Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी): टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू प्रेम शिंदे याची निवड करण्यात आली तर उपकर्णधारपदी केंब्रिज इंटरनॅशनल हायस्कूलच्या खेळाडू मितांश चोथानी याची निवड करण्यात आली.

सप्टेंबर महिन्यामध्ये गोव्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेची निवड चाचणी श्रीरामपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती.या निवड चाचणीसाठी अहमदनगर, संगमनेर,अकोले,कोपरगाव श्रीरामपूर तसेच संभाजीनगर जिल्ह्यातून ४५ ते ५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.निवड चाचणीतून १३ खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक श्री नितीन बलराज यांनी दिली. निवड झालेल्या संघ १६ ते १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातून निमंत्रित १८ राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री नितीन गायधने तर मार्गदर्शकपदी श्री बॉबी बकाल व गौरव डेंगळे यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या संघाचे टी-२० क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री सद्दिक मोहम्मद,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,प्राचार्या सौ जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड,श्री गोकुळ खंडागळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे: १) प्रेम शिंदे (कर्णधार) २) मितांश चोथानी (उप कर्णधार) ३) यश काथेड ४) धर्मेश आदमाने ५) अर्जान शेख ६) सर्वेश व्यास ७) आकाश यादव ८) आरम डाकले ९) वरद कुंभकर्ण १०) सक्षम थापर ११) अनिमेश फेरवणी १२) रिदम बत्रा  १३) कबीर चौदांते

अहमदनगर(गौरव डेंगळे): रोलर हॉकी हा हॉकीचा एक प्रकार आहे जो कोरड्या पृष्ठभागावर चाकांच्या स्केट्सचा वापर करून खेळला जातो.हे पारंपारिक रोलर स्केट्स (क्वॉड स्केट्स) किंवा इनलाइन स्केट्ससह खेळले जाऊ शकते आणि एकतर बॉल किंवा पक वापरता येते. आज अहमदनगर येथे भारतीय रोलर स्केटिंग संघटनेचे सहसचिव श्री सतीश गायकवाड यांनी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंना रोलर स्केटिंग खेळा संदर्भात प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.

रोलर हॉकी जगभरातील जवळपास ६० देशांमध्ये खेळली जाते.संघटित रोलर हॉकीचे तीन प्रमुख प्रकार आहेत. पारंपारिक " रोलर हॉकी " (याला रिंक हॉकी, क्वाड हॉकी आणि हार्डबॉल हॉकी देखील म्हणतात) क्वाड स्केट्स, वक्र/'केन' स्टिक्स आणि बॉल वापरून खेळला जातो; हा मर्यादित संपर्काचा खेळ आहे . इनलाइन स्केट्स, आइस हॉकी स्टिक्स आणि एक पक वापरून " इनलाइन हॉकी " खेळली जाते ; शरीराच्या तपासण्यांना परवानगी नसली तरी हा एक पूर्ण-संपर्क खेळ आहे. " इनलाइन स्केटर हॉकी " ही इनलाइन हॉकीची युरोपियन आवृत्ती आहे जी पक ऐवजी बॉल वापरते. रिंक हॉकी आणि इनलाइन हॉकी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्केटद्वारे नियंत्रित केली जातात , तर इनलाइन स्केटर हॉकी द्वारे नियंत्रित केली जातेआंतरराष्ट्रीय इनलाइन स्केटर हॉकी फेडरेशन . बहुतेक व्यावसायिक हॉकी खेळ इनडोअर किंवा आउटडोअर स्पोर्ट कोर्टवर होतात (स्केटिंग पृष्ठभाग तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या इंटरलिंकिंग टाइल्सचा एक प्रकार).अन्यथा,कोणत्याही कोरड्या पृष्ठभागाचा वापर खेळ आयोजित करण्यासाठी केला जाऊ शकतो,विशेषत: रोलर रिंक, मॅकॅडम (डामर) किंवा सिमेंट.यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या ४० ते ४५ खेळाडूंसह, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे,श्री नितीन गायधने यांनी रोलर स्केटिंग मार्गदर्शन सत्राचा अनुभव घेतला.

श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हददीत सार्वजनिक गणेश उत्सवात एकुण 112 गणेश मंडळानी सहभाग घेवुन गणेश स्थापना केली होती. सदर मंडळांना प्रोत्साहन देण्याकरीता व पोलीस प्रशासन व गणेश मंडळ यांचेत समन्वय राहुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचे हातातून चांगले कार्य व्हावे करीता श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन कडुन प्रथम ०३ उत्कृष्ट मंडळ व 02 उत्तेजनार्थ तसेच एक गाव एक गणपती 3 मंडळाची निवड करुन त्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याची संकल्पना राबविली. तसेच ज्या गणपती मंडळानी प्रशासनाची परवानगी घेणे,1. गणेश मुतीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत डीजे /डॉल्बींचा वापर न करता पारंपारीक वादयांचा वापर करणे. २. गणेश भुतीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे ३. पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ४. श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे ५. गणेशोत्सव काळात उत्कृष्ट सजावट ६. गणेशात्सव काळात पर्यावरण संगोपन, व्यसनमुक्ती व महीला सुरक्षा बाबतचे कार्यक्रम राबविणे 7. स्वंयसेवक नेमुन शिस्त पाळणारे गणेश मंडळ या निकषांचा विचार करुन मंडळाची बक्षीसासाठी निवड केली आहे. तसेच शासनाच्या घालुन दिलेल्या अटी शर्तीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल सर्व गणेश मंडळाना देखील प्रमाणपत्र दिले.

सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३ मध्ये उत्कृष्ट सार्वजनिक काम केल्याबाबत त्यांचा सन्मान सोहळा दिनांक 02/10/२०२३ रोजी सायंकाळी 06/०० वाजेच्या सुमारास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे मा. डाँ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व मा.हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत पार पडला असून त्याचे शुभहस्ते उत्कृष्ट काम करणा-या गणेश मंडळांना पारीतोषिक वितरण करण्यात आलेले आहेत.प्रथम क्रमांक - मानाचा गणपती आझाद मैदान वार्ड नं -5 दुसरा क्रमांक - नॉर्दन बँच वार्ड नंबर-7 तिसरा क्रमांक-जे टी एस हायस्कूल बेलापूर चौथा क्रमांक- शिवाजी रोड चा राजा वार्ड नं 3

पाचवा क्रमांक-योद्धा ग्रुप गिरमे चौक वार्ड नं-3 उत्तेजनार्थ- 1. जय भोले मित्र मंडळ 2. श्रीराम तरुण मंडळ

एक गाव एक गणपती

प्रथम क्रमांक - खंडाळा

दुसरा क्रमांक - वळदगाव तिसरा क्रमांक- ब्राह्मणगाव वेताळ

यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. सदर कार्यक्रमांस श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी हजर राहीले आहेत. तरी सदर मंडळांनी यापुढे देखील अशाच प्रकारे शासनाचे दिलेल्या सुचना व नियमाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करुन सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याचे काम करेल यांना पोलीस प्रशासनाकडुन अशाच प्रकारे सन्मानित करण्यात येईल बाबत आश्वाषित केले आहे.

सदरचा उपक्रम मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब,मा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली मा. डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व मा. हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत राबविण्यात आला आहे.

बेलापुर (प्रतिनिधी )-गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच  एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण दवाखान्यात व्यवस्थित उपचार घेत आहे .                             या बाबत घडलेली घटना अशी की बेलापुर येथील साई मंदिरांत आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाबाबत बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित  होते मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत होते व त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार वय ७८ वर्ष हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले होते तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ  बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे उभे होते गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल  हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले त्या वेळी  हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले त्यानी त्यांचा श्वास पाहीला  मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला आमदार लहु कानडे यांनी आपले सुरु असलेले भाषण थांबवुन आपल्या वहानातुन शेलार यांना दवाखान्यात पाठवीले पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तसेच आमदार कानडे यांच्या सहकाऱ्यामुळे शेलार यांना वेळेवर उपचार मिळाले सध्या ते संत लुक हाँस्पीटल येथे उपचार घेत असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे .या बाबत शेलार परिवाराने आमदार लहु कानडे तसेच बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे


 ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!

               जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

   आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...

        (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!!

ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! "

जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..

      इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला , 

 आशा महान महामानवाचा आज जन्मदिवस 

  मी लिहीताना  एक निरक्षर ,अनाथ , विश्व बंधुत्व ,संवेदनशील , समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद स्व . यांचा उल्लेख करतो.

.त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो .त्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .

              आगदी १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वरवादाची,  अल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा  समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे "  .त्या एकाच अल्लाहा ची प्रार्थना करा . व  अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.      सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .

           इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही .

कोणी ही व्यक्ती  ती मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकतो , अलिम मौलाना , मुफ्ती , हाफीज ,बनु शकतो ,शिक्षण घेवू शकतो .  ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला.  

ज्ञानी माणसांला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी मोठे स्थान दिले आहे,एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले ,मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थ शास्त्रात , रसायनशास्त्र , वैद्यकीय शास्त्रात, क्रीडा क्षेत्रात , लष्कर क्षेत्रात आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व यांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान मिळवा  लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जा " असा संदेश  त्याकाळी दिला .या पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद स्व यांचा नेहमीच अभिमान बाळगावा तितके थोडेच.

           श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .

                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)

( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)

         अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .

              आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू , बनू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत .

      याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती  केली ,शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान ,वजिर जो एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेला.  ते म्हणजेच मलिक अंबर हे होत .(उदाहरण . त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).

   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक हे प्रेषित मुहम्मद स्व.हेच . आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच  नष्ट केला .

तसेच ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून . नंतर मक्का विजयी दिवशी  पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश दिला व समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते.  समस्त मानव जात ही इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत .हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. यांनीच जगाला दिला.

           स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये..""

                   स्त्रियांना वारसाहक्कात , मालमत्तेत वाटा आहे . तो देणारे जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनीच दिला.

      विश्वातील पहिला घटस्फोटीत , विधवा महिलांसाठी पुनर्विवाह  ही संकल्पना मांडली व जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलाशी  स्वतः विवाह करून तुच्छ समजलं जाणार्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी पत्नी बनवून बहुमान दिला .

       स्री भ्रुण हात्या हे पाप आहे ही सांगणारं ही प्रेषित मुहम्मद पैगंबर च .

 अरब जगतात १४००-१५०० वर्षांपूर्वी समाजमनावर नसानसात भिनलेली होतं की , जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जातं असतं .  त्या जन्म झालेल्या मुलीला जिवंत पुरायच्या क्रुर प्रथा होती , तेथील स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं असतं.ती प्रथाच आपल्या २३ वर्षाच्या कालखंडात हद्दपार करून टाकली.

   स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत व त्या शिकल्या पाहिजेत असे ठणकावून सांगत दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्ती तुन , पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही वाटा आहे हा क्रांतिकारी विचार अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम प्रवचनातून (हॹतुल विदाह -खुतबा Farewell speech) मधे , त्यांनी महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले , " मित्रांनो ,पतीचे पत्नी वर हक्क आहे , तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला ,बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर , निष्ठुर होवू नये ,दयाळु राहा , तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर काळजी घ्यावी . पत्नी चे जे काही आधिकर असतील  ते सर्व द्या . तुमच्या वर विश्वास टाकला आहे ,तर विश्वासघात करू नका , तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या ) दिवशी अल्लाहा समोर हिशोब द्यावाच लागेल . या दिवसाची कायम आठवण ठेवा ."" 

  आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची  तळमळ व्यक्त केली , काळजी घेतली .

      महात्मा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे लिहीतात ,की, 

 ""    तेरावे सद्दीची पैंगंबरी खुण ! दावितो प्रमाण कुरआणात !

            जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

आनंद वतनी ज्योती म्हणे !! ""

             पुढे पुन्हा  महात्मा फुले  यांनी पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहिला व त्यात ते स्तुती करताना लिहीतात की , " 

     कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !

जात प्रमादास खोडी बुडी ! मोडीला अधर्म आणि मतभेद !

सर्वात अभेद ठाम केला !!! " 

(   अर्थात ;- " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला , गुलामगिरी नाकारली , जातिभेद, जातीपाती बुडासकट नष्ट केले , अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला , सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!')

      पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ इक्बाल लिहीतात  की ,.   

         " एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !!

         ना कोई बंदा रहा , ना बंदा नवाज ""!!!

( अर्थात :- मस्जिद मधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा , राष्ट्रपती ,च्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहिला ,कोणी गुलाम नाहीत कोणी मालक नाही ....)

पैगंबर स्व.यांनी अभुतपुर्व क्रांती घडवताना संपूर्ण अरब देशात व्यसनापासुन कित्येक संसार उध्वस्त झालेली पाहून नशा मुक्त, व्यसनमुक्त  चळवळी चालवुन संपूर्ण अरब प्रदेश व्यसन मुक्ती केला . ""  दारू बनवणारा ,त्याची विक्री करणारा ,  ने आन, व्यापार  करणारा , मदत करणारे सर्व गुन्हेगार ठरवले , ""  अरब प्रदेश व्यसन मुक्त केले .

     अर्थ व्यवस्थेत अभुतपूर्व क्रांती घडवून आणली बिना व्याजी अर्थव्यवस्था निर्माण केली , व्याज घेणं- देणं दोन्हीला हराम करून बंद केले , सावकारी पध्दतीचा नायनाट केला .

त्यासाठी श्रीमंत वर्गात जकात पध्दत चालु केली ती अनिवार्य करण्यात आली . यामुळे त्याचे चांगले परिणामही दिसू लागले , समाजातील बहुसंख्य कुटूंब जकात देण्या ईतपत सक्षम झाली व अशा कित्येक गरीबांना त्याचा लाभ झाला.

साक्षरतेची , शिक्षणाची अदुतिय क्रांती घडवून आणली . समाजातील स्री शिक्षण अनिवार्य केले , मुलं-मुली, वृध्द व्यक्तींवर शिक्षण अनिवार्य करण्यात येवून. एका शिक्षीतांने  दहा निरक्षरांना  ज्ञान देण्याचं काम करावे . जेलमधील शिक्षीत,साक्षर कैदींना निरक्षर कैद्यांना शिक्षण देणे अनिवार्य केले . शिक्षणाची अभुतपूर्व क्रांती घडवून आणली.

       आति- विशेष बाब  म्हणजे  जगातील इतिहासात तोडच नाही आशी विषेश  म्हणजे  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व . स्वतः एक निरक्षर , अशिक्षित असून , स्वतः ला लिहीता-वाचता येत नव्हते . तरी सुद्धा , सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व देवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला . याला एक अद्भुतीय  क्रांतीच घडवून आणली.

              या सर्व न भूतो न भविष्यते अशा घडवलेल्या क्रांती चे श्रेय स्वतः ला यतिकिंचतही न देता सर्व काही श्रेय जगत निर्मात्यां अल्लाहा रबबुल आलमीनला दिले !!! मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत .

ते स्वतः म्हणतं ,मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस , कार्यकर्ता आहे, हे सर्व यश अल्लाहा रबबुल आलमीन च्या कृपेने मिळालं आहे.आशी ठाम भूमिका घेउन स्वतः ची विनम्रता संपूर्ण जगासमोर मांडली ... केवढी मोठी विनम्रता ही जगाच्या इतिहासात तोडच नाही .

    प्रसिद्ध तत्वज्ञ ;- बर्नार्ड शॉ नोबेल पुरस्कार विजेते म्हणतात ,की ," मुहम्मद स्व .यांनी दिलेल्या शिकवणीबाबत माझ्या मनात आदर आहे .मी त्यांची प्रशंसा करतो कारण त्यांच्या मध्ये जबरदस्त तेज आहेत.प्रत्येक वयोगटास आवाहन करणारे आणि जीवनात होणारे परिवर्तन पोचविण्याचे सामर्थ्य असलेला हा एकमेव धर्म आहे असे मला वाटते .या व्यक्तींचा मी अभ्यास केला आहे, उद्याच्या युरोपला ईस्लामची तत्व प्रणाली मान्य होईल असे मी भाकीत केले आहे . कारण आजच्या युरोपने ते मान्य करण्यास सुरुवात केली आहे 



लेखक डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 

९२७१६४००१४ .....

श्रीरामपूर-पूर्णवाद नगर येथील  म्हसोबा महाराज मित्र मंडळा येथे  आम आदमी पार्टीचे नेते  तिलक डुंगरवाल यांनी सपत्नीक सत्यनारायण व महाअर्थी करत असताना त्यांनी गणपती रायास रेल्वे प्रशासनाला सद्बुद्धी दे  असेही साकडे  घातले अनेक रहिवाशांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूने लाखो  रुपये देऊन घर व्यापारी गाळे पन्नास वर्षांपूर्वी विकत घेतले त्यामध्ये व्यवसाय करून शहराच्या विकासाला हातभार लावला अनेकांनी आपले उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे चालू केले मात्र रेल्वे लाईन सेंटर पासून उत्तरेकडील व दक्षिणेकडील मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेण्याचे घाट घातला जात आहे यामुळे भयभीत झालेल्या शहर वासियांकडे राजकीय  पुढार्‍यांनी दुर्लक्ष केले मात्र आम्ही या विस्थापित होऊ पाहणाऱ्या  नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सुतवाच तिलक डुंगरवाल त्यांनी महाआरती प्रसंगी केले याप्रसंगी

म्हसोबा महाराज मित्र मंडळ

अध्यक्ष ऋषिकेश जऱ्हाड

सन्नी भिंगरदिवे, विनोद लोंढे, 

आपचे विकास डेंगळे,राहुल रण पिसे, बी एम पवार, रुपेश बिऱ्हाडे, दिनेश सोनवणे,नीरज वैद्य,गगन नितनवरे,अक्षय बिऱ्हाडे,सुनील पवार,गौतम त्रिभुवन,तोहित पिंजारी,नदीम पठाण, पियूष भांबुरे,आकाश म्हसे, निलेश हिवाळे आदी उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-पंधरा आँगस्ट निमित्त तहकुब झालेली ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली असुन पहील्यांदाच तंटामूक्ती अध्यक्षांच्या निवडीवरुन तंटा पहावयास मिळाला असुन सरपंच महेंद्र साळवी यांनी कुठलीही निवड झाली नसल्याचे सांगीतल्यामुळे वादावर पडदा पडला    १५ आँगस्ट निमित्त घेण्यत येणारी ग्रामसभा ३१ आँगस्ट रोजी घेण्यात आली होती परंतु कोरम अभावी ती तहकुब करण्यात आली तहकुब करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते सुरुवातीस ग्रामविकास अधीकारी मेघशाम गायकवाड यांनी मागील सभेच प्रोसिडींग वाचुन दाखविले त्यानंतर शासनाच्या विविध योजना बाबत चर्चा करण्यात आली १५ व्या वित्तआयोगांतर्गत  सन २०२४-२५ च्या आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली स्री जन्माचे स्वागत करुन गाव बाल विवाह मुक्त करण्याचेही ठराव करण्यात आले ऐनवेळी येणाऱ्या विषयात चंद्रकांत नाईक यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदाकरीता प्रकाश जाजु यांच्या नावाची सुचना मांडली त्या सुचनेस ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे अनुमोदन देत असतानाच गावकरी मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले हा विषय विषय पत्रीकेवर नसताना घेण्याचे कारणच नाही आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांचे कामकाज चांगले असल्यामुळे त्यांनाच मुदतवाढ दिल्याचे जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्यामुळे दोन्ही गटाकडून गदारोळ सुरु झाला त्यावर तोडगा काढत सरपंच महेंद्र साळवी यांनी हा विषय विषय पत्रीकेवर घेवुनच निवड करु असे सांगितले त्यानंतरही प्रफुल्ल डावरे व चंद्रकांत नाईक यांच्यात खडाजंगी झाली नेते मंडळीनी मध्यस्थी करुन दोघांनाही शांत केले या वेळी मारोतराव राशिनकर यांनी भंडारदरा धरणातुन के टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे तसेच गावात प्लँस्टीक बंदी करण्यात यावी अशी सुचना मांडली त्यास प्रकाश कुर्हे यांनी अनुमोदन दिले गेल्या काही दिवसापासून बेलापुर ग्रामपंचायत सत्ता बदला बाबत चर्चा सुरु होत्या सरपंच उपसरपंच यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात होते त्यामुळे आजच्या ग्रामसभेत नेकमे काय होणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती मात्र परस्पर दोन्ही विरोधी गटांना वाटत होते सरपंच आमचाच आहे त्यामुळे ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष पदाचा वाद सोडला तर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ठरावीक लोकांनीच माईकच ताबा घेतल्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना आपल्य समस्या मांडताच आल्य नाही ग्रामसभेस जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नवले मुस्ताक शेख  रमेश आमोलीक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक दत्ता कुर्हे  प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख महेश कुर्हे अशोक प्रधान वैभव कुर्हे दादा कुताळ प्रसाद खरात सचिन अमोलीक कामगार तलाठी पी बी सुर्यवंशी गोपी दाणी आरुण अमोलीक एकनाथ नागले पुरुषोत्तम भराटे शफीक बागवान प्रभात कुर्हे राजेंद्र कुताळ द्वारकनाथ कुताळ नितीन नवले विशाल आंबेकर अजीज शेख संतोष शेलार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget