Latest Post

बेलापूरः(प्रतिनिधी )-गावकरी मंडळाने महिलांना गावाचा कारभार करण्याची संधी दिली.पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे व माजी खा.डाॕ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंंचायत विकासाभिमुख कारभार करीत आहे.महिलांना कतृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वावलंबी व आत्मनीर्भर बनून विविध क्षेञात यश मिळवावे असे आवाहन सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले.                                           जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेच्या अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या.याप्रसंगी उपसरपंच प्रियंका कु-हे,माजी उपसरपंच तबसुम बागवान,सदस्या श्रीमती शिला पोळ,प्राथमिक  आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ. अश्विनी लिप्टे,वैद्यकीय अधिकारी डाॕ.सोनल दराडे यांचेसह महिला उपस्थित होत्या.                          .                                     प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य आधिकारी डाॕ.आश्विनी लिप्टे यांनी महिला आरोग्यविषयक सविस्तर माहिती दिली.जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत  तसेच पञकार संघाच्या वतीने सरपंच स्वाती अमोलिक,उपसरपंच प्रियंका कु-हे,सदस्य तबसुम बागवान,शिला पोळ,वैद्यकीय अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे व डाॕ.सोनल दराडे,  जि.प.मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका उदमले मॕडम, बचत गट संघाच्या अध्यक्ष आशा गायकवाड स्वच्छता कर्मचारी सगुणा तांबे त्याचबरोबर सर्पमित्र सौ राजश्री निलेश अमोलिक हिचा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.                                        याप्रसंगी जि.प.सदस्य शरद नवले,पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,देविदास देसाई यांनी मनोगत व्यक्त करुन विविध सुचना केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक खंडागळे यांनी केले तर ग्रामविकास आधिकारी निलेश लहारे यांनी सद्यस्थितीतील कामकाजाची माहिती दिली.यावेळी तंटामुक्तीचे आध्यक्ष बाळासाहेब दाणी, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार  संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष पञकार असलम बिनसाद संजय वाहुळ राजुभाई शेख वंदना गायकवाड दिलिप दायमा,पोलिस पाटिल अशोक प्रधान,दादासाहेब कुतळ, बाबुराव पवार आदि उपस्थित होते.

श्रीरामपूरच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची केली मागणी


मतदारसंघासह राज्याच्या प्रश्नांचा घेतला आढावा

सलीमखान पठाण (प्रतिनिधी)श्रीरामपूर - सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशनामध्ये काल रात्री श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला आणि श्रीरामपूर सह राज्यातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचा जाहीर धिक्कार केला.

काल दिवसभर राज्यपालांचे अभिभाषणावर चर्चा सुरू होती.मात्र सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना फारशी बोलायची संधी दिली नाही.काँग्रेसच्या आमदारांना तर पार शेवटी संधी मिळाली.रात्री साडेसात वाजता आमदार ओगले बोलण्यास उभे राहिले. आपल्या सुमारे बारा मिनिटाच्या घणाघाती भाषणात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.

श्रीरामपूर सह राज्यामध्ये सध्या अतिक्रमणाचा प्रश्न गाजत आहे.सरकारने अतिक्रमण काढताना 08 मार्च 2019 चा जो जी आर आहे.त्यानुसार सर्वांना घरे देण्याचे जाहीर केलेले आहे. 2011 पूर्वीच्या लोकांना ते जिथे राहतात तिथेच घरे देण्याचा शासनादेश आहे.मात्र या आदेशाची पायमल्ली करत अत्यंत निर्दयीपणाने श्रीरामपूरात अतिक्रमणे काढण्यात आली. बाराशे दुकाने आणि 130 घरे जमीन दोस्त करण्यात आली.अनेक प्रपंच रस्त्यावर आले. त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा आता चिंता लागली आहे असे सांगून अतिक्रमण काढताना कोणतीही दयामया दाखवण्यात आली नाही.दोन महिन्यांची बाळंतीण आपल्या बाळाला घेऊन या अतिक्रमण काढणाऱ्या लोकांना आडवी आली तरी तिचे घर जमीन दोस्त करण्यात आले.सध्या हे कुटुंब रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे सांगून मानवता धर्म हा काही प्रकार आहे याची सरकारला जाणीव आहे का असा प्रश्न विचारून त्यांनी सरकारचा धिक्कार केला.


इतर मुद्द्याचा परामर्ष घेताना आमदार ओगले यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच मुंबईतील हिंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम का रखडले आहे ? ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला. 

एकात्मिक औद्योगिक केंद्र व माल वाहतूक केंद्र राज्यामध्ये निर्माण करण्याचे सरकारचे धोरण आहे. यामध्ये अनेक ठिकाणी औद्योगिक भूखंड पडीक आहेत.सदरचे केंद्र श्रीरामपूर येथे व्हावे.या ठिकाणी विमानतळ,चांगले रस्ते, रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एकात्मिक औद्योगिक केंद्र श्रीरामपूरला देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान राबवताना शेतकऱ्यांच्या कापसाला आठ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या उसाला चार हजार रुपये टन भाव द्यावा अशी मागणी केली. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील निवड झालेल्या एक लाख युवकांना गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळालेला नाही. तो त्यांना त्वरित मिळावा तसेच सदरचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा करण्यात यावा अशी ही मागणी त्यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी - शिंगणापूर हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असून दोन्ही तीर्थस्थानांना जोडणारा  नगर मनमाड रस्ता हा गेली अनेक वर्ष खराब झालेला आहे.हजारो माणसे त्या ठिकाणी मेलेली आहेत.तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना योग्य आदेश द्यावेत असे ते म्हणाले. सोयाबीन खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार शोधून काढण्याची मागणी देखील त्यांनी केली. अंगणवाडी सेविका निवड समितीचे अध्यक्ष पद आमदारांकडे होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तसेच एस सी व ओबीसी चे गुण कमी केले आहे.त्यामुळे एससी आणि ओबीसी चे आरक्षण कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न विचारून सदरचे प्रवर्ग आरक्षण नियमित करावे व तोपर्यंत ही भरती स्थगित करावी अशी मागणी त्यांनी केली. 

2011 पूर्वीच्या कॉलेजेसना शंभर टक्के अनुदान द्यावे असेही ते म्हणाले. 

मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये क्रीडा संकुले उभारण्यात यावी, त्यामध्ये श्रीरामपूरचा अग्रक्रमाने विचार करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली. 

घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत सरकार काही उपक्रम राबवीत आहे. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली तसेच संविधानाचा अपमान करण्यात आला.या घटना करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली. 

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील राहणारा मी असून त्या ठिकाणी बहादूरगड किल्ला आहे. या किल्ल्याशी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी निगडित आहेत.तरी सदरच्या किल्ल्या चा राष्ट्रीय स्मारकात समावेश करावा अशी ही मागणी त्यांनी केली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती सुद्धा त्वरित करावी असेही ते म्हणाले.


चौकट

सरकारच्या एकूणच कामकाज करण्याच्या पद्धतीवर आसूड ओढतांना आमदार हेमंत ओगले यांनी आपल्या भाषणात -


*बडी सफाई से झूट बोलते है कुछ लोग,उन्हे खबर भी नही हमे सब कुछ बखुबी मालूम है* 


असा शेर सादर करून आपल्या भाषणाला सुरुवात केली.


*आमदारांचे अभिनंदन*

आमदारकीला निवडून आल्यानंतर हेमंत ओगले यांचे हे दुसरे अधिवेशन होते यापूर्वी नागपूर येथे अल्पकालीन अधिवेशन झाले होते.दोन्ही अधिवेशनात त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न आवर्जून मांडले.यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं.तालुक्याच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करून विधानमंडळात त्यावर आवाज उठविल्याबद्दल आमदार हेमंत ओगले यांचे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे .


चौकट

*पुन्हा ती गांधी टोपी*

काल विधानसभेत आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आमदार ओगले यांनी श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असे वाक्य लिहिलेली गांधी टोपी पुन्हा एकदा प्रधान केली होती. विधानसभेत प्रत्येक वेळी बोलताना ते या टोपीचा वापर करतात त्यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नाला विधानसभेत चालना मिळते कालही आपले भाषण करताना त्यांनी ही टोपी परिधान केली होती. विधानसभेत तो एक चर्चेचा विषय होता.

बेलापूर

( प्रतिनिधीश्री )--दधिमथी वैदिक गुरुकुलच्या वतीने घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या वार्षिक परिक्षेत बेलापुरातील महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवला असुन पुढील धार्मिक विधी परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे त्याकरिता लवकरच तो( काशी) वाराणसी येथे जाणार आहे त्याबद्दल श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला हिन्दुस्तानातील प्रसिद्ध अशा धार्मिक वैदिक संस्कृतीचे शिक्षण देणारा श्री दधिमथी वैदिक गुरुकुल हे  देशात सर्व परिचित आहे हे गुरुकुल गोठमांगलोद जि . नागौर राजस्थान येथे आहे. या शिक्षण संस्थेत सर्व धार्मिक ,वैदिक,सांस्कृतिक विधीचे शिक्षण दिले जाते या गुरुकुलामध्ये सण 2021 मध्ये पत्रकार दिलीप दायमा यांनी आपले चिरंजीव महेश दायमा यास धार्मिक व विधियुक्त पौराहित्य शिकविण्यासाठी पाठविले होते महेश दायमा याने तीनही वर्षात सलग प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तृतीय वार्षिक परिक्षेत  सर्वोच्च गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक पटकवीला. काल श्रीदधिमथी वैदिक गुरुकुल राजस्थान येथे श्रीरामंदिर आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पुज्य श्रद्धेय स्वामी गोंविंददेव गिरीजी महाराज याच्या शुभहस्ते महेश दायमा याचा सत्कार करण्यात आला. गुरुकुल संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता . त्यावेळी आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या महेश दायमायाने प्रथम प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना विशेष आनंद झाला महेश दायमा याने ॐ चैरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतही सर्वोत्कृष्ट गुण मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले होते त्याच्या या चमकदार कामगीरी मुळे महेश दायमा याची आता पुढील वैदिक व सांस्कृतिक परिक्षेसाठी श्रीक्षेत्र वाराणसी ( काशी ) उत्तर प्रदेश येथे निवड करण्यात आली आहे आहे . वैदीक गुरुकुल शिक्षणात महेश दायमा याला श्री. दधिमथी वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिणारायण व्यास, कोषाध्यक्ष जयकिशन, संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी, निदेशक सुभाष मिश्रा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. महेश दायमा याच्या या यशाबद्दल आमदार हेमंत ओगले जेष्ठ पत्रकार मनोज आगे, अरुण पा . नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले , श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,  बाळासाहेब आगे, भास्करराव खंडागळे अभिनंद केले.  .

श्रीरामपूर तालुक्यातील भामानगर येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असलेल्या या दिवशी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान शिव हे संहारकर्ता आणि पुनरुत्थान करणारे देव असून, ते भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करतात. ते त्रिमूर्तींपैकी एक असून सृष्टीचा समतोल राखतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, असे मानले जाते. तसेच, या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. शिवभक्त या दिवशी उपवास करतात, जागरण करतात, मंत्रजप व अभिषेक करून भगवान शिवाची आराधना करतात.

    भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून प्रगट झालेल्या अग्निनारायणाचाच अवतार म्हणजे अडबंगनाथ महाराज आहे. असा हा पवित्र अडबंगनाथ जन्मोत्सव व महाशिवरात्री उत्सवाची प्रथा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांनी घालून दिलेली आहे. त्यामुळे या दिवसाला गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने विशेष महत्व आहे.

   अश्या या विशेष दिवशी अत्यंत उत्साहाने विविध धार्मिक  कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांची सुरुवात बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नाथांचा अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता ज्या भावीकांचे धर्मनाथ बीज उत्सवासाठी अनमोल योगदान लाभलेले आहे अशा भाविकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन होईल. तसेच दु.12 वाजता ओम चैतन्य अडबंगनाथ जन्मोत्सव साजरा होईल.

  तद्नंतर खिचडी महाप्रसाद श्री.अर्जुन आप्पा लोखंडे पाथरे  यांच्या वतीने होईल व संतपूजन श्री.बाळासाहेब वाकचौरे नाशिक यांच्या वतीने होईल. 

या दिवशी हजारो भाविकांना अडबंगनाथांचे दर्शन घेण्याचा अभूत पूर्व योग प्राप्त होणार आहे.भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सोहळा भाविकांसाठी अपूर्व आनंद देणारा ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री अडबंगनाथ मंदिरात आध्यात्मिक लहरींनी भारलेले वातावरण अनुभवता येणार आहे. भव्य दिव्य असा महाशिवरात्री व अडबंगनाथ जन्मोत्सव आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी दिवसभर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अन्नक्षेत्र, गुरुकुल चालू आहे तरी आपणास कार्यक्रमासाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन श्री क्षेत्र अडबगनाथ देवस्थानचे महंत अरुणगीरीजी महाराज यांनी केले आहे 


तसेच हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )--श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी असलेले श्रीकिसन मुंदडा यांचे सुपुत्र डॉक्टर अतिश मुंदडा यांना असोसिएशन ऑफ फॉर्म्युसुटिकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एकदिवसीय परिषदेत डॉक्टर एस जी वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   छत्रपती संभाजीनगर येथे १५फेब्रुवारी रोजी झालेल्या असोसिएशन ऑफ फार्मासुट्टीकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एक दिवशीय परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात चांदवड येथील एस एन जे बी संचलित श्रीमान सुरेश दादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉक्टर अतिशकुमार श्रीकिसन मुंदडा यांना *डॉ. एस. जी. वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर* या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. सोहन चितलांगे तसेच महाराष्ट्र शाखेचे प्रेसिडेंट डॉ. राकेश सोमानी व व्हाईस प्रेसिडेंट डॉ. स्वरूप लाहोटी आणि डॉ. शिरिष जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आठवडाभरापूर्वीच डॉ . मुंदडा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दोन मानाच्या पुरस्कारावर डॉ. मुंदडा यांनी मोहर लावल्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गौरव डेंगळे/उत्तराखंड :उत्तराखंड राज्याला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले.उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे.उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये खेळाडूंनी ५८ नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापैकी नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत आणि ४९ राष्ट्रीय खेळांचे विक्रम आहेत.विक्रम करण्यात धनुर्विद्या आघाडीवर आहे,त्यात २२ नवीन विक्रम झाले.अॅथलेटिक्स १६ विक्रमांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅथलेटिक्समध्ये एक,पोहण्यात दोन आणि वेटलिफ्टिंगमध्ये सहा विक्रम झाले आहेत.तर राष्ट्रीय खेळांच्या विक्रमांमध्ये, धनुर्विद्यामध्ये २२, अॅथलेटिक्समध्ये १५, पोहणे आणि वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी ०६ विक्रम आहेत.

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सर्वाधिक २२ विक्रम झाले. झारखंडच्या ऑलिंपियन दीपिका कुमारीने चार राष्ट्रीय खेळांमध्ये विक्रम प्रस्थापित केले.तिने ७० मीटर, २x७० मीटर, महिला संघ आणि मिश्र संघात हा विक्रम केला आहे. या राष्ट्रीय खेळांमध्ये तिरंदाजीमध्ये उत्तराखंडने फक्त एकच विक्रम केला आहे. उत्तराखंडच्या आदर्श पनवारने भारतीय फेरीत दोन राष्ट्रीय खेळांचे विक्रम मोडले.


राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे उत्तराखंड हे १२ वे राज्य बनले!!!


स्थापनेच्या २५ व्या वर्षाच्या सुरुवातीला, उत्तराखंडने राष्ट्रीय खेळांचे आयोजन करून देशभरात क्रीडाभूमी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तराखंड हे राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे देशातील १२ वे राज्य बनले आहे.

१९२४ मध्ये देशात भारतीय ऑलिंपिक खेळ सुरू झाले. मग शहरांना यजमानपद देण्यात आले. १९३८ पर्यंतच्या ८ आवृत्त्यांपैकी ३ स्पर्धा लाहोरमध्ये झाल्या.त्यानंतर, १९४० पासून त्याचे नाव बदलून राष्ट्रीय खेळ असे करण्यात आले. १९४० ते १९७९ पर्यंत, १७ आवृत्त्या शहरांनी आयोजित केल्या होत्या.

कटक, मद्रास आणि लाहोर येथे खेळ दोनदा आयोजित करण्यात आले होते.परंतु १९८५ मध्ये,२६ व्या राष्ट्रीय खेळांपासून,त्याचे स्वरूप बदलण्यात आले आणि ते ऑलिंपिक स्वरूपाच्या धर्तीवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये राज्यांना खेळांचे आयोजन देण्यात येऊ लागले.१९८५ मध्ये दिल्ली पहिले यजमान बनले.

तेव्हापासून,२०२५ पर्यंत १३ आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत आणि उत्तराखंडला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले. उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे. तर केरळमध्ये दोनदा खेळ आयोजित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य आजपर्यंत राष्ट्रीय खेळांचे आयोजन करू शकलेले नाही.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पुण्याहून जम्मूतावीला जाणारी व जम्मूतावीहून  पुण्याला येणारी झेलम एक्सप्रेस ही गाडी १६ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पत्रकार देण्यात आली आहे.

जम्मू येथे रेल्वे यार्ड चे मोठे काम सुरू  असल्याने सुमारे ३७ दिवसांसाठी वेगवेगळ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये पुण्याहून जम्मूतावीला जाणारी 11077 क्रमांकाची गाडी १७ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहे तर जम्मूतावीहून पुण्याला येणारी 11078 क्रमांकाची गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत बेलापूर म्हणजे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येणार नाही.त्यामुळे सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे.

दरम्यान मध्ये रेल्वेने झेलम रेल्वे १६ दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगर व श्रीरामपूर मधील प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या भागातून मोठ्या संख्येने प्रवासी वैष्णोदेवीसाठी या गाडीने जम्मूतावी ला जातात तसेच दिल्ली आणि पंजाब मधील अनेक गावांना जाण्यासाठी ही थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे खात्याने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्लीपर्यंत सुरू ठेवायला पाहिजे होती अशी अपेक्षा बंटी गुरुवाडा,सलीमखान पठाण,अशोक उपाध्ये,राजेंद्र सोनवणे, अयाज तांबोळी यांनी व्यक्त केली.रेल्वेच्या या तुघलकी निर्णयाने प्रवाशांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे.सध्या लग्नसराई व परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget