेख, एमआयएमचे उत्तर जिल्हा युवा अध्यक्ष सादिक शेख, आदि मान्यवरांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी केले, तर आभार पत्रकार मोहम्मद हनीफभाई तांबोळी यांनी मानले.

बेलापूर (वार्ताहर) येथील गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवा निमित्त  नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  ना.राधाकृष्ण विखे पाटील चषक दोन दिवसीय  भव्य  खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती संयोजन प्रमुख जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.


या स्पर्धेसाठी गावकरी मंडळाच्या वतीने प्रथम बक्षिस रू.५१ हजार, तेजराज आर. एम. सी. बाय चव्हाण कन्स्ट्रक्शन, श्रीरामपूर यांच्या तर्फे द्वितीय बक्षिस रू.४१ हजार,सुरेश नारायण शिंदे, बेलापूर यांच्या वतीने तृतीय बक्षिस रु.३१ हजार आणि सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या तर्फे चतुर्थ बक्षिस रू.२१ हजार ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ठ संघ, उत्कृष्ठ चढाईपटू, उत्कृष्ठ पकड पटू आणि उत्कृष्ठ खेळाडू अशी प्रत्येकी रू. ५ हजार १०० ची चार बक्षिसे अनुक्रमे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी,देवा ग्रुप बेलापुर,साई फर्निचर,रामगड व कृष्णा कलेक्शन श्रीरामपूर यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. तसेच रविवार दि.५ रोजी  कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते व महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजने व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सर्वश्री अनिल पटारे (९४२२२९०३९३), बंटी शेलार (९८३४३८०९३५), गिताराम पवार सर (९४०३७०१००७) या भ्रमण ध्वनी क्रमांकासह सतीश सोनवणे, मयुर जाधव, विकी अमोलिक, मोईन शेख यांच्याशी सातशे रुपये प्रवेश शुल्कासह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरातील मोठ्या संख्येने  कबड्डी संघांनी या खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही संयोजक मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक पा.खंडागळे यांच्यासह स्वागतोत्सुक समस्त गावकरी मंडळ, बेलापूर कबड्डी संघ आणि बेलापूर - ऐनतपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी  )-धान्य दुकानदारांनी पी एम धान्य योजनेचे वाटप केलेले कमिशन त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार असुन यापुढील मोफत धान्य वाटपाचेही कमिशन दुकानदारांच्या खात्यावर वर्ग केले जाईल असे अश्वासन जिल्हा पुरवठाअधिकारी जयश्री माळी यांनी दिले                   जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्य वतीने निवेदन दिले त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा आधिकारी माळी यांनी वरील अश्वासन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे धान्य दुकानदारांनी वाटप केले असुन त्याचे कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे माहे एप्रिल 2021  महीन्यात वाटप केलेल्या राज्य शासनाचे एक महीन्याचे पैसे ताताडीने  मिळावे जानेवारी 2023 पासुन मोफत धान्य वितरण करण्याचे शासनाचे आदेश असुन मोफत धान्य वाटपामुळे दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे दुकान भाडे विज बिल मापाडी यांचा खर्च कसा भागवावा याचे संकट दुकानदारापुढे उभे आहे त्यामुळे मोफत वाटपाचे कमिशन दर महा खात्यावर जमा व्हावे  माहे आँक्टोंबर नोव्हेंबर  डिसेंबर या महीन्याकरीता दुकानदारांनी चलन भरले असुन पैसे भरुन दुकानदारांना ते धान्य उशिरा जानेवारी महिन्यात मिळाल्यामुळे त्याचे वितरण मोफत करावे लागले त्यामुळे ते चलनाचे भरलेले पैसे विनाविलंब मिळावे दुकानदारांना धान्य दुकानात मोजुन मिळावे त्या करीता प्रत्येक गाडीत वजनकाटा असावा आदि मागण्याचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना देण्यात आले त्या वेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे श्रीरामपुर तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget