Latest Post

संगमनेर: ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक केवळ धार्मिक उत्साहापुरती मर्यादित न राहता, यावर्षी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवणारी ठरली. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणुकीनुसार शांतता, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत विविध गटांनी इथे मिलादुन्नबी, पैगंबर जयंतीदरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

यात ​एका स्वयंसेवक गटाने मिरवणूक ज्या मार्गाने गेली, त्या मार्गाची तात्काळ स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीतून 'स्वच्छता हाच धर्म' असा संदेश देण्यात आला. या तरुणांनी मिरवणुकीचा उत्साह कायम राखत सामाजिक भान जपले, ज्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.तर एका गटाने महा​आरोग्य शिबिराचे आयोजन ते देखील मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार व औषधे अश्या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिला गेला. धार्मिक उत्सवादरम्यान आरोग्यसेवेसारख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.​काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी आणि शांततेच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या विचारांचे फलक तसेच ऐतिहासिक आठवणीतल्या पुरातन काळातील वस्तू आणि माहितीपत्रके घेऊन लोकांना सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.


​एकंदरीत, यावर्षीची ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक धार्मिक उत्साहासह सामाजिक कार्याचा एक आदर्श बनली आहे. या उपक्रमांनी पैगंबरांच्या शिकवणुकीला केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही लोकांपर्यंत पोहोचवले. याचीच दखल घेत ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, पुरस्कार जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी अशा एकूण पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या  शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3=00 वाजता  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सय्यद बाबा चौक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद अहिल्यानगर  महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख, महासचिव जमीर शेख, यांनी दिली आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आटवाडी, एकलहरे येथे मोठी कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपी अमजद नौशाद सय्यद (वय ३०, रा. आटवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) हा सध्या फरार आहे.


गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. आरोपी अमजद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये विमल ब्रॅण्डचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला.

तसेच घरामध्येही प्रतिबंधित मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या उपस्थितीत घराचे कुलूप उघडण्यात आले. घराची झडती घेतली असता तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला व तंबाखू सापडला. सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,०६,१८४/- एवढी असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे यांना तातडीने कळविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेला बंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही अशा अवैध व्यापाराविषयी माहिती पोलिसांना दिल्यास तातडीने कडक कारवाई केली जाईल.

बेलापूर (प्रतिनिधी)--अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टार नंबर 917/25  कलम 64(1) Bns 

सह 4,8,12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लॉज मालक,वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने  यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम वाढ करून त्यास अटक केली असून. न्यायालयाने  आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

     यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीस गुन्हा करण्यास मदत केली म्हणून सदर लॉजच्या मालकास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे 

    

    बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार आरोपीला  आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम  कारावासाची शिक्षा व द्रव्य दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.

     जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान लॉज /हॉटेल चालक, मालक यांचा निष्काळजीपणा व अप्रत्यक्ष /प्रत्यक्ष सहभाग दिसन आल्यास  वरील प्रमाणेच हॉटेल मालक लॉज मालक कॅफे रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल लॉज कॅफे मालकांनी याची खबरदारी घ्यावी की आपण रूम देताना अल्पवयीन मुला-मुलींना तर रूम देत नाही ना वयाची पडताळणी करूनच आपला व्यवसाय करावा अन्यथा चुकीचे काम केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे

बेलापूरः गावकरी मंडळ व  ग्रामस्थ बेलापूर बु -ऐनतपूर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रविवार (दि.३१)होणाऱ्या चिञकला स्पर्धा बेलापूर-ऐनतपूर येथील मुलांसाठी मर्यादित आहे.स्पर्धा दोन गटात होणार आहे.छोटा गट((इयत्ता १ली ते ४ थी*)करिता मुक्त चित्र हा विषय आहे.यासाठी

प्रथम क्रमांक रु. ११११/-(श्रेया मोटर्स,श्रीरामपूर रोड, )

द्वितीय क्रमांक रु. ७७७/-(शुभम जनरल व झेरॉक्स)तर तृतिय क्रमांक:-रुपये ५५५/-

(गुरुकृपा फोटो स्टुडीओ.)याप्रमाणे बक्षिसे असतील              

       मोठा गट ( इयत्ता ५ वी ते १० वी.)करिता

 माझे आवडते व्यक्तीमत्व, ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रसंग,

ऑपरेशन सिंदूर असे विषय आहेत.या गटासाठी प्रथम क्रमांक रु. २२२२/-

(भागवत प्रतिष्ठान,बेलापूर बु.)

द्वितीय क्रमांक:-रुपये ११११/-(श्री. रामेश्वर सोमाणी, व्हा.चेअरमन, गावकरी पतसंस्था, .) तरतृतीय क्रमांक रु. ७७७/-

(विशाल मंडप डेकोरेटर्स.)याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.       

        चित्र काढण्यासाठी कागद संयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धकांना चित्र स्पर्धेच्या दिवशी निर्धारित वेळेतच काढून पूर्ण करावे लागेल. चित्र काढण्यासाठी व रंगविण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी आणावे. स्पर्धकांनी रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजे पर्यंत संत सावता मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)या ठिकाणी उपस्थित राहावे. स्पर्धकांनी आपली नावे               

 प्रमोद जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. हेमंत मुथ्था मो. ८८३०८४८०९०) सुदर्शन सुपर शॉपी, मेनरोड, बेलापूर बु (श्री. सुधीर करवा, मो.९०११७९४४९८)व

महावीर शॉपी & जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. संतोष ताथेड, मो.८७९३६३७२६३)येथे नोंदवावीत जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

पत्रकारितेचा वारसा आणि सामाजिक बांधिलकीची अनोखी गाथा - धिरज शिवपालसिंह ठाकूर

आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात 'दैनिक प्रवरातीर'सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.

धिरजचा जन्म मूळ गावी, श्री संत नगरी शेगाव येथे झाला. मात्र, तो अवघ्या दोन वर्षाचा असतानाच शिवपालसिंह संगमनेरच्या भूमीत स्थायिक झाले, शिवपालसिंह कोणताही पूर्वानुभव पाठीशी नसताना पत्रकारितेची नवी इनिंग सुरू करण्यासाठी संगमनेर शहरात आले. लहानपणापासूनच धिरजला कुटुंबातील कष्टाचे आणि स्वाभिमानी वातावरणाचे बाळकडू मिळाले. अवघ्या आठ वर्षांच्या धीरजने संगमनेरच्या अकोले नाक्यावर पेपर स्टॉल चालवून वडिलांना मदत करायला सुरुवात केली. हे कष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले.

पत्रकारितेचे धडे आणि 'प्रवरातीर'ची जबाबदारी- शिक्षणासोबतच, धिरजने पत्रकारितेचे धडेही गिरवायला सुरुवात केली. त्याने आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच, वडिलांनी सुरू केलेल्या साप्ताहिक 'प्रवरा माई' वृत्तपत्रात सक्रिय सहभाग घेतला. या काळात त्याने पत्रकारितेच्या सर्व बाजू समजून घेतल्या. मग ती जबाबदारी जाहिरात वितरणाची असो, व्यवस्थापनाची असो, किंवा संपादकीय कामाची असो. त्याने कम्प्युटरशी संबंधित सर्व कामे स्वतः शिकून घेतली. या अनुभवामुळे, शिक्षण पूर्ण झाल्यावर 'दैनिक प्रवरातीर' सुरू करण्याची वेळ आली, तेव्हा धिरजने वडिलांसोबत ही संपूर्ण जबाबदारी समर्थपणे स्वीकारली. गेली दहा वर्षे हे दैनिक धिरजच्या मालकीचे असून, त्याने वडिलांच्या मदतीने प्रवरातीरला यशाच्या शिखरावर नेले आहे. या बाप-लेकाच्या प्रयत्नामुळे दैनिक प्रवरातीर संगमनेरच नव्हे तर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील अग्रगण्य सायं दैनिक बनले आहे.

'दैनिक प्रवरा तीर' हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, ते संगमनेर आणि परिसरातील समाजाचा आरसा बनले आहे. याचे श्रेय जाते धिरजच्या सामाजिक जाणिवेला आणि मनमिळाऊ स्वभावाला. त्याने केवळ जाहिरातदारांना ग्राहक म्हणून न पाहता, त्यांच्याशी मैत्रीचे आणि विश्वासाचे नाते जोडले. त्यामुळे, संगमनेर शहरात त्याचा मोठा मित्रपरिवार आहे, जो नेहमी त्याच्या पाठीशी उभा असतो.

या वृत्तपत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची निष्पक्ष भूमिका. 'प्रवरा तीर'ने नेहमीच सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य माणसांच्या समस्यांना वाचा फोडण्यापासून ते शहरातील राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य करण्यापर्यंत, त्यांनी कधीही कुणाची भीड ठेवली नाही. याचा परिणाम म्हणून, सर्वसामान्यांपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत, सर्वांनाच हे वृत्तपत्र आपलेसे वाटते.

'दैनिक प्रवरा तीर'ने वाचकांच्या मनात स्थान मिळवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यातील 'संगमनेरी ठोका' हे सदर. हे सदर केवळ बातम्या देत नाही, तर ते समाजातील चुकीच्या गोष्टींवर परखडपणे भाष्य करते. हा स्पष्टवक्तेपणा आणि पत्रकारितेतील बाणेदारपणा वाचकांना इतका भावला की, अनेकजण 'प्रवरा तीर'च्या प्रतीक्षेत असतात. यामुळेच, हे वृत्तपत्र अल्पावधीत लोकप्रिय झाले.

धिरजचे वडील, शिवपालसिंह ठाकूर, यांनी आयुष्यभर पत्रकारितेचा स्वाभिमान कधीही सोडला नाही. कुणाचे भाट बनून काम केले नाही. हीच शिकवण धिरजने आत्मसात केली आहे. आजच्या युगात, जिथे अनेकदा पत्रकारितेच्या मूल्यांवर तडजोड केली जाते, तिथे धिरजने आपल्या वडिलांचा बाणा जपला आहे. 'दैनिक प्रवरातीर'च्या यशस्वी वाटचालीमागे हेच नैतिक मूल्य आणि कठोर परिश्रम आहेत. धिरजचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नेहमी मार्गदर्शन करत असतात, ज्यामुळे धिरजचा आत्मविश्वास द्विगुणित होतो.

पत्रकारितेसोबतच, सामाजिक कार्याची जोड देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे 'दैनिक प्रवरातीर' हे वृत्तपत्र केवळ एक व्यवसाय न राहता, एक सामाजिक चळवळ बनले आहे. धिरजच्या नेतृत्वाखाली, हे दैनिक भविष्यातही संगमनेरच्या समाजाचा आवाज बनून राहील, असा विश्वास त्यांच्या वाचकवर्गाला आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन, कष्टाच्या बळावर आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, धिरजने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.

प्रवरातीरच्या माध्यमातून समाजाचा आवाज बनून काम करताना धिरज आपली सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी ओळखून आहे. कमी वयातच जबाबदारी पार पाडताना आपल्या दोन बहिणींच्या विवाह देखील त्याने मोठ्या धुमधडाक्यात लावून दिला. तसेच आईच्या आजारपणाला देखील तो तोंड देत आहे. अशा स्थितीत त्याने जसा शहरात मित्रपरिवार गोळा केला तसाच प्रभागांमध्ये देखील त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक जाणीव प्रगल्भ असल्याने अनेकांचा आवाज म्हणून तो सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावताना दिसतो. पत्रकारितेसोबतच, सामाजिक कार्याची जोड लाभलेल्या धिरजच्या या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा! त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला निरोगी आणि समृद्ध आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!


*📃🖋️सीए कैलासभाऊ सोमाणी.*

बेलापूरः श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा उद्या शुक्रवार(दि.१५)रोजी संपन्न होणार आहे.                                   यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची भव्य शोभायात्रा  तसेच भव्य दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गावर  महिला भगिनींनी  सडा रांगोळी काढणे व प्रत्येकी पाच पणत्या  तेल आणि वातीसह  दिपोत्सवासाठी आणाव्यात .शोभायाञा मिरवणुकीमध्ये कलश घेऊन सहभागी व्हावे सोबत थोडासा प्रसाद आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.                               या भव्य कार्यक्रमाचे   महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार व्हावे.शुक्रवारी १५आॕगष्ट रोजी  सायंकाळी ४ ते ६ वा. या वेळेत श्री केशव गोविंद मंदिर येथुन संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व ६.३० वाजता भव्य दीपोत्सव होईल.तरी भाविकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी  केले आहे.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  रविवार(दि.१७)रोजी स.९ वा. रयत शिक्षण संस्था,सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक  राजेन्द्र घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडु मातीच्या गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा'आयोजित करण्यात आली आहे.                                        शाडु मातीच्या गणपती मुर्ती पर्यारणपुरक मानल्या जातात.याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणेच्या हेतूने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार १७ आॕगष्ट रोजी सकाळी ९ वा. श्री.संत सावता महाराज मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)येथे आयोजित करण्यात आले आहे.                                                           या शिबिरात फक्त बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थी सहभागी होवू शकतील.प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १००विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल.शाडू माती  आयोजक देतील तर पाण्यासाठी आवश्यक भांडे विद्यार्थ्याने सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायत बेलापूर कार्यालयात  सचिन साळुंके(९६५७७११००१),प्रमोद जनरल स्टोअर्सचे हेमंत मुथा(८३०८४८०९,व सुदर्शन सुपर शाॕपीचे सुधीर करवा (९०११७९४४९८)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर बुll व सत्यमेव ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget