Latest Post

मानवता संदेश फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आजच्या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील वातावरणाचा विचार करता वृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे .वृक्षारोपणासाठी सर्व प्रकारची मदत आपण करू. आज जे वृक्षारोपण होत आहे त्यासाठी जाळ्या सुद्धा उपलब्ध करून देऊ .मानवता संदेश फाउंडेशनने हाती घेतलेले कार्य खरोखर मानवतेसाठी उपयुक्त आहे .सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक काम उत्कृष्टपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले.


मिल्लत नगर भागात मानवता संदेश फाउंडेशन व जॉगिंग ट्रॅक कमिटी तर्फे कॅनल साईडला मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक पत्रकार सलीमखान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार कानडे,माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये,

अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, जोएफ जमादार यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते.

मिल्लत नगर परिसरातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लवकरच आपण सोडवू त्यासाठी नगरपालिकेत सर्व विभागांची बैठक बोलावून सर्व समस्या मार्गी लावू.शहरांमध्ये आपण जे काही काम केले आहे ते आपल्यासमोर आहे. जनतेने मला लोकप्रतिनिधी केल्यामुळे जनतेची कामे करण्याचा मी प्रयत्न केला असे ही ते म्हणाले.

युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले.श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी आपल्या भाषणामध्ये सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये आम्ही सर्वजण काम करीत असून सामाजिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी त्यांचे मोलाची योगदान आहे. वृक्षारोपण करणे हे एक पुण्याचे काम आहे. हे काम सर्वांनीच पुढे नेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. शेवटी ॲडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

यावेळी विविध प्रकारच्या साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

आमदार कानडे, अनुराधाताई आदिक, सचिन गुजर,सिद्धार्थ मुरकुटे,अशोक उपाध्ये, अहमद जागीरदार, आयाज तांबोळी, साजिद मिर्झा,तौफिक शेख,सुनील साळवे, , सतीश म्हसे,नगरसेवक मुक्तार शाह, कलीम कुरेशी,पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार, रज्जाक पठाण,डॉ. सलीम शेख,तौफिक शेख, मुख्तार मणियार, मेहबूब प्यारे,अश्फाक शेख, महबूबअली शाह, जोएब जमादार, मुश्ताक शेख, शन्नू दारूवाला,

शौकत शेख,आदित्य आदिक,नियाज शेख,अवि पोहेकर,सैफ शेख,हबीब तांबोळी,

फिरोज पठाण,असलम सय्यद,कलीम रॉयल शेख,वसीम जहागीरदार,

साजिद शेख, अनवर टेलर, डॉ.अदनान मुसाणी,अझहर शेख, अश्फाक शेख,नंदकुमार आरोटे, गोसावी, सलाउद्दीन शेख,शंकर गायकवाड, सरवरअली मास्टर,जाकीर पटेल,असलम बिनसाद, एस के खान,शाहिद शेख,हाजी इमाम सय्यद, एडवोकेट मोहसीन शेख, एडवोकेट समीन बागवान,दीपक कदम, भैय्या शाह,समीरखान पठाण,समीर शेख,

फारुख पटेल,कामरान पठाण,शोएब पठाण, अमन पठाण,नजीरभाई शेख,किशोर त्रिभुवन, प्रदीप दळवी,सचिन शिंदे, शरद नागरगोजे,

शाहीन शेख,खालिद मोमीन,शादाब शेख, तनवीर शेख,हबीब तांबोळी,बिया शेख, सज्जाद नवाब आदींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

प्रस्ताविक सलीमखान पठाण यांनी केले.

शेवटी एडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरभाई शेख,तनवीर शेख, डॉक्टर सलीम शेख, खालीद मोमीन,एस के खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):आषाढी एकादशी म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतो ते पंढरपूर,पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या मधील अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात.वारी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संस्कृती आणि त्याबरोबरच संतपरंपरा,अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, महाराष्ट्र भूमीमध्ये वारकऱ्यांची दिंडी परंपरा ही अविरत चालू आहे.या परंपरेचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर मधील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये देखील दिंडीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे  करण्यात आले होते.या दिंडीमध्ये शाळेतील सर्व मुलांनी अगदी आनंदाने भाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा आणि विठुरायाच्या आरतीने झाली. त्यानंतर वारकरी परंपरेवर अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सुंदर अशा अभंगाच्या जल्लोषामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडीची सुरुवात सुरुवात झाली दिंडी कर्मवीर भाऊराव पाटील चौक या ठिकाणाहून रामराव अधिक पुतळ्याजवळ असणाऱ्या पटांगणामध्ये गेली. त्या ठिकाणी मुलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद घेतला त्या ठिकाणाहून दिंडी परत शाळेत आली.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव जन्मजय टेकावडे,प्राचार्य घोगरे,शाळेची शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्येष्ठ शिक्षिका चव्हाण,नरोटे तसेच इतर शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने श्रीरामपूर पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड करून सोडून दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सुनील मुथा यांनी सांगितले की रविवारी रात्री श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान व श्रीरामपूर पासिंगच्या दोन वाहनातून  संशयास्पद तांब्याचा तारा पुणे येथे घेऊन  जात असल्याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्याने काही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सदरची वाहने बेलापूर येथील नगर बायपासला पाठलाग करून पकडली. चालकांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीचे रहिवासी असून सध्या श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मध्ये राहत असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे सदर मालाची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. ही चौकशी चालू असतानाच श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मधून काहीजण बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यातील तीन जणांनी पोलिसांशी घासाघीस करून काही लाखांची यशस्वी तडजोड केली. त्यानंतर रात्री दीड वाजता कोणतीही नोंद न घेता दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. सदर वाहने पकडून पोलीस स्टेशनला आणल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले आहे. अशा तऱ्हेने रक्षकच चोरभामट्यांचे हितचिंतक बनत असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून आर्थिक तडजोड करणारा अधिकारी, त्याचा रायटर, सदर प्रकरणातील  इतर कर्मचारी कोण होतेयाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी संविधान बचाव समिती श्रीरामपुर, तसेच समस्त मुस्लीम समाज श्रीरामपुर यांच्यावतीने  दि. १४/०७/२०२४ रोजी दुपारी विशालगड जि.कोल्हापुर याठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली समाज कंटकाच्या जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ केली. धार्मिक स्थळांची विटंबना केली. तसेच महिला व लहान मुले, वृध्द महिला, व पुरुषही या हल्ल्यातुन सुटलेले नाही. त्यांना सुध्दा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे

अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी  व्यक्त केली

सदरचा कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्या-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहिर निषेध करत  या सर्व लोकांवर कोणीत्याही व कुठलाही पदाधिका-याच्या पदाचा मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोपरगांव (गौरव डेंगळे): आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली. मंगळवार (१७) विठ्ठल नामाची शाळा भरली होती.शहरातील सोमैय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषातून टाळमृदंगाच्या गजरात,अभंग, लेझीम नृत्य व भजने गात शहरातून फेरी काढण्यात आली.शाळेच्या प्रांगणात विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेस प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले.दिडींचा समारोप अंभग गात रिंगण करून करण्यात आला.

बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीनुसार लवकरच कांदा निर्यातीसाठी स्वतंत्र रेल्वे मालधक्का सुरु करण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे वक्तव्य

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवुन बाजार सामीतीच्या कामकाजाविषयी आढावा घेतला. बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, माल खरेदी करताना व्यापारी वर्गांना येणाऱ्या अडचणी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या  यावर खासदार वाकचौरे यांनी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी मी श्रीरामपूर बाजार समिती सोबत असेल अशी ग्वाही या वेळी दिली. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अंतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी खासदार निधी मिळणे बाबत त्यांना निवेदन देण्यांत आले. त्याच बरोबर खुप दिवसांपासून प्रलंबित असलेला व बाजार समितीने मागणी केलेला प्रश्न श्रीरामपूर येथे माल वाहतुकीसाठी स्वंतंत्र रेल्वे माल धक्का व्हावा हया मागणीसाठी लवकरच आपण रेल्वे मंत्र्यांना भेटुन सदर प्रश्न मार्गी लावु तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यांत प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी  दिली. यावेळेस श्रीरामपूर बाजार समितीच्या वतीने सभापती श्री. सुधीर पा. नवले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यांत आला. या वेळी संचालक, मयुर पटारे पा., राजेंद्र पाऊलबुध्दे पा., राजु चक्रनारायण, विलास दाभाडे, किशोर कालंगडे,खंडेराव सदाफळ पा., मनोज हिवराळे, प्रभारी सचिव श्री. साहेबराव वाबळे तसेच व्यापारी विजुशेठ छाजेड, दिनेश पवार, अजय गदिया, संजय कोठारी, रोहीत कोठारी, वर्धमान पाटणी, मच्छिंद्र मोरे, संतोष खाडे, संजय शिंदे, सचिन टाकसाळ, शरद कोठारी, मुकेश

कोटारी,दिपक गायकवाड, सुनिल भांड आणि कर्मचारी, हमाल, मापाडी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद असुन ते व्यवसाय सुरु होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे अश्वासन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिल्यानंतर भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आपले उपोषण स्थगीत केले .          बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या मागणीसाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता .अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत होते गावठी दारु मटका बिंगो जुगार गुटखा अवैध वाळु उपसा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली होती त्यामुळे हे सर्व व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी अल्ताफ शेख यांनी उपोषण सुरु केले होते सर्वांच्या विनंतीवरुन व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या अश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले या वेळी बोलताना अल्ताफ शेख यांनी सांगितले की व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे त्यामुळे हे व्यवसाय कायमचे बंद व्हावेत या मागणीसाठी मी उपोषणास बसलो होतो परंतु सर्व ग्रामस्था समक्ष पोलीस निरीक्षक देशमुखयांनी अश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मी स्थगीत करत आहे जर हे व्यवसाय पुन्हा सुरु झाले तर मी पुन्हा उपोषणास बसेल असेही शेख यांनी सांगितले या वेळी गावातील महीलांनी शेख यांनी समाजपयोगी कार्य हाती घेतले असुन दारु बंद झाली तर अनेकांचे संसार सुरळीत चालतील असे सांगितले या वेळी  जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख उपसरपंच मुस्ताक शेख भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर देविदास देसाई भाऊसाहेब तेलोरे मोहसीन सय्यद विजय शेलार विशाल आबेकर बाळासाहेब दाणी महेश कुर्हे ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक सुरेश अमोलीक राजु शेख जब्बार आतार शफीक आतार शफीक बागवान समीर जहागीरदार अब्रार सय्यद गोपी दाणी रफीक शहा समीर पठाण सचिन जाधव मोहसीन पठाण वसीम आतार आसिफ शेख अब्दुल शेख बिलाल बागवान आदि उपस्थित होत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget