Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेवुन देखील चिरंजीव अनिकेत नवनाथ देसाई याने अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन राज्यात  प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे               अनिकेत देसाई याने चंद्ररुप डाकले जैन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीच्या परिक्षेत एकुण ८५ % गुण मिळवीले तसेच अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मीळवुन राज्यात पहीला आला आहे अनिकेत नवनाथ देसाई  हा पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या आहे. सी डी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ,सुहास निंबाळकर जी एस  क्षिरसागर सर व्ही बी दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त सचिन गुजर अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे  पत्रकार देविदास देसाई भास्कर खंडागळे दिलीप दायमा सुहास शेलार असलम बिनसाद सदिंप जगताप आदिंनी अभिनंदन केले आहे ,

बेलापुर (प्रतिनिधी  )-नुकत्याच झालेल्या सीबीएसई परिक्षेत बेलापुरची कन्या भुमी सुभाष आमोलीक हीने पद़्श्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लीश मिडीयम स्कूल मधुन प्रथम क्रमांक  मिळवीला असुन तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           बेलापुरच्या प्रथम नागरीक सरपंच स्वाती अमोलीक यांची बहीण तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आमोलीक यांची कन्या भूमी हीने सीबीएसई परिक्षेत ९६.२ टक्के गुण मिळवुन विळद घाट येथील विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमधुन प्रथम क्रमांक मिळवीला .तिच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख आदिंनी अभिनंदन  केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जोरदार आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बेलापुर खूर्द येथील हरिश्चंद्र दगडू पुजारी यांची दिड एक केळीची बाग भुईसपाट झाली आहे .बेलापुर खुर्द येथील शेतकऱ्याच्या दिड एकर क्षेत्रात असलेली केळीची बाग पुर्णतः उध्वस्त झाली दिड एकर क्षेत्रात २०० झाडाची लागवड केलेली होती त्या बागेतील  केळी तयार झाली होती काल आलेल्या जोरदार वादळामुळे त्यांची दिड एकर बागेतील सर्व केळीची झाडे जमीनीवर झोपली त्यामुळे पुजारी यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी झाडाखाली कैऱ्यांचा सडा पहावयास मिळाला वादळी वाऱ्याबरोबर आलेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात असलेला कांदाही भिजला

श्रीरामपूर नेवासा रोडवर भीषण अपघात अपघातात ट्रक व प्रवासी अँप्पेरिक्षा या समोर समोर धडकल्याने ॲपे रिक्षाचा चक्काचूर एक इसम जागीच ठार वाहतुकीची झाली कोंडी

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठाण व श्री साई सेवा समिती बेलापुर तसेच एस एम बी टी हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  कैलास चायल यांनी दिली आहे .     या शिबीरात शुगर ,रक्तदाब , ब्लड आँक्सीजन तपासणी ,ई सी जी केला जाईल तसेच तज्ञ डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जातील .या शिबीरात हृदय रोगासंबधीत छातीत दुखणे ,चालताना दम लागणे ,दरदरुन घाम येणे ,छातीवर दबाव असणे, छातीत डाव्या बाजुला वेदना होणे ,हाताला मुंग्या येणे वेदना होणे आदि आजारावर मोफत निदान केले जाणार आहे. तसेच ई सी जी मोफत काढला जाणार आहे ,हर्निया ,हायट्रोसिल , अपेंडिक्स ,आतड्याच्या शस्रक्रिया स्वादुपिंडाच्या शस्रक्रिया ,मुळव्याध ,पित्ताशयातील खडे ,भगंदर आदि आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.तिरळेपणा,मोतीबिंदु रातआंधळेपणा ,दृष्टी कमी होणे आदि डोळ्याच्या तसेच नाक कान घसा यातील आजाराच्या देखील तपासणी करुन उपचार केले जाणार आहे तरी शिबीरार्थींनी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर बेलापुर येथे उपस्थित रहावे असे अवाहन श्री साई पावन प्रतिष्ठाण व साई सेवा समिती बेलापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच श्री साईबाबा मंदिरांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सांयकाळी ६ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहनही सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- येथील खटकाळी गावठाण येथे आपापसातील वादातुन झालेल्या भांडणातुन दहशत माजविण्याचा प्रकार समोर आलाअसुन यात एका  विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले तसेच  जाळपोळ,व वाहनांची मोडतोड असा प्रकार घडला.तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला तरी त्या व्यक्तीच्या आसलेल्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीच पुढे धजावत नसले तरी पोलीसांनी  या प्रकरणी फिर्यादी होवुन गावात दहशत माजविणार्याला धडा शिकवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे                                              याबाबतचा समजलेली हकीकत अशी की ,खटकाळी गावठाण येथे एक विधवा आपल्या तीन मुलासह रहाते तिचे शेजारी आसणाऱ्या सराईत गुन्हेगाराने गोंधळ घालुन तिला शिवीगाळ केली .त्याच्या धाकाने ती श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे राहण्यास गेली असता त्या व्यक्तीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला पेट्रोल टाकुन घरातील सर्व संसारपयोगी सामान पेटवुन दिले तसेच त्या परिसरात दहशत निर्माण  केली त्याच्या दहशतीमुळे अनेक जण घाबरले आहेत. काही दिवसापुर्वी अशाच प्रकारे दहशत करुन काही मोटारसायकली तसेच घरातील सामान पेट्रोल टाकुन जाळले होते त्या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  आहे . येथे कायम गुन्हेगारांचा वावर असल्यामुळे  लहानमोठ्या तक्रारी होत आहेत .तसेच काही तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेतात.याचाच परिणाम म्हणून  काल सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा परिसरात दहशत बसविण्यासाठी पेट्रोल टाकुन त्या गरीब विधवेचे संसारपयोगी सामान जाळण्यात आले आहे.                         आज दिवसभर या घटनेची चर्चा होत होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली परंतु ती विधवा प्रचंड दहशतीखाली आसल्यामुळे तक्रार देण्यास पुढे आली नाही .असे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहीले तर भविष्यात एखादी गंभीर घटना घडू शकते तरी पोलीसांनी वेळीच दखल घेवुन संबधीतावर कठोर कारवाई करावी अशी परिसरातील नागरीकांची मागणी आहे.

पृथ्वी तलावर आलेल्या प्रत्येकाला या पृथ्वीतलावरून अखेरचा निरोप घ्यायचा असतो. असे असले तरीही या पृथ्वीतलावरील प्रत्येक जण जसा प्रकृतीने भिन्न असतो तसाच तो स्वभावाने देखील भिन्न असतो.प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही. हा एक निसर्ग नियम आहे.

आयुष्यात आलेला प्रत्येक जन आपल्या संपूर्ण जीवनात वैविध्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत असतो.काही व्यक्ती आपल्याला मिळालेल्या सुंदर जीवनाचा सदुपयोग करत जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल असा प्रयत्न करतात आणि त्यातूनच सत्कार्य अशा काही मिळालेल्या संधीतून जनसेवा करतात. हीच जनसेवा लोकांच्या हृदयात जागा निर्माण करून जाते. लोकांच्या हृदयात जागा निर्माण केल्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा निसर्गचक्रानुसार पृथ्वीतलावरून निघून जाते, त्यावेळी हृदय तुटलेल्या व्यक्तींची काय अवस्था असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमजानखान चांदखान पठाण होय.

सर्वसाधारणपणे अधिकारी म्हटलं कि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो.अगदी अधिकाऱ्यांना हृदय नसते यापासून तर अधिकारी फार करारी असतात इथपर्यंतचे विचार समाजामधून आपल्याला ऐकायला मिळतात. रमजानखान पठाण हे या वाक्यास अपवाद ठरले.त्यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकारी पदाच्या काळामध्ये किती लोकांना जोडले हे त्यांच्या जाण्याने लोकांनी केलेल्या भावनांतून व्यक्त होते.

रमजान पठाण यांनी कधीही केलेल्या कार्याचे आईने दिलेल्या शिकवणी प्रमाणे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू दिले नाही. कळू द्यायचे नाही याप्रमाणेच अनेकांना त्यांच्या सेवेमध्ये अडचणींना साथ देत त्यावर आपल्या ज्ञानाने माफ करत अनेकांना अडचणीतून सोडवलेच तर अनेकांना मदतीचा सहकार्याचा हातही दिला.

फक्त एखाद्याची अडचण त्यांच्या कानावर पडण्याचा उशीर कि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करत संबंधितास कशाप्रकारे मदत करता येईल याचाच ते सदैव प्रयत्न करत असत.प्रसंगी या जनसेवेच्या काळामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. मात्र तरीही लोकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण ती केलीच पाहिजे याच हेतूने ते सतत कार्यरत असायचे. त्यातूनच त्यांनी आपल्या मूळ श्रीरामपूर गावापुरतेच काम न करता,फक्त जिल्हया पुरते काम न करता राज्यभरामध्ये काम केले.ते कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी हे पद,या पदास एक उंची गाठून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.एकेकाळी शिक्षण विस्तार अधिकारी हे पद फक्त बाहुले म्हणूनच होते अशी सर्वांचे भावना होती. मात्र रमजान पठाण यांनी राज्यात शिक्षण विस्तार अधिकारी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती लढा उभारून एक वेगळ्या प्रकारचे स्थान शिक्षण विस्तार अधिकारी पदाला मिळवून दिले. त्याचमुळे राज्यभर असलेले त्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सहकारी मित्र आपल्या मित्राला नेतृत्वाला अलविदा करताना भावना विवश झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या आणि रमजान पठाण नेमके कसे होते हे या व्यक्त झालेल्या भावनांतून दिसून आले.

नव्याने हजर झालेल्या शिक्षकास आधार देत भविष्यात चांगले काम करण्याची संधी निर्माण असल्याचे सांगत उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्या कामी सतत प्रेरणादायी काम पठाण साहेबांनी केले.

संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता हा कळीचा मुद्दा ठरत असतो.या मुद्द्याला स्पर्श करण्यास बरेचसे अधिकारी टाळाटाळ करतात.मात्र रमजान पठाण यांनी अत्यंत बारकाईने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे काम करून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. रमजानभाई यांनी केलेल्या संच मान्यतेस राज्यातील कोणत्याही व्यक्तीने दिलेले आव्हान कोलमडून पडल्याशिवाय राहायचे नाही. म्हणूनच अत्यंत जवळच्या मित्राने याबाबत त्यांचा उल्लेख संच मान्यतेचा बादशहा असा केला.

आपण नगर जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना मराठी माध्यमासोबतच उर्दू भाषिक शाळांचा देखील नावलौकिक कसा वाढेल याचा सातत्याने मागील काही वर्षे त्यांनी उत्तम असा प्रयत्न केला.

रमजान पठाण यांनी शैक्षणिक सेवा देत असतानाच समाजासाठीही ते वेळोवेळी पुढे आल्याचे त्यांच्या सामाजिक कार्यातून देखील दिसून येते. त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर शहरात उभारली गेलेली मिल्लत नगर या भागातील मिल्लत मस्जिद या प्रार्थनास्थळाचा समावेश होतो.

 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता पठाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्कॉलरशिप योजना राबवता आली याचा आनंद काही औरच होता.पठाण साहेब आपल्यात नाहीत या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसत नाही आणि प्रत्येकाला ते आपल्या अवतीभोवतीच आहेत असा सातत्याने भास होतो आहे. मात्र तरी देखील ते आपल्यातून निघून गेलेले आहेत हे वास्तव आहे.तरीही ते विचार रूपात आपल्या सोबत कायम आहेत असे समजून त्यांनी दिलेला विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मित्र म्हणून आमचे कर्तव्य असेल आणि हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्याबद्दल खूप काही देण्यासारखे आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते कि -

 *बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गयी*

*एक शख्स सारे शहर को विरान कर गया*


*शकील बागवान*

केंद्रप्रमुख,खडकी केंद्र,

तालुका - अकोले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget