Latest Post

बेलापूर :(प्रतिनिधी  )- तालुक्यातील बेलापूर येथून लोणीकडे जाणारा भरगच्च भरलेल्या उसाचा ट्रॅक्टरचे जुगाड ऐन कोल्हार चौकात पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला मांसाहारी विक्री करणारा विक्रेता बालबाल बचावला                       शनिवारी दुपारी ( दि.२०) साडेचार वाजेच्या सुमाराला हि घटना घडली.उसाचा ट्रॅक्टर ऐन चढावर आल्याने पलटी झाला.लोणीच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर जुगाड ओव्हरलोड असल्याने कोल्हार रस्त्याच्या कडेला बसलेल्या 

मासांहारी विक्री करणाऱ्या दुकानावरच कोसळले.नशीब बलवत्तर

म्हणून तो विक्रेता थोड्क्यात बचावला आहे.ऊसाचा ट्रक्टर पलटी होताच दुकानदार दबला गेला असेल अशा शंकेने अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली.परतु त्याला काही दुखापत झाली नाही. सामानाचे व मांसाहारी विक्री करणाऱ्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्या वेळी नागरिकांनी  मोठी गर्दी

केली होती. एकाच ट्रँक्टरला दोन ऊसाच्या भरलेल्या ट्राँल्या जोडल्या जातात त्याही अवस्थेत चालक भरधाव वेगाने ट्रँक्टर चालवत असतात शिवाय ट्रँक्टरवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे शिवाय चालकही १८ वर्षाच्या आतीलच असतो या सर्व बाबींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती बरखास्तीला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगीती मिळाली असुन मा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या ४५ (१ )च्या नोटीशीच्या कारवाई विरोधात संरक्षण दिले आहे .         जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना ४५ ( १)ची नोटीस बजावली होती या नोटीस विरोधात बाजार समीतीचे सभापती सुधीर नवलेसह १२ संचालकांनी मा. उच्च न्यायालयात पिटीशन क्रमांक २९५० /२०२४ दाखल केले होते या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्यासमोर झाली,दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी ४५ ( १ )ची कारवाई झाल्यास १५ दिवसाचे संरक्षण दिले असुन ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे मान्या केले दुसरे अपील बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की समीतीला ४० अ  ब खाली बेकायदेशिर नोटीसा दिलेल्या आहेत .बाजार समितीचे आर्थिक वर्ष संपलेले नाही .समीतीचे नफा तोटा पत्रक तयार नाही बाजार समीतीची दोन वेळेस चौकशी झाली परंतु कुठलाच गंभीर दोष आढळून आलेला नाही त्यामुळे दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आसल्याचे अँड महेश देशमुख व अँड राहुल कर्पे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस जी मेहेरे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.वादीचे वकील आँड राहुल कर्पे यांनी सांगितले की न्यायमूर्ती  मेहेरे यांनी संचालक मंडळ हे लोकनियुक्त संचालक मंडळ असुन त्यांना संरक्षण मागण्याचा पुर्ण अधीकार असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रीरामपुर कृषी बाजार समीती जैसे थे राहणार आहे    (बाजार समीतीला एक वर्ष पुर्ण झाले नाही तरी सात महीन्यात दोनदा चौकशी केली कुठल्याही विकास कामांना परवानगी न देता विरोधकांनी अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु संचालक मंडळाच्या चोख कामामुळै बाजार समीतीला ५०लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले चार कोटी पन्नास लाखाच्या पावत्या झाल्या हे संस्थेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे न्यायालयाचा निकाल हा विरोधकांनी केलेल्या खोट्या तक्रारीला चपराक आहे .. सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपुर

श्रीरामपूर प्रतिनिधी-चादर मिरवणूक ही हजरत सैलानी बाबा दरबार वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर या ठिकाणाहून ढोल ताशे नगारे तसेच सटाणा येथील म्युझिकल बँड वाद्यासह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भगतसिंग चौक मेन रोड मार्गे जात असताना श्रीराम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी तसेच श्रीराम मंदिर उत्सव कमिटी यांनी देखील हजरत सैलानी बाबा यांच्या संदल चादर मिरवणूकीला भेट देऊन हिंदू मुस्लिम राम रहीम या सर्व गोष्टींचा शहरातील लोकांना श्रीरामपुराची जुनी परंपरा देखील दाखवून दिली


हजरत सैलानी बाबा दरबार  उर्स कमिटी यांच्या वतीने श्रीरामपुरातील श्री राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीरामांचा रामनवमीनिमित्त हरिपाठ चालू असल्याने उर्स कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवावीया व ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद तसेच कायदेशीर सल्लागार अजित डोखे यांनी मंदिराचे पावित्र्य राखत सदर श्रीराम मंदिर परिसरामध्ये ढोल ताशे नगारे तसेच म्युझिकल बँड बंद करून मिरवणूक शांतपणे गांधी चौकापर्यंत घेऊन गेलेत गांधी पुतळा पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी रोड मार्गे गिरमे चौक व हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी चादर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला

संदल शरीफ हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी दहा वाजता सर्व विधिवत सलाम दुवा पूजा करून बाबांच्या दर्गा मजांवर चढविण्यात आला

मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुव्यवस्थितपणे तसेच शिस्तबद्ध होण्यासाठी हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य सभासद तसेच भाविक भक्तगण शहरातील सुजाण नागरिक शहराची शान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बरमे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनांं वह्या वाटप करुन साजरी केली जयंती.बेलापुर झेंडा चौकात दोन ठिकाणी, बेलापुर ग्रामपंचायत, नगररोड मित्र मंडळ ,बेलापुर विविध कार्यकारी संस्था, खटकाळी गावठाण आदि ठिकाणी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .  बेलापुरातील राजवाडा येथुन डाँक्टर बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याची  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर तहसीलदार मिलींद वाघ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना २००० वह्याचे वाटप करण्यात आले या वेळी तहासीलदार वाघ यांनी रमेश अमोलीक मित्र मंडळाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले मा.सरपंच भरत साळूंके रविंद्र खटोड डाँक्टर चेतन लोखंडे देविदास देसाई  अल्ताफ शेख मयुर खरात सागर साळवे सनी खरात प्रतिक आमोलीक रोनल अमोलीक अलिशा अमोलीक विजु भिंगारदिवे विजय अमोलीक किरण गायकवाड हरिष दाणी अनिता खरात प्रभावती अमोलीक सिमा तेलोरे आदिसह महिला पुरुष सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले झेंडा चौकात तसेच बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच  मुस्ताक शेख हाजी इस्माईल शेख,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे एकनाथ नागले देविदास देसाई, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,सुहास शेलार बंटी शेलार भरत साळूंके, सुभाष अमोलिक,भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात,सचिन अमोलिक, रावसाहेब अमोलिक, विनायक जगताप, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर,प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे, बाळासाहेब शेलार,आजीज शेख जाकीर शेख  संजय भोंडगे,सोमनाथ जावरे, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र तेलोरे,मुस्ताक आतार,बाबुराव पवार, सुधीर तेलोरे,आदिंनी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पोलीस पाटील अशोक प्रधान व्हा चेअरमन विश्वनाथ गवते अनिल नाईक गोरक्षनाथ कुर्हे भाऊसाहेब वाबळे अरुण अमोलीक प्रकाश कुर्हे विजय खंडागळे अयाजअली सय्यद चंद्रकांत नाईक उपस्थित  होते नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने शरद नवले अभिषेक खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे नंदकिशोर लोखंडे  भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे सुनिल मुथा देविदास देसाई पुरुषोत्तम भराटे राहुल माळवदे सावकार अमोलीक  शुभम पारखे दिनेश सकट सनी बनसोडे शुभम दांडगे आदिच्या उपस्थितीत माहामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व राजनीती समाचार न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक देवळाली प्रवरा येथील श्री इब्राहिम फत्तुभाई शेख यांची राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली,एडवोकेट विलासराव पठारे प्रदेशाध्यक्ष, मधुकरराव थोरात राष्ट्रीय सचिव पत्रकार,उस्मान भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन बहुजन फोर्स या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते इब्राहिम शेख यांना प्रदान करण्यात आले

इब्राहिम शेख यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने एडवोकेट विलासराव पठारे, मधुकरराव थोरात, अरुण त्रिभुवन, सलीम पठाण, रोहिदास थोरात, उस्मान भाई शेख, सुखदेव केदारे, अमीर भाई जहागीरदार, अकील हाजी सुन्ना भाई, राजू भाई आर शेख, राजू भाई के शेख, असलम बिनसाद, अकबर भाई शेख, रवींद्र जगताप, राहुल कोळगे,  अमीर बेग, कचरू लोहकरे, मन्सूर भाई शेख, विजय खरात, सज्जाद अन्सारी, प्रकाश मालोकर, माधव सोळशे, एजाज भाई सय्यद, मुसा भाई सय्यद, अस्लम भाई सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी, हमद भाई शेख, रसूल सय्यद, सखाराम पगार, सूर्यकांत गोसावी, शब्बीर भाई कुरेशी, लालू भाई सय्यद, अशोक भिंगारे, सौ बानोबी शेख रेशमा शेख, सौ सविता भालेराव, सौ रुबीना रफिक शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूरच्या हजरत सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रोत्सवाची या वर्षाची सुरुवात करणारा शुभारंभाचा कार्यक्रम बहारदार असा अखिल भारतीय कौमी एकता मुशायरा (कवि संमेलन) उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी दिली.मुशायऱ्याचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 तेवीस वर्षांपूर्वी शहराच्या यात्रोत्सवाला जोडून मुशायरा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कोरोना काळ वगळता उद्या होणारा हा अठरावा कार्यक्रम आहे असे ही त्यांनी सांगितले.

उद्या होणाऱ्या अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू शायर अबरार काशीफ तसेच मराठीचे जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस यांचे सह आंतरराष्ट्रीय हास्य कवी राहत हरारत (तामिळनाडू),सुप्रसिद्ध उर्दू शायर कमर एजाज (औरंगाबाद),झहीर अख्तर (बहाणपूर),

इर्शाद अंजूम (अनाऊन्सर),हिंदी कवी

कपिल जैन (यवतमाळ),

हास्य कवी इब्राहीम सागर (धुलिया),

रोबोट मालेगावी तसेच

इर्शाद वसीम (नासिक) व शाकिर अहमद शाकिर (जामखेड) हे नामवंत कवी व शायर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुशायरा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख यांनी दिली.

गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सय्यद बाबा दर्गा समोरील मैदानावर घेतला जात होता.परंतु तेथे रेल्वे खात्याचे बांधकाम झाल्याने जागा नसल्याने यावर्षी हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन समोरील बॅरिस्टर रामराव आदिक पुतळा समोर असलेल्या मैदानात घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष मुन्ना पठाण यांनी दिली.

सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रेनिमित्त होणारा हा मुशायरा कार्यक्रम खूपच लोकप्रिय असून या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक शायर व कवी यांनी श्रीरामपूरात उपस्थिती लावली आहे. अबरार काशिफ यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध उर्दू शायर यांना ऐकण्याची संधी श्रीरामपूरकरांना प्राप्त झाली असून काव्य रसिक व मुशायरा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमिटीचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहराचा जातीय सलोखा व शहरवासीयांचे एकमेकांशी असलेले स्नेहबंध दृढ करण्यासाठी कौमी एकता मुशायरा हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नेते,कार्यकर्ते,नागरिक यांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.

श्रीरामपूरची शान वाढविणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी एक पर्वणी आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमेटीचे संघटक मुनीर शेख यांनी केले आहे.


उद्या होणाऱ्या या मुशायरा व कवी संमेलनास सर्व काव्य व शायरी प्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण,अध्यक्ष मोहम्मद रफिक शेख,

स्वागताध्यक्ष मुन्नाभाई पठाण,कार्याध्यक्ष संजय जोशी,संघटक मुनीर भाई शेख,उपाध्यक्ष - डॉ. रविंद्र कुटे,रियाज पठाण,जावेद काझी, शांतीलाल पोरवाल,

मुख्तार मनियार,गणेश मगर,एजाज शेख,

मोहम्मद रफिक (बाबा),

सचिव आसिफ शेख,

सहसचिव सलीम जहागिरदार,खजिनदार

साजीद मिर्झा, सह खजिनदार फिरोज पोपटीया,दर्गाह विश्वस्त

दिलावर पेंटर,सदस्य - सौ.रंजनाताई पाटील, रविंद्र गुलाटी,राजेश अलघ,श्रीनिवास बिहाणी,हरीश ओबेराय,

अनिल पांडे,ॲड.बाबा शेख,गफ्फार पोपटीया,

इरफान जिवाणी,ॲड. बाबा औताडे,

रज्जाकभाई फिटर,ॲड. कलिम शेख,महाराज कंत्रोड,गुलशन कंत्रोड,

नरेंद्र पाटणी,सुनिल गुप्ता,मंजीत चुग,अशोक गाडेकर,लालमहंमद जहागिरदार, रवि भागवत,मनोज आगे, महेश माळवे,

अशोक उपाध्ये, संजय छत्ल्लारे,भगवान उपाध्ये, सुनिलराव बोलके,अशोक सातुरे,

शाहिद कुरेशी, साजिद खान,पुरुषोत्तम झंवर,

राजेंद्र सोनवणे, प्रताप देवरे,डॉ. निशिकांत चव्हाण,डॉ. ज्ञानेश्वर राहिंज,डॉ. सुनील उंडे,संजय माखीजा,

रज्जाक पठाण,सय्यद फारुक सर,जाकीर सय्यद (सर), अल्ताफ शेख,नजिरभाई शेख,

सत्यनाथ शेळके, राजु दारुवाला,अरुण मंडलिक,मो.बदर शेख, फिरोज शेख,साबिर शेख, बाळासाहेब सरोदे, प्रदिप दळवी,जितू विळस्कर,अभिजीत मुथा,सागर वर्मा,सादिक शिलेदार,फिरोज हमिद खान,जावेद हमीद शेख,लकी सेठी,इज्जू इनामदार,शकील खान, अमरप्रीत सेठी,अण्णा इंगळे,युसुफ शहा,

असलम बिनसाद,जयेश सावंत,मयूर पांडे,

भाऊसाहेब भोसले, शरीफ मेमन,युसूफ लाखाणी आदींनी केले आहे.

कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ईयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने ध्येय प्रकाशन संचलित आय एम विनर या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण मिळवुन राज्यात दुसरा क्रमांक मिळवीला.या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.              तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत १५० पैकी १३६ गुण मिळवुन राज्यात आठवा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला महात्मा फुले प्रज्ञा शोध जिल्हा स्तरीय स्पर्धेत १५० पैकी १३० गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला .तर कँमेरेज हाय इंटरनँशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर काँलेज संचलित कौन बनेगा लिटल इन्स्टेंन या तालुका स्तरीय स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला . साईश ढोकणे हा श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत.त्यास एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका पैठणी मँडम तसेच वर्गशिक्षिका श्रीमती मेघा पवार ,यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .या वेळी आपले आयडाँल विश्वास नांगरे पाटील असल्याचे चिरंजीव साईश याने बोलुन दाखविले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget