Latest Post


बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले.                                 येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील करून ऋषिकेश साहेबराव वाबळे याची दक्षिण आफ्रिकेतील डरबान शहराजवळ जवळील केप टाऊन येथे साखर कारखान्याच्या व्यवस्थापना संबंधित सॉफ्टवेअर तयार करण्याचे व  अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करण्याकरता निवड झाली असून त्याच्या या निवडीमुळे श्रीरामपूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा असा वर्षोव होत आहे                               बेलापूर येथील ऋषिकेश वाबळे हे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव रामराव वाबळे यांचे चिरंजीव आहेत .त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेलापूर येथील जेठाभाई ठाकरशी सोमय्या हायस्कूल येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी एमआयटी कॉलेज पुणे येथून बी टेक एम बी ए ॲग्री अँड फूड मॅनेजमेंट पदव्या संपादन केल्या शिक्षणाच्या काळात त्यांनी साखर उद्योग आणि कृषी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी कठोर मेहनत घेऊन शिक्षण व कौशल्याच्या जोरावर थेट परदेशात आपली छाप उमठविली आहे .याप्रसंगी अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, आमदार हेमंत ओगले, अरुण पाटील नाईक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके ,बाळासाहेब भांड,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, संजय गोरे ,लहान भाऊ नागले ,अशोक राशिनकर, बाजार समितीचे सर्व संचालक सभासद व व्यापारी वर्गांनी ऋषिकेश वाबळे त्याचबरोबर सचिव साहेबराव वाबळे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. बेलापूरच्या मातीतून घडलेल्या ऋषिकेश वाबळे यांनी आज जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करुन दिली आहे .

गेली वीस-बावीस वर्षांपासून उक्कलगाव गणातील कार्यक्षेत्रात उक्कलगाव गळनिंब एकलहरे कुरणपूर फत्याबाद मांडवे कडीत खंडाळा चांडेवाडी तांबेवाडी यादी भागात सामाजिक कामात कार्यरत असून व नात्यागोत्याचा मोठा जाळं मित्रपरिवार मोठा असून या परिसरातील सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे केले असून उक्कलगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी असे सर्व सामान्यांचे आग्रही भूमिका व लागेल ती मदत करणार असल्याचे  ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे संदीप शेरमाळे यांनी सांगितले.

   कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, तांबेवाडी,फत्याबाद, चांडेवाडी, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, जवाहरवाडी, यादी परिसरात अनेक प्रश्न त्यामध्ये 

वीज, पिण्याचे पाणी,बिबट्या कडून हल्ल्या, हॉस्पिटलचे प्रश्न, बांधकाम कामगार, रस्ते, रेशनचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार, अपंग, एकल महिला, बालसंगोपन प्रकरणही मोठ्या प्रमाणावर या परिसरात राबवले आहे.कोरोना काळातही मोठं काम असून  महिला बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे काम यापूर्वी केलेले असून  मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. आतापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी हे गावात कोणालाच माहीत नव्हते. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दुकानात त्यांचा शिक्का व सही उपलब्ध होती त्याचा हे उल्लेखनीय काम विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेले आहे. या सामाजिक कामाबद्दल गळनिंब येथील व प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुकीत उभं करून बिगर खर्च निवडून आणले ते गळनिंब ग्रामपंचायतचे दहा वर्षे सदस्य असून श्रीरामपूर न्यायालयाच्या विधी सेवा समिती चे तीन वर्षे काम केले. याव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक काम फार मोठे असून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले असून या पाच गावे वाड्या वरती ४२ मावस भाऊ,सासरवाडी घरातील सर्वांची, भावाची  सासरवाडी याच पाच गावात  असल्याने मोठे नातेगोते  व मित्रपरिवार  मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यात या भागातून जाणारा कोल्हार बेलपिंपळगाव रस्ता याचे काम देखील त्यांच्या रेट्यामुळे झाले. फत्याबाद मधील असणारे कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गटार त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काँग्रेटीकरण करून रस्ता उंचावण्यासाठीचा प्रस्ताव करण्यात आला. या ठिकाणी बोलले जाते. उक्कलगाव  प्रवरापट्ट्यातील पाच गावांच्या विकास कामासाठी त्यांचं मोठे प्रयत्न राहिले असल्याने परिसरातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे त्यांनी उकलगाव गनातून पंचायत समिती निवडणूक लढवावी.


श्रीरामपूर (10 ऑक्टोबर 2025) : श्रीरामपूर तालुका शालेय क्रीडा खो-खो  मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धांचा आज चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूरच्या क्रीडांगणावर जल्लोषात शुभारंभ झाला. या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे (चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, पर्यवेक्षक विजय दळवी, परीक्षा विभाग प्रमुख प्रमोदकुमार राऊत, क्रीडा शिक्षक श्री. सुनील बनसोडे, प्रा. बाळासाहेब शेळके, तसेच श्रीरामपूर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री. काकासाहेब चौधरी व सचिव श्री. संभाजी ढेरे उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांचा सत्कार काकासाहेब चौधरी यांनी केला, उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद यांचा सत्कार पुंडलिक शिरोळे सरांनी, तर प्रा. सुभाष देशमुख यांचा सत्कार विजय गाडेकर सरांनी केला. तसेच काकासाहेब चौधरी यांचा सत्कार प्राचार्य कांबळे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रा. बाळासाहेब शेळके यांनी केला.

प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “आयुष्यात प्रत्येकाने एक खेळ तरी खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते.”

यानंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय गाडेकर सरांनी केले.

बेलापूरः (प्रतिनिधी)-येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच)विद्युत  सबस्टेशनला  स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाली असुन या प्रश्नाबाबत वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन हे काम मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.  या बाबत माहिती देताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की तालुक्याचे विविध प्रश्न आमदार या नात्याने सतत विधानसभेत मांडत असतो . श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथील सब स्टेशनला अनेक गावे जोडलेले असल्यामुळे या सबस्टेशनवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी भार नियमनाचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आपण बेलापूरकरता स्वतंत्र उपविभाग देण्याची मागणी केली होती .  व त्याबाबत सतत पाठपुरावाही केला होता.या मागणीची दखल घेवुन बेलापूर करीता स्वतंत्र विभाग व बारा कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्याचे आदेश नुकतेच करण्यात आलेले आहे याबाबत राज्यमंत्री मेघना दीपक साकोरी बोर्डीकर यांनी आपणास  पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व आपण केलेल्या प्रयत्नामुळे महावितरण मार्फत नवीन उपविभाग व शाखा कार्यालय निर्माण करण्यास अंतरी मंजुरी मिळाली असून याबाबत महावितरण स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आपण केलेल्यां पाठपुराव्यामुळेच या कार्यालयामार्फत सदर जनहिताचे काम मार्गी लागले असल्याचे पत्र राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे यांनी दिले असल्याचेही आमदार ओगले यांनीसांगितले ,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचेही आमदार ओगले यांनी सांगितले .

बेलापूरःयेथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच्)विद्युत  सबस्टेशनला पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून दर्जावाढ होवून स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.                      याबाबत श्री.नवले व श्री .खंडागळे यांनी सांगीतले की,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी पालकमंञी नाम.विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजय विखे पा. व महावितरणचे अधिकारी यांचेकडे बेलापूर,ऐनतपूर,उक्कलगाव,एकलहरे,वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,कान्हेगाव येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळळाने सातत्याने पाठपुरावा केला होता.                            या शिष्टमंडळात  शरद नवले अभिषेक खंडागळे यांच्यासह बेलापूरच्या सरपंच सौ.मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, रणजीत श्रीगोड,जालिंदर कु-हे ,भाऊसाहेब कुताळ, रामराव शेटे, विराज भोसले,किशोर बनकर, विष्णुपंत डावरे,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,अनिल गाडे, बंडू तोरणे, प्रशान्त लिप्टे, मुकुंद लबडे ,महेश खरात, हाजी इस्माईलभाई शेख,मोहसीन सय्यद, शफिक बागवान, मुश्ताक शेख,लाल महम्मद जाहगीरदार, गणेश उमाप,रावसाहेब अमोलिक ,सुभाष अमोलिक ,दिलिप अमोलिक ,भाऊसाहेब तेलोरे, अनिल थोरात, प्रकाश राजुळे, प्रभात कु-हे , महेश कु-हे,अजीजभैया शेख  आदिंचा  समावेश होता. शिष्टमडळ नेवून पाठपुरावा केला होता.                         सदर प्रयत्नास अखेरीस यश येवून बेलापूर उपविभागास मान्यता मिळाल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी कळविले आहे.सदरचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल नाम.राधाकृष्ण विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजयदादा विखे पा.,महाविरणचे उपअभियंता श्री.वाणी,श्री.भोगले,श्री.अवचिते यांना धन्यवाद दिले आहेत.

श्रीरामपूर : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन व कामकाजाच्या दृष्टीने नव्याने जिल्हा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- जिल्हाधिकारी अहिल्यानगर,उपाध्यक्ष- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अहिल्यानगर. सदस्य- डॉ.अभिजीत दिवटे प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर,श्री. संजय साळवे वैद्यकीय सामाजिक अधिकारी रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर अशासकीय सदस्य,श्री.बबन मस्के अशासकीय सदस्य,श्री. रत्नाकर ठाणगे अशासकीय सदस्य,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अहिल्यानगर सदस्य सचिव ही कमिटी दिव्यांगांच्या पुनर्वसनात्मक कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात कामकाज पाहणार आहे.

      संजय साळवे यांनी अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र तसेच मूकबधिर विद्यालय संचलित दिव्यांग कल्याण मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र मार्फत दिव्यांगांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, व सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान योगदान दिलेले आहे. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 58 दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.     त्याचबरोबर जिल्हा परिषद 5% सेस फंडातून 38 दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे.

       मागील पंचवीस वर्षापासून दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग वधु वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजगायत 288 दिव्यांग व्यक्तींचे विवाह मोफत संपन्न करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत आत्तापर्यंत 14 दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवरील सायकल उपलब्ध करून दिले आहे.तसेच अनेक दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर,कुबडी व इतर कृत्रिम साहित्य उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

     त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे

      दरवर्षी दिव्यांग महिला सन्मान सोहळा,संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय  योजना,स्वतंत्र रेशन कार्ड, याचा लाभ दिव्यांगांना मिळवून दिला आहे. अलीमको नवी दिल्ली, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर मार्फत मोफत हातपाय मोजमाप व कॅलिपर्स  मोजमाप तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करून 112 दिव्यांगांना याचा लाभ मिळवून दिला आहे.

     त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच त्यांची निवड जिल्हा व्यवस्थापन समितीवर करण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक डॉ.दीपक अनाप, दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget