Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी: श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार यांची समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांच्या आदेशान्वये समाजवादी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.जमादार पुर्वी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत त्यांना उचित न्याय मिळवून देणेकामी सातत्याने संघर्ष केला असल्याने त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.यावेळी नियुक्ती पत्र देताना समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफ शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाड़े, युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहद अहमद, माजी नगरसेवक शान ए हिंद,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती साजेदा  निहालअहमद (मालेगांव), धुळे शहराध्यक्ष गुड्डू काकर, धुळे येथील माजी नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल,जमील मन्सूरी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.जमादार यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.

 

आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा 

बेलापुर  (प्रतिनिधी) श्रीरामपुर  कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला  असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे 


श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव  वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन  संचालक मंडळ कार्यरत झाले  आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले  असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.


या बजेटमध्ये  मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व  बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर  २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी  पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.


तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.

श्रीरामपूर -अयोध्येत ५०० वर्षाच्या प्रदीर्घ  प्रतीक्षेनंतर  प्रभू श्रीरामाची  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात आज जल्लोषचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या कार्यक्रमानिमित्त आप व समर्थ ग्रुप च्या वतीने  नेवासा रोड समर्थ चौक येथे रामध्वज उभारण्यात आला यावेळी मोठी रॅली काढून चौकामध्ये सडा, रांगोळी काढून, भगवे झेंडे, फुलांची सजावट, आतिशबाजी करत मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा देत मोठ्या आनंद उत्सवात कार्यक्रम साजरा करण्यात आला.या वेळी आप चे जिल्हाअध्यक्ष  तिलक डुंगरवाल म्हणाले की ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशामध्ये जल्लोषाचे आणि उत्सवाचे वातावरण दिसत आहे  त्याचप्रमाणे भारतात रामराज्य ही आले पाहिजे राज्यकर्त्यांनी रामराज्य प्रमाणेच राज्य चालून  जनतेला सुख समृद्ध करून  देशात असंच उत्साही वातावरण ठेवून रामराज्य प्रमाणेच काम करावे  अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली, यावेळी विकास डेंगळे म्हणाले देशामध्ये असाच आनंद उत्सव व प्रेम कायम राहो सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आनंदाने रावे सर्व देश वासियांना  प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी

तिलक डुंगरवाल, विकास डेगळे, राहुल रणपिसे, भरत डेगळे, श्रीधर कराळे पाटील, प्रशांत बागुल ,प्रवीण लगडे, सलीम शेख, अमोल नवघरे, ,डाॅ प्रवीण राठोड,,डाॅ सचिन थोरात, राज डेंगळे, भागवत बोंबले, देवराज मुळे ,मनोज बोंबले, मोहन तेलोरे , महेश कवठाळे, प्रवीण काळे ,गणेश भडांगे, शिवा मोरे, संदीप शिरसाट, मुबारक शेख, महबूब प्यारे, युवराज घोरपडे ,निलेश घोरपडे, सतीश सुलताने, अभिजीत राऊत, प्रसाद कटके, अलीम भाई शेख, विशाल शिरसाट, भागवत घुगे ,सुभाष भडांगे, शिवशंकर मोरे, नितीन मोरे ,गणेश पवार, प्रदीप ऊडे, राहुल राऊत, शुभम मालकर, गोकुळ जाधव, जयेश खर्डे, गणेश गवारे, विजय भवार, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- महाले पोदार क्रीडा संकुलात महाले प्रतिष्ठान व अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने मिरज येथे दि २३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या १४ वर्षाखालील मुला-मुलीच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे सराव शिबीर दि २० जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाले प्रतिष्ठान ओम महाले यांनी दिली.या सराव शिबीरासाठी अहमदनगर,पुणे व सोलापुर जिल्हातून निवड झालेल्या संभाव्य २० मुली सहभागी होणार आहेत.सकाळ ६:०० ते १०:०० व सायंकाळ ४:०० ते ७:०० अशा दोन सत्रात सराव शिबिर आयोजित होणार आहे.शिबिरा दरम्यान व्यायाम व आहार तज्ञ डॉ सुभाष देशमुख यांच्या देखील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. निवड झालेल्या संभाव्य २० खेळाडूंमध्ये बहुतेक खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तसेच राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक देखील पटकावले आहे. तीन दिवसीय व्हॉलीबॉल शिबिर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष व लेवल वन प्रशिक्षक पार्थ दोशी व श्रीरामपूरचे क्रीडा रत्न नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. व्हॉलीबॉल शिबिर हे श्रीरामपूरकरांसाठी पर्वणी असून जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या शिबिरासाठी आपल्या पाल्याला बघण्यासाठी घेऊन यायचं आहे, असे आवहान अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.शिबिर महाले पोतदार शाळेमध्ये आयोजित होणार आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-पोलीस खात्याचे ब्रिदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असुन या ब्रिदवाक्याप्रमाणे चांगल्याला चांगली वागणुक व वाईटाला वाईटच वागणुक दिली जाईल समाजासाठी विघातक असणारे कृत्य करणारावर निश्चितच कारवाई केली जाईल असा ईशारा श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला बेलापुर ग्रामपंचायत, बेलापुर पत्रकार ,ग्रामस्थ यांच्या वतीने नविन अधीकाऱ्याचे स्वागत व बदली झालेल्या अधिकाऱ्याचा निरोप समारंभाचे आयोजन बेलापुर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होत पोलीस निरीक्षक देशमुख पुढे म्हणाले की मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली त्या निमित्ताने अनेकांशी संपर्क आला परंतु श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर गावातील नागरीक सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन काम करतात याचा आनंद वाटला हिंदु मुस्लिम ऐक्याचे आदर्श उदाहरण या गावात पहायला मिळते अशाच प्रकारे सर्वत्र सर्व समाजाने सामंजस्य दाखविले तर पोलीसांचेही काम कमी होईल या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे म्हणाले की या ठिकाणी काम करताना वेगळाच अनुभव आला या गावातील सर्व नागरीक पुढाकार घेवुन आपल्या समस्या स्वतःच सोडवितात ऐकमेकांचे सण उत्सव साजरे करतात दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतात अशा गावात काम करण्याची संधी मिळाली आपणाकडून मिळालेल्या चांगल्या कामाची शिदोरी मी जाताना बरोबर घेवुन जात आहे बदली हा नोकरीचा भाग आहे परतु येथे भरपुर काही शिकण्यास मिळाले त्याचा उपयोग भविष्यात काम करताना  निश्चितच होईल गावाने सुरु केलेल्या चांगल्या परंपरा अशाच सुरु ठेवाव्यात असा आग्रह त्यांनी व्यक्त केला या वेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे  टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुनिल मुथा,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,
 भाजपा अल्पसंंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष  हाजी ईस्माईल शेख प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मांसाहार विक्रीची दुकाने स्वंयम् स्फूर्तीने बंद ठेवणारे व्यापारी रसीद कुरेशी फिरोज कुरेशी फरहान कुरेशी जुबेर कुरेशी यासीन कुरेशी शाहीद कुरेशी ईरफान कुरेशी यासीर कुरेशी रामु गुडे अजीजभाई शेख राज्जाक पटेल दाऊद आतार श्रीलाल गुडे अबेद पठाण कय्युम कुरेशी आदिंचा सन्मान पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .या वेळीग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब दाणी,पत्रकार दिलीप दायमा,सुहास शेलार,प्रसाद खरात,अजीज शेख, मोहसीन सय्यद,जाकीर शेख,रत्नेश गुलदगड, नितीन शर्मा, जीना शेख,बाबुलाल पठाण, हवालदार दिपक कदम ,हवालदार बाळासाहेब कोळपे बेलापुर पोलीस स्टेशनचे  गौतम लगड भारत तमनर संपत बडे नंदु लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे धनंजय वाघमारे महेश थोरात समीर शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले.

 बेलापुर (प्रतिनिधी  )- अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्राच्या होणाऱ्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ ( चिकन मटन मासे )विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय बेलापुरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी घेतला असुन या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे .  बेलापुर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभु श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले असता मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवुन राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदु बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेवुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता .  त्याच धर्तीवर बेलापुर ग्रामपंचायतीच्या वातीने

बेलापूर बु ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन,मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली या विनंतीला मान देत सर्व व्यवसायीकांनी दिनांक २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्राम विकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार,मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण,रामू गुडे रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी,कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक परिक्षेत्रांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस विभागात ३ वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच जिल्हा बाहेर बदल्यांचा झाल्या आहेत. श्रीरामपूर शहरात पुन्हा पोलिसिंग काय असते हे दाखवून देत अनेक गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची धुळे येथे बदली झाली असून. धुळे शहरात दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख करणारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे इंचार्ज म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने. आज दिनांक बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडे ५:३० वाजता, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका दबंग अधिकाऱ्याचा निरोप समारंभ तर दुसऱ्या दबंग अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget