Latest Post

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे कच-याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढणार आहे.यादृष्टिने उपाययोजना म्हणून ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञ संकलन करुन भविष्यात त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.                                       यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच मीना साळवी,उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत आधिकारी निलेश लहारे,कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग,प्रेरणा ठाणगे,अनिता पाचपिंड,अॕड.अविनाश साळवी आरोग्य विभागाचे दत्ताञय वक्ते,अविनाश शेलार यांची संयुक्त बैठक झाली.                           सदर बैठकीत वाढत्ती लोकसंख्या व नागरीकरण गृहित धरुन मागील काळात कचरा व्यवस्थापनाबाबत काहिच उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.याचा सारासार विचार करुन राज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी ग्रामपंचायतीस शेतीमंडळाची जी जमीन दिली आहे तिथे  कचरा डंपींग यार्ड केले जाणार आहे.                                                        गावातील ओला व सुका कचरा स्वतंञपणे सकलित करुन गौळा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा, पिशव्या ,पाण्याच्या बाटल्या,कॕरीबॕग्ज,भाजीपाला आवशेष स्वतंञपणे जमा करुन ठेवावेत. ओल्या कचऱ्या मध्ये प्लास्टिक मिसळले गेल्यास कचऱ्याचे विघटन होत नाही व दुर्गंधी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता घेवून सहकार्य करावे.ओला व सुका कचरा घंटा गाडीत स्वतंत्र पणे जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हा जमा झालेला कचरा नियोजित डंपिंग यार्ड येथे टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.यामुळे नजिकच्या काळात कचरा विल्हेवाटिची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.अशातहेने कचरा व्यवस्थापनावर बैठकीसत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेलापूरःतालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले(आबा) यांची बिनविरोध निवड झाली. गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्यादृष्टिने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले.त्यानुसार श्री.चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली.सरपंच मिना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थीतीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे,स्वाती अमोलिक 

,मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक,भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते.त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले,अभिषेक खंडागळे ,प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडाळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिध्द केल्याचे मानले जाते.                                                            निवडीनंतरच्या आभार सभेत  जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक,शांतीलाल हिरण, मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शरद नवले म्हणाले की,पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.,सौ.शालिनीताई विखे पा,माजी खा.डाॕ.सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून  गावाच्या विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधि देण्याची शब्दपूर्ती केली आहे. याप्रसंगी कनजीशेठ टाक,जि.प.सदस्य शरद नवले,जालिंदर कुऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण पा.नाईक ,रणजीत श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,हाजी ईस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,पुरुषोत्तम भराटे,सुधाकर तात्या खंडागळे,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक,अॕड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,अन्वर सय्यद, शफिक बागवान,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,अभिषेक नवले,दिलीप दायमा,श्रीहरी बारहाते,दत्तात्रय नवले,सचिन अमोलिक,भैय्या शेख,बंटी शेलार,भाऊसाहेब तेलोरे,निसार बागवान,अशोक दुधाळ,शाहरुख शेख,व्दारकनाथ नवले,गोपी दाणी,राज गुडे,अजीज शेख,महेश कु-हे,रफीक शेख,सुभाष अमोलिक ,बाबुराव पवार,शहानवाज सय्यद,विशाल आंबेकर,जाकीर शेख,शरद अंबादास नवले,रफिक शेख,अशोक वहाडणे,दादासाहेब कुताळ,गणेश राशिनकर,विनायक जगताप,गोकुळ कुताळ,शाम गायकवाड,शशिकांत नवले,दिपक गायकवाड,संजय गंगातिरवे,निसार आतार,अनिल नवले,शफिक आतार,राजेंद्र नवले,भरत नवले, दिपक प्रधान,पंढरीनाथ गाढे, शुभम नवले अशोक दुधाळ, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड आदि प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

१२ जुलैला रंगणार अंतिम स्पर्धा; विजेत्या संघाला ट्रॉफी व प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार..


कोपरगाव(गौरव डेंगळे): सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा थ्रो बॉल लीग २०२५ साठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी शनिवार, ५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.


या लीगमध्ये प्रत्येक संघात

✅ इयत्ता ९ वी व १० वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ७ वी व ८ वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ८ वी ते १० वी मधील ४ मुलींचा समावेश असणार आहे.


स्पर्धेचे अंतिम सामने शनिवार, १२ जुलै रोजी रंगणार असून, विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येईल. याच दिवशी सर्व संघांचे कर्णधार आणि अधिकृत संघांची घोषणा करण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यात थ्रो बॉल खेळाचा प्रचार-प्रसार करणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. धनंजय देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी श्री. गणेश वाघ व श्री. गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये थ्रो बॉल खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली ( गौरव डेंगळे): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ (National Sports Policy 2025) ला मंजुरी दिली आहे. हे धोरण देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नव्या धोरणाद्वारे भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताला सक्षम स्पर्धक म्हणून घडवण्याचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.

हे धोरण पूर्वीच्या २००१ मधील क्रीडा धोरणाला बदलून नव्या पिढीसाठी तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना केंद्र सरकार,नीती आयोग,राज्य सरकारे,राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू,तज्ज्ञ,तसेच जनतेचा सहभाग घेण्यात आला.


राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ चे पाच प्रमुख स्तंभ:


१ . जागतिक पातळीवरील उत्कृष्टता..


® गवतापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडवण्याच्या योजना.


® ग्रामीण व शहरी भागात स्पर्धात्मक लीग व स्पर्धांचे आयोजन.


® जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रशिक्षक विकास.


® राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे व्यवस्थापन व क्षमतेत सुधारणा.


® क्रीडा विज्ञान, औषधोपचार व तंत्रज्ञानाचा उपयोग.


® प्रशिक्षक,अधिकारी,सहाय्यक कर्मचारी यांचे प्रशिक्षण.



२ . आर्थिक विकासासाठी क्रीडा.


® क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन व भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन.


® क्रीडा क्षेत्रातील उत्पादन व स्टार्टअप्सना चालना.


® खासगी क्षेत्र, CSR, PPP मॉडेलद्वारे गुंतवणूक आकर्षित करणे.


३ . सामाजिक विकासासाठी क्रीडा.


® महिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, आदिवासी व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना.


® पारंपरिक व स्थानिक खेळांना पुनरुज्जीवन.


® क्रीडा क्षेत्रात करिअरला प्रोत्साहन.


® भारतीय प्रवासी व परदेशस्थित भारतीयांना क्रीडा क्षेत्रात सहभागी करणे.


४ . क्रीडा जनआंदोलन म्हणून.


® देशभर क्रीडा व फिटनेस संस्कृती रुजवण्यासाठी अभियान.


® शाळा,महाविद्यालये, कार्यालयांसाठी फिटनेस इंडेक्स.


® सर्वांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करणे.


५ . शिक्षणाशी एकात्मता (NEP 2020 अनुकूल).


® शालेय अभ्यासक्रमात क्रीडांचा समावेश.


® शिक्षक व क्रीडा शिक्षकांना विशेष प्रशिक्षण.


® विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागृती वाढवणे.


६ . रणनीतिक आराखडा.


® क्रीडा क्षेत्रातील मजबूत कायदे व नियमन.


® तंत्रज्ञानाचा वापर – AI, डेटा विश्लेषणाद्वारे प्रगती मापन.


® ठोस उद्दिष्टे, KPI आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी.


® प्रत्येक राज्याने आपले धोरण या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत करणे.


® सर्व मंत्रालये व विभागांचा एकत्रित सहभाग.

येवला (प्रतिनिधी ): येथील एसएनडी सीबीएसई संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ शारदा कोपरगांव (CCS) च्या U-14 आणि U-17 संघांनी प्रभावी खेळ करत दुहेरी विजय मिळवला.दोन्ही संघांनी अनुक्रमे २८ धावांनी आणि ९ गडी राखून विजय मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

U-14 क्रिकेट सामना : शारदा संघाचा २८ धावांनी विजय..


U-14 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शारदा संघाचे नेतृत्व जयदीप दरांगे यांनी केले.

प्रथम फलंदाजी करताना क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने २० षटकांत ९५ धावा केल्या.

फलंदाजीत विहान कसलीवालने १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.सार्थक जाधवने १४ धावा फटकावल्या. हर्षद फुकटेने १० धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत एसएनडी सीबीएसई संघाकडून पार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात एसएनडी सीबीएसई संघ १५.३ षटकांत केवळ ६७ धावांवर गारद झाला.यश पवारने १८ धावा केल्या,तर पार्थ सोनवणेने ११ धावांचे योगदान दिले.शारदा संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. देवासिस मार्कड, हर्षद फुकटे,सार्थक जाधव यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले.

सामना २८ धावांनी जिंकत शारदा संघाने जल्लोष केला.

सामनावीर म्हणून सार्थक जाधव याची निवड झाली,त्याने १४ धावा आणि २ गडी घेत सर्वांचे लक्ष वेधले.


U-17 क्रिकेट सामना : दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीचा दबदबा..


U-17 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई येवला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना एसएनडी सीबीएसई क्रिकेट ग्राउंड,येवला येथे खेळवण्यात आला.

शारदा संघाचे नेतृत्व जय ढाकणे याने केले.एसएनडी सीबीएसई 

 संघाने २० षटकांत १०४/८ अशी धावसंख्या उभारली.शुभम सातारकरने ३६ धावा फटकावल्या तर विजय चव्हाणने १५ धावांचे योगदान दिले.

शारदा संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.विराट घेगडमल व साईराम शेळके यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले तर अर्णव थोरात १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने केवळ १३.२ षटकांत १०५/१ धावा करत सामना ९ गडी राखून सहज जिंकला.प्रेम कसलीवालने ३८* नाबाद धावा करत संघाचा कणा मजबूत केला.ऋतेश सोनपसारेने ३८ धावांची धमाकेदार खेळी केली.साईराम शेळकेनेही १३* नाबाद धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

सामनावीर म्हणून ऋतेश सोनपसारे याची निवड झाली. त्याच्या प्रभावी खेळीमुळे शारदा संघाने हा विजय खेचून आणला.

श्रीरामपूरःगेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर येथून बेपत्ता झालेले आणि पोलिसांना शोधण्यात अपयश आलेले व्यापारी रामप्रसाद चांडक यांचा अखेरीस ठावठिकाणा लगला आहे.श्री.चांडक हे धार्मिक पर्यटन करुन नाशिक येथे त्यांचे साडू श्री.करवा यांचेकडे पोहचले आहेत. चांडक कुटुंबिय त्यांना आणणेसाठी नाशिकला रवाना झाले असून चांडक कुटुंबियांनी याबाबत  पोलिसांना अवगत केले आहे.                                        याबाबतची हकीकत अशी की,रामप्रसाद चांडक हे बेलापूरला त्यांचे मुलासोबत मोटार सायकलवर आले.बेलापूरला ते मुख्य झेंडा चौकात उतरले.त्यानंतर ते बेपत्ता झाले.दोन दिवस शोध घेतल्यावरही तपास न लागल्याने चांडक कुटुंबियांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.त्यानंतरही शोध न लागल्याने व्यापारी तसेच ग्रामस्थांनी पोलिसांनी तपासाला गती देवून चांडक यांचा शोध घ्यावा अशा आशयाचे निवेदन दिले.त्यानंतरही आठवडाभरात पोलिसांना शोध लावण्यात अपयश आले.                             अखेरीस काल शुक्रवारी मध्यराञी श्री.चांडक हे विविध धार्मिकस्थळांना भेटी देवून अखेरीस  नाशिकस्थित त्यांचे साडू सुनील करवा यांचेकडे पोहचले.ते पोहचल्याचे श्री.करवा यांनी किशोर चांडक यांना कळविले.सदरची माहिती मिळाल्यानंतर किशोर चांडक व त्यांचे औरंगाबाद येथील मेहुणे श्री.चांडक यांना आणण्यासाठी नाशिकला गेले.जाताना त्यांनी आम्ही नाशिकला जात असल्याबाबत पोलिसांना अवगत केले.

बेलापूर( प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व राजकीय नेते इंद्रनाथ  पाटील थोरात यांच्यावर  जो हल्ला झाला त्या संदर्भात दाखल गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण द्वारे, व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोठ्या शिताफीने पोलीसांनी किरण रावसाहेब साळवे  वय 34 वर्षे रा. वॉर्ड नं.02 श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन  अटक केली असुन त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.                 पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध करून या घटनेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमा विरुध्द भा द वि  कलम 118(1) 119(1)304(2)115(2)352 351 (2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे,भारत तमनर रविंद्र अभंग, यांनी तातडीने सूत्रे हलवुन श्रीरामपूर येथील किरण रावसाहेब साळवी यास ताब्यात घेतले त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जुनं पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget