मानवता संदेश फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आजच्या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील वातावरणाचा विचार करता वृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे .वृक्षारोपणासाठी सर्व प्रकारची मदत आपण करू. आज जे वृक्षारोपण होत आहे त्यासाठी जाळ्या सुद्धा उपलब्ध करून देऊ .मानवता संदेश फाउंडेशनने हाती घेतलेले कार्य खरोखर मानवतेसाठी उपयुक्त आहे .सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक काम उत्कृष्टपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले.
मिल्लत नगर भागात मानवता संदेश फाउंडेशन व जॉगिंग ट्रॅक कमिटी तर्फे कॅनल साईडला मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक पत्रकार सलीमखान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार कानडे,माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये,
अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, जोएफ जमादार यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते.
मिल्लत नगर परिसरातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लवकरच आपण सोडवू त्यासाठी नगरपालिकेत सर्व विभागांची बैठक बोलावून सर्व समस्या मार्गी लावू.शहरांमध्ये आपण जे काही काम केले आहे ते आपल्यासमोर आहे. जनतेने मला लोकप्रतिनिधी केल्यामुळे जनतेची कामे करण्याचा मी प्रयत्न केला असे ही ते म्हणाले.
युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले.श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी आपल्या भाषणामध्ये सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये आम्ही सर्वजण काम करीत असून सामाजिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी त्यांचे मोलाची योगदान आहे. वृक्षारोपण करणे हे एक पुण्याचे काम आहे. हे काम सर्वांनीच पुढे नेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. शेवटी ॲडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.
यावेळी विविध प्रकारच्या साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले.
आमदार कानडे, अनुराधाताई आदिक, सचिन गुजर,सिद्धार्थ मुरकुटे,अशोक उपाध्ये, अहमद जागीरदार, आयाज तांबोळी, साजिद मिर्झा,तौफिक शेख,सुनील साळवे, , सतीश म्हसे,नगरसेवक मुक्तार शाह, कलीम कुरेशी,पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार, रज्जाक पठाण,डॉ. सलीम शेख,तौफिक शेख, मुख्तार मणियार, मेहबूब प्यारे,अश्फाक शेख, महबूबअली शाह, जोएब जमादार, मुश्ताक शेख, शन्नू दारूवाला,
शौकत शेख,आदित्य आदिक,नियाज शेख,अवि पोहेकर,सैफ शेख,हबीब तांबोळी,
फिरोज पठाण,असलम सय्यद,कलीम रॉयल शेख,वसीम जहागीरदार,
साजिद शेख, अनवर टेलर, डॉ.अदनान मुसाणी,अझहर शेख, अश्फाक शेख,नंदकुमार आरोटे, गोसावी, सलाउद्दीन शेख,शंकर गायकवाड, सरवरअली मास्टर,जाकीर पटेल,असलम बिनसाद, एस के खान,शाहिद शेख,हाजी इमाम सय्यद, एडवोकेट मोहसीन शेख, एडवोकेट समीन बागवान,दीपक कदम, भैय्या शाह,समीरखान पठाण,समीर शेख,
फारुख पटेल,कामरान पठाण,शोएब पठाण, अमन पठाण,नजीरभाई शेख,किशोर त्रिभुवन, प्रदीप दळवी,सचिन शिंदे, शरद नागरगोजे,
शाहीन शेख,खालिद मोमीन,शादाब शेख, तनवीर शेख,हबीब तांबोळी,बिया शेख, सज्जाद नवाब आदींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
प्रस्ताविक सलीमखान पठाण यांनी केले.
शेवटी एडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरभाई शेख,तनवीर शेख, डॉक्टर सलीम शेख, खालीद मोमीन,एस के खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment