Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कारखाना बंद झाल्यामुळे गावाकडे निघालेल्या ऊस तोड मजुराची बैलाने भरलेली गाडी उत्साही गोरक्षकांनी अडविली.परंतु चौकशी करुन पोलीसांनी ती गाडी सोडुन दिली परंतु या सर्व प्रकारामुळे ऊस तोड मजुरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.                                     बेलापुरात काल चुकीचा संदेश मिळाल्यामुळे अति उत्साही कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने बांधलेले कंपाऊड तोडले होते तो गोंधळ बराच वेळ चालला होता शेवटी पुन्हा तार कंपाऊड केल्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यातच बेलापुर चौकातुन बैलाने भरलेले वहान जात असल्याचे समजताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी ते वहान अडविले  दौंड कारखाना बंद झाल्यामुळे ऊस तोडणी करणारे मजुर गाडीत बैलासह सामान भरुन धुळ्याकडे गावी निघाले होते बैलाने भरलेली गाडी पहाताच काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी ती अडवली जमावाला पाहुन चालकही घाबरला मग ती गाडी बेलापुर पोलीस स्टेशनला नेण्यात आली .पोलीसांनी सविस्तर चौकशी केल्यावर असे समजले की कारखानां बंद झाल्यामुळे ते ऊस तोडणी मजुर घराकडे निघाले होते या प्रकरणाची माहिती मिळताच टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष  सुनील मुथा व पत्रकार देविदास देसाई  यांनी शहनिशा करून पोलिसांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली व सदर वाहन सोडण्याची विनंती केली टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा यांनी दौंड कारखाना व्यवस्थापनाशी देखील  संपर्क साधला सर्व बाजुने चौकशी केल्यानंतर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब  कोळपे यांनी  कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वांची शंका निरसन झाल्यानंतर  पोलिसांनी ते वाहन सोडले.मात्र

या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेला त्यामुळे धुळ्याला जाणाऱ्या या मजुरांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुर ग्रामपंचायतीच्या  जागेत केलेले  अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात  काढल्यानंतर चुकीचा संदेश पसरविण्यात आल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी बांधलेले कंपाऊड तोडून पुन्हा तेथे जनावरे बांधल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन वादावर पडदा पाडला या बाबत हकीकत अशी की,बेलापुर बाजार तळाजवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अतिक्रमण करुन जनावरे बांधण्यात आली होती. तेथे शेड बांधण्यात येणार असल्याचे समजताच बेलापुर ग्रामपंचायतीने ते सर्व सामान कार्यालयात आणले त्यानंतर  ग्रामपंचायत पदाधीकारी सदस्य व ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण काढुन टाकले व बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने त्या जागेस तार कंपाऊड करण्यात आले .ही बाब काहींना खटकली त्यांनी अपप्रचार करुन गो शाळेतुन गायी बाहेर काढल्या असा संदेश पसरविला त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले .चुकीच्या माहीतीमुळे आलेल्या कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने केलेल्या कंपाउडची तोडफोड केली तसेच त्या जागेत पुन्हा जबरदस्तीने जनावरे बांधली ,ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला ,पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले ,त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणले जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे देविदास देसाई आदिसह सदस्य  व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा झाले .या वेळी संबधीत अतिक्रमण करणारांनी चुकीचा संदेश दिला की गो शाळेत बांधलेल्या गायी सोडून दिल्या  त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाले तेथे ग्रामस्थ पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये बराच वेळ जोरदार बाचाबाची झाली या वेळी जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा यांनी स्पष्टपणे सांगीतले की ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करुन चुकीचा संदेश पसरवुन गावातील वातावरण कुणी खराब करत असेल तर ते कदापीही खपवुन घेणार नाही, त्यामुळे कंपाउडची तोडफोड करणारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली त्याच वेळी श्रीरामपुरहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली की अतिक्रमण काढु नये या करीता गो शाळेतुन गायी काढुन दिल्याचा चुकीचा संदेश देवुन बोलविण्यात आले त्यामुळे  आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यानीही थोडेसे नमते घेतले, अखेर ताबडतोब पुन्हा ग्रामपंचायतीची जागा मोकळी करुन द्यावी नाहीतर शासाकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमीका सुनिल मुथा सरपंच स्वाती अमोलीक जी प सदस्य शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल्ल डावरे यांनी घेतली अखेर पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यावर आपापसात एकमत झाले अन त्या वादावर पडदा पडला तो पर्यत गावात काहीतरी वेगळेच घडल्याची चर्चा तालुकाभर पसरली होती परंतु पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पी एस आय दिपक मेढे ऐ एस आय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब  कोळपे संपत बडे भारत तमनर नंदु लोखंडे होमगार्ड अजय भागवत तसेच गावातील शरद नवले सुनिल मुथा अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड एकनाथ नागले  देविदास देसाई प्रफुल्ल डावरे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली .                        (सामाजिक जिवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आलेल्या माहीतीची पुर्ण खात्री करुनच पुढील पाऊल उचलावे चुकीच्या माहीतीमुळे चांगले काम करतानाही अनर्थ घडू शकतो याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवावी -सुनिल मुथा बेलापुर पत्रकार संघ)

बेलापुर (प्रतिनिधी )-छोट्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवुन देण्यात यावी अशी मागणी बेलापुरकरांच्या वतीने बेलापुर पोलीसांना करण्यात आली या बाबत पोलीसांनी छोट्या व्यवसायीकांना दहा वाजता दुकाने बंद करण्याबाबत ताकीद दिली होती त्यामुळे छोटे व्यवसायीक अडचणीत सापडले होते लवकर दुकाने बंद केल्यामुळे दुकानदारांना प्रपंच चालविणे अवघड झाले होते त्यामुळे व्यवसायीकांनी बेलापुर ग्रामपंचायत तसेच पत्रकारांनी यात लक्ष घालावे अशी विनती केली होती त्यांच्या सुचनेनुसार  बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा उपसरपंच मुस्ताक शेख लहानु नागले संदीप सोनवणे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी छोट्या व्यवसायीकांना आगोदरच धंदा होत नाही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्राहक शितपेय दुध घेण्याकरीता उशिरा बाहेर येतात. लवकर दुकाने बंद केल्यास व्यवसाय मोडकळीस येतील त्यामुळे अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी तसेच बेलापुर परिसरात आता अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आलेले आहे त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे त्यामुळे छोट्या व्यवासायीकांना आपले व्यवसाय करण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत मुदत द्यावी अशी विनंती करण्यात आली. या वेळी एपीआय सुरेश आव्हाड यांनी सांगितले की वरिष्ठाच्या सुचनांचे पालन करुनच आपण व्यवसायीकांना लवकर व्यवसाय बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या आता सर्वांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे*

बेलापुर (प्रतिनिधी  )-गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने चौकाचौकात उच्च दर्जाचे सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय बेलापुर गावाने घेतला ही निश्चितच कौतुकास्पद बाब असुन व्यापाऱ्यांनी देखील अशाच प्रकारे सीसीटीव्ही कँमेरे बसवावेत असे अवाहन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मेयांनी केले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने तीन ठिकाणी मुख्य चौकात अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले त्याचे उद़्घाटन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांचे हस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डाँक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वेळी बोलताना अप्पर पोलीस वैभव कलुबर्मे म्हणाले की गावात शांतता व कायदा सुव्यवस्था रहावी या करीता ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत ही आनंदाची बाब आहे परंतु कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचाही चोख बंदोबस्त केला जाईल या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की कँमेरे लावल्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद होतील काही अनुचित घटना घडल्यास पोलीसांना तपास करणे सोयीचे होणार आहे त्यामुळे घर असेल किंवा व्यवसाय प्रत्येकाने सीसीटीव्ही कँमेरे बसवावे असेही देशमुख म्हणाले  या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे गावात शांतता रहावी या करीता गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व वहानावर या कँमेऱ्याची नजर असणार आहे .गावात येणाऱ्या तीन मुख्य चौकात साडेआठ लाख रुपये खर्चाचे कँमेरे बसविण्यात आलेले आहे,या कँमेऱ्यात अर्धा किलोमीटर पर्यंतचे चित्रण चित्रीत होणार आहे रात्र व दिवस आसे २४ तास हे चित्रण सुरु राहणार आहे ,या वेळी बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले पत्रकार देविदास देसाई यांनी सूत्रसंचलन केले या वेळी सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुर्हे  प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु उर्फ एकनाथ नागले बेलापुर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी जनार्धन ओहोळ मोहसीन सय्यद भाऊसाहेब  तेलोरे रमेश काळे पत्रकार दिलीप दायमा सहाय्यक फौजदार सुधीर हापसे पोलीसा काँन्स्टेबल भारत तमनर संपत बडे रघुवीर कारखीले नंदकिशोर लोखंडे गौतम लगड हवालदार औटी हवालदार भालेराल दादासाहेब कुताळ अजीज शेख महेश कुर्हे जाकीर शेख प्रविण बाठीया बाबुराव पवार शहानवाज सय्यद मोजीम शेख बाबुलाल पठाण आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरातील महिलांकरीता बचत गटाच्या माध्यमातून नवनविन लघु उद्योग, व्यवसाय सुरु करुन महीलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य  करु असे अश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी दिले.                           जि प सदस्य शरद नवले व श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या.आपल्या भाषणात शालीनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, आज सर्वच क्षेत्रात महीला अघाडीवर असुन त्यांचे कार्यही जोमाने सुरु आहे. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या लघु उद्योगातुन जवळपास ४० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे अनेक छोटे छोटे उद्योग आहेत जे की महीला  यशस्वीपणे करु शकते. बचत गटाच्या माध्यमातून महीलांना पुढे येण्याची खुप मोठी संधी आहे .बरेच उद्योग असे आहेत की त्यात कच्चा मालही पुरविला जातो व पक्का मालही खरेदी केला जातो त्याकरीता महीलांनी पुढे येण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र या व व्यवसाय सुरु करा तुम्हाला सर्वतोपरि सहकार्य जनसेवा फौंडेशन व विखे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येईल. मात्र हे करताना महीलेनेच महीलेला आधार दिला पाहीजे. जुन्या रुढी अंधश्रध्दा या पासुन दुर रहा, विधवा महीलेच्या भावना समजुन घ्या त्यांनाही जगण्याचा आनंद मिळविण्याचा हक्क आहे ,पती मयत झाला तर त्या महीलेचा त्यात काय दोष असतो त्यामुळे विधवांना सन्मान द्या त्यांना प्रवाहाबाहेर टाकू नका. कर्ज काढुन सोहळे समारंभ करु नका समारंभात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या.सध्या फास्ट फूड खाण्याची फँशन सुरु झालेली आहे पण आपण काय खातो याचे पण भान ठेवा समाजातील वंचित निराधार लोकांना मदत करा जेष्ठांना वयोवृध्दांना सन्मानाची वागणूक द्या. घर फोडायला महीलाच कारणीभूत असतात हे ही लक्षात घ्या घर सावरा घर उभ करा पण घर फोडू नका मुलाप्रमाणे मुलीचेही संगोपन करा असेही त्या म्हणाल्या.यावेळी सरपंच स्वाती अमोलिक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते  वैद्यकीय ,वकीली, शिक्षकी ,उद्योजिका ,माजी सरपंच ,उत्कृष्ठ गृहीणी, महीला शेतमजुर, भजनी मंडळ चित्रकार, शेती, बँक, पतसंस्था, विमा, खेळ, आरोग्य ,एस टी महामंडळ, सामाजिक,  गायन, ग्रामपंचायत स्वच्छता आदि क्षेत्रात काम करणाऱ्या महीलांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ.स्नेहल नवले,सौ. मानवी खंडागळे,सौ. प्रतिभा देसाई,संगीता देसाई सौ. जया भराटे,रुपाली लोंढे सौ. करिमा सय्यद,सौ. माधुरी ढवळे,ग्रामपंचायत सदस्या सौ.तबसुम बागवान,सौ.प्रियंका कुऱ्हे,सौ. सुशिलाबाई पवार, सौ. मीना साळवी, सौ. उज्वला कुताळ यांचे सह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ योगीता अमोलीक यांनी केले .अध्यक्षपदाची सूचना सौ तबसूम बागवान यांनी केली तर सौ प्रियंका कुर्हे यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ संगीता फासाटे यांनी केले तर सौ उज्वला कुताळ यांनी आभार मानले.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.यानिमित्ताने गावकरी मंडळाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले.                        बेलापूरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक झाली. या बैठकीस माजी सरपंच महेन्द्र साळवी, माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,मिना साळवी,प्रियंका कुऱ्हे,सुशीलाबाई पवार, वैभव कुऱ्हे,उज्वला कुताळ,रविंद्र खटोड,भरत साळुंके,रमेश अमोलिक,ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड उपस्थित होते.                                                           उपसरपंच पदासाठी शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख तसेच रविंद्र खटोड,सुधीर नवले,भरत साळुंके ,अरुण पा.नाईक यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीचे रमेश आमोलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक होणार अशी चर्चा असताना  रमेश आमोलिक यांनी संख्याबळ जमत नसल्याचे लक्षात आल्याने  ऐनवेळी माघार घेतली .त्यामुळे  मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.                                                निवडीनंतर गावकरी मंडळाची विजयी व आभार सभा संपन्न झाली.यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे,स्वाती अमोलिक, मोहसीन सय्यद, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, गोपी दाणी,रफिक शेख,आदिंची भाषणे झाली.यावेळी जालिंदर कुऱ्हे, सुधाकर खंडागळे,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,प्रभाकर बाळासाहेब दाणी,अन्नू सय्यद,रमेश काळे, ज्ञानेश्वर वाबळे,भाऊसाहेब तेलोरे,रावसाहेब अमोलिक,विशाल आंबेकर,बाबुराव पवार, रविंद्र कुताळ,श्रीहरी बारहाते,महेश कुऱ्हे, भैय्या शेख, रियाज सय्यद,दिलीप अमोलिक,विनायक जगताप, सचिन वाघ,गफूर शेख,सुधीर तेलोरे, बाळासाहेब शेलार, बाबुलाल पठाण, जीना शेख यांचे सह गावकरी मंडळाचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या प्रभारी सचिवपदी साहेबराव वाबळे यांच्या नावावर औरंगाबाद खंडपिठाने शिक्का मोर्तब केला असुन पणन मंत्री तसेच जाँईंड रजिस्टार यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आल्याची माहीती बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                             श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिव पदाबाबत  चारच दिवासापूर्वी पणन मंत्र्यांनी सचिव पदाचा पदभार संस्थेचे सचिव काळे यांना देण्याचे आदेश दिले होते तसेच जाँईंड रजिस्टार यांचे आदेश कायम केले होते त्यामुळे सचिव काळे यांनी सहाय्यक निबंधक तसेच बंदोबस्तात सचिव पदाचा पदभार घेण्याचा प्रयत्न  केला त्या वेळी प्रभारी सचिव हे रजेवर होते सभापती सुधीर नवले यांनी सांगीतले की संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा करु परंतु सचिव काळे यांनी एकतर्फी चार्ज घेतला पणन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशा विरोधात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली .त्या याचिकेचा नुकताच निकाल हाती आला असुन वाबळे यांच्या वतीने अँड राहुल कर्पे व अँड महेश देशमुख यांनी काम पाहीले तर काळे यांच्या वतीने अँड विनायक होन व अँड अश्विन होन यांनी काम पाहीले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget