बेलापूरच्या उपसरपंचपदी गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड

बेलापूरःतालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले(आबा) यांची बिनविरोध निवड झाली. गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्यादृष्टिने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले.त्यानुसार श्री.चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली.सरपंच मिना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थीतीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे,स्वाती अमोलिक 

,मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक,भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते.त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले,अभिषेक खंडागळे ,प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडाळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिध्द केल्याचे मानले जाते.                                                            निवडीनंतरच्या आभार सभेत  जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक,शांतीलाल हिरण, मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शरद नवले म्हणाले की,पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.,सौ.शालिनीताई विखे पा,माजी खा.डाॕ.सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून  गावाच्या विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधि देण्याची शब्दपूर्ती केली आहे. याप्रसंगी कनजीशेठ टाक,जि.प.सदस्य शरद नवले,जालिंदर कुऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण पा.नाईक ,रणजीत श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,हाजी ईस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,पुरुषोत्तम भराटे,सुधाकर तात्या खंडागळे,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक,अॕड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,अन्वर सय्यद, शफिक बागवान,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,अभिषेक नवले,दिलीप दायमा,श्रीहरी बारहाते,दत्तात्रय नवले,सचिन अमोलिक,भैय्या शेख,बंटी शेलार,भाऊसाहेब तेलोरे,निसार बागवान,अशोक दुधाळ,शाहरुख शेख,व्दारकनाथ नवले,गोपी दाणी,राज गुडे,अजीज शेख,महेश कु-हे,रफीक शेख,सुभाष अमोलिक ,बाबुराव पवार,शहानवाज सय्यद,विशाल आंबेकर,जाकीर शेख,शरद अंबादास नवले,रफिक शेख,अशोक वहाडणे,दादासाहेब कुताळ,गणेश राशिनकर,विनायक जगताप,गोकुळ कुताळ,शाम गायकवाड,शशिकांत नवले,दिपक गायकवाड,संजय गंगातिरवे,निसार आतार,अनिल नवले,शफिक आतार,राजेंद्र नवले,भरत नवले, दिपक प्रधान,पंढरीनाथ गाढे, शुभम नवले अशोक दुधाळ, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड आदि प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget