Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव प्रेमकुमार अशोक आघाडे याने शालेय क्रिडा स्पर्धेत उंच उडीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला त्यामुळे त्याची निवड जिल्हा पातळीवर करण्यात आली होती चिरंजीव आघाडे याने जिल्हा पातळीवरही  उंच उडीत दुसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समीतीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या या वेळी माजी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले  सदस्य मुस्ताक शेख पत्रकार देविदास देसाई  तसेच शाळेच्या शिक्षीका श्रीमती शांताबाई गागरे ,श्रीमती शहाबाई उदमले श्रीमती कल्याणी हुमणे ,श्रीमती अमृता वनारसे श्रीमती अंजली देवढे शालेय व्यवस्थापन समितीचे राजुभाई सय्यद अमन सय्यद उपस्थित होते

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर खेळाची गोडी निर्माण करण्याकरीता मैत्रीपूर्ण स्पर्धाचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या दृष्टीने श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार जन्मजय टेकावडे यांनी संस्थेअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित होणाऱ्या आहेत.या अंतर्गत आज ५ ते ७ या वयोगटासाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत मुलांमध्ये श्रीराम अकॅडमी संघाने तर मुलींमध्ये श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे व माध्यमिक विभाग स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संगिता कासलीवाल,चित्रा खटोड, एस मुंदडा, प्रा जयश्री पोडघन,प्रा डॉ योगेश पुंड, प्रा करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी खेळाडूना मार्गदर्शन करतात श्री टेकावडे म्हणाले की आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.चांगल्या स्वस्तासाठी मुला-मुलींनी मैदानावरचे खेळ खेळणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन टेकावडे यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्याकरीता श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

पाथर्डी: (गौरव डेंगळे):राजीव गांधी विद्यापीठ,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स,वेटलिफ्टींग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गरुड हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना  ४५ किलो वजन गटात एकूण १४३ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तर योगिता खेडकर हिने ८७ किलो वजन गटात एकूण १७६ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. या आधी हर्षदा गरुड हिने धर्मशाला येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते तर योगिता खेडकर हिला बेंगलोर येथे झालेल्या  खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे  मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बी. ए. चौरे यांनी या खेळाडूंचे  अभिनंदन केले.

बेलापुर  (प्रतिनीधी )- येथील बेलापुर एज्युकेशन संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान क्षिरसागर यांना चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे               भगवान क्षिरसागर यांना मुंबई तसेच पुणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धेत पहीला व दुसरा क्रमांक मिळालेला आहे .आज विवाह ही एक गंभीर समस्या बनलेली आहे ,विवाह समस्येबाबत सलग दिड वर्ष त्यांनी व्यंगचित्र मालीका विविध वृत्तपत्रामधुन सादर केले तसेच व्यसनमूक्तीवर हसत खेळत व्यसनमूक्ती हे सुमारे तिनशे वात्रटीका व व्यंगचित्र असलेले पुस्तकही प्रकाशित झालेले आहे भगवान क्षिरसागर यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल श्री संत शिरोमणी रोहीदास महाराज चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण हा पुरस्कार देवुन गौरविण्यात आहे त्याबद्दल खासदार सदाशिव लोखंडे   माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे भास्करराव खंडागळे सुनिल मुथा देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी): बेलापूर ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा "आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार" चे वितरण महसूलमंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते तसेच खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धराम शालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियांका कुऱ्हे, सुशिलाबाई पवार, वैभव कुऱ्हे आदींनी स्विकारला.                               सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला.                                                   बेलापूर ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजने अंतर्गत १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना,साठवण तलाव,बंदिस्त गटारीची कामे,नियमित घंटागाडीव्दारे कचरा संकलन,नियमित लसीकरण,घरकुल योजनेची काटेकोर अंमलबजावणी ,विना पोलिस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक ,विविध सांस्कृतिक उपक्रम,क्रीडा स्पर्धा,दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण आदि कामे करुन पुरस्कारासाठीची निकषपूर्ती केल्याने सदरचा पुरस्कार देण्यात आला.                   सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी            ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे, भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे हाजी ईस्माईल शेख, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर बंगाळ, माजी उपसरपंच प्रकाश नाईक, बाबुराव पवार, गोपी दाणी, बाबुलाल पठाण, महेश कुऱ्हे, भाऊसाहेब तेलोरे, भैय्या शेख, मधुकर अनाप, अली शेख, मछिंद्र खोसे, सुभाष रशिनकर आदी उपस्थित होते.

राहता (गौरव डेंगळे): प.पू गुरुमाऊलींचे आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साकुरी ता.राहता जि. अहमदनगर येथे दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य एक दिवसीय श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ (मोठा ग्रंथ) पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून ३५१ सेविकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी नवनाथ पाराण्याची सेवा रुजू केली.सेवा सकाळी ७:०० वाजता सुरू झाली तर सायंकाळी ४:३० वाजता संपन्न झाली व त्यानंतर आयोजकाकडून प्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. साकुरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र हे राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी त्रिकाल आरती, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी प्रश्न-उत्तर विभाग, रविवारी बालसंस्कार व ग्राम अभियान तसेच रविवारच्या दिवशी विवाह मंडळाचे कामकाज सुरू असते.केंद्र प्रतिनिधी म्हणून प्रभाकर दंडवते, गुरुपीठ प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण पांगरकर शास्त्री,बाल संस्कार प्रतिनिधी म्हणून उज्वला बावके,ग्राम अभियान प्रतिनिधी म्हणून उर्मिला गायकवाड,कृषी प्रतिनिधी म्हणून निर्मला पोटे तर विवाह मंडळ प्रतिनिधी म्हणून शालिनी वाणी काम बघतात.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने मानव सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्य सुतार समाजाचे विभागीय अध्यक्ष अँड. व्ही. टी. शिंदे ,बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  पत्रकार देविदास देसाई  शेलार बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,शिवाजी पा वाबळे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले ,समता परिषदेचे प्रकाश कुर्हे  ,गणेश लढ्ढा, पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार आदि मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले ,या वेळी बल्लु दायमा अरविंद राठी ,विशाल मेहेत्रे  ,विशाल आंबेकर ,सचिन शर्मा ,बाळासाहेब शर्मा ,सतीश शर्मा शुभम शर्मा ,संजय शर्मा ,राजेंद्र शर्मा ,रामभाऊ वाकचौरे ,गोविंद भराटे ,राजु पोपळघट ,भाऊसाहेब पोपळघट ,निर्मलराज , ईंद्रजीत ,गीरीश परांजपे ,अर्जुन कुर्हे गोरक्षनाथ शिंदे जालींदर शिंदे , आप्पासाहेब महाले , जयराम शर्मा आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget