Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-समींद्रा फौंडेशनच्या वतीने अनेक गरजु वंचित लाभार्थ्यांना जिवनावश्यक वस्तू तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले असुन जवळपास १२ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट देण्यात आले असल्याची माहीती फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव पा .थोरात यांनी दिली                                श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शालेय किटच्या साहित्याचे वाटप प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देविदास देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर ज्ञानदेव निबे संस्थेच्या सचिव सविता थोरात राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक बबनराव तागड ,मनिषा कोल्हे, उमेश थोरात उपस्थित होते. या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की या फौंडेशनच्या माध्यमातून ऊस तोड कामगार ,घिसाडी समाज तसेच समाजातील वंचित घटकांना विविध वस्तू, कपडे आदि साहित्य वाटप करण्यात आले तर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथेही मदत देण्यात आलेली आहे कुठलाही विद्यार्थी शैक्षणिक सोयी सुविधेमुळे शिक्षंणापासून वंचित राहु नये ही आपली भुमीका असल्याचे मत थोरात यांनी मांडले या वेळी प्राथमिक शाळा उक्कलगाव ,प्राथमिक शाळा पटेलवाडी ,प्राथमिक शाळा आटवाडी ,प्राथमिक शाळा वाकणवस्ती येथील  विद्यार्थ्यांना बँग ,कंपास ड्राईंग बुक वह्या कलर पेटी टुथ ब्रश व ईतर साहित्य भेट देण्यात आले या वेळी सुधीर आहेर, पत्रकार देविदास देसाई ,मनिषा कोल्हे, मेजर ज्ञानदेव निबे, बबनराव तागड तसेच शालेय विद्यार्थीनी सायली मोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी उक्कलगाव शाळेच्या मुख्याध्यापिका कविता गायकवाड, मनिषा साठे ,ज्योती तोरणे ,ज्ञानेश्वर चौधरी पटेलवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा भागवत, रविंद्र वाघ मारुती वाघ रामनाथ पिलगर मुराद सय्यद मनिषा टाके विनीत चांदेकर प्रितम मेहेरखांब प्रिया माहुरे नंदा चेमटे शंकर बर्डे रमेश रजपुत संजय मोरे ज्योतिबा श्रीराम विजया थोरात पाटील दिपक गोसावी आशिष निकम आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक उक्कलगाव शाळेच्या कविता  गायकवाड यांनी केले तर रविंद्र वाघ यांनी आभार मानले मारुती वाघ यांनी सूत्रसंचलन केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जीवन सुखी व समाधानी जगायचे असेल तर भक्ती मार्गाचा अवलंब करा. मुलांना सुसंस्कारीत करा आचरण शुद्ध ठेवा कुणाशी कपटनिती ठेवुन वागु नका.खोटे बोलु नका असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला .             आदिक मास निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की  मुलावर चांगले संस्कार करा तीच आपली संपत्ती आहे पैशाच्या मोहापायी जिवनातील आनंद गमावुन बसु नका मनुष्य जन्म हा एकदाच आहे याची जाणीव ठेवा प्राणीमात्रावर दया करा हिंसा करु नका भक्ती हे जीवनाचे सार आहे.ज्याच्याकडे समाधान आहे तो सर्वात सुखी माणूस आहे त्यामुळे समाधानी रहा सुख आपोआप प्राप्त होईल .कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे आपल्या गरजा किती  आहे ते कोरोनाने आपल्याला शिकविले आहे घरात बसुन देखील आपण आनंदात जीवन जगत होतो त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावताना दुःख पदरात घेवु नका जीवानाचा खरा आनंद कशात आहे हे जाणून घ्या सर्व संपत्ती येथेच सोडून आपल्याला जायचे आहे आपल्या बरोबर केवळ आपले कर्मच येणार आहे त्यामुळे सत्कर्म करा आसा उपदेशही महंत रामगीरी महाराज यांनी दिला या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा ,राजेश खटोड , रामविलास झंवर ,संजय राठी ,दिपक सिकची ,रामप्रसाद झंवर किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण ,भरत सोमाणी ,गोविंदराम दायमा ,विशाल वर्मा ,पत्रकार देविदास देसाई ,वकील संघटनेचे अध्यक्ष अँड विजयराव सांळूके ,सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज , विशाल आंबेकर ,प्रशांत खटोड ,गोपाल राठी ,अक्षय लढ्ढा ,मुकुंद चिंतामणी ,प्रमोद पोपळघट ,करण गोसावी ,आदिसह महीला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-राज्यातील सर्व दुकानदारांच्या मागण्या एकच असुन अधिवेशन संपल्यानंतर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवुन दुकानदारांच्या उचित मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळास दिले          राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की दुकानदारांना दिली जाणारे कमिशन हे तुटपुंजे असुन कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी दुकानदारांनी मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे घट मंजुर करण्यात यावी धान्याप्रमाणेच साखरेलाही १५० रुपये मार्जिन देण्यात यावी तसेच मागील साखरेच्या मार्जिनचा फरकही देण्यात यावा कोरोना काळात वितरीत केलेल्या कँरी फाँरवर्ड धान्याचे मार्जिन त्वरीत मिळावे माहे नोव्हेंबर डिसेंबर २०२२ महीन्यात धान्याचे पैसे भरले परंतु ते धान्य जानेवारी महीन्यात प्राप्त झाले असुन त्याचे वितरण मोफत करण्यात आले त्यामुळे चलनाने भरलेलै पैसे त्वरीत मिळावे पाँज मशिन जुन्या झाल्यामुळे बिल करताना वारवार अडथळे येतात त्यामुळे हाय स्पिडचे नविन पाँज मशिन देण्यात यावे दुकानदारांना धान्य मोजुनच दिले जावे सहकारी संस्थांच्या सेल्समन यांनाही वाटप केलेल्या कमिशनचा लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे अनिल मानधने दिलीप गायके संगमने तालुध्यक्ष काशिनाथ आरगडे नानासाहेब चौधरी नितीन गोरे सुखदेव खताळ सुर्यभान दिघे अशोक कानवडे आदिचा शिष्टमंडळात समावेश होता

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च एक ते दीड लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करावे याकरिता पत्रकार संघाच्या इलेक्टॉनिक मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी सर्व पत्रकार व सर्व श्रीरामपूर शहर हितचिंतकांना या कर्तव्य दक्ष अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या लढ्यात सोबत राहून श्रीरामपुरातील विकास कामे उत्कुष्ट व दर्जेदार करून घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आपण पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार केला आसून लवकरच रास्ता रोको देखील करणार असल्याचे अस्लम बिनसाद यांनी सांगितले या आंदोलनात शहरातील सामाजिक संघटना व सूदान नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे 

अहमदनगर  - (प्रतिनिधी ), लोणी येथे आढळलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासातच आरोपींचा छडा लावून दोन आरोपींना अटकही केले आहे                                         या बाबत हकीकत अशी की  दिनांक 30 जुलै रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगलगांव शिवार, लोणी, ता. राहाता येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी अंदाजे 45 ते 55 वर्षे वयाचे पुरुषाचे छातीवर कोणत्यातरी हत्याराने भोसकुन खुन केला. सदर घटने बाबत लोणी पोलीस स्टेशनचे पोना/निलेश मुक्ताजी धादवड यांचे तक्रारी वरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2023 भादविक 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयारा करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. 

त्या आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक   दिनेश आहेर यांनी पोलीस साब इन्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड काँन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर खुनाचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले त्या आधारे पथकाने आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 29 जुलै  रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर नंबर 135/2023 मधील मिसिंग व्यक्ती श्री. विठ्ठल नारायण भोर वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर हे बेपत्ता असले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणे बाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार नामे स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. सेंधवा, मध्यप्रदेश येथे जावुन आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मनोज वासुमल मोतीयानी, वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर व 2) स्वामी प्रकाश गोसावी वय 28, रा. सावेडीगांव, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.

त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दिनांक 29/07/23 रोजी माझी पांढरे रंगाची हुंडाई आय-20 कार मधुन जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार नामे स्वामी गोसावी याचे मदतीने मयताचे छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व मयताचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले बबत माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे. 


आरोपी नामे मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -6 गुन्हे दाखल आहेत 

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

एकाच कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत पोहोचविण्याचा मान देसाई परिवाराने मिळवीला असुन अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवा देत आहे तर दुसरा अभिषेक देसाई हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सेवा देत आहे त्या बद्दल राज्याचे महसुल, पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचे वडील जेष्ठ पत्रकार देविदास देसाई व आई सौ प्रतिभा देसाई यांचा सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे ,जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे आदि मान्यवर.

केंद्र सरकारच्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२६ कोटींची योजना बेलापूर (वार्ताहर) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बेलापुर बुद्रुक - ऐनतपुर येथील १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ उद्या रविवार दि.३० रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच तसेच श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक पा. खंडागळे यांनी दिली.

 या प्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पा., आ. लहू कानडे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जि. प. सदस्य शरद नवले, ज्येष्ठ भाजप नेते सुनिल मुथा, पं.स. चे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अधीक्षक अभियंता एस. एम. कदम, कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनील हरदास, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 जि.प.सदस्य शरद नवले यांच्या अधिपत्याखालील श्रीरामपूर रस्त्यावर सद्गुरु मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन सर्वश्री सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी एम. बी. गायकवाड, ग्रा. पं. सदस्या सौ. तबस्सुम बागवान, स्वाती अमोलीक, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, मिना साळवी, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, वैभव कू-हे, सौ . रंजना बोरुडे, शिला पोळ, छाया निंबाळकर, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक आदींनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget