Latest Post


बेलापूरःबेलापूरात सत्तांतर झाले नसून फक्त सरपंच हस्तांतरण झाले आहे.बहुमत आजही गावकरी मंडळाकडे असून गावकरी मंडळ अभेद्य आहे.काही झारीतल्या शुक्राचा-यांनी स्वार्थासाठी षडयंञ केले असले तरी ग्रामस्थांचा आम्हालाच पाठींबा आहे.सरपंच महेन्द्र साळवी हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले तरी त्यांना आम्ही अनुसुचित जागेचे आरक्षण असताना सरपंचपद दिले.त्यांनी आमच्यावर मी मागासवर्गिय असल्याने मला ञास दिला असा आरोप करणे निराधार आहे .आम्ही अडीच वर्षात एकदिलाने भरीव विकासकामे केली. गाव विकासाच्या वाटेवर असताना विरोधकांनी केवळ सत्तालालसेपायी कुटील डाव खेळून विकासाला खिळ घातली असल्याने ग्रामस्थच विरोधकांचा हिशोब चुकता करतील असा दावा  जि.परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे केला आहे.                             बेलापूरचे सरपंच महेन्द्र साळवी यांनी विरोधी गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जि.परिषद सदस्य श्री.शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,गावकरी मंडळाचे ग्रामपंचायत सदस्य सौ.तबसुम बागवान,कु.सविता अमोलिक,सौ.प्रियंका कु-हे ,सौ.मिना साळवी,सौ.उज्वला कुताळ,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे  यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात नमूद केले की, गावकरी मंडळ निवडून आले तेंव्हा चार सदस्य अनूसुचित जातीचे असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी प्रत्येकी  पंधरा महिने सरपंचपद असे सर्वानुमते ठरले होते.पण श्री.साळवी यांनी तिस महिने उलटून गेले तरी शब्द पाळला नाही. त्यांकडे वारंवार राजीनाम्याची मागणी केली पण त्यास प्रतिसाद न देता त्यांनी पदालालसेपोटी व आर्थिक तडजोडी करून विरोधकांशी हातमिळवणी केली.आता ते माझ्यावर दबाव असायचा,मला ञास दिला जायचा असे बिनबुडाचे आरोप करुन सारवासारव करीत आहेत.                         गावकरी मंडळाने गेल्या अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा करुन १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच साठवण तलावासाठी विनामुल्य साडे आठ एकर जमिन मिळविली.यात महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोलाचे सहकार्य केले.विरोधकांकडे वीस वर्षे सत्ता होती.राज्यातही काँग्रेसची सत्ता व हे ज्यांना नेते मानतात ते महसूलमंञी होते मग कां पाणी पुरवठा योजना व  साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.विरोधकांनी त्यांचेकडे सत्ता असताना कोणते भरीव काम केले हे सांगावे.आम्ही विधायक कामाला सहकार्य करु पण चुकीच्या कामाचा माञ विरोध करु.विरोधकांचे समाधान हे अल्पकाळासाठी आहे.लवकरच पुन्हा गावकरी मंडळाचीच सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे.                            गेल्या अडीच वर्षात गावकरी मंडळाने पाणीपुरवठा योजना व साठवण तलावाचे ऐतिहासिक काम मार्गी लावले.भुयारी गटारांची कामे केली.कारभार करताना एजंट निर्माण होवू दिले नाही.स्वच्छ व जनहिताचा कारभार केला.तीस महिने सरपंचपद भोगल्यावर सरपंच म्हणतात माझ्यावर दबाव होता.असा दबाव होता  तर त्याची यापूर्वी वाच्यता कां झाली नाही.संघटनेने राजीनामा मागीतल्यावरच  दबाव कसा आला. आम्ही गावाशी बांधिलकी राखून अहोराञ कामाला वाहून घेतले.जनतेला हे सर्व माहित आहे.त्यामुळे आता जे घडले ते जनतेला मान्य नाही.हा आमचा नाही तर जनमताचा  विश्वासघात आहे.जनतेची गावकरी मंडळाला सहानुभूती आहे.तेव्हा जनताच विरोधकांना धडा शिकवेल. ज्यांनी फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केले त्यांनी आता गाव विकासाची जबाबदारी घ्यावी असे सदर पञकात नमूद केले आहे.


श्रीरामपूर- श्रीरामपूरातील टिळकनगर येथील रांजनखोल चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवुन एका व्यापाऱ्यास लुटणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर), रोहित सोपान रामटेके (वय ३१, रां. रांजणखोल) अशी नावे असून त्यांनी आणखी एका अनोळखी साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ ग्रॅम वजनाची ७० हजाराची सोन्याची साखळी, २० हजार रुपये रोख रक्कम, १० हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकुण १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४, रा. खोसे वस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) यांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी २० हजार रुपये खिशात घेतले. त्यानंतर त्यांचा जुना ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडुन उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते.

राहाता येथे प्रशांत डांगे हे भेटले नाही, म्हणुन ते पुन्हा राहाता येथुन गणेशनगर, वाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमी प्रमाणे टिळकनगर कारखान्याचे पाठीमागुन एकलहरे मार्गे बेलापूरकडे जाण्यास निघाले. तेव्हा टिळकनगर येथील रांजनखोल चौकात दुपारी २ वाजेच्या सुमारास आले व चौकातुन पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकु दाखवुन त्यांना धमकावुन त्यांना एकलहरेकडे जाणारे रोडने घेवुन रांजनखोल शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साळुंखे वस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली.

मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवुन पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये तसेच गळ्यातील सोन्याची साखळी व एक विवो कंपनीचा मोबाईल काढुन घेतला. त्यानंतर आणखी पैसे पाहिजे म्हणुन मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आराओरडा केल्याने ते तिघे आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले.

   याबाबत खोसे यांच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पथकाने गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला असता संशयित इसम रईस शेरखान पठाण, रोहित सोपान रामटेके व त्याचा एक अनोळखी साथिदार यांनी सदरचा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात सापळा लावुन, शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. रामेश्वर ढोकणे, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. संभाजी खरात तसेच पो.ना. सचिन धनाड, पो. कॉ. प्रमोद जाधव व पो.कॉ. आकाश भैरट यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत


बेलापुर (प्रतिनिधी  )-गेल्या तीन महीन्यापासुन बेलापुरात सरपंच बदलाचे वारे वाहु लागले होते अविश्वास ठराव, सरपंच बदल अशी चर्चा सुरु असतानाच सरपंच महेंद्र साळवी यांनी अचानक घुमजाव घेत गावकरी मंडळाला रामराम करुन काँग्रेस ,जनता अघाडी युतीत प्रवेश करुन बेलापुरच्या राजकीय गोटात खळबळ उडवुन दिली आहे                                 या बाबत वृत्त असे की बेलापुर ग्रामपंचायतीत मागील झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर काँग्रेस जनता अघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या गावकरी मंडळाच्या हाती सत्ता येताच १५, १५ महीने सरपंच पद देण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार पहीला मान महेंद्र साळवी यांनी देण्यात आला त्या नंतर १५ महीने उलटुनही सरपंच महेंद्र साळवी राजीनामा देत नाही व श्रेष्ठी काहीच बोलत नाही या रागातुन गावकरी मंडळातुन निवडुन आलेले रमेश अमोलीक यांनी गावकरी मंडळाला गुडबाय करुन जनता अघाडी व काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला त्यानंतर काही चुकीच्या कामकाजावर आवाज उठविण्याचेही काम अमोलीक यांनी केले सरपंच साळवी यांना ३० महीन्यापेक्षा जास्त कार्यकाळ पुर्ण करुनही राजीनामा देत नसल्यामुळे गावकरी मंडळाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जावु लागला गेल्या तीन महीन्यापासुन सरपंच महेंद्र साळवी हे गावकरी मंडळाच्या विरोधी गटाच्या संपर्कात होते त्यांच्या वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या ,याची कुणकुण गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांना लागली होती तरीही त्यांनी शांततेची भुमीका घेतली सरपंच महेंद्र साळवी यांचाही समज पक्का झाला की नेत्याच्या पाठींब्याशिवाय कुणीच अविश्वास आणण्याचे धाडस करु शकत नाही त्यामुळे त्यांनीही बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड भरत साळूंके यांच्याशी संधान साधले त्यांनीही शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या राजकीय उक्तीप्रमाणे साळवी यांना जवळ केले जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्या समवेत बैठक घेतली त्या वेळी साळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी माझा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साळवी हे रविंद्र खटोड भरत साळूंके सुधीर नवले यांच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यामुळे शरद नवले यांनी तुम्हाला तुमचा मार्ग मोळका आहे परंतु आम्ही काहीच कमी केले नव्हते असे सांगुन ते निघुन गेले त्यानंतर बरच काही रात्रीत ठरविण्यात आले अन सकाळी  सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले या वेळी सुधीर नवले , रविंद्र खटोड ,भरत साळूंके अशोक राशिनकर अयाजअली सय्यद राजेश खटोड जाकीर शेख प्रकाश जाजु शेषराव पवार चंदु पा नाईक किशोर बोरुडे शफीक आतार जावेद शेख रमेश अमोलीक संजय शेलार ,विलास मेहेत्रे आदिसह असंख्य कार्यकर्ते होते या वेळी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली गावकरी मंडळाकडे आता ९ काँग्रेस जनता अघाडीकडे ७ जागा असे सध्यातरी संख्याबळ आहे यातील जनता अघाडीचा एक सदस्य यापुर्वीच अपात्र ठरलेला आहे दोनही गटांनी विरोधी गटातील दोन दोन सदस्य संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे गावकरी मंडळाकडे ९ सदस्य असले तरी त्यातील तीन सदस्य हे मुरकुटे गटाचे आहेत त्यामुळे आणखी काही राजकीय अदलाबदल होते की काय याची कुजबुज गावात सुरु आहे       काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव            बाजार समीतीत विखे गटाला धक्का देवुन काँग्रेसचे सुधीर नवले सभापती झाले गणेश कारखाना निवडणूकीतही विखेंना सत्तेपासुन दुर ठेवण्यात काँग्रेस सफल झाली तर बेलापुरातही विखेंचे निकटवर्ती शरद नवले यांच्याकडून काँग्रेसने सत्ता खेचुन एक प्रकारे विखेंना शहच दिलेला असल्याची चर्चा बेलापूर वा परिसरात सुरु आहे

दिनांक 9 जून रोजी 10 ते 5 वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरातुन फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिला कशाचेतरी आमिष दाखवुन फिर्यादीचे संमतीशिवाय पळवुन घेवुन गेला म्हणुन फिर्यादीचे तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशने येथे गुरनं. 552/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले, त्यानुसार तपास पथकाने तात्काळ आरोपीचा व अल्पवयीन मुलीचा शोध चालु केला, मोबाईल ट्रॅकीग, सी. डी. आर. / एस. डी. आर. रिपोर्ट तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातुन शोध चालु केला. पोलीस आपल्या मागावर आहेत यांची भनक आरोपीस लागल्याने सदर अल्पवयीन मुलीस दिनांक 10/06/2023 रोजी सांयकाळी 06/00 वा. सुमा. राहुरी फॅक्ट्ररी येथे सोडुन निघुन गेला होता. सदर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेवुन विचारपुर केली असता तिच्या शाळेचा बस चालक आरोपी नामे विजय गोविंद गोडसे, रा. देवळाली ता. राहुरी जि. अहमदनगर यांने माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे आई वडील तुला नेहमी त्रास देतात, ते मला पाहवत नाही, आपण त्याच्यापासुन लांब कुठेतरी निघुन जावु, असे बोलुन मला माझे राहते घरुन घेवुन गेला व मी अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुध्दा त्याने माझ्यावर लैगिक अत्याचार केला असा जबाब मुलीने दिल्याने सदर दाखल गुन्हयात भांदवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11, 12 प्रमाणे वाढ करुन आरोपीचा शोधाकरीता दोन वेगवेगळया टिम करुन शोध चालु केला.दिनांक 16/06/2023 रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांना सदर गुन्हयातील आरोपी हा रात्री 09/00 वा. सुमारास राहुरी फॅक्ट्ररी परीसरात येणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोनि. गवळी साो. यांचे आदेशाने सदर परिसरात तपास पथकाने सापळा रचुन शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीसांकडुन पोक्सो कायदयाबाबत जनजागृतीसाठी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, 18 वर्षे पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, प्रत्यक्ष वा सोशल मिडीयावरुन पाठलाग केल्यास प्रेमाच्या जाळयात ओढल्यास, पळवून नेल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांना असे कृत्य करण्यास मदत करणाऱ्या व्यक्ती विरुध्द तात्काळ पोक्सो कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येते.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे, स.फौ. सुधिर हापसे, पोना / रघुवीर कारखेले, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/ भारत तमनर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोना. सचिन धनाड, पोकॉ. / प्रमोद जाधव व पोकॉ. आकाश भैरट यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत.


बेलापुर (प्रतिनिधी  )-भारतीयांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.असे असले तरी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे पऱ्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा अन ती जगवा असा संदेश श्रीरामपूरचे वरिष्ठ वनपरिमंडळ अधिकारी एम डी कोळी यांनी केले. श्रीरामपुर  तालुक्यातील उक्कलगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .त्या वेळी कोळी यांनी हे अवाहन केले   या वेळी प्रवरा नदीकाठी दशक्रियविधी ओठयाजवळ कांचन वड करंजी लिंब शिवण 

आदी प्रकारच्या अकरा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.उक्कलगाव गळनिंब रस्त्यावर वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाचे दिपक निर्वाण ग्रामरोजगार सेवक शाम नागरे यांनी  त्या झाडांची योग्य निगा व काळजी घेतल्यामुळे आज रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या प्रकारे झाडांची वाढ झालेली दिसत असल्याचे पत्रकार देविदास देसाई यांनी सांगुन दोघांचेही अभिनंदन केले  यावेळी श्रीरामपूर वनपरिमंडळ अधिकारी संगिता चौरे सामजिक वनीकरण अधिकारी  दिपक निर्वाण वनीकरण कर्मचारी बाळासाहेब कांबळे विशाल कानडे बाळासाहेब आहेर प्रशासक दिपक मेहेरे ग्रामविकास अधिकारी रमेश निबे ग्रामरोजगार सेवक शाम नागरे अनिल थोरात सोमनाथ मोरे पोलिस पाटील हिराबाई मोरे विकास थोरात दिगबर मोरे नानासाहेब थोरात वनमजूर संजय गायकवाड बबन पिसाळ रामभाऊ मोरे किशोर थोरात रविंद्र मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

......

बेलापूरः (प्रतिनिधी  )-छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन रयतेचे राज्य साकारले.सामान्य माणूस व स्वराज्यातील गाव हे केन्द्रस्थानी माणून त्यांनी राज्यकारभार केला.शिवराय हे ख-या अर्थाने ग्रामविकासाचे प्रवर्तक होते असे प्रतिपादन जि.परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                                            बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले यांनी मनोगत व्यक्त केले.                        प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.यावेळी सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्रामविकास अधिकारी श्री.गायकवाड  यांचेसह  भास्कर बंगाळ,प्रकाश कु-हे ,प्रभात कु-हे ,महेश कु-हे ,दादासाहेब कुताळ,पञकार सुहास शेलार,प्रविण बाठीया,जनार्दन ओहोळ,प्रभाकर ताके,सुभाष  राशिनकर,अली शेख,बाबुराव पवार,सचिन साळुंके,विजय खरोटे आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिद्द चिकाटी व  कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हेच अभिषेक दुधाळ याने दाखवुन दिले असुन आजच्या तरुणासमोर अभिषेक एक आदर्श असल्याचे मत उपविभागीय अधिकारी किरण सांवत पाटील यांनी व्यक्त केले बेलापुर येथील अभिषेक दुधाळ याने युपीएससी परिक्षेत सलग तिन वेळेस घवघवीत यश मिळवीले नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्याने देशात२७८ वी रँक मिळवीली त्याबद्दल श्रीरामपुर महसुल विभागाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते उपविभागीय अधीकारी किरण सावंत पुढे म्हणाले की तरुणांनी आगोदर आपले ध्येय निश्चित करावे व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी अनेक जण प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात परंतु प्रयत्नवादी रहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक दुधाळ असल्याचेही सावंत पाटील म्हणाले या वेळी प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनीही अभिषेक दुधाळ याचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना अभिषेक दुधाळ याने मी घेतलेले कष्ट व त्याला मिळालेले आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार या सर्वांचे आशिर्वाद व प्रेम  यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले या वेळी योगेश भालेकर रामेश्वर शेले सावळे भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब धनवटे भाऊसाहेब अभया राजळव शारदा वाघ मिलींद दुधाळ पत्रकार देविदास देसाई आदि  मान्यवर उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget