Latest Post

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- महाले पोदार क्रीडा संकुलात महाले प्रतिष्ठान व अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने मिरज येथे दि २३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या १४ वर्षाखालील मुला-मुलीच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे सराव शिबीर दि २० जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाले प्रतिष्ठान ओम महाले यांनी दिली.या सराव शिबीरासाठी अहमदनगर,पुणे व सोलापुर जिल्हातून निवड झालेल्या संभाव्य २० मुली सहभागी होणार आहेत.सकाळ ६:०० ते १०:०० व सायंकाळ ४:०० ते ७:०० अशा दोन सत्रात सराव शिबिर आयोजित होणार आहे.शिबिरा दरम्यान व्यायाम व आहार तज्ञ डॉ सुभाष देशमुख यांच्या देखील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. निवड झालेल्या संभाव्य २० खेळाडूंमध्ये बहुतेक खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तसेच राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक देखील पटकावले आहे. तीन दिवसीय व्हॉलीबॉल शिबिर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष व लेवल वन प्रशिक्षक पार्थ दोशी व श्रीरामपूरचे क्रीडा रत्न नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. व्हॉलीबॉल शिबिर हे श्रीरामपूरकरांसाठी पर्वणी असून जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या शिबिरासाठी आपल्या पाल्याला बघण्यासाठी घेऊन यायचं आहे, असे आवहान अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.शिबिर महाले पोतदार शाळेमध्ये आयोजित होणार आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-पोलीस खात्याचे ब्रिदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असुन या ब्रिदवाक्याप्रमाणे चांगल्याला चांगली वागणुक व वाईटाला वाईटच वागणुक दिली जाईल समाजासाठी विघातक असणारे कृत्य करणारावर निश्चितच कारवाई केली जाईल असा ईशारा श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला बेलापुर ग्रामपंचायत, बेलापुर पत्रकार ,ग्रामस्थ यांच्या वतीने नविन अधीकाऱ्याचे स्वागत व बदली झालेल्या अधिकाऱ्याचा निरोप समारंभाचे आयोजन बेलापुर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होत पोलीस निरीक्षक देशमुख पुढे म्हणाले की मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली त्या निमित्ताने अनेकांशी संपर्क आला परंतु श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर गावातील नागरीक सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन काम करतात याचा आनंद वाटला हिंदु मुस्लिम ऐक्याचे आदर्श उदाहरण या गावात पहायला मिळते अशाच प्रकारे सर्वत्र सर्व समाजाने सामंजस्य दाखविले तर पोलीसांचेही काम कमी होईल या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे म्हणाले की या ठिकाणी काम करताना वेगळाच अनुभव आला या गावातील सर्व नागरीक पुढाकार घेवुन आपल्या समस्या स्वतःच सोडवितात ऐकमेकांचे सण उत्सव साजरे करतात दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतात अशा गावात काम करण्याची संधी मिळाली आपणाकडून मिळालेल्या चांगल्या कामाची शिदोरी मी जाताना बरोबर घेवुन जात आहे बदली हा नोकरीचा भाग आहे परतु येथे भरपुर काही शिकण्यास मिळाले त्याचा उपयोग भविष्यात काम करताना  निश्चितच होईल गावाने सुरु केलेल्या चांगल्या परंपरा अशाच सुरु ठेवाव्यात असा आग्रह त्यांनी व्यक्त केला या वेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे  टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुनिल मुथा,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,
 भाजपा अल्पसंंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष  हाजी ईस्माईल शेख प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मांसाहार विक्रीची दुकाने स्वंयम् स्फूर्तीने बंद ठेवणारे व्यापारी रसीद कुरेशी फिरोज कुरेशी फरहान कुरेशी जुबेर कुरेशी यासीन कुरेशी शाहीद कुरेशी ईरफान कुरेशी यासीर कुरेशी रामु गुडे अजीजभाई शेख राज्जाक पटेल दाऊद आतार श्रीलाल गुडे अबेद पठाण कय्युम कुरेशी आदिंचा सन्मान पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .या वेळीग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब दाणी,पत्रकार दिलीप दायमा,सुहास शेलार,प्रसाद खरात,अजीज शेख, मोहसीन सय्यद,जाकीर शेख,रत्नेश गुलदगड, नितीन शर्मा, जीना शेख,बाबुलाल पठाण, हवालदार दिपक कदम ,हवालदार बाळासाहेब कोळपे बेलापुर पोलीस स्टेशनचे  गौतम लगड भारत तमनर संपत बडे नंदु लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे धनंजय वाघमारे महेश थोरात समीर शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले.

 बेलापुर (प्रतिनिधी  )- अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्राच्या होणाऱ्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ ( चिकन मटन मासे )विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय बेलापुरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी घेतला असुन या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे .  बेलापुर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभु श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले असता मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवुन राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदु बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेवुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता .  त्याच धर्तीवर बेलापुर ग्रामपंचायतीच्या वातीने

बेलापूर बु ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन,मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली या विनंतीला मान देत सर्व व्यवसायीकांनी दिनांक २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्राम विकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार,मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण,रामू गुडे रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी,कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक परिक्षेत्रांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस विभागात ३ वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच जिल्हा बाहेर बदल्यांचा झाल्या आहेत. श्रीरामपूर शहरात पुन्हा पोलिसिंग काय असते हे दाखवून देत अनेक गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची धुळे येथे बदली झाली असून. धुळे शहरात दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख करणारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे इंचार्ज म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने. आज दिनांक बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडे ५:३० वाजता, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका दबंग अधिकाऱ्याचा निरोप समारंभ तर दुसऱ्या दबंग अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले आहे.

खेळाडूंच्या पालकांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाली स्पर्धेला सुरुवात 


श्रीरामपुर(गौरव डेंगळे): आरोग्य व शारीरिक क्षमता यामधील फरक खेळाडूंना क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व पालक यांनी लहान वयात लक्षात आणून देणे खूपच गरजेचे आहे.यश-अपयश,संघात निवड याहीपेक्षा खेळाडूंनी खेळण्याच्या फायद्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते प्रा सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निवड चाचणी प्रसंगी केले.

येथील महाले पोदार क्रीडा संकुलच्या व्हॉलिबॉल मैदानावर चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची आज निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी पुणे जिल्हा,अहमदनगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाले प्रतिष्ठानचे श्री ओम महाले, दैनिक स्नेहप्रकाश कार्यकारणी संपादक श्री स्वामीराज कुलथे,श्री सनी हिरन,श्री पार्थ दोशी, कुलदीप कोंडे,श्री पापा शेख, नितीन बलराज,श्री शैलेंद्र त्रिपाठी,श्री शंभूराजे मनुर,सर्वेश राठी,धनंजय माळी, नितीन फुलपगार सह आदी मान्यवर उपस्थित होते .प्रा देशमुख यांनी निवड चाचणी स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूं तंदुरुस्त राहण्यासाठी काही व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी या सर्व व्यायाम प्रकाराचा खेळाडूंबरोबर पालकांनी देखील आनंद घेतला.

या निवडचाचणीतून संभाव्य १६ मुले व १६ मुलीच्या पुणे विभाग संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी होणाऱ्या शिबिरातून अंतिम १२ मुले व १२ मुलीच्या संघाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती श्री नितीन बलराज यांनी दिली. दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान मिरज येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-  अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ तारखेला आयोध्देत होणाऱ्या सोहळ्याचे औचित्य साधुन श्रीरामपुर तालुक्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या  एकुण ३२ मूर्तीचे वाटप करण्यात येणार असुन उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली                        महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे .त्याच धर्तीवर अनुलोम संस्थेच्या सहकार्याने राज्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील नागरे परिवाराला हा बहुमान मिळाला महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते  नागरे परिवारातील सामाजिक कार्यकर्ते शाम नागरे व मुकुंद नागरे यांना मूर्ती प्रदान करण्यात आली उक्कलगाव येथे सडा रांगोळी काढुन वाजत गाजत प्रभू श्रीरामाची मूर्ती नागरे यांच्या निवासस्थानी आणण्यात आली या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली या वेळी राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाम नागरे यांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले या वेळी उक्कलगावच्या लोकनियुक्त महीला सरपंच कु. रविना शिंदे उक्कलगाव ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, अनिल जनार्धन थोरात, रविंद्र जगधने, पत्रकार शरद थोरात, परशुराम आदिक ,हरिहर केशव गोविंद मंदिराचे पुजारी अरविंद तांबे, विनायक तांबे ,सोपान पगारे, मधुकर पुजारी, सुरेश मुसमाडे ,शुभम जगधने, केसापुर येथील डोखे, श्री शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान उक्कलगावचे मावळे, श्री हरिहर भजनी मंडळ तसेच उक्कलगावचे ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी:महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाची व लाभदायक ठरणारी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विविध आजारांवरील उपचारासाठी होणारा ५ लाख रूपयांपर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.

ज्येष्ठ संपादक शौकत शेख व त्यांचे चिरंजीव मोहसीन शेख यांनी पत्रकारदिनी सुरू केलेल्या "मोहसिन-ए-मिल्लत" या मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट समोरील संत मदर तेरेसा सर्कल प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी इलाहिबक्ष कुरेशी हे होते. 

मासिकाचे संपादक मोहसिन शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संपादक शौकत शेख,

माजी नगरसेवक नजीर मुलाणी,  महेबुब कुरेशी, तौफिक शेख,  असिफ तांबोळी, जाफर शहा,  सलाऊद्दीन शेख, मुखतार मनियार,असलम बिनसाद, हाजी लतीफ सय्यद, रियाजखान पठाण, स्वामीराज कुलथे, विजय खाजेकर, डी.एल.भोंगळे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मिलिंदकुमार साळवे म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पासून ते महालापर्यंत राहणाऱ्या सर्व आर्थिक व सामाजिक घटकातील वर्गाला ५ लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणाऱ्या या मोफत आरोग्य विम्याचा गोरगरीब जनतेस मोठा लाभ होणार आहे.

२८ जुलै २०२३ रोजी या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे.  त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटुंबांचा म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. पात्र कुटुंबाला मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले होते. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून लागू केली. १ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत ५ लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटुंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला. 

२८ जुलै २०२३ ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व १२ कोटी जनतेला सरसकट ५ लाख रूपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू करण्यात आले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारित महात्मा फुले ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने १२ कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रूग्णालयांमधून ५ लाख रूपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत, असेही साळवे यांनी सांगितले.

----------------------------

*सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड*

सध्या २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणारांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे  कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेऐवजी थेट आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

-------------------------------

*यामुळे रखडली योजना*

अंमलबजावणी सहाय्य संस्था व अंगीकृत रूग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती, योजनेच्या आज्ञावलीत बदल, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर मनुष्यबळ  नियुक्ती, एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या विमा कंपनीची निवड अशी कार्यवाही न झाल्याने योजना मंत्रालयात रखडली आहे.

--------------------------------

*जनतेतून साकारली योजना*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार मी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी किमान ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना लागू करण्याची सूचना केली होती. तिची दखल घेऊन ही योजना साकारली, याचा आनंद आहे. शासन जनतेचा आवाज ऐकते,याचा प्रत्यय यातून आला. मंत्रालयातील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून तातडीने योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.

*--मिलिंदकुमार साळवे,* मिशन वात्सल्य शासकीय समिती, महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती.

----------------------------------------


👇 *बॉक्स मध्ये घेणे* 👇


*प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे - दिपालीताई ससाणे*


*पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोहसिन ए मिल्लत या* *वर्तमानपत्र प्रकाशन सोहळ्यात महिलांचा मोठा सहभाग लाभला*

*या कार्यक्रमास महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते यावेळी मोहसिन शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.*

*या प्रसंगी मोहसिन ए मिल्लत या वृतपत्रास शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या शुभेच्छापर भाषणात सौ.ससाणे  म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यापर्यंतच मर्यादित न राहता प्रत्येक समाजातील महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात पुढे येवून कामे केली पाहिजेत असे प्रोत्साहनही यावेळी त्यांनी महिलांना दिले. तसेच या कार्यक्रमात महिला भगीनींची मोठी उपस्थिती पाहून तथा मोहसिन ए मिल्लत या वृतपत्राच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहुन मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे ते म्हणाल्या.*

----------------------------------------

यावेळी महेबुब कुरेशी, हाजी लतीफभाई सय्यद,नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, जोएफ जमादार, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, मुखतार मनियार, आसिफ मनियार, असलम बिनसाद, विजयराव खाजेकर , शौकत शेख, ॲड. मुमताज बागवान, सलवा शेख, फरजाना शेख आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.

यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही खुपच सविस्तरपणे याप्रसंगी दिली आहे,

 मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील घराघरात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याची कामे केली जाणार असुन त्या अनुषंगाने अभा कार्ड/ आयुष्यमान भारत कार्ड कार्ड/ ई- श्रम कार्ड/ पेन्शन कार्ड याची सविस्तर माहिती सदरील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याप्रमाणेच शासनाच्या आणखी ज्या काही विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देखील प्रत्येक अंकात सविस्तरपणे दिली जाणार आहे, आमच्या मोहसिन ए मिल्लत कमेटी चा उद्देश केवळ हाच आहे की शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही तळागळातील जनसामान्यांपर्येंत पोहोचावी आणी त्यात त्यांचा फायदा व्हावा,शासनाने त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची त्यांना घरबसल्या माहीती मिळावी,यासाठी खास करुन सदरील कामी कार्यरत असलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील क्रमाक्रमाने या अंकात सविस्तरपणे प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, हाजी लतीफभाई,  महेबुब कुरेशी, जाफर शाह,  शेख नजीर गफूर (मामु),  जोएफ जमादार,  तौफिक शेख (एकता),  शेख शब्बीर (सर),  अजहर शेख (एबीएस),  असिफ तांबोळी,  फिरोज शेख,  रज्जाक पठाण,  शेख जाकीर (सर), मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख, इब्राहिम शेख, असलम बिनसाद, इम्रान एस. शेख, विजयराव खाजेकर, दशरथ भोंगळे, प्रविण साळवे, डॉ. पंडितराव पगारे, रमाताई भालेराव, परवीनभाभी शाह, विजय पाठक,  दिलीप शेंडे (सर), ॲड.मुमताज बागवान, हाजी साजीद मिर्जा, शकील बागवान (सर), जलील कुरेशी (सर),  समीर बागवान, लकी सेठी, जावेद पिंजारी, अजिज अत्तार, असिफ मंडपवाले, पत्रकार बाबासाहेब चेडे, राजेश भवार, नंदकुमार बगाडे, सचिन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शौकतभाई शेख, मोहसिन शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, ॲड. हारुन बागवान, नदीमताज गुलाम, शब्बीर (राजु) कुरेशी , सरताज शेख, आरिफ कुरेशी, इब्राहिम बागवान (सर), मो.शफी अन्सारी, अफजल मेमन, मोहसिन बागवान, शब्बीर शेख, जावेद शेख, युनूस कुरेशी, हाजी फयाज बागवान, मुखतार मनियार, कलीम शेख, जाकीर शाह, समदानी शाह,जुबेर पटेल, वाजीद शेख तसेच सलवा शेख, फरजाना शेख,जेबा शाह,  हिना मुलाणी, आस्मा सय्यद, जबीन पटेल, निलोफर बागवान, आर्शिया नदीम गुलाम, पूजा सकट, अनम खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मोहसिन ए कमेटीचे कार्याध्यक्ष हाजी इलाहिबक्ष कुरेशी यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget