Latest Post

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.यानिमित्ताने गावकरी मंडळाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले.                        बेलापूरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक झाली. या बैठकीस माजी सरपंच महेन्द्र साळवी, माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,मिना साळवी,प्रियंका कुऱ्हे,सुशीलाबाई पवार, वैभव कुऱ्हे,उज्वला कुताळ,रविंद्र खटोड,भरत साळुंके,रमेश अमोलिक,ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड उपस्थित होते.                                                           उपसरपंच पदासाठी शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख तसेच रविंद्र खटोड,सुधीर नवले,भरत साळुंके ,अरुण पा.नाईक यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीचे रमेश आमोलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक होणार अशी चर्चा असताना  रमेश आमोलिक यांनी संख्याबळ जमत नसल्याचे लक्षात आल्याने  ऐनवेळी माघार घेतली .त्यामुळे  मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.                                                निवडीनंतर गावकरी मंडळाची विजयी व आभार सभा संपन्न झाली.यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे,स्वाती अमोलिक, मोहसीन सय्यद, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, गोपी दाणी,रफिक शेख,आदिंची भाषणे झाली.यावेळी जालिंदर कुऱ्हे, सुधाकर खंडागळे,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,प्रभाकर बाळासाहेब दाणी,अन्नू सय्यद,रमेश काळे, ज्ञानेश्वर वाबळे,भाऊसाहेब तेलोरे,रावसाहेब अमोलिक,विशाल आंबेकर,बाबुराव पवार, रविंद्र कुताळ,श्रीहरी बारहाते,महेश कुऱ्हे, भैय्या शेख, रियाज सय्यद,दिलीप अमोलिक,विनायक जगताप, सचिन वाघ,गफूर शेख,सुधीर तेलोरे, बाळासाहेब शेलार, बाबुलाल पठाण, जीना शेख यांचे सह गावकरी मंडळाचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या प्रभारी सचिवपदी साहेबराव वाबळे यांच्या नावावर औरंगाबाद खंडपिठाने शिक्का मोर्तब केला असुन पणन मंत्री तसेच जाँईंड रजिस्टार यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आल्याची माहीती बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                             श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिव पदाबाबत  चारच दिवासापूर्वी पणन मंत्र्यांनी सचिव पदाचा पदभार संस्थेचे सचिव काळे यांना देण्याचे आदेश दिले होते तसेच जाँईंड रजिस्टार यांचे आदेश कायम केले होते त्यामुळे सचिव काळे यांनी सहाय्यक निबंधक तसेच बंदोबस्तात सचिव पदाचा पदभार घेण्याचा प्रयत्न  केला त्या वेळी प्रभारी सचिव हे रजेवर होते सभापती सुधीर नवले यांनी सांगीतले की संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा करु परंतु सचिव काळे यांनी एकतर्फी चार्ज घेतला पणन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशा विरोधात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली .त्या याचिकेचा नुकताच निकाल हाती आला असुन वाबळे यांच्या वतीने अँड राहुल कर्पे व अँड महेश देशमुख यांनी काम पाहीले तर काळे यांच्या वतीने अँड विनायक होन व अँड अश्विन होन यांनी काम पाहीले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री. विरभद्रेश्वर देवस्थान ऐनतपुर येथे महाशिवरात्र  निमित्त बेलापूर ऐनतपुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 ते 7 मार्च 2024 पर्यंत तीन दिवसीय शिवलीलामृत सामुदायिक पारायणसेवा करण्यात आली असुन शुक्रवार दिनांक  8मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेतश्री विरभद्रेश्वराचा अभिषेक श्री प्रदीप नवले सर व सौ प्रेरणा प्रदीप नवले यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर 9ते 12 या वेळेत देवी भक्त केशवगुरु दिमोटे देवळाली प्रवरा यांच्या रेणुकादेवी सत्संग मंडळाचा सत्संग सोहळा व महाआरती आयोजित केली असून त्यानंतर खिचडी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी या शिवभक्ती सत्संगाचा व  खिचडी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )- भाजपा महिला अघाडीच्या वतीने बेलापुरात शक्ती वंदन पद यात्रा काढण्यात आली होती.  भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुश्रीताई ढोकचौळे भाजपा महिला अघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी कानडे भाजपा महिला मोर्चा सोशल मिडीया सौ कविता दुबे भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ अनिता शर्मा ,भाजपा महिला शहराध्यक्षा सौ पुष्पलता हरदास भाजपाच्या महिला अघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पुजा चव्हाण भाजपा जिल्हा कार्यकारीणी सदस्या रेखाताई रिंघे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती वंदन पदयात्रा  काढण्यात आली होती  या शक्ती वंदन पदयात्रेत अब की बार मोदी सरकार ,अब की बार ४०० पार , येवुन येवुन येणार कोण मोदी शिवाय दुसरे कोण अशा घोषणा महीलांनी दिल्या या फेरीत शितल सोनवणे ,सोनाली ठोंबरे ,वैशाली शिरसाठ ,स्वाती घोरपडे ,आसमा सय्यद , सरीता मोकाशी ,पुजा चव्हाण ,सरपंच स्वाती अमोलीक  ,रेश्मा पटेल ,बेलापुर ग्रामपंचायत सदस्या तबस्सूम बागवान ,माधुरी ढवळे ,करीमबी सय्यद ,समीना शेख , लैला शेख , रोशनी शेख , सुलताना शेख , सलीमा शेख नसरीन शेख ,योगीता अमोलीक ,निकीता जाधव आदि महीला सहभागी झाल्या होत्या .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव प्रेमकुमार अशोक आघाडे याने शालेय क्रिडा स्पर्धेत उंच उडीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला त्यामुळे त्याची निवड जिल्हा पातळीवर करण्यात आली होती चिरंजीव आघाडे याने जिल्हा पातळीवरही  उंच उडीत दुसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समीतीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या या वेळी माजी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले  सदस्य मुस्ताक शेख पत्रकार देविदास देसाई  तसेच शाळेच्या शिक्षीका श्रीमती शांताबाई गागरे ,श्रीमती शहाबाई उदमले श्रीमती कल्याणी हुमणे ,श्रीमती अमृता वनारसे श्रीमती अंजली देवढे शालेय व्यवस्थापन समितीचे राजुभाई सय्यद अमन सय्यद उपस्थित होते

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर खेळाची गोडी निर्माण करण्याकरीता मैत्रीपूर्ण स्पर्धाचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या दृष्टीने श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार जन्मजय टेकावडे यांनी संस्थेअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित होणाऱ्या आहेत.या अंतर्गत आज ५ ते ७ या वयोगटासाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत मुलांमध्ये श्रीराम अकॅडमी संघाने तर मुलींमध्ये श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे व माध्यमिक विभाग स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संगिता कासलीवाल,चित्रा खटोड, एस मुंदडा, प्रा जयश्री पोडघन,प्रा डॉ योगेश पुंड, प्रा करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी खेळाडूना मार्गदर्शन करतात श्री टेकावडे म्हणाले की आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.चांगल्या स्वस्तासाठी मुला-मुलींनी मैदानावरचे खेळ खेळणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन टेकावडे यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्याकरीता श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

पाथर्डी: (गौरव डेंगळे):राजीव गांधी विद्यापीठ,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स,वेटलिफ्टींग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गरुड हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना  ४५ किलो वजन गटात एकूण १४३ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तर योगिता खेडकर हिने ८७ किलो वजन गटात एकूण १७६ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. या आधी हर्षदा गरुड हिने धर्मशाला येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते तर योगिता खेडकर हिला बेंगलोर येथे झालेल्या  खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे  मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बी. ए. चौरे यांनी या खेळाडूंचे  अभिनंदन केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget